शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये नितीशकुमारांशिवाय भाजपा सरकार बनवू शकते, जदयू शिवाय एनडीए ११४ वर; एवढ्या जागा महागात पडणार...
2
बिहारमध्ये पराभव झाल्यानंतरही, राजद आणि तेजस्वी यादवांसाठी आनंदाची बातमी
3
"निवडणूक आयोग आणि SIR जबाबदार...!"; बिहार निवडणूक निकालावरून काँग्रेस भडकली
4
Bihar Election Result: "...यापेक्षा वेगळा निकाल लागणे शक्य नव्हते"; संजय राऊतांचं निकालावर खळबळजनक विधान
5
बिहारमध्ये विजयी घौडदौड, मात्र पोटनिवडणुकीत भाजपाला मोठा फटका; ८ पैकी ६ जागांवर पराभव?
6
बिहारमध्ये एनडीएला बंपर विजय कसा मिळाला? ही आहेत ५ प्रमुख कारणं
7
तेजस्वी पिछाडीवर, तिकडे तेज प्रताप यादवांची काय अवस्था...; 'हम तो डुबेंगे सनम...' खरे ठरतेय? 
8
कामगिरी दमदार; पीएम मोदींच्या हनुमानाची 'हनुमान उडी', LJP(R) इतक्या जागांवर आघाडीवर...
9
बिहार निवडणूक निकाल: राघोपुरात तेजस्वी यादव पिछाडीवर; लखीसरायमध्ये विजय सिन्हांची आघाडी कायम
10
बिहारमध्ये NDA ला आघाडी, भाजप-जेडीयूच्या जागा वाढल्या; तेजस्वी यादवांना 'या' ५ चुका पडल्या महागात!
11
बिहारमध्ये RJD ला सर्वाधिक मते, पण केवळ ३५ जागांवर आघाडी; भाजपा-जेडीयूला किती टक्के मते मिळाली?
12
Health And Ritual: दुपारच्या जेवणानंतर वामकुक्षी ही पूर्वापार परंपरा; मेंदू होतो सुपरफास्ट!
13
“इंदुरीकर महाराज, फेटा खाली उतरवू नका, सोशल मीडियावरील छपरींकडे दुर्लक्ष करा”; कुणाचे आवाहन?
14
"आता काँग्रेस पूर्वीपेक्षा अधिक…"; आपल्याच पक्षासंदर्भात काय बोलले शशी थरूर? भाजपच्या धोरणांकडे 'इशारा'!
15
Utpatti Ekadashi 2025: उत्पत्ती एकादशीला 'या' ६ उपायांनी पापमुक्त व्हा; पाहा पूजाविधी!
16
Maithili Thakur : "मला माझं यश दिसतंय, पण...", आघाडी घेताच लोकप्रिय गायिका मैथिली ठाकूरची पहिली प्रतिक्रिया
17
नेटबँकिंग वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! SBI, HDFC सह सर्व बँकांच्या वेबसाइटचे डोमेन बदलले; काय आहे कारण?
18
बिहार निवडणुकीत बाहुबलींचा दबदबा कायम; 'या' 12 जागांनी वाढवली उत्सुकता, कोण पुढे? पाहा...
19
Bihar Assembly Election Result 2025 Live Updates: बिहारमध्ये भाजपा-जेडीयू युतीला ऐतिहासिक आघाडी; 'राजद'ला मोठा दणका
20
Bihar Result 2025: बिहारच्या निकालात NDA ला प्रचंड बहुमत; आता BJP-JDU मध्ये 'बिग ब्रदर'साठी चुरस
Daily Top 2Weekly Top 5

स्वयंपाकघर ते मंत्रालय : ‘विदेशी’ असेल ते हाकला! बलाढ्यांशी टक्कर द्यायला स्वदेशी २.० आंदोलन

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2025 07:25 IST

जागतिकीकरणाच्या नावाखाली गुलाम व्हायचे की बलाढ्यांशी टक्कर द्यायला स्वदेशी २.० आंदोलन सुरू करायचे, हे ठरवण्याची वेळ आलेली आहे.

प्रभू चावलाज्येष्ठ पत्रकार 

भारत लुटारूंचे नेहमीच आकर्षण राहिला, बदमाशांसाठी भारत हे मधाचे पोळे होते आणि नफेखोरांचा स्वर्ग. इस्ट इंडिया कंपनी सुरुवातीला काही तोफा घेऊन आली नव्हती; व्यापाराच्या बहाण्याने इंग्रज येथे आले आणि नंतर राज्यकर्ते झाले. इथल्या परंपरा त्यांनी मोडल्या आणि एका संपन्न संस्कृतीचे रूपांतर उपासमारांच्या वसाहतीत करून टाकले. देवघेवीच्या मिषाने जे सुरू झाले, त्याची परिणती गुलामगिरीत झाली.

विदेशी मालकीच्या डिजिटल यंत्रणांना ‘झोहो’ या देशी कंपनीच्या रूपाने पर्याय देत असल्याचे केंद्रीय माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी जाहीर केले आहे. अकाउंटिंग आणि डेटा स्टोरेजसाठी ती काम करेल. हाच आत्मनिर्भर भारत तर नव्हे?  ब्रिटिश गेले, पण अमेरिकन शैलीतील ‘वेस्ट इंडिया कंपनी २.०’ भारताला लुटत आहे. जुन्या वसाहतवादाने कापूस, सोने, अफू येथून नेली, तर एकविसाव्या शतकात डिजिटल हिरे आणि डेटा हरण केला जात आहे. लेखापरीक्षक, सल्लागार, तज्ज्ञ अशा नावाखाली ही मंडळी भारताच्या कारभारात घुसली आहेत. मंत्रालयांमध्ये त्यांनी बस्तान मांडले असून, देशाला परावलंबित्वाच्या जाळ्यात ढकलले आहे. एकेकाळी त्यांनी व्यापारमार्गे वसाहत केली आता ते सल्लागाराच्या भूमिकेतून तेच करत आहेत. रिलायन्स, एचडीएफसी, अदानी आणि एल अँड टी अशा कंपन्यांचा संवेदनशील डेटा भारतीय सर्व्हर्समधून जात नाही तर लंडन किंवा न्यूयॉर्कशी निष्ठा असलेल्या विदेशी कंपन्यांच्या माध्यमातून जातो. एक प्रकारे ही हेरगिरीच आहे.

‘झोहो’बद्दल मंत्रीमहोदय उच्चरवाने बोलत असले तरी या बड्या सल्लागार कंपन्या करत असलेली डेटाचोरी थांबणारी नाही. भारतातील उद्योग कसे चालवायचे, धोरणे कशी आखायची, अब्जावधीच्या निविदा कशा काढायच्या? हे सगळे या कंपन्या ठरवतात. मंत्रालयात त्यांचे हस्तक बसतात. धोरणांचा मसुदा ठरवतात आणि दुसऱ्या हाताने नफा खिशात टाकतात. 

‘एफएमसीजी’ क्षेत्रातल्या ग्राहकोपयोगी उत्पादने विकणाऱ्या बड्या विदेशी कंपन्या भारतातील घराघरात घुसल्या आहेत. आपण काय खायचे, हे त्या सांगतात. बाजारावर मक्तेदारी गाजवतात आणि त्यांच्या विदेशी मालकांना अब्जावधींची रॉयल्टी पोचवतात. गांधींनी साम्राज्याविरुद्ध चरखा उगारला. आजच्या भारताने विदेशी बालेकिल्ल्यांविरुद्ध भक्कम संरक्षक भिंत उभी केली पाहिजे. विदेशी व्यापाराची नाकाबंदी ट्रम्प करू शकतात, चीन विदेशी कंपन्यांना वेसण घालू शकतो, तर भारत आपल्या १.४  अब्जाच्या अवाढव्य बाजारपेठेला का गवसणी घालत नाही? देशाला आज दुसरे तिसरे काही नव्हे तर ‘दुसरे स्वदेशी आंदोलन’ हवे आहे. स्वदेशी २.०मध्ये पोलादी वज्रमुठीची आर्थिक तटबंदी उभी करा. सरकारी कार्यालयात विदेशी सल्लागारांवर बंधने घाला. देशी कंपन्यांनाच सरकारी कंत्राटे द्या, जसे  संरक्षण क्षेत्रात केले जाते. मंत्र्यांना विश्वासार्हतेचा आणि कंपन्यांना देशभक्तीचा दावा करायचा असेल तर त्यांनी विदेशी सल्लागार संस्था आणि एफएमसीजी कंपन्यांचे जोखड झुगारावे. भारतीय उद्योगपतींनी अमेरिकेला महान करणाऱ्या बुद्धिमान अधिकाऱ्यांसाठी चांगले  पगार देऊन बौद्धिक गळती उलटी फिरवली पाहिजे.  

जागतिकीकरणाच्या  नावाखाली गुलाम व्हायचे, की बलाढ्यांशी टक्कर द्यायला स्वदेशी आंदोलन सुरू करायचे, हे आपल्याला ठरवायचे आहे. भारत एका ऐतिहासिक वळणावर उभा आहे. एक रस्ता देशाच्या प्रबोधनाकडे जातो. ज्यातून देशाची उभारणी होईल; ब्रांडिंग होईल आणि दुसरा रस्ता उपभोगवाद आणि सल्लागारांच्या मार्गाने गुलामगिरीकडे नेईल.

महात्मा गांधी जर चरखा, सत्याग्रह, मीठ यांचा वापर करून ब्रिटिश साम्राज्य उलथून टाकू शकतात, तर ३.७ ट्रिलियनची अर्थव्यवस्था हाताशी असताना भारतीय नेते ते का करू शकत नाहीत? जगातील सर्वांत तरुण कार्यशक्ती आपल्याकडे आहे. आत्मनिर्भर भारत ही केवळ घोषणा राहता कामा नये. ते वादळ झाले पाहिजे. कारखाने ते अर्थव्यवस्था, स्वयंपाकघरातील फडताळे ते मंत्रिमंडळातील फाइल्स या सगळ्यावर असलेले त्यांचे वर्चस्व झुगारले गेले पाहिजे. ‘स्वदेशी २’चा काळ आला आहे. आत्ता हे जमले नाही, तर कधीच जमू शकणार नाही!

English
हिंदी सारांश
Web Title : From Kitchen to Ministry: Drive Out 'Foreign'! Swadeshi 2.0 Movement.

Web Summary : The article urges India to embrace 'Swadeshi 2.0,' advocating for economic independence by curbing foreign influence in government, industries, and consumer choices. It highlights data theft risks and calls for prioritizing domestic companies and talent to build a self-reliant India.
टॅग्स :Make In Indiaमेक इन इंडियाIndiaभारतUSअमेरिका