शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
3
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
4
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
5
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
6
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
7
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
8
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
9
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
10
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
11
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
12
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
13
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
14
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
15
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
16
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
17
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
18
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
20
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
Daily Top 2Weekly Top 5

पाच दिवसांचा आठवडा: उद्देश सफल होईल का?

By रवी टाले | Updated: February 13, 2020 19:36 IST

पाच दिवसांचा आठवडा: उद्देश सफल होईल का ही शंकाच आहे.

अखेर महाराष्ट्रसरकारने राज्य सरकारी कर्मचाºयांना पाच दिवसांचा आठवडा लागू केलाच! बºयाच दिवसांपासून सरकारचा तसा विचार असल्याची चर्चा सुरू होती. सरकारने घेतलेल्या निर्णयामुळे त्या चर्चेवर पडदा पडला. अर्थात हा निर्णय सरसकट सर्वच राज्य सरकारी कर्मचाºयांना लागू होणार नाही. अत्यावश्यक सेवांमध्ये कार्यरत कर्मचाºयांसह इतरही काही सेवांमधील कर्मचाºयांना पूर्ववत सहा दिवसच काम करावे लागणार आहे. या निर्णयामुळे सरकारी कर्मचाºयांमध्ये आनंदाची लहर पसरणे स्वाभाविकच आहे; मात्र हा निर्णय राज्याच्या दृष्टीने लाभदायक असेल की नुकसानदायक, या मुद्यावरून दोन तट पडले आहेत. अगदी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीतही काही मंत्र्यांनी या निर्णयाला विरोध केल्याचे वृत्त बाहेर झिरपले आहे. आठवड्यात केवळ पाचच दिवस शासकीय कामकाज चालणार असल्याने सरकारचा आस्थापना, वीज, पाणी, शासकीय गाड्यांचे इंधन यावर होणार असलेला खर्च वाचणार आहे आणि त्यामुळे हा निर्णय लाभदायकच ठरणार आहे, असे निर्णयाच्या समर्थकांचे म्हणणे आहे. वस्तुत: या युक्तिवादातच विरोधाभास आहे. एकीकडे दैनंदिन कामकाजाची वेळ वाढविल्यामुळे आठवड्यातील कामाचे एकूण तास कमी होणार नाहीत, असेही म्हणायचे आणि दुसरीकडे वीज, पाणी यावरील खर्चात बचत होणार असल्याचेही म्हणायचे! जर कामाचे तास पूर्ववतच राहणार असतील, तर मग या खर्चात कशी बचत होऊ शकेल? वीज व पाण्यावरील खर्चातील बचतीप्रमाणेच शासकीय वाहनांच्या इंधन खर्चातही बचत होणार असल्याचा निर्णयाच्या समर्थकांचा दावा आहे. रविवार आणि सार्वजनिक सुट्यांच्या दिवशी रस्त्यांवर सर्रास शासकीय वाहने धावताना बघणाºयांचा तरी या दाव्यावर विश्वास बसणे शक्य नाही. आता रविवारला जोडून आणखी एक सुटी मिळाली म्हटल्यावर इंधनाचा खर्च कमी होईल की वाढेल, हे ज्याचे त्याने ठरवावे! काही सन्माननीय अपवाद वगळता, आपल्या देशातील सरकारी अधिकारी व कर्मचारी कार्यक्षमता, निस्पृहता, सेवाभाव, प्रामाणिकता इत्यादी गुणांसाठी ना पूर्वी ओळखले जात होते, ना आता ओळखले जातात! एकदा सरकारी नोकरीत चिकटलो, की आयुष्यभर आपले कुणीच काहीही वाकडे करू शकत नाही, यावर त्यांचा ठाम विश्वास असतो आणि तो ठायीठायी त्यांच्या वर्तणुकीतून झळकतही असतो. लालफीतशाही हा शब्द अशा अधिकारी-कर्मचाºयांमुळेच रुढ झाला आहे. गत शतकातील साठ-सत्तरच्या दशकात, कार्यालयात आल्यावर खुर्चीला कोट टांगून ठेवून दिवसभर अदृश्य होणाºया कर्मचाºयांवर अनेक विनोद होत असत. काळ बदलला असला तरी परिस्थितीत काही फार बदल झालेला नाही. कालौघात मस्टर (हजेरीपट) जाऊन बायोमेट्रिक यंत्रे आली खरी; पण त्यांचा किती उपयोग होतो, हे सरकारी कार्यालयांमध्ये वारंवार काम पडणाºयांना चांगलेच ठाऊक असते. अनेक कार्यालयांमधील ती यंत्रे कामच करीत नाहीत, ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे कामाचे तास वाढवण्याचा कितपत उपयोग होईल, याबाबत शंकाच आहे. मुळात पाच दिवसांचा आठवडा ही संकल्पना पाश्चात्य देशांमध्ये अस्तित्वात आली ती कर्मचाºयांची कार्यक्षमता वाढविण्यासाठी! सहा दिवस कामाच्या ठिकाणी कष्ट करणाºया कर्मचाºयांना एक दिवस घरची कामे उरकण्यासाठी आणि एक दिवस विश्रांती घेण्यासाठी अथवा एखाद्या रमणीय ठिकाणी जाऊन ताजेतवाने होण्यासाठी मिळावा, ही त्यामागील कल्पना! पाश्चात्य देशांमध्ये आपल्या देशाप्रमाणे भरमसाठ सार्वजनिक सुट्या नसतात. त्यामुळे त्या देशांमध्ये पाच दिवसांच्या आठवड्याची गरज होतीच! श्रम संस्कृतीमध्ये विश्वास असलेल्या त्या देशांमध्ये त्याचे लाभही दिसून आले. आपल्या देशात माजी पंतप्रधान स्व. राजीव गांधी यांनी ही संकल्पना आणली होती. केंद्र सरकारच्या कार्यालयांमध्ये तेव्हापासून पाच दिवसांचाच आठवडा आहे; मात्र त्यामुळे त्या कार्यालयांच्या कार्यक्षमतेमध्ये किती सुधारणा झाली, यावर एकदा संशोधन व्हायला हवे. राजा बोले अन् दळ हाले, अशी म्हण आहे. लोकशाहीत राजाची जागा लोकांनी निवडून दिलेल्या सत्ताधाºयांनी घेतली आहे. त्यामुळे त्यांनी घेतलेला निर्णय लागू होणारच आहे! आता किमान निर्णयामागील उद्देश कसा सफल होईल, याची काळजी तरी त्यांनी घ्यावी, अशी अपेक्षाच तेवढी सर्वसामान्य जनता बाळगू शकते!
टॅग्स :GovernmentसरकारMaharashtraमहाराष्ट्र