शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

लढा कचरामुक्तीचा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2018 00:28 IST

औरंगाबादचा संपूर्ण कचरा ज्या नारेगावात टाकला जात होता तेथील गावक-यांनी तीन दशके हा कचरा सहन केल्यानंतर अखेर लढा पुकारला.

मराठवाड्यातील औरंगाबादेत गेल्या पंधरवड्यात कचऱ्यावरून जे युद्ध पेटले ते सा-यांनीच बघितले. औरंगाबादचा संपूर्ण कचरा ज्या नारेगावात टाकला जात होता तेथील गावक-यांनी तीन दशके हा कचरा सहन केल्यानंतर अखेर लढा पुकारला. एवढी वर्षे त्यांच्या सहनशीलतेची अक्षरश: परीक्षा घेण्यात आली. गावकºयांच्या या प्रश्नाकडे गांभीर्याने बघण्याची गरज स्थानिक प्रशासनाला वाटली नाही. कायम वेळकाढू धोरण राबविण्यात आले. त्यामुळे स्फोट होणारच होता. हा सारा पंक्तीप्रपंच यासाठी कारण नागपूर शहराचा कचरा ज्या भांडेवाडीत जमा होतो तेथील परिस्थितीही अशीच बिकट होत चालली आहे आणि प्रशासनाने तसेच लोकप्रतिनिधींनी केवळ आश्वासनांचे फुगे न सोडता यावर त्वरित ठोस उपाययोजना केली नाहीतर या परिसरातील लोकांच्या भावनांचाही उद्रेक होऊ शकतो. भांडेवाडीतील लोक कित्येक वर्षांपासून नागपूरचा कचरा सहन करीत आहेत. नागपूर शहराच्या विस्तारासोबतच येथे निघणारा कचराही प्रचंड वाढला आहे. दररोज अंदाजे १२०० मेट्रिक टन एवढा कचरा निघतो, आणि हा संपूर्ण कचरा एकमेव अशा भांडेवाडीतील डम्पिंग यार्डमध्ये टाकला जातो. परिणामी या भागातील प्रदूषण वाढले असून तेथील नागरिकांच्या आरोग्यासही धोका निर्माण झाला आहे. हे डम्पिंग यार्ड हटविण्याची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून होत आहे. यासाठी परिसरातील नागरिकांनी आंदोलनेही केली. पण कचºयाचा प्रश्न काही सुटला नाही. कचरा वाढल्यावर येथे एक प्रक्रिया प्रकल्प सुरू करण्यात आला होता. पण तोही आता बंद पडला आहे. हा प्रकल्प तातडीने सुरू व्हावा असे कुणाला वाटले नाही. औरंगाबादेत कचºयानंतर भांडेवाडीचा कचराही उचलून धरण्यात आल्यानंतर पालकमंत्र्यांनी या परिसराला भेट देऊन डम्पिंग यार्डमधील कचºयाची तातडीने विल्हेवाट लावण्याच्या सूचना केल्या आहेत खºया. आता संबंधित अधिकारी त्या किती तत्परतेने अमलात आणतात, ते बघायचे. हा डम्पिंग यार्ड गावठाणापासून १०० मीटर दूर न्यावा, असेही निर्देश पालकमंत्र्यांनी दिले आहेत. पण याने हा प्रश्न सुटेल असे वाटत नाही. कारण ज्या वेगाने शहराचा विस्तार होत आहे तो बघता भविष्यात पुन्हा हीच समस्या निर्माण होईल. कचºयापासून मुक्ती मिळविण्यासाठी एकतर आपल्याला गोव्याच्या साळीगाव कचराभूमीप्रमाणे व्यवस्थापन करावे लागेल. अन्यथा संपूर्ण कचरा एकाच ठिकाणी गोळा न करता प्रत्येक वॉर्डाची स्वतंत्र कचरा व्यवस्थापन यंत्रणा उभारावी लागेल. ज्या वॉर्डाचा कचरा असेल तेथेच त्याचा निस्तरा होईल, आणि हे लवकरात लवकर करावे लागेल अन्यथा कचºयासाठीचा हा लढा तीव्र होऊ शकतो.