शहरं
Join us  
Trending Stories
1
PM Modi vs Congress: "काँग्रेस म्हणजे भ्रष्टाचाराची जननी, त्यांना विकासाची ABCD माहिती नाही"; पंतप्रधान मोदी विरोधकांवर बरसले!
2
...तर पक्ष तेव्हाच फुटला असता; शरद पवारांच्या दाव्यावर छगन भुजबळांची पहिली प्रतिक्रिया
3
"प्रेक्षकांचा आवडता संघ नेहमी जिंकेलच असं नाही पण लोकशाहीत...", सचिनचं मतदारांना आवाहन
4
Video: धोनी मॅच संपल्यावर RCBच्या खेळाडूंशी जे वागला, त्यावर विश्वासच बसेना! नेटकऱ्यांनीही केली टीका
5
शेतातील ५० लाख झाडांवर कुऱ्हाड! अधिक पिकांसाठी जमीन हवी म्हणून तोडली झाडे - अहवाल 
6
यावेळीही ट्रॉफी जिंकण्याचे RCB चे स्वप्न भंगणार? एक योगायोग अन् चाहत्यांचे टेन्शन वाढले
7
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
8
१% ते १००% पर्यंतचा प्रवास! RCB ची गाडी सुस्साट; ५ खेळाडूंमुळे मिळाले प्ले ऑफचे तिकीट
9
नाशिकमध्ये निवडणुकीत कोणाला पाठिंबा देणार? मनोज जरांगे पाटलांनी स्पष्टच सांगितलं
10
नातू प्रज्वल रेवण्णावरील आरोपांवर माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी मौन सोडले; म्हणाले, दोषी आढळला तर...
11
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
12
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
13
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
14
पुण्यात आलिशान पोर्शे कारने दोघांना चिरडले; तरुण-तरुणी जागीच ठार
15
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
16
भाजप आरएसएसला संपवायला निघालाय, उद्धव ठाकरे यांचा मुंबईत संयुक्त पत्रकार परिषदेत आरोप
17
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू
18
'छगन भुजबळांना मुख्यमंत्रिपद दिले असते तर पक्ष...'; शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
19
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
20
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार

एकाच कॅनव्हासवर ‘ईश्वर अल्लाह तेरो नाम’!

By अतुल कुलकर्णी | Published: February 05, 2018 12:08 AM

मथळा वाचून आश्चर्य वाटेल. कारण जातीपातीत, धर्मात तेढ निर्माण करून राष्ट्रवाद, देशभक्ती, देशद्रोही अशी लेबलं लावून मनाची वाटणी केली की अन्य मूलभूत प्रश्नांकडे पाहण्यासाठी वेळ कुणाला उरतो.

मथळा वाचून आश्चर्य वाटेल. कारण जातीपातीत, धर्मात तेढ निर्माण करून राष्ट्रवाद, देशभक्ती, देशद्रोही अशी लेबलं लावून मनाची वाटणी केली की अन्य मूलभूत प्रश्नांकडे पाहण्यासाठी वेळ कुणाला उरतो. आजकाल वाईट किंवा चांगला अशा दोनच गटात माणसं, विचार वाटून घेतले जात आहेत. जातीधर्मामध्ये लोकांना लढायला लावले की लोक त्यातच गुंग होतात. अशावेळी एकच कॅनव्हास घेऊन त्यावर ईश्वर आणि अल्लाह लिहिण्याची हिंमत करण्याचा सद्विचार अंमलात आणला तो दुर्मिळ होत चाललेल्या अक्षरलेखनात स्वत:चे नाव जागतिक पातळीवर नेणा-या अच्युत पालव यांनी.राज्याच्या राजधानीत सतत काही ना काही घडत असते. चर्चा मात्र राजकारणाची जास्त होते. ज्या विषयामुळे राज्यात, देशात वाद होऊ शकतात असे विषय टाळण्याकडे सगळ्यांचा कल असताना अच्युत पालव यांनी तोच विषय अत्यंत संवेदनशीलतेने हाताळत ‘ईश्वर अल्लाह तेरो नाम’ ही संकल्पना घेऊन मोठे काम उभे केले आहे. याआधी जगभरातील उर्दू, पर्शियन, अरबी भाषेत अक्षरलेखन (कॅलिग्राफी) करणा-यांचा एक ‘कॅलिग्राफी बिनाले’ शारजा येथे भरला होता. जगातील तमाम मुस्लीम कॅलिग्राफर त्यात सहभागी होते. त्यासाठी पालव यांनी देवनागरीत केलेले कॅलिग्राफीचे काम पाठवले. तेथे त्यांना विशेष आमंत्रित म्हणून बोलावले गेले आणि त्या ठिकाणच्या निवडक कामांचे जे पुस्तक निघाले त्याच्या कव्हरवर पालव यांनी देवनागरीत केलेले काम झळकले होते. त्यात ते एकमेव हिंदू कॅलिग्राफर होते. अक्षरांनी धर्म पाहून न्याय केला नव्हता हे किती चांगले...! त्यातूनच ईश्वर अल्लाहची संकल्पना प्रत्यक्षात आकाराला आली आहे. या सगळ्या कामांचे देखणे प्रदर्शन उद्या मंगळवारपासून मुंबईत नेहरू सेंटर येथे सुरू होत आहे.आजकाल चांगले अक्षर काढणे, शाईच्या पेनाने लिखाण करणे या तशा दुर्मिळ किंवा बिनकामाच्या गोष्टी झाल्या आहेत. मनात विचार आले की कोणत्याही भाषेत गुगल गुरुजीला सांगितले की बोटांनी टाईप करण्याचे कष्टही तो तुम्हाला देत नाही. अशा काळात शाईचा आणि कागदाचा हाताला होणारा स्पर्श, त्याचा वास, गंध या गोष्टी कधीच मागे पडल्या. वेगवेगळ्या आकाराच्या शाईच्या पेन, त्यासाठी शाईची दौत, शाई भरण्याचे ड्रॉपर, पेनाच्या पत्तीला (नीब) टोक करून देण्यासाठी वापरला जाणारा घासपेपर या सगळ्या गोष्टी आता परिकथेत जमा झालेल्या असताना अक्षरातून आपला स्वभाव व्यक्त करता येतो, अक्षरं तुमच्यावर संस्कार करत असतात हा विचार घेऊन काम करणाºया अच्युतला जेव्हा याचे महत्त्व विचारले जाते तेव्हा तो सहज सांगून जातो.लता मंगेशकर हे नाव नाजूकपणे लिहिले पाहिजे आणि ओसामा बिन लादेन हे नाव ढब्ब्या ढब्ब्या अक्षरातच. दोघांची जातकुळीच वेगळीय... म्हणूनच अशा वेगळ्या जातकुळीचा हा माणूस ईश्वर आणि अल्लाह एकाच कॅनव्हासवर चितारण्याचे अप्रतिम काम करू शकतो. चुकून अडखळत पडलेलं मूल आम्ही आजही पटकन जाऊन उचलतो. त्यावेळी ते कोणत्या जातीधर्माचं आहे हे अजून तरी आम्ही विचारत नाही. यानिमित्ताने हे विचारण्याचं धाडस आमच्यात न येवो, हीच काय ती अपेक्षा...!