शहरं
Join us  
Trending Stories
1
Supreme Court: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर टांगती तलवार, आरक्षणाच्या मर्यादेवर आज सुनावणी!
2
Mahayuti: एकमेकांचे माजी नगरसेवक, पदाधिकारी पळवण्यावरून महायुतीत घमासान! 
3
Government Decision: 'नोटरी'वर झालेले जमीन व्यवहारही आता कायदेशीर; ३ कोटी नागरिकांना मोठा दिलासा
4
एकाचवेळा तीन बिबट्यांच्या घराला घिरट्या; शिकारीच्या शोधात आलेले सीसीटीव्ही कॅमेरात कैद 
5
अल-फलाह विद्यापीठाचा संस्थापक जावेद सिद्दीकीवर मोठी कारवाई; ईडीने केली अटक! मनी लॉन्ड्रिंग, घोटाळ्याचा आरोप
6
मोठी दुर्घटना: पुलावरच दोन बसची समोरासमोर धडक; एका नेपाळी महिलेचा मृत्यू, ३५ हून अधिक प्रवासी जखमी
7
आजचा अग्रलेख: हसीना यांना पुन्हा सांभाळा !
8
राज ठाकरेंनी फटकारले, पिट्याभाईने मनसेलाच सोडले; नाराज रमेश परदेशीचा भाजपमध्ये प्रवेश 
9
Asia Cup Rising Stars 2025 : विदर्भकराची मॅच विनिंग फिफ्टी! भारतीय संघाची सेमीफायनलमध्ये एन्ट्री
10
डॉ. उमरला करायचा होता 9/11 सारखा घातपात, पण मुजम्मिल सोबत झाले मतभेद अन् फेल झाला संपूर्ण मनसुबा!
11
ऑटोमोबाईल क्षेत्रातील चमत्कार! होंडाकडे आहे जगातील सर्वात 'स्वस्त' प्रायव्हेट जेट; जाणून घ्या किंमत आणि वैशिष्ट्ये
12
चीन-जपानमध्ये अचानक तणाव वाढला, युद्धाच्या उंबरठ्यावर; जपानच्या दूताने बिजिंग सोडले...
13
दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीला साबरमती तुरुंगात कैद्यांकडून मारहाण; एटीएस, पोलिसांत उडाली खळबळ 
14
"८-९ महिन्यापूर्वी उदय सामंत यांच्यासह एकनाथ शिंदे यांचे २० आमदार फुटत होते, पण...!"; शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांचा मोठा गौप्यस्फोट
15
अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का! उज्वला थिटे यांचा नगराध्यक्षपदासाठीचा अर्ज बाद
16
मुळशी पॅटर्न फेम 'पिट्या भाई' भाजपात जाणार? राज ठाकरेंनी सुनावल्यानंतर पुन्हा केली फेसबुक पोस्ट, म्हणाले...
17
Travel : भारताचे १०००० रुपये 'या' देशात जाऊन होतील २५ लाख! ४ दिवसांच्या ट्रिपसाठी बेस्ट आहे ऑप्शन
18
झटक्यात ₹3900 रुपयांनी आपटलं सोनं! चांदीही झाली स्वस्त; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
19
"हिडीस, किळसवाणं, एखाद्या अबलेवर बलात्कार करावा, तसे भाजपा वागतेय", एकनाथ शिंदेंच्या नेत्याला संताप अनावर
20
लॉरेन्सच्या भावाला अमेरिकेतून गचांडी धरून भारतात आणले जाणार; बाबा सिद्दीकी हत्याकांड प्रकरणी मोठे खुलासे होणार... 
Daily Top 2Weekly Top 5

लढा कचरामुक्तीचा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2018 00:28 IST

औरंगाबादचा संपूर्ण कचरा ज्या नारेगावात टाकला जात होता तेथील गावक-यांनी तीन दशके हा कचरा सहन केल्यानंतर अखेर लढा पुकारला.

मराठवाड्यातील औरंगाबादेत गेल्या पंधरवड्यात कचऱ्यावरून जे युद्ध पेटले ते सा-यांनीच बघितले. औरंगाबादचा संपूर्ण कचरा ज्या नारेगावात टाकला जात होता तेथील गावक-यांनी तीन दशके हा कचरा सहन केल्यानंतर अखेर लढा पुकारला. एवढी वर्षे त्यांच्या सहनशीलतेची अक्षरश: परीक्षा घेण्यात आली. गावकºयांच्या या प्रश्नाकडे गांभीर्याने बघण्याची गरज स्थानिक प्रशासनाला वाटली नाही. कायम वेळकाढू धोरण राबविण्यात आले. त्यामुळे स्फोट होणारच होता. हा सारा पंक्तीप्रपंच यासाठी कारण नागपूर शहराचा कचरा ज्या भांडेवाडीत जमा होतो तेथील परिस्थितीही अशीच बिकट होत चालली आहे आणि प्रशासनाने तसेच लोकप्रतिनिधींनी केवळ आश्वासनांचे फुगे न सोडता यावर त्वरित ठोस उपाययोजना केली नाहीतर या परिसरातील लोकांच्या भावनांचाही उद्रेक होऊ शकतो. भांडेवाडीतील लोक कित्येक वर्षांपासून नागपूरचा कचरा सहन करीत आहेत. नागपूर शहराच्या विस्तारासोबतच येथे निघणारा कचराही प्रचंड वाढला आहे. दररोज अंदाजे १२०० मेट्रिक टन एवढा कचरा निघतो, आणि हा संपूर्ण कचरा एकमेव अशा भांडेवाडीतील डम्पिंग यार्डमध्ये टाकला जातो. परिणामी या भागातील प्रदूषण वाढले असून तेथील नागरिकांच्या आरोग्यासही धोका निर्माण झाला आहे. हे डम्पिंग यार्ड हटविण्याची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून होत आहे. यासाठी परिसरातील नागरिकांनी आंदोलनेही केली. पण कचºयाचा प्रश्न काही सुटला नाही. कचरा वाढल्यावर येथे एक प्रक्रिया प्रकल्प सुरू करण्यात आला होता. पण तोही आता बंद पडला आहे. हा प्रकल्प तातडीने सुरू व्हावा असे कुणाला वाटले नाही. औरंगाबादेत कचºयानंतर भांडेवाडीचा कचराही उचलून धरण्यात आल्यानंतर पालकमंत्र्यांनी या परिसराला भेट देऊन डम्पिंग यार्डमधील कचºयाची तातडीने विल्हेवाट लावण्याच्या सूचना केल्या आहेत खºया. आता संबंधित अधिकारी त्या किती तत्परतेने अमलात आणतात, ते बघायचे. हा डम्पिंग यार्ड गावठाणापासून १०० मीटर दूर न्यावा, असेही निर्देश पालकमंत्र्यांनी दिले आहेत. पण याने हा प्रश्न सुटेल असे वाटत नाही. कारण ज्या वेगाने शहराचा विस्तार होत आहे तो बघता भविष्यात पुन्हा हीच समस्या निर्माण होईल. कचºयापासून मुक्ती मिळविण्यासाठी एकतर आपल्याला गोव्याच्या साळीगाव कचराभूमीप्रमाणे व्यवस्थापन करावे लागेल. अन्यथा संपूर्ण कचरा एकाच ठिकाणी गोळा न करता प्रत्येक वॉर्डाची स्वतंत्र कचरा व्यवस्थापन यंत्रणा उभारावी लागेल. ज्या वॉर्डाचा कचरा असेल तेथेच त्याचा निस्तरा होईल, आणि हे लवकरात लवकर करावे लागेल अन्यथा कचºयासाठीचा हा लढा तीव्र होऊ शकतो.