शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
2
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
3
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
4
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
5
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
6
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
7
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
8
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
9
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
10
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
11
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
12
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
13
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
14
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
15
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
16
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
17
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
18
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
19
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
20
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत

गडकरींचा ‘डॉक्टरी’सल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2018 00:44 IST

डॉक्टरांनी विद्वत्ता आणि गुणवत्तेसोबतच सामाजिक दायित्वाचे पालन केले पाहिजे. यामुळे त्यांना आपल्या कार्याचे संपूर्ण समाधान मिळेल. पॅ्रक्टिस करणा-या कुठल्याही डॉक्टरसाठी नैतिकता ही प्राधान्यक्रमावर असली पाहिजे, अशी अपेक्षा केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केली आहे.

डॉक्टरांनी विद्वत्ता आणि गुणवत्तेसोबतच सामाजिक दायित्वाचे पालन केले पाहिजे. यामुळे त्यांना आपल्या कार्याचे संपूर्ण समाधान मिळेल. पॅ्रक्टिस करणा-या कुठल्याही डॉक्टरसाठी नैतिकता ही प्राधान्यक्रमावर असली पाहिजे, अशी अपेक्षा केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केली आहे. नागपुरात गुरुवारी भारतीय बालरोग परिषदेस प्रारंभ झाला. या परिषदेचे उद्घाटन गडकरी यांच्या हस्ते झाले. यावेळी उपस्थित असलेल्या समस्त डॉक्टर समुदायासमोर त्यांनी या क्षेत्राशी संबंधित जी विविध मते मांडली ती केवळ त्यांची एकट्याची नसून प्रातिनिधिक स्वरुपाची आहेत. सर्वसामान्य लोकांच्या मनात आज डॉक्टरांबद्दल ज्या भावना निर्माण झाल्या आहेत, डॉक्टर आणि रुग्णांमधील नात्यात अविश्वासाचा जो गंध येऊ लागला आहे त्या पार्श्वभूमीवर गडकरी यांनी ज्या भावना बोलून दाखविल्या त्याचा डॉक्टरांनी अंतर्मुख होऊन विचार करण्याची नितांत आवश्यकता आहे. गडकरींची एक शैली आहे. एरवी आपल्या एखाद्या कार्यकर्त्याकडूनही चूक झाली की ते त्याची जाहीर शस्त्रक्रिया करीत असतात. ती सुद्धा अ‍ॅनस्थेशियाशिवाय. विशेष म्हणजे यामुळे कुणी दुखावतही नाही. नेमकी अशीच शस्त्रक्रिया त्यांनी काल डॉक्टरांची केली. देशातील सरकारी रुग्णालयांची दुरवस्था आणि डॉक्टरांच्या तुटवड्याबद्दल त्यांनी आपल्या भाषणात ऊहापोह केला. त्याचाही विचार आता सर्व पातळीवर झाला पाहिजे. कारण या देशातील वैद्यकीय सेवा आणि शिक्षणाचा ढासळता दर्जा चिंतेचा विषय झाला आहे. देशात निर्माण होणारे डॉक्टर्स, त्यांची उपलब्धता आणि गुणवत्ता यांच्यात अजूनही योग्य ताळमेळ बसलेला नाही. अनेक डॉक्टरांचा दर्जा हा भोंदू डॉक्टरांपेक्षा किंचित वरचा असल्याचे विधान खुद्द एका माजी आरोग्य सचिवानेच केले होते. त्याचप्रमाणे डॉक्टरांच्या कमतरतेकडे जागतिक आरोग्य संघटनेने यापूर्वी लक्ष वेधले आहे. आजमितीस देशातील सुमारे ३९० वैद्यकीय महाविद्यालयांमधून वर्षाला जवळपास ५५ हजार डॉक्टर्स तयार होतात. सध्या आपल्या येथे साडेसात लाख डॉक्टर्स कार्यरत आहेत. म्हणजे १७०० लोकांमागे एक डॉक्टर असे हे प्रमाण आहे. ते अर्थातच कमी आहे. पण केवळ डॉक्टरांची संख्या वाढवूनही भागणार नाही. कारण डॉक्टर उपलब्ध असले तरी ग्रामीण भागात जाऊ इच्छित नाहीत. सरकारी सक्तीचाही आता त्यांच्यावर परिणाम होईनासा झाला आहे. एकूण परिस्थिती बघता शासनानेही आता ढासळत्या आरोग्य सेवेबाबत केवळ डॉक्टरांना जबाबदार न धरता नवनवीन कल्पना, योजना आणि उपाय अमलात आणले पाहिजेत. यासाठी वैद्यकीय शिक्षणात आमूलाग्र बदल करावा लागणार आहे. याशिवाय खासगी आणि सरकारी भागिदारीतून डॉक्टरांची गुणवत्ता कशी वाढेल या दिशेनहीे प्रयत्न करावे लागतील.

टॅग्स :Nitin Gadakriनितिन गडकरीPoliticsराजकारणIndiaभारत