शहरं
Join us  
Trending Stories
1
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
2
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
3
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
4
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
5
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
6
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
7
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
8
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
9
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
10
२४ डिसेंबरला ब्लूबर्ड ब्लॉक-२ चे हाेणार उड्डाण ; अमेरिकेतील एएसटी स्पेस मोबाइलसोबत इस्रोचा करार
11
काश्मीरमध्ये ‘चिल्ला-ए-कलां’ प्रारंभ; प्रचंड थंडीच्या मोसमाची सुरुवात
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

पांढरपेशा स्त्रीमुक्ती चळवळीत दलित महिलांचा विसर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2020 06:21 IST

उच्चभ्रू महिलांवरील अत्याचाराची चर्चा होते, महिला रस्त्यावर उतरतात, मोर्चे काढतात, बलात्काऱ्यांना फाशी देण्याची मागणी करतात. हे सारे स्वाभाविक नि रास्त आहे; पण त्याच वेळी दलित महिला-मुलींवर अत्याचार झाले तर समाज मूक राहतो.

- बी.व्ही. जोंधळे(सामाजिक कार्यकर्ते)एकीकडे महिलावर्ग पुरुषांच्या बरोबरीने प्रत्येक क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवीत असताना दुसरीकडे मात्र त्यांच्यावर अनन्वित अत्याचार होत राहावेत या विसंगतीचा अर्थ असा की, स्त्रियांकडे एक माणूस म्हणून न पाहता ती एक भोगदासीच आहे. अशा पुरुषप्रधान विकृत दृष्टिकोनातून पाहिले जात असल्यामुळे स्त्रियांवर जोरजबरदस्ती करून त्यांच्यावर अमानुष अत्याचार होत असतात, होत आहेत, जे की निंद्य आहेत. उच्चभ्रू महिलांवरील अत्याचाराची चर्चा होते, महिला रस्त्यावर उतरतात, मोर्चे काढतात, बलात्काऱ्यांना फाशी देण्याची मागणी करतात. हे सारे स्वाभाविक नि रास्त आहे; पण त्याच वेळी दलित महिला-मुलींवर अत्याचार झाले तर समाज मूक राहतो.अत्याचारातही धर्म-जात पाहिली जाते. परिणामी, दलित स्त्रियांची दयनीय स्थिती, तिचे दु:ख, तिच्यावरील अन्याय-अत्याचार दुर्लक्षितच राहतो, ही बाब चिंतेची म्हटली पाहिजे. दरवर्षी ८ मार्च हा महिला दिन म्हणून पाळला जातो. यंदाही तो पाळला गेला. उच्चमध्यम, मध्यमवर्गीय महिलांना नजरेसमोर ठेवून चर्चा झाली, सेलेब्रिटी महिला, कलाकार, अभिनेत्री वगैरेंच्या मुलाखती प्रसिद्ध झाल्या; पण या सर्व सोपस्कारात दलित महिलांचा मात्र सर्वांनाच विसर पडला. त्यांच्याविषयी चकार शब्दसुद्धा उच्चारला गेला नाही, ही बाब गंभीर म्हणावी अशीच आहे.दलित महिलांना प्रत्येक ठिकाणी दुहेरी अन्यायाला बळी पडावे लागते. एक तर स्त्री म्हणून आणि दुसरीकडे जातीय भावनेतून. अत्याचार कुणावरही होवो तो निंद्यच असतो; पण दलित महिला-मुलींवरील अत्याचाराची समाज म्हणून संवेदनशीलतेने दखल घ्यायला आपण तयार नसतो. खैरलांजीप्रकरणी आंदोलने केली ती दलित समाजाने. अगदी ताजे उदाहरण म्हणजे अलीकडेच सिल्लोड तालुक्यातील अंधारी गावी (जि. औरंगाबाद) एका दलित महिलेला जाळून मारले; पण त्याची फारशी चर्चाही झाली नाही. आंदोलने तर दूरच, अन्यत्र होणाºया अत्याचारात लोकप्रतिनिधी, मंत्री पीडितेच्या भेटीस जातात; पण दलित महिलांवरील अत्याचाराबाबत आपण फारसे गंभीर नसतो. एखाद्या दलित तरुणाने वरच्या जातीतील मुलीशी प्रेम केले तर त्याला दिवसाढवळ्या मारताना उभा गाव पाहतो; पण साक्ष द्यायला कुणी पुढे येत नाही. साक्षीदार फितूर होतात, कारण जात. जातीचा हा ब्रह्मराक्षस इतका जबर आहे की, दलित स्त्रिया अस्वच्छ असतात म्हणून त्यांच्यावर बलात्कार होऊ शकत नाही, असे एखादे न्यायमूर्ती म्हणू शकतात. यापेक्षा दलित स्त्रीची असंवेदनशील अवहेलना ती काय असू शकते?

दलित स्त्रियांची कामाच्या ठिकाणी जशी आर्थिक पिळवणूक नि लैंगिक शोषण होते, तसेच त्यांना राजकीय क्षेत्रातही दुय्यम नि अपमानास्पद वागणूक मिळते. दलित महिलांना रोजंदारी कामावर दलित म्हणून कामाचा मोबदला कमी दिला जातो. ग्रामपंचायतीत दलित महिला सदस्यांना, सरपंचांना खुर्चीवर बसता येत नाही. बºयाच ठिकाणी त्यांना झेंडावंदनाचा झेंडा फडकविण्याचा मान मिळत नाही. शिवाशिव पाळण्यात येते. शहरी भागात दलित महिला अधिकाऱ्यांकडे तुच्छतेने पाहिले जाते. त्यांच्या कार्यालयीन आदेशांचे धडपणे पालनही केले जात नाही; पण उच्चभू्र मध्यमवर्गीय पांढरपेशी स्त्रीमुक्ती चळवळीला याच्याशी काही घेणे-देणे नाही, अशी स्थिती आहे, हे नाकारता येईल काय? बौद्ध धम्माचा स्वीकार करूनसुद्धा अजूनही मोठ्या प्रमाणात दलित स्त्री अंधश्रद्धेत अडकली आहे. या पार्श्वभूमीवर तिला तिच्या हक्कांची जाणीव करून देणे, तिची अंधश्रद्धेतून मुक्तता करणे यासाठी सुशिक्षित दलित स्त्रिया कुठले योगदान देतात, हासुद्धा एक चिंतनीय प्रश्नच आहे.दलित स्त्रियांवरील अन्याय-अत्याचाराचा प्रश्न चर्चिताना एक बाब लक्षात घेतली पाहिजे ती अशी की, जोवर आपण लोकनिष्ठेचा अंगीकार करणार नाही तोवर दलित स्त्रियांना न्याय मिळणार नाही. बाबासाहेबांनी एके ठिकाणी म्हटले आहे, ‘दक्षिण आफ्रिकेत जेव्हा भारतीय जनतेवर अन्याय होत होते तेव्हा तेथील रेव्हरंड स्कॉट या गोºया माणसाने भारतीयांवरील अन्याय दूर करण्यासाठी पराकाष्ठा केली. गोºयावंशाची मुले भारतीयांच्या बाजूने लढली. गोºयांची ही लोकनिष्ठा होती. भारतात मात्र सवर्ण जातीतील माणूस वर्गीकृत समाजाची बाजू घेऊन क्वचितच लढताना दिसतो. कारण आपणाकडे लोकनिष्ठेचा अभाव आहे. तात्पर्य जोवर आपण लोकनिष्ठेचा अवलंब करणार नाही तोवर दलित समाज असो की, दलित स्त्री असो यांना सामाजिक न्याय मिळणार नाही, हे उघड आहे. शिवाय स्त्री अत्याचाराचा प्रश्न हा जातीव्यवस्थेशी निगडित असल्यामुळे जोवर जाती व्यवस्था मोडून पडत नाही तोवर स्त्री अत्याचार थांबणार नाहीत, हे उघड आहे; पण लक्षात कोण घेतो.

टॅग्स :WomenमहिलाIndiaभारत