शहरं
Join us  
Trending Stories
1
"ट्रम्प यांनी हस्तक्षेप केला नसता तर...'; शहबाज शरीफ बनले अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचे प्रवक्ते, शांतीदूत म्हणत नोबेल देण्याची मागणी
2
सुपर ओव्हरचा थरार! श्रीलंका २ धावांवर All Out; पहिल्या बॉलवर मॅच संपवत टीम इंडियाचा विजयी 'षटकार'
3
"सात भारतीय विमानं पाडली...!"; संयुक्त राष्ट्रांच्या मंचावर खोटारड्या शाहबाज शरीफ यांची नुसती 'फेका-फेक'
4
IND vs SL Match Super Over: अखेरच्या चेंडूवर ड्रामा अन् सामन्यात सुपर ओव्हर ट्विस्ट; नेमक काय घडलं (VIDEO)
5
सोनम वांगचुक जोधपूर मध्यवर्ती कारागृहात; अटक केल्यानंतर लेहमधून विमानाने आणलं, CCTV खाली देखरेख
6
Pathum Nissanka Century : पहिली सेंच्युरी अन् श्रीलंकेच्या पठ्ठ्यानं किंग कोहलीचा मोठा विक्रमही मोडला
7
फुल-ऑन ड्रामा! संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत नेतन्याहू भाषणाला येताच अनेक देशांचं 'वॉकआउट'
8
संजूचा गगनचुंबी सिक्सर! चाहतीचे ठुमके अन् ड्रेसिंग रुममध्ये सनथ जयसूर्याला कळायचं झालं बंद (VIDEO)
9
अभिषेक शर्माचा महारेकॉर्ड! T20 आशिया कप स्पर्धेत ३०९ धावांसह पाकच्या रिझवानला दिली 'धोबीपछाड'
10
आशिया कप फायनल आधी ICC कडून सूर्यकुमार यादव याच्यावर कारवाई; PCB नं केली होती तक्रार
11
"त्या डोंगरेला निलंबित करा, माझं नाव खराब करता"; वाहतूक कोंडीवरुन एकनाथ शिंदे अधिकाऱ्यांवर संतापले
12
अग्निशमन दलाचे जवान घरात घुसताच सिलिंडरचा स्फोट; फ्लॅटमध्ये लागलेल्या आगीत मुलाचा मृत्यू, ५ जण जखमी
13
ठरलं, ८-९ ऑक्टोबरला PM मोदी महाराष्ट्रात येणार; CM फडणवीस म्हणाले, “नवी मुंबई विमानतळ...”
14
“राऊतांनी खासदारकीचा एक महिन्याचा पगार दिला असता तर आभार मानले असते”; कुणी केली खोचक टीका?
15
"रशियन सैन्यात जावू नका, तुमच्या जीवाला धोका"; सरकारने दिला इशारा, म्हणाले, "२७ भारतीय..."
16
या एसयूव्हीचं फक्त नावच काफी...! विक्रीच्या बाबतीत पुन्हा ठरली नंबर-1; 38% मार्केट केला एकटीनं 'कॅप्चर'
17
भारताच्या दिग्गज डिफेंस कंपनीला थेट इस्रायलमधून मिळाली मोठी ऑर्डर, अशी आहे शअरची स्थिती
18
VIDEO: बापरे... चिमुरड्याने बसल्या बैठकीला कचाकचा खाल्ल्या हिरव्या मिरच्या, नेटकरीही थक्क
19
कोण आहेत अरुणाचल प्रदेशात पंतप्रधान मोदींचं स्वागत करणाऱ्या या 'डॅशिंग' IAS अधिकारी? सोशल मीडियावर होतायत व्हायरल!
20
“६०० कोटींचा फंड, लोक मरत होते, पण एक पैसा खर्च केला नाही”; CM फडणवीसांचा ठाकरेंवर हल्लाबोल

लढा कचरामुक्तीचा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2018 00:28 IST

औरंगाबादचा संपूर्ण कचरा ज्या नारेगावात टाकला जात होता तेथील गावक-यांनी तीन दशके हा कचरा सहन केल्यानंतर अखेर लढा पुकारला.

मराठवाड्यातील औरंगाबादेत गेल्या पंधरवड्यात कचऱ्यावरून जे युद्ध पेटले ते सा-यांनीच बघितले. औरंगाबादचा संपूर्ण कचरा ज्या नारेगावात टाकला जात होता तेथील गावक-यांनी तीन दशके हा कचरा सहन केल्यानंतर अखेर लढा पुकारला. एवढी वर्षे त्यांच्या सहनशीलतेची अक्षरश: परीक्षा घेण्यात आली. गावकºयांच्या या प्रश्नाकडे गांभीर्याने बघण्याची गरज स्थानिक प्रशासनाला वाटली नाही. कायम वेळकाढू धोरण राबविण्यात आले. त्यामुळे स्फोट होणारच होता. हा सारा पंक्तीप्रपंच यासाठी कारण नागपूर शहराचा कचरा ज्या भांडेवाडीत जमा होतो तेथील परिस्थितीही अशीच बिकट होत चालली आहे आणि प्रशासनाने तसेच लोकप्रतिनिधींनी केवळ आश्वासनांचे फुगे न सोडता यावर त्वरित ठोस उपाययोजना केली नाहीतर या परिसरातील लोकांच्या भावनांचाही उद्रेक होऊ शकतो. भांडेवाडीतील लोक कित्येक वर्षांपासून नागपूरचा कचरा सहन करीत आहेत. नागपूर शहराच्या विस्तारासोबतच येथे निघणारा कचराही प्रचंड वाढला आहे. दररोज अंदाजे १२०० मेट्रिक टन एवढा कचरा निघतो, आणि हा संपूर्ण कचरा एकमेव अशा भांडेवाडीतील डम्पिंग यार्डमध्ये टाकला जातो. परिणामी या भागातील प्रदूषण वाढले असून तेथील नागरिकांच्या आरोग्यासही धोका निर्माण झाला आहे. हे डम्पिंग यार्ड हटविण्याची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून होत आहे. यासाठी परिसरातील नागरिकांनी आंदोलनेही केली. पण कचºयाचा प्रश्न काही सुटला नाही. कचरा वाढल्यावर येथे एक प्रक्रिया प्रकल्प सुरू करण्यात आला होता. पण तोही आता बंद पडला आहे. हा प्रकल्प तातडीने सुरू व्हावा असे कुणाला वाटले नाही. औरंगाबादेत कचºयानंतर भांडेवाडीचा कचराही उचलून धरण्यात आल्यानंतर पालकमंत्र्यांनी या परिसराला भेट देऊन डम्पिंग यार्डमधील कचºयाची तातडीने विल्हेवाट लावण्याच्या सूचना केल्या आहेत खºया. आता संबंधित अधिकारी त्या किती तत्परतेने अमलात आणतात, ते बघायचे. हा डम्पिंग यार्ड गावठाणापासून १०० मीटर दूर न्यावा, असेही निर्देश पालकमंत्र्यांनी दिले आहेत. पण याने हा प्रश्न सुटेल असे वाटत नाही. कारण ज्या वेगाने शहराचा विस्तार होत आहे तो बघता भविष्यात पुन्हा हीच समस्या निर्माण होईल. कचºयापासून मुक्ती मिळविण्यासाठी एकतर आपल्याला गोव्याच्या साळीगाव कचराभूमीप्रमाणे व्यवस्थापन करावे लागेल. अन्यथा संपूर्ण कचरा एकाच ठिकाणी गोळा न करता प्रत्येक वॉर्डाची स्वतंत्र कचरा व्यवस्थापन यंत्रणा उभारावी लागेल. ज्या वॉर्डाचा कचरा असेल तेथेच त्याचा निस्तरा होईल, आणि हे लवकरात लवकर करावे लागेल अन्यथा कचºयासाठीचा हा लढा तीव्र होऊ शकतो.