शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
3
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
4
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
5
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
6
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
7
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
8
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
9
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
10
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
11
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
12
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
13
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
14
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
15
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
16
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
17
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थयथयाट
18
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
19
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
20
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!

बोंडअळीवर शोधले फवारणी औषध

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2018 05:33 IST

भगवान रामजी इंगोले यांनी त्यांच्या शेतात जैविक खत व फवारणी औषधाची निर्मिती केली आहे

- प्रा. शरद वाघमारे, मालेगावरासायनिक खत फवारणीमुळे शेतकऱ्यांना उत्पादन खर्च जास्त येत असून, त्या तुलनेत जमिनीचा कसही कमी होत आहे. रासायनिक खतांच्या वापरामुळे पिके, पालेभाज्या विषजन्य निर्माण झाल्याने हानिकारक ठरत आहे.यावर उपाय म्हणून मालेगाव (जि. नांदेड) येथील भगवान रामजी इंगोले यांनी त्यांच्या शेतात जैविक खत व फवारणी औषधाची निर्मिती केली आहे. इंगोले यांनी रासायनिक खताचा वापर हळदी पिकासाठी टाळला असून, त्यांनी बायोअमृत खत घरच्या घरी तयार केले आहे.हे खत तयार करताना त्यांनी २०० लिटर पाण्याची प्लास्टिक टाकी, १०० किलो गाईचे शेण, गोमूत्र २० लिटर, दोन किलो गूळ, दोन लिटर दूध, २०० ग्राम तूप,दोन किलो चनाडाळ, बुरशी (ट्रायकोडर्मा, मेटरिझम) पाच किलो यांचे मिश्रण १५ दिवस काठीने हलवून केले. महिन्यातून १ किंवा २ वेळेस देता येते. बायोअमृत जीवामृत स्लरी या खतामुळे पिकांवरील करपा, उमनी अळीचा संपूर्ण नायनाट होऊन इतर किडीचाही प्रादुर्भाव कमी होत आहे व यासाठी केवळ १५०० ते २००० हजार रुपये खर्च येतो. शेतकरी भगवान इंगोले यांनी त्यांच्या शेतात ‘दशपाणी अर्क’ हे विविध प्रकारच्या वस्तू व वनस्पतीचे पाणी वापरुन तयार केले आहे. यासाठी त्यांनी २०० लिटर पाण्याची प्लास्टिकची टाकी, हिरव्या मिरच्याचा कुटलेला दोन किलो ठेचा, २ किलो गायीचे शेण, ५ लि. गोमूत्र, दीड ते दोन किलो अद्रक, अर्धा किलो हळद, ५ किलो कडुलिंबाची पाने, तीन किलो धोतºयाची पाने, निरगुडे पाने, प्रत्येकी २ किलो रुचकीची पाने बेशरमाची पाने, कनेरीची पाने, गुळवेल पाने, सीताफळांच्या पानांचे मिश्रण करुन एक महिना ते ड्रममध्ये ठेवले.कापूस व इतर पिकांना २०० मिलीमध्ये १५ लिटर फवारणी होते. इंगोले यांनी तयार केलेल्या दशपाणी अर्कमुळे बोंडअळी, मावा, तुडतुडे, रसशोषणाच्या किडींचा नायनाट होण्यास मदत झाली.

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती