शहरं
Join us  
Trending Stories
1
KL राहुलच्या 'सेल्फिश सेंच्युरी'सह पंतची चूक नडली? शुबमन गिल म्हणाला, मॅच तिथंच फिरली; पण...
2
भारत-इंग्लंड मालिकेतून 'हा' स्टार खेळाडू बाहेर ! हाताला गंभीर दुखापत, लवकरच शस्त्रक्रिया होणार
3
ठाण्यात पाच विद्यार्थिनींचा एकाच तरुणाकडून विनयभंग; पालकांमध्ये संताप; फरार आरोपीच्या अटकेची मागणी
4
टेस्टमधील खतरनाक स्पेल! स्टार्कनं १५ चेंडूत २ धावा खर्च करत साधला ५ विकेट्सचा विश्वविक्रमी डाव
5
IND vs ENG : या चौघांपैकी एकानं बुमराह-सिराजसारखा 'दम' दाखवला असता तर मॅच सहज जिंकता आली असती
6
जड्डूची लढवय्या इनिंग व्यर्थ! बुमराहनंही बॅटिंग वेळी धैर्य दाखवलं, सिराजची अनलकी विकेट अन् इंग्लंडनं मारली बाजी
7
मुंबईतील दोन तरुणांचा पाण्याच्या डोहात बुडून मृत्यू; नायगांवच्या चिंचोटीमधील दुर्दैवी घटना
8
हातातोंडाशी आलेला विजयाचा घास हिरावला... टीम इंडिया कुठे चुकली? वाचा, पराभवाची ५ कारणे
9
अमृतसरचं सुवर्ण मंदिर RDX नं उडवण्याची धमकी, ईमेलनंतर एकच खळबळ
10
लैंगिक समानतेसाठी ३५ वर्षांचा संघर्ष, हिंगणघाटच्या वर्षा देशपांडे यांचा आंतरराष्ट्रीय गौरव
11
"रशिया पुढील ५० दिवसांत युक्रेन युद्ध थांबवण्यास तयार झाला नाही, तर...!" डोनाल्ड ट्रम्प यांची रशियाला थेट धमकी
12
चेनस्नॅचिंग करणाऱ्या दिल्लीतील टोळीला नागपुरात अटक, विविध १० गुन्ह्यांची उकल
13
सातारा: प्रारुप रचना जाहीर ! जिल्ह्यात गट अन् गणात मोडतोड; नावे बदलली, गावांचीही अदलाबदल
14
डोंबिवली: पैशाच्या हव्यासापायी 'हॉटेल अटेंडंट' बनला सोनसाखळी चोर; रामनगर पोलिसांनी मुसक्या आवळल्या !
15
नागपूर: नंदीग्राम एक्सप्रेसमधून पिंपळखुटी रेल्वे स्थानकाजवळ धूर; मोठा अनर्थ टळला...
16
सर्व विमानांचे फ्युएल कंट्रोल स्विच तपासा; एअर इंडिया अपघातानंतर डीजीसीआयने कंपन्यांना दिले महत्त्वाचे आदेश
17
'त्या' तरुणींची छांगूरच्या तावडीतून सुटका करून, त्यांना पुन्हा हिंदू बनवणाऱ्या गोपाल राय यांना जीवे मारण्याची धमकी; केली सुरक्षेची मागणी
18
"दोन हाणा पण मला नेता म्हणा' अशी त्यांची अवस्था"; भाजपा आमदार शिवाजी पाटलांचा खोचक टोला
19
कॅनडात इस्कॉनच्या रथयात्रेवर फेकली अंडी; परराष्ट्र मंत्रालयाने केली कॅनेडियन सरकारकडे कारवाईची मागणी
20
IND vs ENG : बुमराहनं ७ महिन्यांनी उघडलं खातं! १ तास ४० मिनिटे केली बॅटिंग

ही मौजमजा परवडणारी आहे?

By admin | Updated: January 3, 2016 22:51 IST

बावीस नोव्हेंबर रोजी रविवार होता. त्यानंतर दोन दिवस सरकारी कामकाज झाले. नंतर बुधवारी २५ ला गुरू नानक जयंतीची सुटी. त्याला जोडून दोन रजा टाकणाऱ्यांना सलग चार दिवस मजा करता आली

बावीस नोव्हेंबर रोजी रविवार होता. त्यानंतर दोन दिवस सरकारी कामकाज झाले. नंतर बुधवारी २५ ला गुरू नानक जयंतीची सुटी. त्याला जोडून दोन रजा टाकणाऱ्यांना सलग चार दिवस मजा करता आली. त्यात नोव्हेंबरचा शेवटचा आठवडा वाया गेला. डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात चार दिवस काम झाले व सालाबादप्रमाणे सरकार पाच डिसेंबरपासून नागपूरला हिवाळी अधिवेशनासाठी रवाना झाले. २३ पर्यंत सरकार तिकडेच. त्यानंतर २४ ते २७ मोठा वीकेंड आला. सगळे ‘थर्टीफर्स्ट’च्या तयारीला लागले. शेवटचा आठवडाही वाया गेला. ४ तारखेपासून सरकार पूर्वपदावर येईल असे मंत्री, अधिकारीच येणाऱ्या जाणाऱ्यांना सांगत होते. या काळात मंत्रालयात फेरफटका मारला तर दिवाळीसारखी अवस्था होती. थोडक्यात काय तर गेल्या ४५ दिवसांपासून मंत्रालय जवळपास बंद झाल्यात जमा आहे. हे याच वर्षी होते आहे असे नाही. गेल्या अनेक वर्षांची ही परंपराच बनली आहे. नागपूर अधिवेशन डिसेंबरात होते. त्याआधीचा एक आठवडा आणि अधिवेशन संपल्यानंतर ३१ डिसेंबरची पार्टी होऊन सगळे पूर्ववत कामावर येण्यासाठी वर्षातले ३० ते ३५ दिवस दरवर्षी वाया जातात. ही चैन, ही मौज महाराष्ट्राला परवडणारी आहे का, या प्रश्नाचे उत्तर प्रत्येकाने आपल्या मनात शोधायचे आहे. अधिवेशनातून काही हाती लागले का? तर त्यावर सांगण्यासारखे विरोधकांकडे फार काही नाही व सरकार केलेल्या घोषणांची यादी देण्यात मग्न आहे. दुसरीकडे राज्याच्या डोक्यावर साडेतीन लाख कोटींचे कर्ज आहे. अर्धे राज्य दुष्काळाच्या खाईत आहे. येणाऱ्या दोन महिन्यातच पाण्यासाठी मराठवाडा, खानदेश आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात हाणामाऱ्या होतील अशी स्फोटक परिस्थिती आहे. मराठवाड्यातल्या अनेक गावांमध्ये आजच टोकाचा असंतोष आहे. पिण्यासाठी पाणी नाही, हाताला काम नाही, कोणाकडे आश्वासकपणे पाहावे असा दिलासा देणारा चेहरा दिसत नाही, विश्वासाने कोणाच्या खांद्यावर मान टाकून गुदमरलेलं मन मोकळं करावं असा खांदाही मिळेनासा झाला आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्त्यांंची संख्या तीन हजारांचा आकडा पार करून गेली आहे. अशी विदारक स्थिती असताना स्वत:स कल्याणकारी राज्य म्हणवून घेणाऱ्या महाराष्ट्राला ही ३० ते ३५ दिवसांची चैन परवडणारी आहे? या काळात ज्यांचे कोणाचे राज्यातल्या कोणत्याही जिल्ह्यात काम पडले असेल त्याला ‘आता अधिवेशन आहे, संपल्यानंतर या’ असे उत्तर ऐकायला मिळाले असेल. ज्याचा अधिवेशनाची काडीचाही संबंध नाही असा शिपाईदेखील हल्ली साहेब, अधिवेशन आहे, नंतर या, साहेब बिझी आहेत... असे साहेबांच्या परस्परच सांगून मोकळा होतानाचे चित्र अनेक कार्यालयांमधून पाहावयास मिळेल.त्यातच गेल्या वर्षभरात सरकारने मंगळवारी मंत्रिमंडळाची बैठक घेण्याचा नवा पायंडा पाडला आहे. त्यामुळे अनेक मंत्री सोमवारी सायंकाळपर्यंत किंवा मंगळवारी सकाळी मुंबईत येतात. मंगळवार-बुधवार मुंबईत. गेला बाजार काहीजण गुरुवारीही थांबतात आणि आपल्या मतदारसंघात निघून जातात. याचा अर्थ सोमवार, शुक्रवार, शनिवार मंत्रालय शांत शांतच असते. दर आठवड्याचे असे तीन दिवस, दिवाळीचे पंधरा-वीस दिवस आणि उत्सवप्रिय महाराष्ट्रात येणारे सण वार आणि त्यासाठीच्या सुट्या यांचा हिशोब यात कोठेही नाही.जाता जाता : सरकारने गरिबांसाठी १० लाख घरे बांधण्याचा संकल्प सोडला, त्याला वर्ष झाले. एकही घर बांधून झालेले नाही. गृहनिर्माणमंत्री प्रकाश मेहता यांच्या सहाव्या मजल्यावरील केबिनची आणि कार्यालयाची मात्र मोठ्या प्रमाणावर डागडुजी चालू आहे. सगळा कारभार पारदर्शक करण्यासाठी म्हणून काचेच्या केबिन केल्या जात आहेत. या कामासाठी आणखी किमान दहा बारा दिवस लागणार आहेत. त्यामुळे त्यांचे कार्यालय सध्या तरी जिथे जागा मिळेल तेथून चालू आहे... - अतुल कुलकर्णी