शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

इथेनॉलवर बंदीचा सरकारचा निर्णय; शेतकऱ्यांचे नुकसान वाढून भडका उडेल

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2023 05:52 IST

चालू हंगामात साखरेचे उत्पादन घटेल, म्हणून खबरदारीचा उपाय म्हणून सरकार असा निर्णय घेत आहे, असे सांगितले जात आहे.

स्वातंत्र्याचे अमृतमहोत्सवी वर्ष पार पडल्यानंतरही शेती-शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत मुक्ततेचे वारे पोहोचत नाही. सरकार कोणत्याही पक्षाचे किंवा आघाडीचे असो, जनतेच्या हितासाठी म्हणून गळे काढीत शेती व्यवसायाला सुळावर चढविले जात आहे. कांदा महागला म्हणून निर्यातबंदी केली जाते. तांदळाचे उत्पादन घटण्याची शक्यता व्यक्त होताच निर्यातीवर निर्बंध आणले जातात. एवढेच नव्हे, तर टोमॅटो महागले म्हणून त्याची आयात करून माफक दरात ग्राहकांना वाटण्याची योजना आखली जाते. शेतीमालाचे दर पडतात तेव्हा मात्र, सरकार नावाची यंत्रणा हात वर करते. आता उसापासून तयार करण्यात येणाऱ्या इथेनॉल उत्पादनाविषयी असाच परंपरेत बसणारा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे.

इथेनॉलचे उत्पादन वाढवा, आता केवळ साखर उत्पादन करून चालणार नाही, असे राज्यकर्तेच सांगत होते. साखर उद्योगाशी संबंधित क्षेत्राने गुंतवणूक करून सुमारे ४५० इथेनॉलचे प्रकल्प देशभरात उभारले. त्याचे दर निश्चित केले. पेट्रोलमध्ये किमान दहा ते वीस टक्के इथेनॉल मिश्रित करून साखर उद्योगाचे भले करूया, असे जाहीर आश्वासन दिले होते. परिणामी, ऊस उत्पादक शेतकऱ्यांना जादा दर देता येईल, असेही सांगून झाले. चालू गळीत हंगामाच्या प्रारंभी देशातील साखरेचा साठा ५७ लाख टन होता. या हंगामात ३२५ लाख टन उसाचे गाळप होईल. त्यापैकी पंधरा लाख टन उत्पादन इथेनॉलसाठी वापरले जाईल. सुमारे ३१० लाख टन साखरेचे उत्पादन होईल आणि शिल्लक साठा मिळून ३६७ लाख टन साखर २०२३-२४ मध्ये उपलब्ध असणार आहे. देशांतर्गत साखरेचा खप २९० लाख टन आहे. ७७ लाख टन साखर पुढील वर्षाचा हंगाम (२०२४-२५) सुरू होत असताना शिल्लक असेल. केंद्र सरकारच्या धाेरणानुसार किमान ६० लाख टन साठा शिल्लक ठेवण्याचे धोरण असते. ती पूर्तता होत असतानाही उसाच्या रसापासून इथेनॉल उत्पादन करण्यावर सरकारने बंदी घालण्याचा आदेश जारी केला आहे.

चालू हंगामात साखरेचे उत्पादन घटेल, म्हणून खबरदारीचा उपाय म्हणून सरकार असा निर्णय घेत आहे, असे सांगितले जात आहे. इथेनॉलचा वापर वाढवू, तुम्ही उत्पादन वाढवा, असे साखर उद्योगाला सांगितले जात होते. साखरेचे दर वाढतील म्हणून या उद्योगाला (इथेनॉल निर्मिती) कुलूप लावा, असे सांगणे कितपत योग्य आहे? चालू वर्षात आणि पुढील वर्षी (२०२४) साखर कमी पडणार नाही. साठा कमी असल्याने थोडे दर वाढण्याची शक्यता आहे. ऊस उत्पादनाचा खर्च भरमसाठ वाढला आहे. उसाला वाढीव दर द्यावा लागत असल्याने साखर उत्पादनाचा खर्च वाढला आहे. पेट्रोल, डिझेल, खतांचे दर वाढले आहेत. साखर कर्मचारी-कामगारांचे पगार वाढले आहेत. अशावेळी साखर उद्योगाच्या उत्पन्नावर थेट परिणाम करणारा इथेनॉल प्रकल्प बंद ठेवण्याचा निर्णय सरकार कसे काय घेऊ शकते? उसापासून केवळ साखर उत्पादन करणारा प्रकल्प किफायतशीर होत नाही, हे आता सिद्ध झाले आहे. यासाठीच अनेक कंपन्यांनी आणि साखर कारखानदारांनी सुमारे ७० हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करून इथेनॉलचे देशभरात ४५० प्रकल्प उभे केले आहेत. त्यातून मिळणाऱ्या उत्पन्नाची बाजू पाहता कच्च्या मालाला (उसाला) जादा दर दिला जात आहे. या साऱ्यावर आता पाणी फिरणार आहे.

साखरेसाठी शेतकऱ्यांनी अनेक वेळा दरातील घसरण सहन केली. साखर कारखानदारांनी कारखाने कर्जे काढून चालविले. त्यांचे विस्तारीकरण केले. इथेनॉल हा साखर उद्योगाचा विस्तार करायची संधी आहे, असे अधिकृत धोरण सरकारने घेतले. बंदी घालणारच असाल, तर इथेनॉल प्रकल्पामध्ये गुंतविलेल्या भांडवलाचा खर्च (व्याज रूपाने) सरकारने उचलावा; अन्यथा शेकडो वस्तू-सेवांचे दर वाढतात तसे साखरेचे उत्पादन घटल्याने त्याचेही दर वाढू द्यावेत. इथेनॉलचा वापर थांबल्यावर पेट्रोलची मागणी वाढणार आहे. कच्चे तेल आयात करूनच आपण पेट्रोलची गरज भागवितो. साखर थोडीशी कमी पडली, तर थोडे दर वाढतील. त्या उद्योगातील चढ- उतारात ग्राहकांनीही थोडा तोटा सहन करावा. थोडे अधिकचे पैसे खर्च करावेत, तसेच साखरेचा वापर कमी करावा. प्रत्येक वेळी शेती- शेतकऱ्यांच्या नुकसानीकडे दुर्लक्षच करायचे, हे बरोबर नाही. साठ वर्षांत होत राहिले तेच आम्ही करणार, असे जाहीर तरी करून टाकावे; अन्यथा या बंदीचा विपरीत परिणाम साखर उद्योगावर होईल आणि शेतकऱ्यांचे नुकसान वाढून भडका उडेल!

टॅग्स :Central Governmentकेंद्र सरकारFarmerशेतकरी