शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
4
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
5
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
6
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
7
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
8
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
9
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
10
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
11
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
12
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
13
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
14
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
15
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
16
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
17
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
18
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
19
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
20
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
Daily Top 2Weekly Top 5

मैत्री हीच भारताच्या स्वधर्माची पूर्वअट! भारतीय गणराज्याच्या स्वधर्माचे हे आद्य सूत्र होय

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2026 06:52 IST

भारतीय प्रजासत्ताकाचा स्वधर्म स्पष्ट करणारी चार सूत्रे धार्मिक, सामाजिक, राजकीय आंदोलनांच्या आधारे अधोरेखित करता येतात. त्या सूत्रांची चर्चा! 

योगेंद्र यादव, राष्ट्रीय संयोजक, भारत जोड़ो अभियान, सदस्य, स्वराज इंडिया

भारतीय प्रजासत्ताकाची स्थापना केवळ ७६ वर्षांपूर्वीच झालेली असली तरी त्याचा ‘स्वधर्म’ अत्यंत प्राचीन आहे. तीन हजार वर्षांपूर्वीच त्याचा पाया घातला गेला होता. आजचे आपले गणराज्य म्हणजे ‘भारतवर्ष’, ‘हिंदुस्तान’ आणि ‘इंडिया’ अशा तीन प्रवाहांचा त्रिवेणी संगम आहे. हा स्वधर्म आपल्याला प्राचीन भारताच्या सनातन मूल्यांत शोधता येणार नाही, तर तो विविध आंदोलनांच्या आविष्कारात आढळेल. प्रथम बौद्ध आणि जैन धर्मदर्शनांनी, त्यानंतर सुफी आणि भक्ती परंपरांनी आणि आधुनिक काळात राष्ट्रीय आंदोलनाने प्रस्थापित सत्तेला ललकारले; आपल्या सभ्यतेच्या मूल्यांचा मूळ अर्थ शोधला आणि जनमानस ढवळून काढले. भारतीय प्रजासत्ताकाचा स्वधर्म ढोबळमानाने स्पष्ट करणारी चार सूत्रे आपल्याला याच धार्मिक, सामाजिक आणि राजकीय आंदोलनांच्या आधारे अधोरेखित करता येतील. या आणि यापुढील तीन लेखांत ही चार सूत्रे मी विशद करणार आहे.

यातील पहिले सूत्र आहे- ‘मैत्री’. भिन्नभिन्न मते, पंथ, संप्रदाय आणि अनुचरांचे समूह यांचे सहजीवन हे नेहमीच भारतीय समाजाचे एक अंगभूत लक्षण राहिले आहे. सहअस्तित्व ही केवळ अपरिहार्यता न राहता, एक आदर्श म्हणून ते विकसित करण्याचे प्रयत्न येथील समाज आणि शासनकर्ते सुरुवातीपासूनच करत आले आहेत. ऋग्वेदात मित्र ही देवता मिलाफ, समन्वय आणि सौहार्दाचे प्रतीक आहे. छांदोग्य उपनिषदात मित्र हा सामंजस्याचे प्रतीक आहे. बुद्धांनी याचाच विस्तार करून मैत्री (पाली भाषेत ‘मेत्ता’) हा चार ब्रह्मविहारांपैकी एक आदर्श म्हणून मांडला आहे. मैत्री म्हणजे द्वेषहीनता आणि समभाव. सम्राट अशोकाने द्वेषहीनता, अहिंसा आणि स्नेह यांची सांगड सामाजिक सद्भावाशी घातली. सर्वधर्मसमभाव ही शासकीय नीती आणि संयम हा सामाजिक आदर्श बनवून, अशोकानेच पंथनिरपेक्षतेचा पाया घातला.

सुलह-ए-कुल नीतीद्वारे अकबराने अशोकाच्या याच धोरणाचा विस्तार केला : ‘बादशहा कोणत्याही धर्माचे पालन करणारा असो, प्रजेला आपापला धर्म, पूजाअर्चना आणि रूढीपरंपरांचे पालन करण्याची पूर्ण मोकळीक असेल. सक्तीने धर्मपरिवर्तन होणार नाही. धार्मिक बाबी, संस्था आणि विधीपालनात राज्यसंस्था कोणताही हस्तक्षेप करणार नाही. प्रशासकीय कायदेकानून कोणत्याही विशिष्ट धर्माचे असणार नाहीत. शासन सर्व धर्मक्षेत्रे आणि संस्थांना संरक्षण आणि अनुदान देईल.’ - अकबराचे हे धोरण आधुनिक अर्थाने सेक्युलर नव्हते; पण अकबराने भारताचा स्वधर्म नीट ओळखला होता. संविधानातील पंथनिरपेक्षता म्हणजे अशोक आणि अकबर यांच्या धोरणाचाच विस्तार आहे. आजच्या भारतात ‘सेक्युलर’ हा शब्द याच अर्थाने वापरला जातो. सर्व धर्मसंप्रदायांना समदृष्टीने पाहणे आणि एकाच संप्रदायाच्या वर्चस्वाला विरोध करणे हाच आपल्या ‘धर्मनिरपेक्षते’चा सर्वसामान्य अर्थ आहे; परंतु शब्दांचा पूर्वेतिहास आणि गर्भितार्थ पाहता धर्मनिरपेक्षता किंवा सेक्युलरवाद यापैकी कोणत्याच शब्दातून हा अर्थ नीट व्यक्त होत नाही. कारण आपल्याकडे धर्म म्हणजे रिलिजन नव्हे. त्यामुळे धर्मनिरपेक्षता हा शब्द आपला समाज नैतिक मूल्यांबाबत उदासीन असल्याचा गैरसमज अकारण पसरवतो. या अर्थाने राज्यघटनेच्या अधिकृत प्रतीत वापरलेला पंथनिरपेक्षता हा शब्द अधिक संयुक्तिक आहे.

शब्द कोणताही असो, अशोक आणि अकबरापुढे असलेलेच आव्हानच आजही आपल्यासमोर आहे. भिन्नभिन्न धर्म व दृष्टिकोन असलेल्या माणसांमध्ये समभाव निर्माण करणे आणि वर्चस्ववाद, द्वेष आणि हिंसेला आळा घालणे ही दोन्ही आव्हाने जुनीच आहेत; पण वर्तमान परिस्थितीत ती अधिक तीव्र झाली आहेत. विविध धर्मसमूहांतील हानिकारक रूढींमध्ये सुधारणा करण्याची जबाबदारीही आजची राज्यसंस्था झटकू शकत नाही. या आव्हानाला तोंड देण्यासाठी ‘मैत्री’ आणि ‘सुलह-ए-कुल’ हाच मार्ग स्वीकारून आपल्याला सर्वधर्मसमभाव परिभाषित करावा लागेल. ही ‘देशी दृष्टी’ धार्मिकतेचा सन्मान करते. धर्माबाबत ती मुळीच उदासीन नाही. कारण धर्म हा तर नैतिकतेचा स्रोत आहे. कोणत्याही विशिष्ट धर्माबाबत मात्र ती निष्पक्ष आहे. मैत्रीभावातून उदयाला आलेली असल्याने ही दृष्टी सर्व धार्मिक समुदायांबद्दल समभाव बाळगते. वेगवेगळ्या पंथांदरम्यान परस्परविश्वास आणि सन्मानाचे नाते रुजवत आवश्यक तेथे धार्मिक समुदायांतर्गत होत असलेले शोषणही थांबवणे ही राज्यसंस्थेची जबाबदारी आहे.

राज्यघटनेच्या प्रास्ताविकेत धर्मनिरपेक्षता हा शब्द केव्हा आणि का घातला गेला ही चर्चा निरर्थक आहे. आपल्या राज्यघटनेची मूलभूत बांधणीच मुळात सर्वधर्मसमभाव या तत्त्वानुसार झालेली होती. या अर्थाने सर्वधर्मसमभाव ही केवळ घटनात्मक तरतूद नाही; सभ्यतेच्या मूलभूत मूल्यांपैकी ते एक मूल्य आहे. भारत देशाला अखंड राखण्यासाठी स्वीकारलेली ती एक अनिवार्य पूर्वअट आहे. भारतीय गणराज्याच्या स्वधर्माचे हे आद्य सूत्र होय.yyopinion@gmail.com

English
हिंदी सारांश
Web Title : Friendship: Prerequisite to India's Swadharma, the Republic's Foundational Principle

Web Summary : Friendship, tolerance, and equality are vital to India's identity, drawing from ancient values and movements. सर्वधर्मसमभाव, rooted in history, is crucial for national unity. It promotes harmony and respect among diverse faiths, combating dominance and fostering ethical governance.
टॅग्स :Indiaभारत