शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारवर निशाणा?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
3
Staff Gift: कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्यांना दितेय मोठे मोठे फ्लॅट, किंमतही कोट्यवधींमध्ये
4
बांगलादेशात उस्मान हादीनंतर आता NCP नेत्याची हत्या; अज्ञात हल्लेखोराने डोक्यात झाडली गोळी
5
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
6
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
7
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
8
हातावर मेहेंदी, हिरवा चुडा अन् मुंडावळ्या; प्रियदर्शिनी इंदलकरची लगीनघाई? 'तो' फोटो व्हायरल
9
नको असलेला पसारा २०२५ मध्येच सोडा, नवीन वर्षात 'मिनिमलायझेशन'ची सवय लावा
10
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
11
YouTube वर १ बिलियन व्ह्यूज आले तर किती पैसे मिळतात? आकडा ऐकून हैराण व्हाल!
12
नोकरी गेली खड्ड्यात, आज राजीनामा देणारच, कारण...; ढसाढसा रडत शिक्षिकेने बनवला Video
13
बिबट्यानंतर आता लांडग्याची दहशत... तीन वर्षाच्या चिमुरड्याला उचलून नेलं; कुठे घडला प्रकार?
14
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दराचा नवा उच्चांक, चांदीच्या दरात ७,२१४ रुपयांची वाढ; सोन्याच्या दरातही जोरदार तेजी
15
"साजिद अकरमशी माझा कोणताही संबंध नाही"; दहशतवाद्याच्या पत्नीचा मृतदेह स्वीकारण्यास नकार
16
'मी हे विकत घेऊ शकत नाही' असे म्हणणे सोडा! रॉबर्ट कियोसाकींनी सांगितला श्रीमंतीचा नवा मंत्र
17
VIDEO : "सर्वस्व दिलं, तरीही मनासारखं नाही घडलं!" रोहित शर्मा 'त्या' गोष्टीबद्दल पहिल्यांदाच बोलला
18
'बॉर्डर २'मध्ये दिसणार सुनील शेट्टी आणि अक्षय खन्ना? सनी देओलच्या सिनेमासंदर्भात मोठी अपडेट आली समोर
19
आता मनमानी चालणार नाही! रुग्णालयांना आधीच सांगावा लागणार आयसीयू-व्हेंटिलेटरचा खर्च; 'यांची' मंजुरीही आवश्यक
20
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
Daily Top 2Weekly Top 5

मराठवाड्यातील गांधीवादी नेत्याचा लढा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2018 02:47 IST

हैदराबाद मुक्ती संग्रामानंतर तिथेच सशस्त्र लढ्याला पूर्णविराम देऊन गंगाप्रसादजींनी वयाची ९५ वर्षे उलटली तरी सुराज्य निर्मितीचा गांधी मार्ग अजूनही सोडलेला नाही.

- धर्मराज हल्लाळेहैदराबाद मुक्ती संग्रामानंतर तिथेच सशस्त्र लढ्याला पूर्णविराम देऊन गंगाप्रसादजींनी वयाची ९५ वर्षे उलटली तरी सुराज्य निर्मितीचा गांधी मार्ग अजूनही सोडलेला नाही.शालेय जीवनापासूनच गांधी विचारांचा प्रभाव असलेले थोर स्वातंत्र्य सेनानी गंगाप्रसाद बाळाराम अग्रवाल यांनी हैदराबाद मुक्ती संग्रामात जुलमी राजवटीविरुद्ध सशस्त्र लढा दिला. ज्यावेळी स्वातंत्र्य मिळाले, त्याचवेळी शस्त्र बाजूला ठेवत आयुष्यभर अहिंसेचा विचार जपला. त्यांच्या कार्याचा सन्मान करणारा महाराष्ट्र फाऊंडेशनचा जीवन गौरव पुरस्कार १३ जानेवारी रोजी पुण्यात गंगाप्रसादजींना प्रदान होणार आहे. स्वराज्य मिळाल्यानंतर सुराज्यासाठी धडपडणारे ते सेनानी होत. १७ सप्टेंबर १९४८ रोजी हैदराबाद स्टेटमधील जुलमी राजवट संपुष्टात आली. त्यावेळी चोंढी स्टेशनवर कुरुंद्याच्या अत्याचारी फौजदाराला पकडून लोकांनी बेदम झोडपण्यास सुरुवात केली होती. गंगाप्रसादजींनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखले आणि संतापलेल्या लोकांच्या तावडीतून त्या फौजदाराची सुटका केली. प्रखर संघर्षानंतर विजयोत्सवात बेभान न होता तोल सांभाळणारी वृत्ती गंगाप्रसादजींनी दाखविली. सुडाची आग आता अयोग्य आहे, झाले गेले विसरून सर्वांनी एक झाले पाहिजे. हैदराबाद मुक्ती लढा हा कुणा एका जाती वा धर्माविरुद्ध नव्हता, तो अखंड भारताच्या संपूर्ण स्वातंत्र्यासाठीचा लढा होता, अशी धारणा असणा-यांपैकी गंगाप्रसादजी आहेत. संवेदनशील घटनांमध्ये दंगलसदृश परिस्थिती निर्माण झाली, तर रस्त्यावर येऊन हिंसा करणाºयांना तिथेच थांबविण्याची नैतिक ताकद असणारे नेते आज दिसत नाहीत. १९६९ मध्ये महात्मा गांधीजींची जन्मशताब्दी साजरी होत असताना महाराष्ट्रात काही भागात दंगली उसळल्या होत्या. शेकडो लोक मृत्युमुखी पडले. त्यावेळी वसमत येथे धार्मिक ऐक्यासाठी गंगाप्रसादजींनी १४५ दिवसांचे एक प्रदीर्घ साखळी उपोषण केले. लोकनायक जयप्रकाशजी नारायण यांच्या पत्नी प्रभावतीदेवी यांनी वसमत येथे जाऊन त्यांच्या कार्याची प्रशंसा केली.स्वामी रामानंद तीर्थ यांच्यासोबतचा लढा, आजेगावचा रणसंग्राम इतिहासात नमूद आहे. हुतात्मा बहिर्जी शिंदे यांच्यासह अनेक जखमी सैनिकांना प्राणांची बाजी लावून वाचविण्यासाठी गंगाप्रसादजी धावले होते. रायफल घेऊन लढणारे हे सैनानी पुढे आयुष्यभर गांधी विचारांचे पाईक बनले. भूदान चळवळीत योगदान दिले. दुष्काळाविरुद्ध झुंज अभियान राबविले. आणीबाणीत १८ महिने तुरुंगवास भोगला. महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाचे काम पुढे नेत खादीचा प्रचार आणि प्रसार केला. ग्रामीण भागात महिलांच्या आरोग्यासाठी निर्धूर चूल, सेंद्रीय शेतीचे प्रयोग केले. अनेक शेतकºयांना सेंद्रीय शेतीकडे वळविले. मराठवाडाभूषण, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाची डी.लिट पदवी संपादन करणारे गंगाप्रसादजी शेतकरी आत्महत्या थांबविण्यासाठी आजपर्यंत दौरे करीत राहिले. जानेवारी महिन्यात त्यांनी ९६व्या वर्षांत पदार्पण केले आहे. थोर स्वातंत्र्य सेनानी गोविंदभाई श्रॉफ यांच्यानंतर मराठवाड्यात आदर्शवत सर्वोच्च स्थान असणारे गंगाप्रसादजी हे केवळ अग्रवाल कुटुंबीयांची जबाबदारी असू शकत नाहीत. १७ सप्टेंबरला होणाºया सरकारी औपचारिकतेपलीकडे जाऊन त्यांची सेवा करण्याची संधी सरकार अन् समाजाने स्वीकारली पाहिजे. कुटुंब देखभाल करीत असले तरी मोठ्या माणसांचे मोठेपण त्यांच्या हयातीत नव्हे, पश्चात गौरवान्वित करणारा मराठी मातीचा दुर्गुण नाहीसा करण्याची जबाबदारी तरुण पिढीवर आहे.

टॅग्स :social workerसमाजसेवक