शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
3
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
4
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
5
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
6
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
7
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
8
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
9
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
10
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
11
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
12
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
13
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
14
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
15
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
16
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
17
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
18
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
19
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
20
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...

‘द ग्रेट डिव्हायडर ऑफ इंडिया’ म्हणजेच ‘देशाचा सर्वात मोठा दुभंगकर्ता’

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2019 06:19 IST

‘टाइम’ या जागतिक कीर्तीच्या नियतकालिकाने मुखपृष्ठावर नरेंद्र मोदींचे छायाचित्र छापून, त्यासोबत ‘द ग्रेट डिव्हायडर आॅफ इंडिया’ (भारताचा दुभंग करणारा नेता) असा मजकूर प्रकाशित केला आहे.

‘टाइम’ या जागतिक कीर्तीच्या नियतकालिकाने मुखपृष्ठावर नरेंद्र मोदींचे छायाचित्र छापून, त्यासोबत ‘द ग्रेट डिव्हायडर आॅफ इंडिया’ (भारताचा दुभंग करणारा नेता) असा मजकूर प्रकाशित केला आहे. त्यामुळे स्वाभाविकच मोदींचा पक्ष आणि त्यांचा संघ परिवार त्यावर भडकला आहे. आम्ही तथाकथित ‘हिंदुराष्ट्र’ निर्माण करण्याच्या प्रयत्नात असताना, ‘टाइम’वाले आम्हालाच ‘दुभंगकर्ते’ म्हणतात ही त्यांची व्यथा. भारत हे बहुधर्मी, बहुभाषी व संस्कृतीबहुल राष्ट्र आहे. त्यात ८० टक्के लोक हिंदू, तर २० टक्के अन्य धर्मीय आहेत. त्यातील मुसलमानांची संख्या १७ कोटी तर ख्रिश्चनांची दोन कोटी आहे. मोदींच्या पक्षाचा या दोन्ही धर्मांवर राग आहे.

फार पूर्वी ओडिशा या राज्यात त्याने १,२०० चर्चेस जाळून खाक केली. गोध्राकांडानंतर त्याने गुजरातमध्ये दोन हजार मुसलमानांची कत्तल केली. आता नॅशनल रजिस्टर आॅफ सिटीझन्सच्या नावावर आसामातील मुस्लिमांना देशाबाहेर घालविण्याची त्यांनी तयारी केली आहे, तर ३५ अ हे कलम बदलून काश्मीरचा प्रदेश बड्या भांडवलदारांना हॉटेल्ससाठी देण्याची त्यांची तयारी आहे. सगळ्या ‘सुधारणा’ मुसलमानांवर लादण्याची त्यांची त-हाही डिवचणारी आहे. गोवधबंदी (हिंदू शेतकऱ्यांना कितीही त्रासाची असली तरी) मुसलमानांचे खाद्य तोडण्यासाठी त्यांनी आणली.

तलाकबंदी, बहुपत्नीत्वाला आळा घालणारा कायदा हे सारे उपाय त्यांच्यासाठी केले जात आहेत. गोमांसाच्या संशयावरून त्यांनी मुसलमानांची घरे उत्तर प्रदेशात जाळली, तर दलित तरुणांना गुजरातमध्ये मरेस्तोवर मारहाण केली. अल्पसंख्याकही भारतीय आहेत, पण त्यांची बाजू घेणा-या पत्रकारांवर बेकारी लादून त्यांना भाजपने अडचणीत आणले. मुसलमानांची भारतातील संख्या, पाकिस्तानातील मुसलमानाहून अधिक आहे. इराण, इराक, इजिप्त, सौदी अरेबिया, अफगाणिस्तान या देशातील मुस्लीम लोकसंख्येहूनही ती मोठी आहे. एवढ्या मोठ्या लोकसंख्येला दुखावत राहण्याचा व त्यांच्याविरुद्ध जाणारे पक्षपाती निर्णय घेण्याचा प्रकार त्या समाजाला दूर लोटण्याचाच नव्हे, तर देशात दुभंग घडवून आणण्याचा आहे.

दलित पायदळी तुडवायचे, मुसलमान हाकलायचे, ख्रिश्चनांना परके ठरवण्याचा उद्योग मोदींच्या नेतृत्वात सुरू असताना, त्यांचे सहकारी व परिवार टाळ्या वाजविणारा आहे. हे एके काळी श्रीलंका सरकारने तामिळांविरोधात केले. म्यानमार सरकार रोहिंग्याबद्दल करीत आहे. अमेरिकेचे सरकार मेक्सिकनांविरुद्ध करीत आहे. पाकिस्तानात अहमदीया पंथाविरुद्ध सुरू आहेत. अनेक पाश्चात्त्य कृष्णवर्णीयांविरुद्ध करीत आहेत. हा प्रकार समाजात दुही निर्माण करण्याएवढाच देशात दुभंग माजविण्याचा आहे. तो करणाऱ्यांना प्रशंसक लाभणे ही दुर्दैवाची बाब आहे. देश अखंड राहावा, म्हणून बलिदान करणा-या महात्मांच्या देशात देश तोडणा-यांचे हे उपद्व्याप सुरू असलेले पाहणे हा दुर्दैवी प्रकार आहे. येथे कुणी कुणाचे जास्तीचे लाड करीत नाही. कुणी कुणाचा अनुनय करीत नाही. तरीही तशा प्रचाराला प्रोत्साहन देणे आणि देश एकाच धर्माचा असल्याची हाळी देणे हा देश तोडण्याचाच प्रकार आहे.

समाजात सामंजस्य-एकोपा असेल तर देश टिकतो नाही, तर त्याचे रशियासारखे १५ तुकडे होतात, हे जगाने पाहिले आहे. धर्म, भाषा, संस्कृती, जीवनपद्धती यांचे वेगळेपण कायम राखूनही एकात्मता टिकविणे हा राष्ट्रधर्म आहे. त्यात जे दुभंगवादी असतात, त्यांना देशप्रेमी म्हणायचे की देशविरोधी? नरेंद्र मोदींना ‘देशाचा सर्वात मोठा दुभंगकर्ता’ असे ‘टाइम’ने म्हटले असेल, तर ते या सा-या पार्श्वभूमीवर खरेच आहे. त्यांच्या या प्रयत्नांना विरोध करणे व समाजात समतोल कायम राखणे हीच खरी देशभक्ती. ज्या समाजात माणसे जाती-धर्माच्या नावाने वेगळी केली जातात व त्यांच्याकडे तसे पाहिले जाते, त्या समाजात ऐक्य कसे राहील? त्यामुळे ‘टाइम’ या नियतकालिकाने दिलेला इशारा साºयांनी नीट समजून घेतला पाहिजे व देशात दुभंग करणा-यांपासून सावधच नव्हे, तर दूर राहिले पाहिजे.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदी