शहरं
Join us  
Trending Stories
1
"एक स्पष्ट आदेश... पक्षातील कोणीही..."; मराठीचा मुद्दा गाजत असतानाच राज ठाकरेंची फेसबूक पोस्ट
2
"रेल्वे कर्मचाऱ्याला तमीळ येत नव्हतं, म्हणून दुर्घटना घडली", आता तामिळनाडू रेल्वे-व्हॅन अपघातातही भाषेची एन्ट्री!
3
भारताचे INS महेंद्रगिरी शत्रूला पाणी पाजायला तयार! चीन-पाकिस्तानची झोप उडणार, काय आहे यात खास? जाणून थक्क व्हाल!
4
ठाकरे बंधूंची युती होईल का, किती टिकेल? स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वतींची मोठी भविष्यवाणी
5
मराठी शाळा बंद, ५००० शिक्षकाचं आंदोलन, मुख्यमंत्र्यांनी त्याकडे लक्ष द्यावं- सुप्रिया सुळे
6
“ज्येष्ठ कलाकार मनमोहन माहिमकर यांना बेघर होऊ देणार नाही”; DCM एकनाथ शिंदेंनी दिली ग्वाही
7
महाराष्ट्रातील सीईटी कक्षाकडून घेण्यात येणाऱ्या प्रवेश नोंदणीला मुदतवाढ; विद्यार्थी हितासाठी निर्णय!
8
टॉप 10 अब्जाधिशांच्या यादीतून बिल गेट्स बाहेर, संपत्तीत मोठी घसरण
9
कोट्यवधी लोकांना खूशखबर, पीएफच्या खात्यात जमा झाले व्याजाचे पैसे, असा तपासा बॅलन्स
10
१४ वर्षांच्या पोराचा आणखी एक पराक्रम! आता वैभव सूर्यंवशीनं मोडला शुबमन गिलचा विक्रम
11
११ तासांत काय घडलं? अविनाश जाधव यांनी सगळं सांगितलं; अटक, सुटका ते मोर्चाची Inside Story
12
येमेनमध्ये भारतीय नर्स निमिषा प्रियाला फाशीची शिक्षा; न्यायालयाने तारीख ठरवली
13
इतके पैसे कुठून आणता? निशिकांत दुबेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा; मालमत्तांची यादीच शेअर केली
14
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
15
भारतीय क्रिकेटर स्मृती मन्धानाला इंग्लंडमध्ये मिळाला 'लाल गुलाब'; फोटो व्हायरल, रंगली चर्चा
16
गोपाल खेमका हत्याकांडात मोठा गौप्यस्फोट, एका व्यावसायिकानेच दिली होती सुपारी, समोर आलं असं कारण
17
“राज ठाकरेंच्या मविआतील सहभागावर अद्याप चर्चा नाही”; रमेश चेन्नीथला यांनी केले स्पष्ट
18
पोलीस अधिकाऱ्यानं चोरला ट्रेनमध्ये झोपलेल्या प्रवाशाचा मोबाईल, जवळ उभे असलेले फक्त बघतच राहिले; VIDEO व्हायरल
19
योगी सरकारमधील महिला मंत्र्यांच्या ताफ्याला मोठा अपघात, झाल्या गंभीर जखमी  
20
विधानसभेचे विरोधी पक्षनेते पद रिक्त, विरोधकांची सरकारवर टीका; विधिमंडळात पायऱ्यांवर आंदोलन

‘द ग्रेट डिव्हायडर ऑफ इंडिया’ म्हणजेच ‘देशाचा सर्वात मोठा दुभंगकर्ता’

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2019 06:19 IST

‘टाइम’ या जागतिक कीर्तीच्या नियतकालिकाने मुखपृष्ठावर नरेंद्र मोदींचे छायाचित्र छापून, त्यासोबत ‘द ग्रेट डिव्हायडर आॅफ इंडिया’ (भारताचा दुभंग करणारा नेता) असा मजकूर प्रकाशित केला आहे.

‘टाइम’ या जागतिक कीर्तीच्या नियतकालिकाने मुखपृष्ठावर नरेंद्र मोदींचे छायाचित्र छापून, त्यासोबत ‘द ग्रेट डिव्हायडर आॅफ इंडिया’ (भारताचा दुभंग करणारा नेता) असा मजकूर प्रकाशित केला आहे. त्यामुळे स्वाभाविकच मोदींचा पक्ष आणि त्यांचा संघ परिवार त्यावर भडकला आहे. आम्ही तथाकथित ‘हिंदुराष्ट्र’ निर्माण करण्याच्या प्रयत्नात असताना, ‘टाइम’वाले आम्हालाच ‘दुभंगकर्ते’ म्हणतात ही त्यांची व्यथा. भारत हे बहुधर्मी, बहुभाषी व संस्कृतीबहुल राष्ट्र आहे. त्यात ८० टक्के लोक हिंदू, तर २० टक्के अन्य धर्मीय आहेत. त्यातील मुसलमानांची संख्या १७ कोटी तर ख्रिश्चनांची दोन कोटी आहे. मोदींच्या पक्षाचा या दोन्ही धर्मांवर राग आहे.

फार पूर्वी ओडिशा या राज्यात त्याने १,२०० चर्चेस जाळून खाक केली. गोध्राकांडानंतर त्याने गुजरातमध्ये दोन हजार मुसलमानांची कत्तल केली. आता नॅशनल रजिस्टर आॅफ सिटीझन्सच्या नावावर आसामातील मुस्लिमांना देशाबाहेर घालविण्याची त्यांनी तयारी केली आहे, तर ३५ अ हे कलम बदलून काश्मीरचा प्रदेश बड्या भांडवलदारांना हॉटेल्ससाठी देण्याची त्यांची तयारी आहे. सगळ्या ‘सुधारणा’ मुसलमानांवर लादण्याची त्यांची त-हाही डिवचणारी आहे. गोवधबंदी (हिंदू शेतकऱ्यांना कितीही त्रासाची असली तरी) मुसलमानांचे खाद्य तोडण्यासाठी त्यांनी आणली.

तलाकबंदी, बहुपत्नीत्वाला आळा घालणारा कायदा हे सारे उपाय त्यांच्यासाठी केले जात आहेत. गोमांसाच्या संशयावरून त्यांनी मुसलमानांची घरे उत्तर प्रदेशात जाळली, तर दलित तरुणांना गुजरातमध्ये मरेस्तोवर मारहाण केली. अल्पसंख्याकही भारतीय आहेत, पण त्यांची बाजू घेणा-या पत्रकारांवर बेकारी लादून त्यांना भाजपने अडचणीत आणले. मुसलमानांची भारतातील संख्या, पाकिस्तानातील मुसलमानाहून अधिक आहे. इराण, इराक, इजिप्त, सौदी अरेबिया, अफगाणिस्तान या देशातील मुस्लीम लोकसंख्येहूनही ती मोठी आहे. एवढ्या मोठ्या लोकसंख्येला दुखावत राहण्याचा व त्यांच्याविरुद्ध जाणारे पक्षपाती निर्णय घेण्याचा प्रकार त्या समाजाला दूर लोटण्याचाच नव्हे, तर देशात दुभंग घडवून आणण्याचा आहे.

दलित पायदळी तुडवायचे, मुसलमान हाकलायचे, ख्रिश्चनांना परके ठरवण्याचा उद्योग मोदींच्या नेतृत्वात सुरू असताना, त्यांचे सहकारी व परिवार टाळ्या वाजविणारा आहे. हे एके काळी श्रीलंका सरकारने तामिळांविरोधात केले. म्यानमार सरकार रोहिंग्याबद्दल करीत आहे. अमेरिकेचे सरकार मेक्सिकनांविरुद्ध करीत आहे. पाकिस्तानात अहमदीया पंथाविरुद्ध सुरू आहेत. अनेक पाश्चात्त्य कृष्णवर्णीयांविरुद्ध करीत आहेत. हा प्रकार समाजात दुही निर्माण करण्याएवढाच देशात दुभंग माजविण्याचा आहे. तो करणाऱ्यांना प्रशंसक लाभणे ही दुर्दैवाची बाब आहे. देश अखंड राहावा, म्हणून बलिदान करणा-या महात्मांच्या देशात देश तोडणा-यांचे हे उपद्व्याप सुरू असलेले पाहणे हा दुर्दैवी प्रकार आहे. येथे कुणी कुणाचे जास्तीचे लाड करीत नाही. कुणी कुणाचा अनुनय करीत नाही. तरीही तशा प्रचाराला प्रोत्साहन देणे आणि देश एकाच धर्माचा असल्याची हाळी देणे हा देश तोडण्याचाच प्रकार आहे.

समाजात सामंजस्य-एकोपा असेल तर देश टिकतो नाही, तर त्याचे रशियासारखे १५ तुकडे होतात, हे जगाने पाहिले आहे. धर्म, भाषा, संस्कृती, जीवनपद्धती यांचे वेगळेपण कायम राखूनही एकात्मता टिकविणे हा राष्ट्रधर्म आहे. त्यात जे दुभंगवादी असतात, त्यांना देशप्रेमी म्हणायचे की देशविरोधी? नरेंद्र मोदींना ‘देशाचा सर्वात मोठा दुभंगकर्ता’ असे ‘टाइम’ने म्हटले असेल, तर ते या सा-या पार्श्वभूमीवर खरेच आहे. त्यांच्या या प्रयत्नांना विरोध करणे व समाजात समतोल कायम राखणे हीच खरी देशभक्ती. ज्या समाजात माणसे जाती-धर्माच्या नावाने वेगळी केली जातात व त्यांच्याकडे तसे पाहिले जाते, त्या समाजात ऐक्य कसे राहील? त्यामुळे ‘टाइम’ या नियतकालिकाने दिलेला इशारा साºयांनी नीट समजून घेतला पाहिजे व देशात दुभंग करणा-यांपासून सावधच नव्हे, तर दूर राहिले पाहिजे.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदी