शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
2
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
4
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
5
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
6
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
7
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
8
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
9
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
10
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
11
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
12
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
13
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
14
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
15
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
16
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
17
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
18
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
19
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
20
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?

मराठवाड्यातील गांधीवादी नेत्याचा लढा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2018 02:47 IST

हैदराबाद मुक्ती संग्रामानंतर तिथेच सशस्त्र लढ्याला पूर्णविराम देऊन गंगाप्रसादजींनी वयाची ९५ वर्षे उलटली तरी सुराज्य निर्मितीचा गांधी मार्ग अजूनही सोडलेला नाही.

- धर्मराज हल्लाळेहैदराबाद मुक्ती संग्रामानंतर तिथेच सशस्त्र लढ्याला पूर्णविराम देऊन गंगाप्रसादजींनी वयाची ९५ वर्षे उलटली तरी सुराज्य निर्मितीचा गांधी मार्ग अजूनही सोडलेला नाही.शालेय जीवनापासूनच गांधी विचारांचा प्रभाव असलेले थोर स्वातंत्र्य सेनानी गंगाप्रसाद बाळाराम अग्रवाल यांनी हैदराबाद मुक्ती संग्रामात जुलमी राजवटीविरुद्ध सशस्त्र लढा दिला. ज्यावेळी स्वातंत्र्य मिळाले, त्याचवेळी शस्त्र बाजूला ठेवत आयुष्यभर अहिंसेचा विचार जपला. त्यांच्या कार्याचा सन्मान करणारा महाराष्ट्र फाऊंडेशनचा जीवन गौरव पुरस्कार १३ जानेवारी रोजी पुण्यात गंगाप्रसादजींना प्रदान होणार आहे. स्वराज्य मिळाल्यानंतर सुराज्यासाठी धडपडणारे ते सेनानी होत. १७ सप्टेंबर १९४८ रोजी हैदराबाद स्टेटमधील जुलमी राजवट संपुष्टात आली. त्यावेळी चोंढी स्टेशनवर कुरुंद्याच्या अत्याचारी फौजदाराला पकडून लोकांनी बेदम झोडपण्यास सुरुवात केली होती. गंगाप्रसादजींनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखले आणि संतापलेल्या लोकांच्या तावडीतून त्या फौजदाराची सुटका केली. प्रखर संघर्षानंतर विजयोत्सवात बेभान न होता तोल सांभाळणारी वृत्ती गंगाप्रसादजींनी दाखविली. सुडाची आग आता अयोग्य आहे, झाले गेले विसरून सर्वांनी एक झाले पाहिजे. हैदराबाद मुक्ती लढा हा कुणा एका जाती वा धर्माविरुद्ध नव्हता, तो अखंड भारताच्या संपूर्ण स्वातंत्र्यासाठीचा लढा होता, अशी धारणा असणा-यांपैकी गंगाप्रसादजी आहेत. संवेदनशील घटनांमध्ये दंगलसदृश परिस्थिती निर्माण झाली, तर रस्त्यावर येऊन हिंसा करणाºयांना तिथेच थांबविण्याची नैतिक ताकद असणारे नेते आज दिसत नाहीत. १९६९ मध्ये महात्मा गांधीजींची जन्मशताब्दी साजरी होत असताना महाराष्ट्रात काही भागात दंगली उसळल्या होत्या. शेकडो लोक मृत्युमुखी पडले. त्यावेळी वसमत येथे धार्मिक ऐक्यासाठी गंगाप्रसादजींनी १४५ दिवसांचे एक प्रदीर्घ साखळी उपोषण केले. लोकनायक जयप्रकाशजी नारायण यांच्या पत्नी प्रभावतीदेवी यांनी वसमत येथे जाऊन त्यांच्या कार्याची प्रशंसा केली.स्वामी रामानंद तीर्थ यांच्यासोबतचा लढा, आजेगावचा रणसंग्राम इतिहासात नमूद आहे. हुतात्मा बहिर्जी शिंदे यांच्यासह अनेक जखमी सैनिकांना प्राणांची बाजी लावून वाचविण्यासाठी गंगाप्रसादजी धावले होते. रायफल घेऊन लढणारे हे सैनानी पुढे आयुष्यभर गांधी विचारांचे पाईक बनले. भूदान चळवळीत योगदान दिले. दुष्काळाविरुद्ध झुंज अभियान राबविले. आणीबाणीत १८ महिने तुरुंगवास भोगला. महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाचे काम पुढे नेत खादीचा प्रचार आणि प्रसार केला. ग्रामीण भागात महिलांच्या आरोग्यासाठी निर्धूर चूल, सेंद्रीय शेतीचे प्रयोग केले. अनेक शेतकºयांना सेंद्रीय शेतीकडे वळविले. मराठवाडाभूषण, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाची डी.लिट पदवी संपादन करणारे गंगाप्रसादजी शेतकरी आत्महत्या थांबविण्यासाठी आजपर्यंत दौरे करीत राहिले. जानेवारी महिन्यात त्यांनी ९६व्या वर्षांत पदार्पण केले आहे. थोर स्वातंत्र्य सेनानी गोविंदभाई श्रॉफ यांच्यानंतर मराठवाड्यात आदर्शवत सर्वोच्च स्थान असणारे गंगाप्रसादजी हे केवळ अग्रवाल कुटुंबीयांची जबाबदारी असू शकत नाहीत. १७ सप्टेंबरला होणाºया सरकारी औपचारिकतेपलीकडे जाऊन त्यांची सेवा करण्याची संधी सरकार अन् समाजाने स्वीकारली पाहिजे. कुटुंब देखभाल करीत असले तरी मोठ्या माणसांचे मोठेपण त्यांच्या हयातीत नव्हे, पश्चात गौरवान्वित करणारा मराठी मातीचा दुर्गुण नाहीसा करण्याची जबाबदारी तरुण पिढीवर आहे.

टॅग्स :social workerसमाजसेवक