शहरं
Join us  
Trending Stories
1
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
2
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
3
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
4
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
5
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
6
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
7
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
8
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
9
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
10
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
11
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
12
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
13
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
14
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
15
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
16
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
17
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
18
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
19
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
20
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग

राजाकडून निराशा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2019 23:55 IST

लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा जळगाव जिल्ह्यात होणार नाही, हे आता निश्चित झाले आहे.

मिलिंद कुलकर्णीलोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा जळगाव जिल्ह्यात होणार नाही, हे आता निश्चित झाले आहे. सोमवारी ते नंदुरबारला येत आहेत, तर धुळ्यात १६ फेब्रुवारीला त्यांची सभा झाली होती. याचा अर्थ काय काढावा? जळगाव जिल्ह्यातील दोन्ही जागा भाजपच्या दृष्टीने जिंकण्याच्या गटात आहेत काय? याचे उत्तर जो तो आपापल्या पध्दतीने देईल. पण ‘राजा’ने जळगावकडे पाठ फिरविल्याने जिल्हावासीय मात्र निराश झाले आहेत. कारण गेल्यावेळी मोदी यांची सभा लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत एरंडोल, जळगाव याठिकाणी सभा झाल्या होत्या. त्यावेळी त्यांनी मतदारांना मोठे स्वप्न दाखविले होते. त्यातील एक टेक्सटाईल पार्कचे होते. ते म्हणाले होते, जळगाव जिल्ह्यात कापूस मोठ्या प्रमाणात पिकतो. परंतु, प्रक्रिया उद्योग नसल्याने तो आमच्या गुजराथमध्ये येतो. म्हणून आमचे सरकार आल्यावर याठिकाणी प्रक्रिया होईल, असे उद्योगांचे जाळे उभारु. पाच वर्षात काय झाले? जामनेरला केवळ जागा अधिग्रहित झाली. फलक लागले. एकही उद्योग सुरु झालेला नाही. कापूस गुजराथमध्ये जात आहेच.स्थलांतर रोखण्यासााठी खान्देशात सिंचनाच्या सुविधा देऊ. म्हणजे, खान्देशातील नागरिक गुजराथ, मध्य प्रदेशात स्थलांतर करणार नाहीत. सिंचनाच्या आघाडीवर देखील निराशाजनक कामगिरी पाच वर्षांत झाली आहे. दोन केंद्रीय जलसंपदा मंत्री झाले, पण मेगा रिचार्ज प्रकल्प साकारला नाही. पाडळसरेचे काम ठप्प आहे. प्रकाशा व सारंगखेडा बॅरेजमधील पाण्यासाठी शेतकरी डोळे लावून बसले आहेत. अक्कलपाडाचे पाणी धुळ्यासाठी अद्याप आलेले नाही. सुलवाडे जामफळ, शेळगाव, वरखेडे-लोंढे असे अनेक प्रकल्प अपूर्णावस्थेत आहेत. गिरीश महाजन हे राज्याचे तर नितीन गडकरी हे देशाचे जलसंपदा मंत्री असल्याने मोठ्या अपेक्षा होत्या. परंतु, समाधानकारक प्रगती झाली नाही, हे वास्तव आहे. त्यामुळे खान्देशातील तिन्ही जिल्ह्यातील रहिवाशांचे चार-सहा महिने स्थलांतर कायम आहे.गेल्या निवडणुकीच्यावेळी औद्योगिक विकासाचे ‘गुजराथ मॉडेल’ मोदी यांनी मांडले होते. सत्ता आल्यास तसाच औद्योगिक विकास खान्देशात करु, असे आश्वासन त्यांनी दिले होते. मात्र याठिकाणीही निराशा पदरी आली. नंदुरबार जिल्ह्यातील गुजराथच्या सीमेवरील गावांमध्ये उद्योग आले, पण त्यांना सोयीसुविधा मिळत नाही. नरडाण्याच्या दिल्ली-मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडोर अद्याप कागदावरच आहे. जळगाव, भुसावळचा औद्योगिक विकास ठप्प आहे. प्लास्टिक पार्कची प्रतीक्षा कायम आहे.धुळ्यातील सभेत तर पंतप्रधानांनी निराशा केली, पण नंदुरबारात ते काय बोलतात, याची उत्सुकता राहील.गडकरी भुसावळला येऊन गेले. महामार्ग बांधकामाच्या प्रगतीविषयी बोलले. भाजपाची मंडळी हुशार आहे. त्यांनी गडकरींची सभा महामार्गाचे काम सुरु असलेल्या भुसावळला लावली. काम ठप्प असलेल्या जामनेर, जळगाव, एरंडोल, पारोळा याठिकाणी लावली नाही. कारण १६५०० कोटी रुपयांच्या कामांचे भूमिपूजन तीन वर्षांपूर्वी गडकरी यांनी केले. त्यापैकी केवळ तरसोद ते चिखली आणि जळगाव ते चाळीसगाव याच रस्त्याचे काम सुरु आहे. उर्वरित सर्व काम ठप्प आहे. नवापूर ते तरसोद या राष्टÑीय महामार्ग क्र.६ चे काम तर रडतखडत सुरु आहे. कधी सुरु होते आणि कधी बंद होते, हे कळतच नाही.गडकरी यांनी महामार्गाविषयी अधिक बोलण्याऐवजी जळगाव ते भुसावळदरम्यान डबलडेकर हवाई बस सुरु करण्याचे स्वप्न दाखविले. आता ही बस कशी असेल ? खर्च किती येईल? तंत्रज्ञान कोणते? याचा काहीही तपशील मिळाला नसला तरी स्वप्न मोठे दाखविले. मध्यंतरी जलवाहतुकीचे स्वप्न खान्देशवासीयांना दाखविले. मुळात नद्या बारमाही वाहत नसताना जलवाहतूक होणार कशी, हा प्रश्न पडतोच. पण विचारणार कुणाला?असाच अनुभव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सभेत आला. पाडळसरे धरणाविषयी जनभावना तीव्र होत्या, त्यांनी नाबार्डकडे जाणार असल्याचे आश्वासन दिले. हुडको कर्जाविषयी पंतप्रधानांकडे जाण्याचे आश्वासन दिले. बलून बंधारे आणि मेगा रिचार्ज जणू कार्यान्वीत झाले अशा पध्दतीने त्यांनी भाषणात उल्लेख केला. सत्ताधारी मंडळींची ही आश्वासने जनतेला निराश करणारी आहेत, हे मात्र निश्चित.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकJalgaonजळगाव