शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
2
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
3
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
4
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
5
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
6
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
7
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
8
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
9
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
10
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
11
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
12
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
13
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
14
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
15
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
16
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
17
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
18
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
19
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?
20
Air India Plane Crash: ज्या आगीत जिवंत माणसांची झाली राख, त्यात एकच मानवी अवयव वाचला

गृहपाठाअभावी फजिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2018 13:21 IST

‘फर्स्ट इम्प्रेशन’ म्हणून असे चित्र जाणे भाजपाच्या प्रतिमेच्यादृष्टीने हानीकारक

मिलिंद कुलकर्णीजळगाव महापालिका निवडणुकीत माजी मंत्री सुरेशदादा जैन यांच्या नेतृत्वाखालील ४० वर्षांची सत्ता संपुष्टात आणून भाजपाने भीमपराक्रम केला. प्रस्थापितांविरुध्द सुप्त लाट असल्याने ७५ पैकी ५७ जागा भाजपाला मिळाल्या. खासदार, आमदार आणि महापौर अशी तिन्ही महत्त्वाची पदे भाजपाकडे असल्याने मोठा दबदबा निर्माण झाला. त्यातच जळगावचे आमदार सुरेश भोळे यांच्या पत्नी सीमा भोळे यांना महापौरपद दिल्याने आता जळगावच्या विकासाची गाडी सुसाट धावेल, असा विश्वास नागरिकांना आहे. परंतु घवघवीत यश, अनुभवी नगरसेवक, प्रशासकीय कामाचा अनुभव असलेल्या नेत्यांचे मार्गदर्शन अशा प्रबळ बाजू असतानाही महापालिकेच्या पहिल्या महासभेत भाजपाची फजिती झाली. सत्ताधारी भाजपामधील नगरसेवकांमध्येच भूसंपादन, गाळेप्रश्न अशा विषयांवरील मतभिन्नता, ठोस भूमिकेचा अभाव असल्याने गोंधळाची स्थिती निर्माण झाली. आमदार सुरेश भोळे, माजी सभापती कैलास सोनवणे यांना सभागृहाकडे धाव घेत परिस्थिती आटोक्यात आणावी लागली. ‘फर्स्ट इम्प्रेशन’ म्हणून असे चित्र जाणे भाजपाच्या प्रतिमेच्यादृष्टीने हानीकारक आहे.भगत बालाणी यांच्यासारखा अनुभवी नगरसेवक हा गटनेता, डॉ.अश्विन सोनवणे यांच्यासारखा तरुण तडफदार आणि कामाचा प्रचंड आवाका असलेले उपमहापौर, मावळते महापौर ललित कोल्हे यांच्याकडे असलेले सभागृह नेतेपद अशी वजनदार आणि परिपक्व नगरसेवकांची फळी भाजपाकडे असताना पहिल्याच महासभेत हे घडले, याचा अर्थ पक्षात विचारमंथन करणारी फळी अद्याप तयार झालेली नाही.निवडणुकीच्या विजयानंतर आमदारांनी ‘थिंक टँक’ बनविणार असल्याचे जाहीर केले होते. वेगवेगळ्या क्षेत्रातील लोकांचा या समितीत समावेश करुन त्यांच्या मार्गदर्शनाचा लाभ जळगाव शहराच्या विकासासाठी केला जाणार असल्याचा त्यांचा मानस आहे. परंतु महिना उलटला तरी अद्याप ही समिती अस्तित्वात आली नाही. परिणामी १६ आॅगस्ट रोजी मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेल्या १०० कोटी रुपयांच्या कामांचे नियोजन पहिल्या महासभेत मंजुरीसाठी येणे अपेक्षित असताना सत्ताधारी आणि विरोधकांचे हित जपणारा भूसंपादनाचा विषय पटलावर आला, याचा संदेश योग्य गेलेला नाही. पूर्वीच्या सत्ताधाऱ्यांनी केलेल्या चुकाच जर सध्याची मंडळी करीत असेल तर मग यांच्यात आणि त्यांच्यात फरक काय असे नागरिकांना वाटू शकते. भाजपाच्या धुरिणांनी ही काळजी घेणे अपेक्षित आहे. स्विकृत सदस्यांची निवड होणे बाकी आहे. त्यात समाजातील वेगवेगळ्या क्षेत्रातील लोकांना समाविष्ट करुन भाजपा महापालिकेतील फळी मजबूत करु शकते. भाजपा असे करते काय, की राजकारणाचा भाग म्हणून पुन्हा राजकीय मंडळींचे पुनर्वसन यानिमित्ताने करते, यावर भाजपाची पुढील दिशा निश्चित होणार आहे.

टॅग्स :BJPभाजपाJalgaonजळगाव