शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
5
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
6
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
7
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
8
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
9
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
10
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
11
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
12
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
13
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
14
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
15
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
16
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
17
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
18
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
19
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
20
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."

अखेर न्यायमूर्तींना न्याय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2018 00:15 IST

केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांचे विधी मंत्रालय बरेच दिवसांनी शहाण्यासारखे वागले आहे.

केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांचे विधी मंत्रालय बरेच दिवसांनी शहाण्यासारखे वागले आहे. १० जानेवारीपासून त्याने चालविलेला न्या.के.एम. जोसेफ यांच्या विरोधाचा आपला हेका मागे घेऊन त्यांच्या सर्वोच्च न्यायालयावरील बढतीस त्याने मान्यता दिली आहे. न्या. जोसेफ हे उत्तराखंड उच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश आहेत आणि त्यांची सर्वोच्च न्यायालयावर नियुक्ती करण्याची शिफारस सरन्यायाधीश दीपक मिश्र यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या कॉलेजीयमने फार पूर्वीपासून चालविली आहे. मात्र कॉलेजीयमने शिफारस करावी आणि विधी मंत्रालयाने ती फेटाळावी हा पोरखेळ त्या दोन वरिष्ठ संस्थांमध्ये बरेच दिवस चालला. एकदा तर न्या. जोसेफ यांच्यासोबत शिफारस केलेल्या सर्वोच्च न्यायालयात वकिली करणाऱ्या इंदू मल्होत्रा यांचे नाव विधी मंत्रालयाने मान्य केले पण जोसेफ यांचे नाव स्वीकारायला त्याने नकार दिला. तो देताना त्यांची सेवाज्येष्ठता पूर्ण झाली नाही आणि विभागीय प्रतिनिधित्वाच्या व्यवस्थेत ते बसत नाहीत अशी अत्यंत गुळमुळीत व फालतू कारणे त्यासाठी पुढे केली. कॉलेजीयमने मात्र आपल्या शिफारशीचा रेटा चालू ठेवून न्या. जोसेफ यांचे नाव सातत्याने पुढे केले. आताच्या मोदी सरकारचा जोसेफ यांच्यावर राग असल्याचे एक कारण राजकीय आहे व ते उघड आहे. उत्तराखंड राज्यात सत्तेवर असलेले हरीश रावत यांचे काँग्रेस सरकार राष्ट्रपतींनी (म्हणजे केंद्र सरकारने) बरखास्त केले. तेव्हा बरखास्तीचा तो आदेश न्या. जोसेफ यांनी रद्द ठरविला व रावत यांना पुन: मुख्यमंत्रिपदावर आरूढ केले. त्या घटनेचा राग मोदी सरकार विसरले नाही. त्यातून रविशंकर प्रसाद हे दीर्घकाळ भाजपचे प्रवक्ते राहिल्याने त्यांचा या संबंधीचा द्वेषभाव टोकाचा राहिला आहे. तो राग हे सरकारच्या कॉलेजीयम विरुद्धच्या आडमुठेपणाबाबतचे जाहीर कारण असले तरी दुसरेही एक कारण त्यामागे असण्याची शक्यता मोठी आहे. त्याची वाच्यता माध्यमांप्रमाणेच विरोधी पक्षांनी केली नसली तरी ते साºयांच्या मनात आहे. मोदींचे सरकार ‘हिंदुत्ववादाचा’ बडिवार मिरवणारे आहे आणि रविशंकर हे त्या वादाचे टोकाचे समर्थक आहेत. त्यामुळे या सरकारच्या मनात न्या. के.एम. जोसेफ यांचा ख्रिश्चन धर्म आलाच नसणार याची खात्री कोण देईल? साºयांच्या मनात व विचारात असलेले हे कारण कुणी उघडपणे बोलून दाखविले नसले तरी त्याची चर्चा समाजात, जाणकारांत व कायद्याच्या वर्तुळातही होती. प्रत्यक्ष न्या.जोसेफ यांच्या मनात तिने केवढा संताप व मनस्ताप उभा केला असेल याची कल्पनाही अशावेळी आपल्याला करता यावी. कॉलेजीयमने जी नावे पाठविली ती सारी सरकारला बिनदिक्कत मान्य होतात. जोसेफ यांचे नाव मात्र दरवेळी डावलले जाते हा प्रकार सरकारच्या धर्मनिरपेक्ष भूमिकेपुढे प्रश्नचिन्ह उभे करणारा आहे़ रविशंकर प्रसाद किंवा सरकारचे प्रवक्ते यासंबंधी देत आलेले स्पष्टीकरण कुणास पटण्याजोगे नव्हते आणि ते कुणी गांभीर्याने घेतलेलेही दिसले नाही. देशातील अल्पसंख्याकांबाबत या सरकारच्या मनात असलेली अढी जुनीे व वठलेली आहे. ती साºयांना ठाऊक आहे. आपली ही भूमिका देश जाणतो हे समजून घेऊन तरी विधी मंत्रालय व केंद्र सरकार यांनी न्या. जोसेफ यांच्याबाबत वेळीच योग्य ती भूमिका घेऊन आपली प्रतिमा सावरायची की नाही? की तीच बळकट केल्याने आपण निवडणुकीत यश मिळवितो यावर त्यांचा विश्वास अधिक आहे. किमान न्यायमूर्तींच्या नियुक्तीत जात, धर्म, भाषा, प्रदेश असे निकष सरकार करणार असेल वा पाळीत असेल तर त्याने नेमलेल्या न्यायमूर्तींवर जनता विश्वास कसा ठेवील. असोे उशिरा का होईना सरकारने कॉलेजीयमची शिफारस मान्य करून न्या. जोसेफ यांना सर्वोच्च न्यायालयावर नेमून त्यांना न्याय दिला ही बाब मोठी व महत्त्वाची आहे आणि त्यासाठी न्या. जोसेफ हेच अभिनंदनास पात्र आहेत.

टॅग्स :Courtन्यायालय