शहरं
Join us  
Trending Stories
1
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
2
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?
3
सोने-चांदीने गुंतवणूकदार मालामाल, गेल्या एका वर्षात मिळाले सोन्यातून ४४ तर चांदीतून ४५ टक्के रिटर्न
4
अग्रलेख: राधाकृष्णन आता देशाचे! नव्या उपराष्ट्रपतींनी हे लक्षात ठेवायला हवेच
5
विम्याचा हप्ता दहा वर्षांत दुप्पट! कंपन्यांकडून ग्राहकांची लूट; भीती दाखवून प्रीमियमवाढ
6
Maratha Reservation: राज्यात आजपर्यंत दिलेल्या कुणबी प्रमाणपत्रांची श्वेतपत्रिका काढावी; ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीची भूमिका
7
विशेष लेख: एका परिवर्तनशील, सहृदय नेतृत्वाचा अमृतमहोत्सव
8
नेपाळमध्ये देशभरात संचारबंदी लागू; महाराष्ट्रातील १०० पर्यटकांसह शेकडो प्रवासी अडकले 
9
भारत-अमेरिका यांच्यात चर्चेची दारे खुली होणार; पंतप्रधान मोदी म्हणाले, "ट्रम्प यांच्याशी..."
10
नेपाळनंतर फ्रान्समध्येही जनतेचा उद्रेक; २५० निदर्शकांना अटक 
11
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
12
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
13
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
14
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
15
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
16
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
17
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
18
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
19
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
20
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!

विशेष लेख: ‘माफ करना राहुल, मेरे भाई!’

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2024 11:48 IST

Rahul Gandhi: राहुल गांधींच्या टीकाकार स्मृती इराणी हल्ली म्हणाल्या, त्यांना कमी लेखू नका! दुसरे टीकाकार गायक रॉकी मित्तल यांचेही हृदयपरिवर्तन झाले आहे.

- हरीष गुप्ता(नॅशनल एडिटर, लोकमत, नवी दिल्ली)

विचित्र वाटले तरी हे खरे आहे. काँग्रेस पक्षाने लोकसभा निवडणुकीत ९९ जागा जिंकल्या. राहुल गांधी विरोधी पक्षनेते झाल्यापासून त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन कमालीचा बदलला आहे. राहुल गांधी यांनी वेगवेगळे विषय उपस्थित करावेत आणि त्या प्रश्नांचा मुकाबला करण्यासाठी भाजपला धावपळ करावी लागावी, असे चित्र स्पष्टपणे दिसते आहे. जातीनिहाय जनगणना हा त्यातलाच एक प्रश्न. परंतु काही दशकांपासून राहुलच्या कठोर टीकाकार असलेल्या स्मृती इराणी यांनी दिलेला धक्का फारच मोठा म्हणायचा. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत अमेठीतून राहुल गांधी यांचा पराभव केल्यानंतर स्मृती इराणी यांना आकाश ठेंगणे झाले होते. राहुल नाव घेऊन त्या नेहमी थट्टा करायच्या. परंतु आता राहुल यांचे सहकारी किशोरीलाल शर्मा यांच्याकडून अमेठीत मानहानिकारकरीत्या पराभव पत्करावा लागल्यानंतर त्या फार कोठे दिसेनाशा झाल्या. मंत्री म्हणून मिळालेला बंगलाही त्यांनी सोडला. अलीकडेच त्या अचानक प्रकटल्या आणि त्यांनी राहुल गांधी यांनी स्वीकारलेल्या नव्या दृष्टिकोनाबद्दल प्रशंसोद्गार काढले. ‘राहुल यांना कमी लेखू नका’ असे त्या म्हणाल्या. एका पॉडकास्टमध्ये स्मृती इराणी म्हणाल्या, ‘राहुल आता नव्या प्रकारचे राजकारण करत आहेत.’ पुढे त्यांनी अशीही पुस्ती जोडली की राहुल यांचे धोरण बदलण्यामागे राजकारणच आहे. मवाळ हिंदुत्वाचा पत्ता चालवण्याचा प्रयत्न त्यांनी केला, परंतु त्यात अपयश आल्यानंतर राहुल गांधींनी पवित्रा बदलला आहे, असे त्यांचे म्हणणे. स्मृती इराणी आता राजकीय कामाच्या शोधात असून अजूनपर्यंत तरी त्यांच्या हाती काही लागलेले नाही. दुसरे एक हरियाणवी गायक संगीतकार जयभगवान मित्तल उर्फ रॉकी मित्तल यांचेही हृदय परिवर्तन झाले आहे. बरीच वर्षे ते राहुल गांधी यांचे टीकाकार होते; पण आता त्यांनी राहुल यांची जाहीर माफी मागितली आहे. ‘माफ करना राहुल, मेरे भाई, भाजप नेतृत्वाचा मी आंधळा भक्त झालो होतो. मी तोंडघशी पडलो. कृपा करून मला क्षमा कर.’ - असे ते म्हणाले. मित्तल यांची भाजपशी फारकत होईल, असे दिसते.

भाजपकडून संघाच्या मनधरणीचे प्रयत्नहे विचित्र वाटेल; पण खरे आहे. भाजपचे नेतृत्व राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या मातृसंस्थेचा रोष शांत करण्याच्या प्रयत्नात असल्याचे दिसते. केंद्र सरकारने घेतलेल्या दोन निर्णयांविषयी राजकीय निरीक्षकांनाच नव्हे तर संघालाही आश्चर्य वाटले. जगातील सर्वात मोठे सामाजिक संघटन असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघात सामील व्हायला सरकारी कर्मचाऱ्यांना अनुमती देणारा निर्णय सरकारने स्वतःहूनच घेतला. काँग्रेस राजवटीने सुमारे ४० वर्षांपूर्वी त्यावर घातलेली बंदी उठवावी, अशी विनंती संघाने २०१५ सालीच केली होती. संघ आणि भाजप एकमेकांना मजबूत करण्यासाठी काम करत असले तरी २०१५ सालापासून संघाने आपल्या मागणीविषयी सरकारला कधीही स्मरण दिले नाही. सरसंघचालक मोहन भागवत यांना सर्वोच्च सुरक्षा देण्याचा निर्णयही असाच अचानक झाला. भागवत यांनी आपली सुरक्षा वाढवावी, अशी मागणी कधीही केली नव्हती. परंतु गुप्तचर आणि सुरक्षा यंत्रणांनी केलेल्या शिफारशीनुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शाह यांच्या बरोबरीची झेड प्लस दर्जाची सुरक्षा यंत्रणा भागवत यांना दिली. असे असले तरी जयप्रकाश नड्डा यांच्या जागी नवा पक्षाध्यक्ष नेमण्याच्या विषयावर मात्र संघ मागे हटायला तयार नाही. पक्षाध्यक्षपदी आपण सुचवलेली व्यक्तीच असेल, असे संघाचे म्हणणे आहे. सरकारचा कारभार चालवायला पंतप्रधान मोकळे आहेत. कोणाला मंत्रिमंडळात घ्यायचे हा पूर्णतः त्यांचा अधिकार आहे. परंतु पक्षाचा विषय असेल तेव्हा संघाच्या पसंतीचा माणूस असला पाहिजे, अशी ही भूमिका आहे. भाजपच्या अध्यक्षपदी नव्याने कोणाला बसवायचे याचा निर्णय न होण्यामागे वेळेचा अभाव आणि अन्य काही कारणेही आहेत. आता निर्णय पुढच्या वर्षाच्या सुरुवातीपर्यंत पुढे ढकलण्यात आला असून हा कुटुंबातला विषय कुटुंबातच सोडवला जाईल, अशी आशा संघाने व्यक्त केली आहे. 

घरवापसी टांगणीलाजम्मू आणि काश्मीरच्या सेवेत असलेले २०१० च्या बॅचचे आयएएस अधिकारी डॉ. शाह फैजल हे नशीबवान म्हणायचे. त्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेऊन स्वतःचा पक्ष काढला आणि दोन वर्षांनंतर राजकारण सोडून ते सेवेत परतले. आता दुसरे आयएएस अधिकारी आपल्याला अशाच प्रकारे पुन्हा सेवेत घेतले जाईल, अशी आशा करत आहेत. २०११ च्या उत्तरप्रदेश बॅचचे भावखाऊ आणि फटकळ आयएएस अधिकारी अभिषेक सिंह यांनी २०२४ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी स्वेच्छानिवृत्ती घेऊन राजकारणात प्रवेश केला.  आता त्यांना सेवेत परत यायचे आहे. मात्र ‘त्यांना घेऊ नका’ अशी शिफारस राज्य सरकारने केली आहे. अंतिम निर्णय केंद्र सरकार घेईल. सिंह यांचे राजकीय उद्योग लक्षात घेऊन केंद्र सरकारही त्यांच्या विनंतीचा विचार करायला तयार नाही. ऑक्टोबर २०२३ मध्ये सिंह यांनी जौनपूरमधून भाजपचे तिकीट मिळावे, यासाठी त्यांनी जंगजंग पछाडले; परंतु त्यांच्या हाती काही लागले नाही. जातवार जनगणना आणि आरक्षणाच्या मुद्द्याला त्यांनी पाठिंबा दिल्यामुळे गोष्टी आणखी कठीण झाल्या. सिंह यांच्या पत्नी दुर्गा शक्ती नागपाल या लखीमपूर खेरीच्या जिल्हाधिकारी आहेत.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेस