शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले
2
राजाच्या हत्येनंतर आणखी एक टार्गेट, ज्याची हत्या करणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहचा नवा खुलासा
3
Air India Plane Crash: बोइंग विमानांचे ६ हजाराहून अधिक अपघात, तरीही १५० देश का खरेदी करतात?; इंजिनिअरचा खुलासा
4
बोइंगने घेतलेले शॉर्टकट पडले महागात, ड्रीमलाइनरवरील संशय वाढला; अमेरिकी माध्यमांत होतेय कंपनीच्या त्रुटींवर चर्चा; यापूर्वी देण्यात आले होते चौकशीचे आदेश
5
आमची मुलगी सोनमपेक्षा कमी नाही! जावयाच्या जीवाची भीती व्यक्त करत आईनेच गाठलं पोलीस स्टेशन! म्हणाली... 
6
Ahmedabad Plane Crash: त्यावेळी नेमकं काय घडलं असावं?
7
Gold Price 13 June: १ लाखांच्या पार पोहोचला सोन्याचा दर; Israel-Iran संघर्षामुळे वाढल्या किंमती, पाहा लेटेस्ट रेट्स
8
Viral Video: समुद्रकिनाऱ्यावर तरुणी काढत होती सेल्फी, तितक्यात मोठी लाट आली अन्...; व्हिडीओ व्हायरल
9
Accident: अग्निशामक दलाच्या गाडीने सहा जणांना चिरडले, बाप-लेकासह तिघे जागीच ठार, लेक वाचली
10
सांगलीतील लाच प्रकरणी आयएएस अधिकारी शुभम गुप्तांच्या अडचणी वाढल्या; आणखी कारनामे उघडकीस
11
एअर इंडियाच्या विमानाला अपघात का झाला? कारण ६ महिन्यांनी कळणार
12
WTC मध्ये राडा! हाताने चेंडूने जमिनीवर टाकला तरीही फलंदाज नाबाद; ऑस्ट्रेलिया टीम हैराण, नियम काय?
13
Air India Flight Emergency Landing : Air India च्या विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी; 156 प्रवाशांचा जीव टांगणीला
14
पुण्याला मुसळधार पावसाने झोडपले; सिंहगड रोडवरील नाल्यात ज्येष्ठ महिला वाहून गेली
15
Israel Attack Iran: इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे लष्करप्रमुख हुसैन सलामी ठार, दोन अणुशास्त्रज्ञांचाही मृत्यू 
16
तीन लग्न, ४ मुलं, करिश्मा कपूरच्या एक्स पती किती होता श्रीमंत?, मागे सोडली इतकी संपत्ती
17
विमान, वेग अन् विनाश : हे आहेत जगभरातील आतापर्यंतचे सर्वात मोठे विमान अपघात
18
"५ सेकंद सर्व थांबले, हिरवी लाईट सुरु झाली अन्..."; रमेश विश्वासकुमारने सांगितले टेकऑफ नंतर काय घडलं
19
Nandita Mahtani : रणबीर कपूरला केलं डेट, विराट कोहलीशीही कनेक्शन; संजय कपूरची पहिली पत्नी कोण?
20
अहमदाबाद प्लेन क्रॅशनंतर, व्हायरल होतेय या ज्योतिषाची भविष्यवाणी, मोठ्या नेत्याच्या मृत्यूचाही होता उल्लेख

दलाल शोधून काढाच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2018 00:39 IST

धुळे जिल्ह्यातील धर्मा पाटील या ८0 वर्षांच्या शेतक-याच्या रविवारी मुंबईत झालेल्या मृत्यूचे वर्णन आत्महत्या नव्हे, तर सरकारी अनास्थेचा बळी असेच करावे लागेल. ही अनास्था केवळ प्रशासकीय पातळीवरील नसून, सत्ताधारी नेत्यांचीही आहे. जनतेच्या प्रश्नांविषयी प्रशासन उदासीन असते, याचा अनुभव अनेकदा आला आहे.

धुळे जिल्ह्यातील धर्मा पाटील या ८0 वर्षांच्या शेतक-याच्या रविवारी मुंबईत झालेल्या मृत्यूचे वर्णन आत्महत्या नव्हे, तर सरकारी अनास्थेचा बळी असेच करावे लागेल. ही अनास्था केवळ प्रशासकीय पातळीवरील नसून, सत्ताधारी नेत्यांचीही आहे. जनतेच्या प्रश्नांविषयी प्रशासन उदासीन असते, याचा अनुभव अनेकदा आला आहे. पण सत्ताधारी पक्ष आणि मंत्री हेही धर्मा पाटील यांच्या मृत्यूला जबाबदार आहेत. धर्मा पाटील यांनी २२ जानेवारी रोजी मंत्रालयात विषप्राशन केले, तेव्हापासून ते मरेपर्यंत त्यांच्या म्हणणे समजून घेऊ न आवश्यक ती कारवाई करण्याचा प्रयत्न एकाही सत्ताधारी नेत्याने केला नाही. रविवारी रात्री धर्मा पाटील मरण पावल्यानंतर सोमवारी सकाळी मंत्री जागे झाले आणि त्यांनी पाटील यांना जमिनीचा मोबदला का कमी मिळाला, याची चौकशी करून योग्य मोबदला ३0 दिवसांत देण्याचे आदेश दिले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही पाटील मृत झाल्यानंतरच त्यांच्या मुलाशी फोनवरून संपर्क साधला. आपल्या न्याय्य मागणीसाठी धर्मा पाटील थेट मंत्रालयातच आले असे नव्हे. ते जिल्ह्यात विविध अधिकाºयांच्या कार्यालयांच्या पायºया दोन वर्षे झिजवत होते. तिथे न्याय मिळत नाही, हे लक्षात आल्यानंतर ते मंत्रालयात आले आणि तिथेही त्यांना उडवाउडवीची उत्तरे मिळाल्याने त्यांनी विषप्राशन केले. वीज प्रकल्पासाठी घेतलेल्या जमिनीचा त्यांना मिळालेला आणि शेजारच्या शेतकºयाला मिळालेला मोबदला यांत लाखो रुपयांचा फरक का, असा त्यांचा सवाल होता. एकाला कोटी रुपये आणि दुसºयाला काही लाख असे का व कोणामुळे घडले, हे ते विचारत होते. जिथे जिथे सरकारी प्रकल्पासाठी भूसंपादन होते, तिथे लगेच दलालांचे राज्य सुरू होते आणि दलालच सारी प्रक्रिया अनेकदा हाती घेतात. या जिल्ह्यातही भाजपाचा एक मंत्रीच जमिनीच्या दलालीच्या व्यवहारांत गुंतल्याचा आरोप झाला आहे. धुळे जिल्ह्यात १३५ कोटींचे बोगस भूसंपादन झाल्याचा आरोप करताना आ. अनिल गोटे यांनी महसूल आयुक्त महेश झगडे यांच्या अहवालाचा हवाला दिला आहे. हे जर खरे असेल, तर जिल्ह्यात कोणकोण दलाल आहेत, एक मंत्री खरोखर दलालीत आहेत का, बोगस भूसंपादन करणारे कोण आहेत, हे जाहीर करून, त्यांच्यावर मुख्यमंत्र्यांनी कारवाईही करायला हवी. ती हिंमत ते दाखवतील, अशी अपेक्षा आहे. शेतकºयांच्या कर्जमाफीचा डांगोरा पिटताना, एक वयोवृद्ध शेतकरी मंत्रालयात विषप्राशन करतो, ही बाब महाराष्ट्रासाठी आणि सरकार व सत्ताधारी यांच्यासाठी लाजीरवाणी आहे. भूसंपादन प्रक्रियेतील दलालांची साखळी उद्ध्वस्त करणे, हाच उपाय ठरेल.

टॅग्स :farmer suicideशेतकरी आत्महत्याFarmerशेतकरीagricultureशेती