शहरं
Join us  
Trending Stories
1
भीषण अपघात! चित्रदुर्गात ट्रकशी धडक झाल्यानंतर स्लीपर बसला आग, १७ जणांचा मृत्यू
2
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून आज पहिले विमान झेपावणार! पहिल्या दिवशी किती फ्लाईट्स उडणार?
3
संतापजनक! लग्नाला नकार दिल्याने भाडेकरूने तरुणीच्या आईला जिवंत जाळले; प्रकृती चिंताजनक
4
धुळे महापालिका निवडणुकीत महायुती अन् मविआत जागावाटपाचा तिढा; 'स्वबळा'ची तयारी जोरात
5
महापालिका निवडणूक २०२६ : 'एमआयएम'ची वाढती ताकद काँग्रेससाठी डोकेदुखी, संख्याबळासह मतांच्या टक्केवारीतही वाढ
6
क्रॉस व्होटिंग नको, 'एक पॅनल, एकच चिन्ह'; महायुतीची नवी रणनीती, दगाफटका टाळण्यासाठी खबरदारी
7
'आता हिशोब सरळ आहे'; राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येताच भाजपने मांडलं मतांचे गणित, आकडेवारीत कोण वरचढ?
8
अमेरिकेत ३० भारतीयांना अटक, शिक्षाही होणार! पण नेमका गुन्हा तरी काय केला?
9
३ तासांत चेकद्वारे पैसे मिळणार का? आरबीआयने ऐनवेळी घेतला मोठा निर्णय, वाचा नवे परिपत्रक
10
तैवानमध्ये भूकंपाचे तीव्र धक्के, समोर आला इमारत हलतानाचा धडकी भरवणारा VIDEO
11
तुम्ही आम्हाला मतदान केले, तरच...; सहायक आयुक्तांना व्यासपीठावर बसवून मंत्री राणे यांची प्रचारसभा
12
मेहुण्याचा जाच आणि भावाचा राग! दारू पाजली अन् सपासप केले वार; वादाचं कारण ऐकून होईल संताप
13
घटस्फोटानंतर मुलांपासून दूर झाली अभिनेत्री, पतीने ख्रिसमसलाही भेटू दिलं नाही; म्हणाली...
14
एक दोन नाही...! पंधरा राज्यांमध्ये बहिणी झाल्या लाडक्या; त्या कुठे कुठे करतात खर्च...
15
तामिळनाडू हादरलं! कडलूरमध्ये भीषण अपघात; भरधाव बसने दोन कारना चिरडले, ९ जणांचा मृत्यू
16
'धुरंधर'च्या FA9LA गाण्यावर स्वत:च्याच लग्नात नाचला मराठी अभिनेता, सगळे बघतच राहिले, व्हिडीओ व्हायरल
17
महास्फोट! एपस्टीनच्या 'त्या' १० लाख कागदपत्रांमध्ये दडलंय काय? नेमकं सत्य काय? जगभरात खळबळ!
18
वर्षानुवर्षांची स्क्रिप्ट बदला, विकासावर बोला, हजार रुपये मिळवा : देवेंद्र फडणवीस
19
हमास प्रमुख इस्माईल हानियाला हत्येच्या काही वेळ आधीच गडकरी भेटलेले...; पहाटे ४ वाजता हॉटेलवर अधिकारी आले...
20
तारिक रहमान परतण्यापूर्वी बांगलादेशात पुन्हा हिंसाचार उफाळला; ढाका बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

अखेर न्यायमूर्तींना न्याय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2018 00:15 IST

केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांचे विधी मंत्रालय बरेच दिवसांनी शहाण्यासारखे वागले आहे.

केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांचे विधी मंत्रालय बरेच दिवसांनी शहाण्यासारखे वागले आहे. १० जानेवारीपासून त्याने चालविलेला न्या.के.एम. जोसेफ यांच्या विरोधाचा आपला हेका मागे घेऊन त्यांच्या सर्वोच्च न्यायालयावरील बढतीस त्याने मान्यता दिली आहे. न्या. जोसेफ हे उत्तराखंड उच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश आहेत आणि त्यांची सर्वोच्च न्यायालयावर नियुक्ती करण्याची शिफारस सरन्यायाधीश दीपक मिश्र यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या कॉलेजीयमने फार पूर्वीपासून चालविली आहे. मात्र कॉलेजीयमने शिफारस करावी आणि विधी मंत्रालयाने ती फेटाळावी हा पोरखेळ त्या दोन वरिष्ठ संस्थांमध्ये बरेच दिवस चालला. एकदा तर न्या. जोसेफ यांच्यासोबत शिफारस केलेल्या सर्वोच्च न्यायालयात वकिली करणाऱ्या इंदू मल्होत्रा यांचे नाव विधी मंत्रालयाने मान्य केले पण जोसेफ यांचे नाव स्वीकारायला त्याने नकार दिला. तो देताना त्यांची सेवाज्येष्ठता पूर्ण झाली नाही आणि विभागीय प्रतिनिधित्वाच्या व्यवस्थेत ते बसत नाहीत अशी अत्यंत गुळमुळीत व फालतू कारणे त्यासाठी पुढे केली. कॉलेजीयमने मात्र आपल्या शिफारशीचा रेटा चालू ठेवून न्या. जोसेफ यांचे नाव सातत्याने पुढे केले. आताच्या मोदी सरकारचा जोसेफ यांच्यावर राग असल्याचे एक कारण राजकीय आहे व ते उघड आहे. उत्तराखंड राज्यात सत्तेवर असलेले हरीश रावत यांचे काँग्रेस सरकार राष्ट्रपतींनी (म्हणजे केंद्र सरकारने) बरखास्त केले. तेव्हा बरखास्तीचा तो आदेश न्या. जोसेफ यांनी रद्द ठरविला व रावत यांना पुन: मुख्यमंत्रिपदावर आरूढ केले. त्या घटनेचा राग मोदी सरकार विसरले नाही. त्यातून रविशंकर प्रसाद हे दीर्घकाळ भाजपचे प्रवक्ते राहिल्याने त्यांचा या संबंधीचा द्वेषभाव टोकाचा राहिला आहे. तो राग हे सरकारच्या कॉलेजीयम विरुद्धच्या आडमुठेपणाबाबतचे जाहीर कारण असले तरी दुसरेही एक कारण त्यामागे असण्याची शक्यता मोठी आहे. त्याची वाच्यता माध्यमांप्रमाणेच विरोधी पक्षांनी केली नसली तरी ते साºयांच्या मनात आहे. मोदींचे सरकार ‘हिंदुत्ववादाचा’ बडिवार मिरवणारे आहे आणि रविशंकर हे त्या वादाचे टोकाचे समर्थक आहेत. त्यामुळे या सरकारच्या मनात न्या. के.एम. जोसेफ यांचा ख्रिश्चन धर्म आलाच नसणार याची खात्री कोण देईल? साºयांच्या मनात व विचारात असलेले हे कारण कुणी उघडपणे बोलून दाखविले नसले तरी त्याची चर्चा समाजात, जाणकारांत व कायद्याच्या वर्तुळातही होती. प्रत्यक्ष न्या.जोसेफ यांच्या मनात तिने केवढा संताप व मनस्ताप उभा केला असेल याची कल्पनाही अशावेळी आपल्याला करता यावी. कॉलेजीयमने जी नावे पाठविली ती सारी सरकारला बिनदिक्कत मान्य होतात. जोसेफ यांचे नाव मात्र दरवेळी डावलले जाते हा प्रकार सरकारच्या धर्मनिरपेक्ष भूमिकेपुढे प्रश्नचिन्ह उभे करणारा आहे़ रविशंकर प्रसाद किंवा सरकारचे प्रवक्ते यासंबंधी देत आलेले स्पष्टीकरण कुणास पटण्याजोगे नव्हते आणि ते कुणी गांभीर्याने घेतलेलेही दिसले नाही. देशातील अल्पसंख्याकांबाबत या सरकारच्या मनात असलेली अढी जुनीे व वठलेली आहे. ती साºयांना ठाऊक आहे. आपली ही भूमिका देश जाणतो हे समजून घेऊन तरी विधी मंत्रालय व केंद्र सरकार यांनी न्या. जोसेफ यांच्याबाबत वेळीच योग्य ती भूमिका घेऊन आपली प्रतिमा सावरायची की नाही? की तीच बळकट केल्याने आपण निवडणुकीत यश मिळवितो यावर त्यांचा विश्वास अधिक आहे. किमान न्यायमूर्तींच्या नियुक्तीत जात, धर्म, भाषा, प्रदेश असे निकष सरकार करणार असेल वा पाळीत असेल तर त्याने नेमलेल्या न्यायमूर्तींवर जनता विश्वास कसा ठेवील. असोे उशिरा का होईना सरकारने कॉलेजीयमची शिफारस मान्य करून न्या. जोसेफ यांना सर्वोच्च न्यायालयावर नेमून त्यांना न्याय दिला ही बाब मोठी व महत्त्वाची आहे आणि त्यासाठी न्या. जोसेफ हेच अभिनंदनास पात्र आहेत.

टॅग्स :Courtन्यायालय