शहरं
Join us  
Trending Stories
1
“स्वाभिमान असेल तर शिंदे-पवारांनी सरकारमधून बाहेर पडावे, अमित शाह...”; संजय राऊतांची टीका
2
कैसन बा...ठीक बा...! एकनाथ शिंदेंनी साधला उत्तर भारतीयांशी संवाद; उद्धव ठाकरेंना लगावला टोला
3
क्राइम पेट्रोल मनात बसले! रुग्णाने आजारी असूनही डॉक्टरांची घेतली धास्ती, पुढे जे झाले...
4
जमीन-दुकान विकून अमेरिका गाठली अन् बेड्या घालून भारतात परतले 'ते' तरुण! नेमकं काय झालं?
5
प्रेक्षकांवर ‘राजा’ फेकणाऱ्या नाकामुराचा गुकेशने केला टप्प्यात कार्यक्रम; पाहा Video...
6
'द फॅमिली मॅन' सीझन ३ 'या' तारखेला होणार प्रदर्शित; 'नोव्हेंबर'मध्ये थरार पाहण्यासाठी सज्ज व्हा!
7
Yogi Adityanath: आता यूपीतील लोकांना उपचारांसाठी दिल्लीला जाण्याची गरज नाही: योगी आदित्यनाथ 
8
Jaipur Bus Accident: कामगारांनी भरलेली बस हाय-टेन्शन लाईनच्या संपर्कात आली, १० जण गंभीर भाजले; दोघांचा मृत्यू
9
२०२५ मध्ये तिसऱ्यांदा डिविडेंड देणार 'ही' डिफेन्स कंपनी, एका शेअरवर ६ रुपयांचा फायदा; पटापट चेक करा डिटेल्स
10
लाडकी बहीण योजनेसाठी सरकार किती निधी देते? ‘इतके’ कोटी होतात खर्च, आकडा पाहून व्हाल अवाक्
11
तुम्ही देखील सोने-चांदी खरेदी करुन घरात ठेवलंय? CA नितीन कौशिक म्हणतात ही गुंतवणूक नाही तर...
12
राज्यातील जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या निवडणुका पडणार लांबणीवर? समोर येतंय असं कारण 
13
Suryakumar Yadav: श्रेयसच्या दुखापतीची बातमी मिळताच सूर्याचा फिजिओला फोन, आता कशी आहे त्याची तब्येत?
14
"पुन्हा मलाच...", तिसरी वेळ राष्ट्राध्यक्ष बनण्याची इच्छा; स्वतःचं कौतुक करत डोनाल्ड ट्रम्प म्हणाले...
15
प्रत्येक टनामागे १ रुपया...! 'वसंतदादा शुगर'ची चौकशी लागली; शरद पवार, अजितदादांशी संबंधीत संस्था कचाट्यात
16
"पुढच्या दीड वर्षात सिनेमा बंद होईल...", महेश मांजरेकरांनी केलं भाकीत; असं का म्हणाले?
17
समस्त ओला ईलेक्ट्रीक स्कूटर मालकांसाठी महत्वाची बातमी! तुमचे तुम्हीच स्पेअर पार्ट घ्या, मेकॅनिककडून दुरुस्त करा...
18
२५ देशामध्ये अफाट संपत्ती, मॉलचेही आहेत मालक; 'हे' आहेत UAE चे सर्वात श्रीमंत भारतीय, ५० हजार कोटींपेक्षा अधिक नेटवर्थ
19
मंदीच्या काळातही ‘या’ 8 क्षेत्रांत कर्मचारी कपातीचा धोका नाही, भविष्यात मोठी संधी; जाणून घ्या...
20
VIRAL : महिला प्रवासी रिक्षात विसरली इयरफोन; वस्तू परत करण्यासाठी रिक्षा चालकाने लढवली 'अशी' शक्कल! होतंय कौतुक

सिरोंचाची सुवार्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2018 00:38 IST

आदिवासींच्या दुर्दशेस सरकारचे भांडवलशाही धोरण कारणीभूत असून त्याचा विरोध माओने दाखवून दिलेल्या सशस्त्र क्रांतीच्या मार्गानेच करता येईल, अशा शब्दात हजारो वंचितांची डोकी भडकवून त्यांच्या हातात बंदूक देणाऱ्या नक्षलवादाने या देशाला वेठीस धरले आहे.

आदिवासींच्या दुर्दशेस सरकारचे भांडवलशाही धोरण कारणीभूत असून त्याचा विरोध माओने दाखवून दिलेल्या सशस्त्र क्रांतीच्या मार्गानेच करता येईल, अशा शब्दात हजारो वंचितांची डोकी भडकवून त्यांच्या हातात बंदूक देणाऱ्या नक्षलवादाने या देशाला वेठीस धरले आहे. या नक्षल्यांनी गडचिरोली जिल्हयात तर नुसता हैदोस घातला आहे. जिल्ह्याच्या टोकावरील सिरोंचा तालुका तर नक्षल्यांचे आवडते ठिकाण. या ठिकाणावरूनच नक्षल्यांनी आधी महाराष्ट्र आणि नंतर छत्तीसगडमध्ये प्रवेश करून दहशतीचा विस्तार केला. परंतु आता याच सिरोंचातून एक सुवार्ता कानी येत आहे. मंगळवारच्या चकमकीत पोलिसांनी नक्षल नेता सुनील कुळमेथे व त्याची पत्नी स्वरूपा यांचे एन्काउंटर केल्यानंतर नक्षल्यांना मोठा हादरा बसला बसून ३५ वर्षांपासून येथे सुरू असलेल्या लाल दहशतीचे पर्व आता संपल्यात जमा आहे. नक्षल चळवळीच्या उदयानंतर जेव्हा या चळवळीतल्या धुरीनांनी आपला कार्यविस्तार करण्याचे ठरवले तेव्हा सर्वप्रथम त्यांची नजर महाराष्टÑ, छत्तीसगडमधील जंगलाकडे गेली. हा प्रदेश नक्षल चळवळ फोफावण्यासाठी पोषक असल्याचे हेरून तत्कालीन आंध्र प्रदेशात येणाºया करीमनगर जिल्ह्यातून गोदावरी पार करून नक्षल्यांनी गडचिरोली जिल्हयात प्रवेश केला आणि गडचिरोलीत जिल्ह्याचा बहुतांश भाग व्यापत छत्तीसगडच्या जगदलपूर, बस्तर, राजनांदगाव व इतर जिल्ह्यांमध्ये पाय पसरत आपला जम बसविला. सिरोंचा तालुका तर नक्षल्यांच्या लेखी आवडते ठिकाण होते. परंतु पोलिसांच्या चौफेर अन् काटेकोर नियोजनामुळे येथे हिंसक कारवाया कमी व्हायला लागल्या होत्या. परंंतु ‘रेस्ट झोन’ म्हणून या तालुक्याला नक्षली अजूनही सुरक्षित ठिकाण समजत होते. पण, गेल्या ६ डिसेंबरला कल्लेडच्या जंगलात पोलिसांनी एकावेळी ७ नक्षलींचा बळी घेतला. ३ एप्रिलला पुन्हा चकमकीत तिघांना टिपले. या मोठया हानीनंतर सिरोंचा तालुक्यातूच आता नक्षल चळवळ हद्दपार होण्यास सुरूवात झाली आहे. पण, म्हणून लगेच हुरळून जाणे योग्य होणार नाही. ज्या कारणामुळे येथील तरुणांनी बंदुका हाती घेतल्या ती कारणे आजही कायम आहेत. ही संपत आलेली चळवळ पुन्हा डोके वर काढू नये असे सरकारला वाटत असेल तर आधी ही कारणे संपवावी लागतील. हा जिल्हा अजूनही उद्योगरहित आहे. हजारो आदिवासी आजही जंगलावर निर्भर आहेत. आजही येथे रुग्णांना खाटेवर लोटवून रुग्णालयात आणले जाते. सरकारी अधिकारी येथे काम करायला तयार नाहीत. येथे राहणारे मागसलेले असले तरी शेवटी माणसे आहेत. त्यांनाही भावना-अपेक्षा आहेत आणि अपेक्षाभंग हे विद्रोहाचे पहिले कारण असते. म्हणून सरकारने या भागात त्वरित पायाभूत सुविधांचे जाळे उभारावे. येथील बेरोजगारांच्या हाताला काम मिळाले तर ते बंदुकीकडे वळणार नाहीत आणि आज केवळ सिरोंच्याहून आलेली ही सुवार्ता उद्या अवघा गडचिरोली जिल्हा व्यापून उरेल.

टॅग्स :naxaliteनक्षलवादीgadima awardगदिमा पुरस्कारMaharashtraमहाराष्ट्र