शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA : टॉस जिंकून फसलो! थेट शुभमन गिलचं नाव घेत सूर्या म्हणाला, तो पहिल्याच बॉलवर आउट झाला अन्...
2
PM मोदींची डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी फोनवरून सखोल चर्चा, 'या' ३ गोष्टींसाठी एकत्र काम करणार
3
‘गोल्डन डक’मुळं गिलच्या निवडीवर प्रश्नचिन्ह; संजूसह टीम इंडियातील ‘वशीलेबाजी’चा मुद्दा पुन्हा चर्चेत
4
धोकादायक सेस इमारतींचा तिढा सुटला; मुंबई 'पागडीमुक्त' होणार, पुनर्विकाच्या नव्या नियमावलीची शिंदेंकडून घोषणा
5
IND vs SA : दक्षिण आफ्रिकेचा पलटवार; घरच्या मैदानात टीम इंडियावर ओढावली T20I मधील सर्वात मोठ्या पराभवाची नामुष्की
6
वसंत मोरे थोडक्यात बचावले; नवले पुलावरील अपघातांवर बोलत असतानाच भरधाव टेम्पो आला अन्..
7
VIDEO : अर्शदीपची ओव्हर संपता संपेना; लाजिरवाण्या रेकॉर्डनंतर डगआउटमध्ये बसलेला गंभीर चिडला!
8
नीलेश घायवळ न्यायालयाकडून फरार घोषित; संपूर्ण मालमत्ता जप्त होण्याची शक्यता
9
FIH Hockey Men’s Junior World Cup 2025 : भारताच्या युवा हॉकी संघाचे PM मोदींकडून खास शब्दांत कौतुक, म्हणाले...
10
"एकदा भावाचा टी-शर्ट घालून मॅच खेळायला गेले अन्..."; महिला क्रिकेटर शेफालीचा धमाल किस्सा
11
IND vs SA : विकेटमागे जितेशची चपळाई! क्विंटन डी कॉकवर ओढावली 'नर्व्हस नाइंटी'ची नामुष्की (VIDEO)
12
"ते पार्ट टाइम पॉलिटिशियन, त्यांना गोपनीय परदेश दौऱ्यांचा छंद..."; मुस्लीम महिला नेत्या राहुल गांधींवर स्पष्टच बोलल्या
13
Indigo ला साडेसाती भोवली? दोन शत्रू ग्रहांमुळे अशी ‘दशा’ झाली; २०२७ पर्यंत आव्हान कायम अन्…
14
लुथरा बंधूंची अटकपूर्व जामीन याचिका फेटाळली; HC म्हणाले, “जिवाला धोका असल्याचा पुरावा...”
15
"मी स्वतःच फॉर्म भरला नाही, आता दंगलखोरांच्या पक्षासमोर...!" SIR वरून ममतांचा हल्लाबोल
16
इम्रान खानच्या तुरुंगात अडचणी आणखी वाढणार! पाकिस्तानने २४ तासात घेतले ५ मोठे निर्णय
17
"'मी गोमांस खातो, कोण मला अडवतं?', म्हणणाऱ्या मंत्र्यासोबत अमित शाह जेवताहेत, हिम्मत असेल तर...!"; उद्धव ठाकरे यांचं थेट आव्हान
18
T20 World Cup 2026 Tickets Live: ICC चा ऐतिहासिक निर्णय! फक्त १०० रुपयांत बूक करा वर्ल्ड कपचं तिकीट
19
"खुर्चीसाठी स्वत:चं पायपुसणं करून घेणाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांवर बोलू नये"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर पलटवार
20
IND vs SA 2nd T20I : अखेर सूर्या भाऊनं डाव साधला! टॉसचा बॉस होण्यासाठी यावेळी आजमावला हा फंडा
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांना त्यांच्या घामाचा दाम हवा, मग तो कुणीही द्यावा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2020 01:59 IST

नवीन कायद्यामुळे शेतमालाची खासगी बाजार व्यवस्था निर्माण होणार आहे. त्यामुळे स्पर्धा वाढणार आहे. बाजार समित्यांना या स्पर्धेत टिकण्यासाठी शेतकºयांप्रति सकारात्मक व्हावे लागेल

पाशा पटेलबाजार समित्यांची स्थापना झाल्यापासून त्यात कोणतेही कालसुसंगत बदल झालेले नव्हते. येथे आडते आणि हमालांचेच वर्चस्व होते. बाजार शुल्क, आडत, हमाली, तोलाई या नावाखाली शेतमालातून जवळपास १५ ते २० टक्के रकमेची कपात केली जात होती. अनेकदा ही मंडळी त्यांच्या मनात येईल तेव्हा बाजार बंद पाडत असत. एकूण बाजार समित्या म्हणजे सार्वजनिक केंद्र बनले होते. त्यामुळे शेतकऱ्यांचा जीव या व्यवस्थेत गुदमरला होता. या कुजलेल्या, कालबाह्य व्यवस्थेत सुधारणा झाल्यामुळे नवे कृषी कायदे स्वागतार्ह आहेत. बाजार समित्यांमध्ये आधारभूत किमतीपेक्षा कमी दरात मालाची खरेदी झाल्यास कारवाईची तरतूद आहे. मात्र प्रत्येक बाजार समितीविरुद्ध खटले दाखल करता येणे शक्य नाही़ प्रत्येक आडत्यावर खटले दाखल करता येणार नाहीत. तांत्रिकदृष्ट्या ते जमणार नाही. त्यामुळे स्पर्धा निर्माण करणारी व्यवस्था तयार करणे हेच त्यावर उत्तर होते. केंद्राने त्यादृष्टीने चांगले कायदे केले आहेत.

नवीन कायद्यामुळे शेतमालाची खासगी बाजार व्यवस्था निर्माण होणार आहे. त्यामुळे स्पर्धा वाढणार आहे. बाजार समित्यांना या स्पर्धेत टिकण्यासाठी शेतकºयांप्रति सकारात्मक व्हावे लागेल. रुमालाखालचे व्यवहार आता कायमचेच थांबतील. खासगी खरेदीदारांकडे आडत, हमाली, सेस, तोलाई, मापाई अशी कुठल्याही प्रकारची कपात होणार नाही. शेतकरी ज्या ठिकाणी मालाची विक्री करतील तीच व्यवस्था पुढील काळात टिकाव धरील. त्याकरिता दोन्हीही खरेदी यंत्रणांना शेतकºयांना आकर्षित करावे लागेल. खासगी व समांतर खरेदी व्यवस्थेमुळे बाजार समित्या हळूहळू नामशेष होतील, अशी एक शंका उपस्थित केली जात आहे. त्यावरून काही ठिकाणी शेतकºयांचा मोठा विरोध सुरू आहे. मूळ विषय असा आहे की, शेतकºयांना मालाला चांगला भाव हवा. मग तो कोणीही देऊ द्यात, त्याला आमचा विरोध नाही. शेतकरी बाजार समित्या जगवण्यासाठी पेरणी करणार नाही. त्याला घामाचे पैैसे हवेत. ते कोणीही द्यावेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पष्ट केले आहे की किमान आधारभूत किंमत (एमएसपी) बंद होणार नाही. यापुढील काळातही एमएसपीची घोषणा होत राहील. बाजार समित्यांमध्ये आधारभूत दराखाली शेतमालाची खरेदी होत असेल तर सरकार हस्तक्षेप करील. त्यामुळे काही मंडळी विनाकारण शेतकºयांमध्ये संभ्रम निर्माण करत आहे. शेतकºयांना घाबरून जाण्याचे कारण नाही. कांदा, बटाटे, तृणधान्य, तेलबिया, डाळी या शेतमालाला जीवनावश्यक वस्तूंच्या यादीतून वगळण्यात आले आहे. नैैसर्गिक आपत्ती किंवा युद्ध अशा अभूतपूर्व परिस्थितीचा अपवाद वगळता सरकार आता या शेतमालांच्या साठवणुकीवर मर्यादा घालणार नाही. त्यामुळे ज्या उद्योजकाकडे, व्यापाºयाकडे जेवढे पैैसे आणि जागा असेल त्या प्रमाणात तो गुंतवणूक करील. त्याप्रमाणात कोल्ड स्टोरेज, गुदामे उभी राहतील. पर्यायाने खासगी खरेदीदार अधिक शेतमालाची खरेदी करतील. त्याचा शेतकºयांना नक्कीच फायदा होईल. कोणतीही व्यवस्था ही निर्दोष असूच शकत नाही. त्यामुळे नव्या कृषी कायद्यामुळे निर्माण होणाºया व्यवस्थेतही काही दोष समोर येतील. त्यावेळी पुन्हा शेतकरी रस्त्यावर उतरून आंदोलने करतील. मात्र भाजप सरकार यानिमित्त कृषी कायद्यामध्ये सुधारणा करत असेल तर त्याचे निश्चितच स्वागत केले पाहिजे. आपल्याला बदल स्वीकारावेच लागतील.

नव्या कृषी कायद्यामध्ये काही त्रुटी आहेत. खासगी खरेदी यंत्रणांवरही काही बंधने आवश्यक आहेत. कराराच्या शेतीमध्ये जर कंपनी आणि शेतकºयांमध्ये काही तंटा झाल्यास प्रांताधिकाºयांच्या दरबारात निवाडा केला जाणार आहे. मुळात या सरकारी अधिकाºयांकडे वेळ नसतो. एखाद्या छोट्या शेतकºयाची फसवणूक झाली तर ते त्या अधिकाºयाकडे जाऊन दाद मागतील का हा प्रश्नच आहे. त्यामुळे या नव्या कायद्यात काही प्रमाणात आम्हाला बदल अपेक्षित आहेत.(शब्दांकन : शिवाजी पवार)(मुलाखतीचे पाहुणे - कृषी मूल्य आयोगाचे माजी अध्यक्ष, आहेत)

टॅग्स :FarmerशेतकरीPasha Patelपाशा पटेल