शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
5
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
6
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
7
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
8
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
9
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
10
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
11
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
12
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
13
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
14
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
15
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
16
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
17
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
18
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
19
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
20
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?

लढा कचरामुक्तीचा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2018 00:28 IST

औरंगाबादचा संपूर्ण कचरा ज्या नारेगावात टाकला जात होता तेथील गावक-यांनी तीन दशके हा कचरा सहन केल्यानंतर अखेर लढा पुकारला.

मराठवाड्यातील औरंगाबादेत गेल्या पंधरवड्यात कचऱ्यावरून जे युद्ध पेटले ते सा-यांनीच बघितले. औरंगाबादचा संपूर्ण कचरा ज्या नारेगावात टाकला जात होता तेथील गावक-यांनी तीन दशके हा कचरा सहन केल्यानंतर अखेर लढा पुकारला. एवढी वर्षे त्यांच्या सहनशीलतेची अक्षरश: परीक्षा घेण्यात आली. गावकºयांच्या या प्रश्नाकडे गांभीर्याने बघण्याची गरज स्थानिक प्रशासनाला वाटली नाही. कायम वेळकाढू धोरण राबविण्यात आले. त्यामुळे स्फोट होणारच होता. हा सारा पंक्तीप्रपंच यासाठी कारण नागपूर शहराचा कचरा ज्या भांडेवाडीत जमा होतो तेथील परिस्थितीही अशीच बिकट होत चालली आहे आणि प्रशासनाने तसेच लोकप्रतिनिधींनी केवळ आश्वासनांचे फुगे न सोडता यावर त्वरित ठोस उपाययोजना केली नाहीतर या परिसरातील लोकांच्या भावनांचाही उद्रेक होऊ शकतो. भांडेवाडीतील लोक कित्येक वर्षांपासून नागपूरचा कचरा सहन करीत आहेत. नागपूर शहराच्या विस्तारासोबतच येथे निघणारा कचराही प्रचंड वाढला आहे. दररोज अंदाजे १२०० मेट्रिक टन एवढा कचरा निघतो, आणि हा संपूर्ण कचरा एकमेव अशा भांडेवाडीतील डम्पिंग यार्डमध्ये टाकला जातो. परिणामी या भागातील प्रदूषण वाढले असून तेथील नागरिकांच्या आरोग्यासही धोका निर्माण झाला आहे. हे डम्पिंग यार्ड हटविण्याची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून होत आहे. यासाठी परिसरातील नागरिकांनी आंदोलनेही केली. पण कचºयाचा प्रश्न काही सुटला नाही. कचरा वाढल्यावर येथे एक प्रक्रिया प्रकल्प सुरू करण्यात आला होता. पण तोही आता बंद पडला आहे. हा प्रकल्प तातडीने सुरू व्हावा असे कुणाला वाटले नाही. औरंगाबादेत कचºयानंतर भांडेवाडीचा कचराही उचलून धरण्यात आल्यानंतर पालकमंत्र्यांनी या परिसराला भेट देऊन डम्पिंग यार्डमधील कचºयाची तातडीने विल्हेवाट लावण्याच्या सूचना केल्या आहेत खºया. आता संबंधित अधिकारी त्या किती तत्परतेने अमलात आणतात, ते बघायचे. हा डम्पिंग यार्ड गावठाणापासून १०० मीटर दूर न्यावा, असेही निर्देश पालकमंत्र्यांनी दिले आहेत. पण याने हा प्रश्न सुटेल असे वाटत नाही. कारण ज्या वेगाने शहराचा विस्तार होत आहे तो बघता भविष्यात पुन्हा हीच समस्या निर्माण होईल. कचºयापासून मुक्ती मिळविण्यासाठी एकतर आपल्याला गोव्याच्या साळीगाव कचराभूमीप्रमाणे व्यवस्थापन करावे लागेल. अन्यथा संपूर्ण कचरा एकाच ठिकाणी गोळा न करता प्रत्येक वॉर्डाची स्वतंत्र कचरा व्यवस्थापन यंत्रणा उभारावी लागेल. ज्या वॉर्डाचा कचरा असेल तेथेच त्याचा निस्तरा होईल, आणि हे लवकरात लवकर करावे लागेल अन्यथा कचºयासाठीचा हा लढा तीव्र होऊ शकतो.