शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईन ठप्प; केवळ सीएसएमटी ते वाशीपर्यंतच लोकल सुरु, ट्रान्स हार्बरवही परिणाम
2
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
3
खुशखबर! EPFO नं बदलले नियम, PF क्लेम आता लगेच होणार; व्याजही जास्त मिळणार, पाहा डिटेल्स
4
आठ वर्षांनंतर अयोध्येतील जमिनीची किंमत २००% वाढली; जमिनीचे व्यवहार वाढल्याने सर्कल रेटमध्ये मोठी वाढ
5
गाडी वापरणं आता महागणार! थर्ड पार्टी इन्शुरन्समध्ये मोठी वाढ करण्याची तयारी, किती वाढेल खर्च?
6
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
7
"माझ्या मृत्यूच्या गोष्टी करणाऱ्यांनो.."; अमिताभ बच्चन यांनी नेटकऱ्याला सुनावलं, नंतर ट्वीट केलं डिलीट
8
Navi Mumbai Crime: नवी मुंबईतील भयंकर घटना! पत्नीवर चाकूनं सपासप वार करून पतीची आत्महत्या
9
पाव्हणं जेवला काय...! गौतमी पाटीलसोबत सरु आजींनीही धरला ठेका, पाहा भन्नाट डान्स स्टेप्स
10
लिव्हर कॅन्सरवरील सर्जरीनंतर दीपिका पहिल्यांदाच आली समोर, सांगितला वेदनादायी अनुभव
11
बहुतांश लोकांना माहीत नाही की या लोनमध्ये संपूर्ण रकमेवर नाही; खर्च केलेल्या रकमेवरच लागतं व्याज, प्रीपेमेंटवर पेनल्टीही नाही
12
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
13
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
14
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
15
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
16
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
17
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
18
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
19
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
20
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत

अखेर अकोल्याचा गडही ढासळला!

By किरण अग्रवाल | Updated: July 24, 2022 11:10 IST

Gopikishan Bajoriya on way to Shinde Group : माजी आमदार गोपीकिशन बाजोरिया यांनी शिंदे गटाच्या मुंबईतील बैठकीस हजेरी लावल्याने हा गडही ढासळला.

- किरण अग्रवाल

नाही नाही म्हणता अकोल्यातही शिवसेनेला फुटीला सामोरे जाण्याची वेळ आली आहे. ही फूट या पक्षाला कमजोर, तर भाजपला अधिक मजबूत करणारी ठरेल; पण फुटू पाहण्यास उत्सुक असणाऱ्यांबरोबरच त्यांना जाऊ देण्यास राजी असणारे अधिक असल्याने हे टळेल असे दिसत नाही.

 

राजकारणात कोणतीच स्थिती कायम टिकून राहत नाही किंवा त्याबद्दलची शाश्वती देता येत नाही हेच खरे. शिवसेनेत ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांनी घडविलेल्या राजकीय भूकंपापासून आतापर्यंत अकोला जिल्हा बचावला होता; पण आता माजी आमदार गोपीकिशन बाजोरिया यांनी शिंदे गटाच्या मुंबईतील बैठकीस हजेरी लावल्याने हा गडही ढासळला. पक्ष कोणताही असो, राजकीय संबंध बिनसल्यानंतर एका म्यानेत दोन तलवारी राहू शकत नाही; त्याचाच हा प्रत्यय म्हणायचा.

 

शिवसेनेतील 'शिंदेशाही' पुढे आली तेव्हा त्यातून बाहेर पडलेल्या आमदार नितीन बापू देशमुख यांच्यामुळे अकोला जिल्ह्याचे नाव न फुटलेला जिल्हा म्हणून चर्चिले गेले; परंतु या संबंधीचे समाधान शिवसेनेला दीर्घकाळ मिळू शकले नाही. संघटनेतील फुटीनंतर उद्धव ठाकरे यांच्या समर्थनार्थ राम मंदिरात महाआरती करणाऱ्या माजी आमदार बाजोरिया गटानेच शिंदेशाहीत दस्तक दिली. ठाकरे यांच्याशी नाराजी नाही, तर जे आमदार नितीन देशमुख माघारी फिरून ठाकरेंकडे आलेत, त्यांच्या वर्चस्ववादाला धक्का देण्याच्या भूमिकेतून अकोल्याच्या गडाचे दरवाजे किलकिले झाले आहेत हे येथे महत्त्वाचे.

 

विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात यापूर्वी तीनदा शिवसेनेतर्फे प्रतिनिधित्व करून यंदा पराभवास सामोरे जावे लागलेल्या बाजोरिया व शिवसेनेचे विद्यमान जिल्हाप्रमुख, आमदार नितीन देशमुख यांच्यातील वितुष्ट लपून राहिलेले नाही. किंबहुना आपल्या पराभवाला देशमुखच जबाबदार असल्याचा आरोप करीत बाजोरिया यांनी पक्षसंघटनेत बदलाची मागणी लावून धरली होती; परंतु पक्षप्रमुखांनी त्याकडे दुर्लक्ष करीत उलट देशमुख गटालाच झुकते माप देत पदाधिकाऱ्यांच्या नव्या निवडी केल्याने बाजोरिया अस्वस्थ होणे स्वाभाविक होते. त्यांना आयताच शिंदे यांचा पर्याय लाभून गेला म्हणायचे. काँग्रेस व राष्ट्रवादीतही सारेच मातब्बर म्हणवतात; पण पक्ष नेतृत्व त्यात जसे बॅलेन्स साधण्याचा प्रयत्न करते तसे शिवसेनेत होऊ न शकल्यानेही अशी स्थिती आकारल्याचे यातून दिसून यावे.

 

महत्त्वाचे म्हणजे बाजोरिया यांच्या निमित्ताने शिंदे गटाला समर्थन लाभू पाहत असले तरी बरेचसे लोक अजूनही उघडपणे व्यक्त होऊ इच्छित नाही, कारण महापालिकेची निवडणूक तोंडावर आहे. एक तर अगोदरच भाजपकडे उमेदवारीसाठी गर्दी झाली आहे, यात शिंदे यांच्या मागे गेलो तर महापालिकेसाठीच्या तिकिटाचे काय, असा प्रश्न अनेकांना पडला आहे. शिंदेंना पाठिंबा देणे म्हणजे भाजपच्या आश्रयाला जाणे आले. अकोल्यात अगोदरच भाजपची बस फुल्ल आहे. शिंदे गटाचे अजून स्वतंत्र अस्तित्व अगर चिन्ह नाही. मग तिकडे जाऊन आपल्या पदरी काय पडणार, असा अनेकांचा स्वाभाविक प्रश्न असल्याने तूर्त अनेकजण आहे तिथे टिकून आहेत. याचा अर्थ शिवसेनेत सर्व आलबेल आहे असाही घेता येऊ नये.

 

शिवसेनेच्या नावावर मोठे झालेले नंतर पक्षाच्या फारशा कामी आले नाहीत हे वेगळे सांगण्याची गरज नसावी. देशमुख यांनी जिल्हाप्रमुखपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर संघटनाबांधणीला वेग आला व या पक्षाने काँग्रेस, राष्ट्रवादीस काहीसे बाजूला सारून भाजपनंतरची दुसऱ्या क्रमांकाची जागा राखण्यासाठीचे प्रयत्न चालविले आहेत. पक्ष संघटनात्मक कार्यक्रम उपक्रमात ते निदर्शनास येते. शिंदे यांच्या समर्थनार्थ एकीकडे शिवसेनेतून गळती सुरू झाली असताना याच अकोल्यातील काहीजणांनी अलीकडेच शिवसेनेत प्रवेश केला, यावरून या पक्षाबद्दल असलेली आस्था लक्षात यावी. तेव्हा या प्रतिमेला अधिक उंचवायचे तर शिवसेनेतील एकजिनसीपणा टिकून असणे गरजेचे आहे; पण दोन्ही बाजूंची वाढती अरेरावी पाहता ते आता शक्य वाटत नाही. याचा लाभ भाजपलाच झाला तर आश्चर्य वाटू नये.

 

सारांशात, अखेर अकोला जिल्ह्यातही शिवसेना फुटीच्या उंबरठ्यावर उभी आहे. यातून व्यक्तिगत कोणाला काय साध्य होईल हा भाग वेगळा; परंतु आगामी अकोला महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने ही फूट शिवसेनेला नुकसानदायी, तर भाजपला लाभदायी ठरण्याची शक्यता नाकारता येऊ नये.

टॅग्स :PoliticsराजकारणGopikishan Bajoriaगोपीकिशन बाजोरीयाShiv Senaशिवसेना