शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

पोप फ्रान्सिसना शुभेच्छा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2019 05:46 IST

आधुनिक विचारसरणीशी जुळवून घेणारे धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांनी संयुक्त अरब अमिरातीला दिलेल्या ऐतिहासिक भेटीमुळे इस्लाम आणि ख्रिश्चन या दोन्ही धर्मांतच नव्हे, तर संपूर्ण जगभरात आशावादाची नवी पालवी फुटली आहे.

सध्याचे सर्वश्रेष्ठ रोमन कॅथलिक धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांनी संयुक्त अरब अमिरात या मुस्लीम राष्ट्राला दिलेली पहिली भेट जेवढी ऐतिहासिक आणि धार्मिक तेवढीच भविष्यकालीन महत्त्वाची ठरावी, अशी आहे. या दोन धर्मांतील वैराला शेकडो वर्षांचा इतिहास आहे. प्रत्यक्षात सातव्या शतकात सुरू झालेले त्यांच्यातील युद्ध ७०० वर्षे चालून १४ व्या शतकात इस्तंबूलच्या तहाने थांबले. त्या तहानेच त्या धर्मांच्या पश्चिमेकडील सीमा निश्चित केल्या. मात्र नंतरच्या काळातीलही त्यांच्यातील वैर थांबले नाही आणि आज अरब गनिमांचे सुरू असलेले ख्रिश्चनविरोधी लढे हेही त्याच इतिहासाशी जोडले आहेत.मुसलमानांचा इतिहास केवळ ख्रिश्चनांशी केलेल्या युद्धांनी भरलेला नाही, तर त्यांनी केलेल्या लढायांनी तो ज्यू धर्माशीही जोडलेला आहे. इस्लामची भारतावरील पहिली स्वारी सातव्या शतकातीलच आहे. चौदाव्या शतकात त्यांना दिल्लीत प्रथम आपली सत्ता स्थापन करता आली. सारांश सारे मध्ययुग धर्मांच्या युद्धांनी ग्रासले आहे आणि त्यात आजवर किती माणसे मेली याचा इतिहास लिहायला ज्ञानी माणसेही धजावलेली नाहीत. या पार्श्वभूमीवर पोप फ्रान्सिस यांची ख्याती त्यांच्या आधुनिक विचारांमुळे व प्रगतीशील धोरणांमुळे साऱ्या जगात फार मोठी मानावी, अशी आहे. त्याचवेळी अरब अमिरातीचे राजकुमार शेख महंमद बिन झायेल अल-निहान हेही त्यांच्या प्रागतिक धोरणांसाठी प्रसिद्ध आहेत. ख्रिश्चन व अरब जगतातील तेढीमुळे त्या दोन्ही धर्मांचे व क्षेत्रांचे आजवर केवढे नुकसान झाले व त्यांना किती मोठ्या आर्थिक आपदांना तोंड द्यावे लागले, याची त्या दोघांनाही कल्पना आहे. त्याखेरीज धार्मिक युद्धाच्या तहानंतर जी धर्माधिष्ठित राष्ट्रे तयार झाली, त्यातील कधी उघड तर कधी सुप्त संघर्ष तसाच धुमसत राहिला.नंतरच्या काळात वेगवेगळ्या निमित्तांनी या दोन प्रदेशांत असलेली जनतेतील धार्मिक तेढ त्यांना स्वस्थ राहू देत नाही, याचीही जाणीव या दोन्ही व्यक्तींना आहे. त्याचमुळे अमिरातीच्या सरकारने गेल्या काही वर्षांपासून धार्मिक तेढ व द्वेष कमी करणारे व अन्य धर्मांविषयीची आस्था वाढविणारे कार्यक्रम हाती घेतले आहेत. तिकडे पोप फ्रान्सिस प्रगतीशील आहेतच. त्यांनी कम्युनिस्ट देशांसह अन्य धर्मपंथांच्या देशांनाही आजवर भेटी दिल्या आहेत. जगातील बहुसंख्य देशांत सध्या धार्मिक व वर्णविषयक दुहीने थैमान घातले आहे. धर्मांधांच्या कडव्या संघटना आपल्याच धर्मातील उदारमतवादी व प्रगतीशील लोकांच्या हत्या करीत आहेत. आपल्याच देशबांधवांना हद्दपार करून देशाबाहेर घालविण्याचे कामही ते करीत आहेत.दक्षिण-मध्य आशिया आणि दक्षिण व उत्तर अमेरिका या संघर्षाने व्यापली आहे. पूर्वेकडेही ब्रह्मदेशाच्या सीमेवर रोहिंग्या आदिवासींची, केवळ ते मुसलमान आहेत म्हणून त्या देशातील बौद्धांनी हद्दपारी व कत्तल चालविली आहे. भारतासारख्या स्वत:ला धर्मनिरपेक्ष समजणाºया देशातही धार्मिक तणाव आहे आणि धर्माच्या नावावर हिंसा होत असलेली जगाला दिसते आहे. धर्माचा आधार श्रद्धा आहे आणि श्रद्धांवर तर्कांना आणि विज्ञानाला मात करता येत नाही. यातील सारे प्रश्न फक्त स्नेह, मैत्री, आत्मीयता आणि हृदयपरिवर्तन याच मार्गाने सोडविता येतात. आवश्यक बाबी साध्य करता येतात. असा भव्य प्रयत्न भारतात महात्मा गांधींनी याआधी केला. नंतरच्या काळात मात्र धर्मा-धर्मांतील तेढ वाढविण्याचेच राजकारण करण्याचे, त्यावर आपली राजकीय पोळी भाजून घेण्याचे प्रयत्न झाले.जगातील कोणत्याही प्रदेशात धर्म आणि राजकारण जेव्हा एकत्र येतात तेव्हा ते कमालीचे हिंस्र आणि एकांगी होतात. त्याची ठळक उदाहरणे गेल्या काही दशकांत आपल्याकडेही उग्र स्वरूपात पाहायला मिळाली. जे असा द्वेष निर्माण करतात किंवा त्याला खतपाणी घालतात त्यांना अशा धार्मिक उन्मादात पोळलेल्यांकडे नंतर पाहायलाही वेळ मिळत नाही, हेही देशाने अनुभवले. या पार्श्वभूमीवर इस्लाम आणि ख्रिश्चन धर्माच्या नेत्यांनी एकत्र येण्याचा हा प्रसंग जगात आशावादाची नवी पालवी निर्माण करणारा आहे. याआधी अमेरिकेचे माजी अध्यक्ष बराक ओबामा यांनी इजिप्तमधील ऐतिहासिक सभागृहात भाषण करून असा प्रयत्न केला होता. पोप फ्रान्सिस यांचा प्रयत्न यापुढे जाणारा असेल आणि तो यशस्वी होत असेल, तर त्याला साºया जगाने शुभेच्छा दिल्या पाहिजेत.

टॅग्स :Popeपोप