शहरं
Join us  
Trending Stories
1
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
2
भंडाऱ्याचे काँग्रेस खासदार प्रशांत पडोळेंच्या गाडीचा भीषण अपघात; ट्रकची धडक, चौघांना किरकोळ दुखापत
3
Ladki Bahin Yojana: 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने'च्या ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी येणार? आदिती तटकरेंनी दिली माहिती
4
तालिबानचे नवे फर्मान! इस्लामविरोधी असल्याचे सांगत अफगाण शाळांमधून काढून टाकले ५१ विषय
5
सणासुदीपूर्वी सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा घसरण; खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याची नवी किंमत
6
'शिवाजीनगर मेट्रो स्टेशनचे नाव सेंट मेरी करा'; आमदाराच्या मागणीला CM सिद्धरामय्यांचा होकार
7
Navratri 2025: नवरात्रीची सुरुवात कधीपासून? घटस्थापनेचे महत्त्व, नऊ रंग आणि उत्सवाची पार्श्वभूमी जाणून घ्या
8
Milk Rate: ४ रुपयांनी स्वस्त होणारे का अमूलचं दूध? कंपनीच्या एमडींनी सांगितला संपूर्ण प्लान
9
भारताच्या 'या' राज्यात राहतात सर्वाधिक नेपाळी लोक, सरकारी सोयीसुविधांचाही घेतात लाभ!
10
"तुमची मुलगी नक्षलवादी आहे, तिचे आधारकार्ड द्या !" पोलिसांना माओवाद आणि मार्क्सवाद यातील फरक समजत नाही का?
11
विश्रांतीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार 'अँक्शन मोड'मध्ये! प्रशासनाला दिले महत्त्वाचे आदेश
12
पत्नीचं अफेअर, घराच्या छतावर चाळे करताना पतीने बॉयफ्रेंडसह पकडलं, त्यानंतर दिली ऐकून थरकाप उडेल अशी शिक्षा
13
भारतात राहून पोस्ट ग्रॅजुएशन अन् देशालाच उडवण्याची योजना; पोलिसांनी सांगितले अटक केलेल्या ५ दहशतवाद्यांचे मनसुबे! 
14
साखरेच्या डब्यात मुंग्याच मुंग्या; पाहून डोक्याचा होतो भुगा, 'या' घरगुती उपायाने होतील छूमंतर
15
VIDEO: बापरे... मगर आणि पाणघोडा आले समोरासमोर, दोघांमध्ये तुफान जुंपली... कोण जिंकलं?
16
"प्रत्येक खासदाराला १५ कोटी देऊन भाजपाने मत खरेदी केले"; 'क्रॉस व्होटिंग'वर सर्वात मोठा दावा
17
"आता पहिल्यासारखं आयुष्य नाही..."; एकाच मुलीशी लग्न करणाऱ्या २ भावांवर कोसळला दु:खाचा डोंगर
18
नवीन गाडीची डिलिव्हरी घेताना अपघात झाला तर? महिंद्रा थारच्या घटनेतून जाणून घ्या विमा क्लेमचे नियम
19
Google Pixel 9: चक्क अर्ध्या किंमतीत खरेदी करा गुगल पिक्सेल ९; कॅमेऱ्यानं अनेकांना लावलंय वेड!

गडकरींचा ‘डॉक्टरी’सल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2018 00:44 IST

डॉक्टरांनी विद्वत्ता आणि गुणवत्तेसोबतच सामाजिक दायित्वाचे पालन केले पाहिजे. यामुळे त्यांना आपल्या कार्याचे संपूर्ण समाधान मिळेल. पॅ्रक्टिस करणा-या कुठल्याही डॉक्टरसाठी नैतिकता ही प्राधान्यक्रमावर असली पाहिजे, अशी अपेक्षा केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केली आहे.

डॉक्टरांनी विद्वत्ता आणि गुणवत्तेसोबतच सामाजिक दायित्वाचे पालन केले पाहिजे. यामुळे त्यांना आपल्या कार्याचे संपूर्ण समाधान मिळेल. पॅ्रक्टिस करणा-या कुठल्याही डॉक्टरसाठी नैतिकता ही प्राधान्यक्रमावर असली पाहिजे, अशी अपेक्षा केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केली आहे. नागपुरात गुरुवारी भारतीय बालरोग परिषदेस प्रारंभ झाला. या परिषदेचे उद्घाटन गडकरी यांच्या हस्ते झाले. यावेळी उपस्थित असलेल्या समस्त डॉक्टर समुदायासमोर त्यांनी या क्षेत्राशी संबंधित जी विविध मते मांडली ती केवळ त्यांची एकट्याची नसून प्रातिनिधिक स्वरुपाची आहेत. सर्वसामान्य लोकांच्या मनात आज डॉक्टरांबद्दल ज्या भावना निर्माण झाल्या आहेत, डॉक्टर आणि रुग्णांमधील नात्यात अविश्वासाचा जो गंध येऊ लागला आहे त्या पार्श्वभूमीवर गडकरी यांनी ज्या भावना बोलून दाखविल्या त्याचा डॉक्टरांनी अंतर्मुख होऊन विचार करण्याची नितांत आवश्यकता आहे. गडकरींची एक शैली आहे. एरवी आपल्या एखाद्या कार्यकर्त्याकडूनही चूक झाली की ते त्याची जाहीर शस्त्रक्रिया करीत असतात. ती सुद्धा अ‍ॅनस्थेशियाशिवाय. विशेष म्हणजे यामुळे कुणी दुखावतही नाही. नेमकी अशीच शस्त्रक्रिया त्यांनी काल डॉक्टरांची केली. देशातील सरकारी रुग्णालयांची दुरवस्था आणि डॉक्टरांच्या तुटवड्याबद्दल त्यांनी आपल्या भाषणात ऊहापोह केला. त्याचाही विचार आता सर्व पातळीवर झाला पाहिजे. कारण या देशातील वैद्यकीय सेवा आणि शिक्षणाचा ढासळता दर्जा चिंतेचा विषय झाला आहे. देशात निर्माण होणारे डॉक्टर्स, त्यांची उपलब्धता आणि गुणवत्ता यांच्यात अजूनही योग्य ताळमेळ बसलेला नाही. अनेक डॉक्टरांचा दर्जा हा भोंदू डॉक्टरांपेक्षा किंचित वरचा असल्याचे विधान खुद्द एका माजी आरोग्य सचिवानेच केले होते. त्याचप्रमाणे डॉक्टरांच्या कमतरतेकडे जागतिक आरोग्य संघटनेने यापूर्वी लक्ष वेधले आहे. आजमितीस देशातील सुमारे ३९० वैद्यकीय महाविद्यालयांमधून वर्षाला जवळपास ५५ हजार डॉक्टर्स तयार होतात. सध्या आपल्या येथे साडेसात लाख डॉक्टर्स कार्यरत आहेत. म्हणजे १७०० लोकांमागे एक डॉक्टर असे हे प्रमाण आहे. ते अर्थातच कमी आहे. पण केवळ डॉक्टरांची संख्या वाढवूनही भागणार नाही. कारण डॉक्टर उपलब्ध असले तरी ग्रामीण भागात जाऊ इच्छित नाहीत. सरकारी सक्तीचाही आता त्यांच्यावर परिणाम होईनासा झाला आहे. एकूण परिस्थिती बघता शासनानेही आता ढासळत्या आरोग्य सेवेबाबत केवळ डॉक्टरांना जबाबदार न धरता नवनवीन कल्पना, योजना आणि उपाय अमलात आणले पाहिजेत. यासाठी वैद्यकीय शिक्षणात आमूलाग्र बदल करावा लागणार आहे. याशिवाय खासगी आणि सरकारी भागिदारीतून डॉक्टरांची गुणवत्ता कशी वाढेल या दिशेनहीे प्रयत्न करावे लागतील.

टॅग्स :Nitin Gadakriनितिन गडकरीPoliticsराजकारणIndiaभारत