शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेत e-KYC करताना चूक झाली? सरकारने दिली दुरुस्तीची संधी; ‘ही’ आहे शेवटची तारीख
2
फुटबॉलचा जादूगार २२ मिनिटेच का थांबला? मेस्सीचे लगेचच स्टेडियम सोडण्याचे खरे कारण आले समोर
3
"या मुलांना धडा शिकवायला हवाच"; वरळी हिट-अँड-रन प्रकरणात कोर्टाचा दणका, मिहिर शाहचा जामीन फेटाळला
4
टीम इंडियाचं नेमकं कुठं चुकतंय? गौतम गंभीरच्या रणनीतीवर रॉबिन उथप्पाची टीका
5
“आता येत्या २ महिन्यात एकनाथ शिंदे पुन्हा CM होतील असे वाटतेय”; कुणी केली भविष्यवाणी?
6
"मगरीचे अश्रू, बंगालचा अपमान...", मेस्सीच्या कार्यक्रमात गोंधळ; BJP-TMC मध्ये आरोप-प्रत्यारोप
7
प्रवाशांनो… वंदे भारत, राजधानीने प्रवास करताय? ‘हा’ नियम अनिवार्य; अन्यथा तिकीट मिळणार नाही!
8
५१००० हजारांचे कोल्हापुरी चप्पल थेट निघाले प्राडाच्या गावी; एक ग्रॅम ही वजनात फरक नसलेली एकमेव जोड
9
डोंबिवलीत पुन्हा प्रदूषण; रस्त्यावर गुलाबी रंग; पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, 'तथ्ये तपासून कारवाई करू'
10
सिडकोच्या घरांमध्ये मोठी सूट; लॉटरीपूर्वीच किमती १० टक्क्यांनी घटल्या, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय
11
जंगलात एक कोटींच्या शेळ्या सोडणे हास्यास्पद; वनमंत्र्यांच्या बिबट्यांच्या उपायांची अजित पवारांनी उडवली खिल्ली
12
'धन्यवाद तिरुवनंतपुरम'; थरूर यांच्या बालेकिल्ल्यात भाजपचा झेंडा! पंतप्रधान मोदींनी मानले केरळच्या जनतेचे आभार
13
केरळच्या राजधानीत भाजपाचा ऐतिहासिक विजय, डाव्या पक्षांचा अनेक वर्षांपासूनचा बालेकिल्ला ढासळला
14
साता जन्माची साथ ८ दिवसांत सुटली; नववधू बॉयफ्रेंडसोबत पसार, नवऱ्याची शोधण्यासाठी वणवण
15
“महापालिका निवडणुकीत युतीबाबत चर्चा करून एकत्र निर्णय बसून घेऊ”; अजित पवारांनी केले स्पष्ट
16
...तर थेट मुख्य सचिवांवरच हक्कभंग आणू; राहुल नार्वेकरांचा विधानसभेत संताप, नेमके काय घडले?
17
नवा ट्विस्ट! "पवन सिंहला धमकी दिली नाही, जे करतो ते..."; लॉरेन्स बिश्नोई गँगचा ऑडिओ व्हायरल
18
शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या पार्टीत राहुल गांधी आणि गौतम अदानी आले आमने-सामने, त्यानंतर घडलं असं काही...
19
Lionel Messi : Video - "फ्रॉड करून गेला, १२ हजारांचं तिकीट..."; मेस्सीची झलक न दिसल्याने फॅन्स प्रचंड चिडले
20
लग्नाच्या नावाखाली अल्पवयीन मुलींचा सौदा; राज ठाकरेंच्या पत्रावर CM फडणवीस म्हणाले, "९० टक्के मुली परत आल्या"
Daily Top 2Weekly Top 5

पांढरपेशा स्त्रीमुक्ती चळवळीत दलित महिलांचा विसर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2020 06:21 IST

उच्चभ्रू महिलांवरील अत्याचाराची चर्चा होते, महिला रस्त्यावर उतरतात, मोर्चे काढतात, बलात्काऱ्यांना फाशी देण्याची मागणी करतात. हे सारे स्वाभाविक नि रास्त आहे; पण त्याच वेळी दलित महिला-मुलींवर अत्याचार झाले तर समाज मूक राहतो.

- बी.व्ही. जोंधळे(सामाजिक कार्यकर्ते)एकीकडे महिलावर्ग पुरुषांच्या बरोबरीने प्रत्येक क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवीत असताना दुसरीकडे मात्र त्यांच्यावर अनन्वित अत्याचार होत राहावेत या विसंगतीचा अर्थ असा की, स्त्रियांकडे एक माणूस म्हणून न पाहता ती एक भोगदासीच आहे. अशा पुरुषप्रधान विकृत दृष्टिकोनातून पाहिले जात असल्यामुळे स्त्रियांवर जोरजबरदस्ती करून त्यांच्यावर अमानुष अत्याचार होत असतात, होत आहेत, जे की निंद्य आहेत. उच्चभ्रू महिलांवरील अत्याचाराची चर्चा होते, महिला रस्त्यावर उतरतात, मोर्चे काढतात, बलात्काऱ्यांना फाशी देण्याची मागणी करतात. हे सारे स्वाभाविक नि रास्त आहे; पण त्याच वेळी दलित महिला-मुलींवर अत्याचार झाले तर समाज मूक राहतो.अत्याचारातही धर्म-जात पाहिली जाते. परिणामी, दलित स्त्रियांची दयनीय स्थिती, तिचे दु:ख, तिच्यावरील अन्याय-अत्याचार दुर्लक्षितच राहतो, ही बाब चिंतेची म्हटली पाहिजे. दरवर्षी ८ मार्च हा महिला दिन म्हणून पाळला जातो. यंदाही तो पाळला गेला. उच्चमध्यम, मध्यमवर्गीय महिलांना नजरेसमोर ठेवून चर्चा झाली, सेलेब्रिटी महिला, कलाकार, अभिनेत्री वगैरेंच्या मुलाखती प्रसिद्ध झाल्या; पण या सर्व सोपस्कारात दलित महिलांचा मात्र सर्वांनाच विसर पडला. त्यांच्याविषयी चकार शब्दसुद्धा उच्चारला गेला नाही, ही बाब गंभीर म्हणावी अशीच आहे.दलित महिलांना प्रत्येक ठिकाणी दुहेरी अन्यायाला बळी पडावे लागते. एक तर स्त्री म्हणून आणि दुसरीकडे जातीय भावनेतून. अत्याचार कुणावरही होवो तो निंद्यच असतो; पण दलित महिला-मुलींवरील अत्याचाराची समाज म्हणून संवेदनशीलतेने दखल घ्यायला आपण तयार नसतो. खैरलांजीप्रकरणी आंदोलने केली ती दलित समाजाने. अगदी ताजे उदाहरण म्हणजे अलीकडेच सिल्लोड तालुक्यातील अंधारी गावी (जि. औरंगाबाद) एका दलित महिलेला जाळून मारले; पण त्याची फारशी चर्चाही झाली नाही. आंदोलने तर दूरच, अन्यत्र होणाºया अत्याचारात लोकप्रतिनिधी, मंत्री पीडितेच्या भेटीस जातात; पण दलित महिलांवरील अत्याचाराबाबत आपण फारसे गंभीर नसतो. एखाद्या दलित तरुणाने वरच्या जातीतील मुलीशी प्रेम केले तर त्याला दिवसाढवळ्या मारताना उभा गाव पाहतो; पण साक्ष द्यायला कुणी पुढे येत नाही. साक्षीदार फितूर होतात, कारण जात. जातीचा हा ब्रह्मराक्षस इतका जबर आहे की, दलित स्त्रिया अस्वच्छ असतात म्हणून त्यांच्यावर बलात्कार होऊ शकत नाही, असे एखादे न्यायमूर्ती म्हणू शकतात. यापेक्षा दलित स्त्रीची असंवेदनशील अवहेलना ती काय असू शकते?

दलित स्त्रियांची कामाच्या ठिकाणी जशी आर्थिक पिळवणूक नि लैंगिक शोषण होते, तसेच त्यांना राजकीय क्षेत्रातही दुय्यम नि अपमानास्पद वागणूक मिळते. दलित महिलांना रोजंदारी कामावर दलित म्हणून कामाचा मोबदला कमी दिला जातो. ग्रामपंचायतीत दलित महिला सदस्यांना, सरपंचांना खुर्चीवर बसता येत नाही. बºयाच ठिकाणी त्यांना झेंडावंदनाचा झेंडा फडकविण्याचा मान मिळत नाही. शिवाशिव पाळण्यात येते. शहरी भागात दलित महिला अधिकाऱ्यांकडे तुच्छतेने पाहिले जाते. त्यांच्या कार्यालयीन आदेशांचे धडपणे पालनही केले जात नाही; पण उच्चभू्र मध्यमवर्गीय पांढरपेशी स्त्रीमुक्ती चळवळीला याच्याशी काही घेणे-देणे नाही, अशी स्थिती आहे, हे नाकारता येईल काय? बौद्ध धम्माचा स्वीकार करूनसुद्धा अजूनही मोठ्या प्रमाणात दलित स्त्री अंधश्रद्धेत अडकली आहे. या पार्श्वभूमीवर तिला तिच्या हक्कांची जाणीव करून देणे, तिची अंधश्रद्धेतून मुक्तता करणे यासाठी सुशिक्षित दलित स्त्रिया कुठले योगदान देतात, हासुद्धा एक चिंतनीय प्रश्नच आहे.दलित स्त्रियांवरील अन्याय-अत्याचाराचा प्रश्न चर्चिताना एक बाब लक्षात घेतली पाहिजे ती अशी की, जोवर आपण लोकनिष्ठेचा अंगीकार करणार नाही तोवर दलित स्त्रियांना न्याय मिळणार नाही. बाबासाहेबांनी एके ठिकाणी म्हटले आहे, ‘दक्षिण आफ्रिकेत जेव्हा भारतीय जनतेवर अन्याय होत होते तेव्हा तेथील रेव्हरंड स्कॉट या गोºया माणसाने भारतीयांवरील अन्याय दूर करण्यासाठी पराकाष्ठा केली. गोºयावंशाची मुले भारतीयांच्या बाजूने लढली. गोºयांची ही लोकनिष्ठा होती. भारतात मात्र सवर्ण जातीतील माणूस वर्गीकृत समाजाची बाजू घेऊन क्वचितच लढताना दिसतो. कारण आपणाकडे लोकनिष्ठेचा अभाव आहे. तात्पर्य जोवर आपण लोकनिष्ठेचा अवलंब करणार नाही तोवर दलित समाज असो की, दलित स्त्री असो यांना सामाजिक न्याय मिळणार नाही, हे उघड आहे. शिवाय स्त्री अत्याचाराचा प्रश्न हा जातीव्यवस्थेशी निगडित असल्यामुळे जोवर जाती व्यवस्था मोडून पडत नाही तोवर स्त्री अत्याचार थांबणार नाहीत, हे उघड आहे; पण लक्षात कोण घेतो.

टॅग्स :WomenमहिलाIndiaभारत