शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
3
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
4
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
5
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
6
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
7
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
8
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
9
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
10
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
11
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
12
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
13
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
14
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
15
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
16
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
17
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
18
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
19
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
20
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे

गृहपाठाअभावी फजिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2018 13:21 IST

‘फर्स्ट इम्प्रेशन’ म्हणून असे चित्र जाणे भाजपाच्या प्रतिमेच्यादृष्टीने हानीकारक

मिलिंद कुलकर्णीजळगाव महापालिका निवडणुकीत माजी मंत्री सुरेशदादा जैन यांच्या नेतृत्वाखालील ४० वर्षांची सत्ता संपुष्टात आणून भाजपाने भीमपराक्रम केला. प्रस्थापितांविरुध्द सुप्त लाट असल्याने ७५ पैकी ५७ जागा भाजपाला मिळाल्या. खासदार, आमदार आणि महापौर अशी तिन्ही महत्त्वाची पदे भाजपाकडे असल्याने मोठा दबदबा निर्माण झाला. त्यातच जळगावचे आमदार सुरेश भोळे यांच्या पत्नी सीमा भोळे यांना महापौरपद दिल्याने आता जळगावच्या विकासाची गाडी सुसाट धावेल, असा विश्वास नागरिकांना आहे. परंतु घवघवीत यश, अनुभवी नगरसेवक, प्रशासकीय कामाचा अनुभव असलेल्या नेत्यांचे मार्गदर्शन अशा प्रबळ बाजू असतानाही महापालिकेच्या पहिल्या महासभेत भाजपाची फजिती झाली. सत्ताधारी भाजपामधील नगरसेवकांमध्येच भूसंपादन, गाळेप्रश्न अशा विषयांवरील मतभिन्नता, ठोस भूमिकेचा अभाव असल्याने गोंधळाची स्थिती निर्माण झाली. आमदार सुरेश भोळे, माजी सभापती कैलास सोनवणे यांना सभागृहाकडे धाव घेत परिस्थिती आटोक्यात आणावी लागली. ‘फर्स्ट इम्प्रेशन’ म्हणून असे चित्र जाणे भाजपाच्या प्रतिमेच्यादृष्टीने हानीकारक आहे.भगत बालाणी यांच्यासारखा अनुभवी नगरसेवक हा गटनेता, डॉ.अश्विन सोनवणे यांच्यासारखा तरुण तडफदार आणि कामाचा प्रचंड आवाका असलेले उपमहापौर, मावळते महापौर ललित कोल्हे यांच्याकडे असलेले सभागृह नेतेपद अशी वजनदार आणि परिपक्व नगरसेवकांची फळी भाजपाकडे असताना पहिल्याच महासभेत हे घडले, याचा अर्थ पक्षात विचारमंथन करणारी फळी अद्याप तयार झालेली नाही.निवडणुकीच्या विजयानंतर आमदारांनी ‘थिंक टँक’ बनविणार असल्याचे जाहीर केले होते. वेगवेगळ्या क्षेत्रातील लोकांचा या समितीत समावेश करुन त्यांच्या मार्गदर्शनाचा लाभ जळगाव शहराच्या विकासासाठी केला जाणार असल्याचा त्यांचा मानस आहे. परंतु महिना उलटला तरी अद्याप ही समिती अस्तित्वात आली नाही. परिणामी १६ आॅगस्ट रोजी मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेल्या १०० कोटी रुपयांच्या कामांचे नियोजन पहिल्या महासभेत मंजुरीसाठी येणे अपेक्षित असताना सत्ताधारी आणि विरोधकांचे हित जपणारा भूसंपादनाचा विषय पटलावर आला, याचा संदेश योग्य गेलेला नाही. पूर्वीच्या सत्ताधाऱ्यांनी केलेल्या चुकाच जर सध्याची मंडळी करीत असेल तर मग यांच्यात आणि त्यांच्यात फरक काय असे नागरिकांना वाटू शकते. भाजपाच्या धुरिणांनी ही काळजी घेणे अपेक्षित आहे. स्विकृत सदस्यांची निवड होणे बाकी आहे. त्यात समाजातील वेगवेगळ्या क्षेत्रातील लोकांना समाविष्ट करुन भाजपा महापालिकेतील फळी मजबूत करु शकते. भाजपा असे करते काय, की राजकारणाचा भाग म्हणून पुन्हा राजकीय मंडळींचे पुनर्वसन यानिमित्ताने करते, यावर भाजपाची पुढील दिशा निश्चित होणार आहे.

टॅग्स :BJPभाजपाJalgaonजळगाव