शहरं
Join us  
Trending Stories
1
गोंदियात EVM चं सील तोडल्याचा आरोप तर सांगलीत रातोरात मतदान वाढल्याचा दावा; स्टाँगरूमबाहेर राडा
2
मुंबईत दुबार मतदारांचा गोंधळात गोंधळ सुरुच; पहिल्याच प्रयोगात नावाशी साधर्म्य असणारेच सर्वाधिक मतदार
3
पतीची हत्या करून ड्रममध्ये टाकणाऱ्या मुस्कानची नवी मागणी; तुरुंगात प्रियकरासाठी केली ही मागणी
4
कर्जासाठी कायपण! पाकिस्तानला विकावी लागणार सरकारी विमान कंपनी; 'फिल्ड मार्शल' मुनीर यांचा डोळा
5
मुलींसाठी LIC ची जबरदस्त स्कीम, ₹१२१ रुपयांच्या बचतीतून मिळेल लाखोंचा रिटर्न; कोणती आहे योजना?
6
"डोळे मिट, मनात इच्छा धर, फुंकर मार"... रोहित शर्मा- ऋषभ पंत यांचा भर मैदानात वेगळाच 'खेळ'; व्हिडिओ व्हायरल
7
भाजपाचं धक्कातंत्र सुरूच...! श्रीकांत शिंदेंच्या मतदारसंघातील शिंदेसेनेचे बडे नेते लावले गळाला
8
Post Office मध्ये ६० महिन्यांसाठी २ लाख रुपये जमा केले तर मॅच्युरिटीवर किती रक्कम मिळेल? पटापट चेक करा डिटेल्स
9
आजचे राशीभविष्य, ४ डिसेंबर २०२५: अचानक धनप्राप्ती अन् विविध फायदे होतील, ज्याने आनंदित व्हाल
10
Orange Gate Tunnel: सोळा मजली उंच इमारतीइतक्या खोल, ७०० इमारतींखालून जाणार ऑरेंज गेट बोगदा
11
Bike Taxi: बेकायदेशीर बाईक टॅक्सी चालवणाऱ्या ' रॅपिडो, उबेर 'ला बसणार दणका; कंपन्यांवर गुन्हे दाखल होणार
12
संयुक्त राष्ट्रात १० दिवसांत भारताविरोधात ३ प्रस्ताव; रशियानं 'व्हेटो' वापरत निभावली मैत्री
13
प्रशिक्षणादरम्यान F-16C लढाऊ विमान वाळवंटात कोसळलं; कॅलिफोर्नियातील थरारक घटना!
14
रुपया नव्वदीपार, गाठला ऐतिहासिक तळ; महागाई वाढणार, विद्यार्थ्यांपासून गृहिणींपर्यंत सर्वांना बसणार फटका
15
हळद पिवळी पोर कवळी...! तेजस्वीनी लोणारीची लगीनघाई, हळदी समारंभाचे फोटो समोर
16
शेतकरी मदतीचा मुद्दा गाजला; कृषिमंत्री आधी म्हणाले, ‘नाही’ नंतर म्हणाले, ‘हो, प्रस्ताव आला’
17
चापलूस एआय तुमची हुजरेगिरी करायला सोकावले आहे!
18
लंकादहन: भाजप-शिंदेसेनेतील वाद गाजला, सत्तापक्षांतील वादांचे निवडणुकीत झाले प्रदर्शन
19
विशेष लेख: व्हेंटिलेटरवर ठेवलेली ‘राज्यघटना’ समजून घेताना...
20
Indigo Flights Issue: ...म्हणून इंडिगोची सेवा ढेपाळली; १०० पेक्षा जास्त विमाने झाली रद्द
Daily Top 2Weekly Top 5

सुवर्णमध्य जरुरी

By admin | Updated: October 21, 2015 04:06 IST

केन्द्रात नवे सरकार आल्यापासून देशातील पायाभूत सुविधांच्या विकासावर खूप जोर देण्यात येत आहे. विशेषत: महामार्ग आणि रेल्वे या दळणवळण सुविधा जागतिक दर्जाच्या करण्यावर

केन्द्रात नवे सरकार आल्यापासून देशातील पायाभूत सुविधांच्या विकासावर खूप जोर देण्यात येत आहे. विशेषत: महामार्ग आणि रेल्वे या दळणवळण सुविधा जागतिक दर्जाच्या करण्यावर तर अधिकच भर देण्यात येत आहे व ते योग्यही आहे. केवळ विकसितच नव्हे, तर अन्य विकसनशील देशांच्याही तुलनेत, भारतातील पायाभूत सुविधांची स्थिती अत्यंत खराब आहे, हे कुणीही अमान्य करणार नाही. भारताला महासत्ता म्हणवून घेण्याची घाई झाली असताना, खड्डेयुक्त महामार्ग, डुगडुगत धावणाऱ्या रेल्वेगाड्या व बेभरवशाची हवाई सेवा हे चित्र परवडण्यासारखे नाही. मात्र पायाभूत सुविधांच्या विकासासाठी लागणारा प्रचंड पैसा उभा करण्यासाठी कल्याणकारी योजनांवरील खर्चात कपात करावी का? पायाभूत सुविधांचा विकास हे देशहिताचेच काम असले तरी लोकसंख्येतील एक मोठा घटक अर्धपोटी झोपत असताना, कुपोषणामुळे बालकांचे बळी जात असताना, सहा पदरी, आठ पदरी महामार्गांचा, बुलेट टे्रनचा आग्रह धरणे कितपत योग्य आहे, हा प्रश्न इतर कुणी उपस्थित केला असता, तर त्याच्यावर ‘खांग्रेस समर्थक’ असल्याचा शिक्का मोदी भक्तांकडून नक्कीच मारला गेला असता. मात्र हा प्रश्न मोदी मंत्रिमंडळातील महिला व बाल कल्याण मंत्री आणि स्वत: गांधी असूनही गांधी घराण्याच्या कट्टर विरोधक असलेल्या मेनका गांधींनीच उपस्थित केला आहे. एका विदेशी वृत्तसंस्थेला मुलाखत देताना, मेनका गांधींनी अलीकडेच त्यांची घुसमट मांडली. कल्याणकारी योजनांसाठीच्या आर्थिक तरतुदींना कात्री लावण्यात आल्यामुळे लक्षावधी आरोग्य कर्मचाऱ्यांचे वेतन देणेही दुरापास्त झाले आहे आणि त्यामुळे बाल कुपोषणाविरुद्धची लढाई लढायची तरी कशी, असाच प्रश्न उपस्थित झाल्याचा त्यांचा सूर होता. त्यांनी उपस्थित केलेला मुद्दा उडवून लावण्यासारखा निश्चितच नाही. आज जगात बाल कुपोषणाचा सर्वाधिक दर असलेल्या देशांमध्ये भारताचाही समावेश होतो. जगातील कुपोषित बालकांपैकी ४० टक्के एकट्या भारतात आहेत. वयाची पाच वर्षेही पूर्ण न केलेल्या सरासरी तीन हजार बालकांचा भारतात दररोज कुपोषणामुळे मृत्यू होतो. चीनला मागे टाकण्याची नव्या सरकारला घाई झाली आहे व त्यात काही चुकीचे नाही. मात्र चीनने विकसित जगाशी स्पर्धा सुरू करण्यापूर्वी, सगळी कवाडे बंद करून घेऊन आधी नागरिकांच्या भुकेचा प्रश्न सोडविला, हे विसरता येणार नाही. भारताला केवळ चीनशीच नव्हे, तर सर्वच विकसित देशांशी स्पर्धा करावीच लागणार आहे. केवळ कल्याणकारी योजनांवर भर देणारे आधीचे सरकार आणि निव्वळ पायाभूत सुविधांच्या मागे लागलेले विद्यमान सरकार, यांच्या धोरणांचा सुवर्णमध्य साधला तरच ते शक्य होईल.