शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
2
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
3
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
4
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
5
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
6
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
7
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
8
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
9
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
10
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
11
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
12
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
13
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
14
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
15
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
16
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
17
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
18
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव
19
मराठी पाट्यांचे रडगाणे; ९८ टक्के आस्थापनांनी न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले
20
दगडफेकीपर्यंतचा प्रचार कोणत्या दिशेने जाणार?

‘फेक न्यूज’ची फेकाफेकी..

By सचिन जवळकोटे | Published: April 05, 2018 12:14 AM

पिंट्या, बंड्या, चिंट्या अन् गण्या काही पत्रकार नव्हते. दिवसभर मोबाईलवर चकाट्या पिटत बसणारे ते ‘पदवीधर बेरोजगार’ होते. न घडलेल्या घटना ‘बे्रकिंग न्यूज’ म्हणून सोशल मीडियावर फिरविण्यात त्यांचा हातखंडा होता. आजपावेतो त्यांनी किती सेलिब्रेटीजना जिवंतपणी स्वर्गलोकी पाठविलेलं, याची गणतीच नव्हती.

पिंट्या, बंड्या, चिंट्या अन् गण्या काही पत्रकार नव्हते. दिवसभर मोबाईलवर चकाट्या पिटत बसणारे ते ‘पदवीधर बेरोजगार’ होते. न घडलेल्या घटना ‘बे्रकिंग न्यूज’ म्हणून सोशल मीडियावर फिरविण्यात त्यांचा हातखंडा होता. आजपावेतो त्यांनी किती सेलिब्रेटीजना जिवंतपणी स्वर्गलोकी पाठविलेलं, याची गणतीच नव्हती. कितीवेळा मंगळावरचे धोकादायक किरण शनी ग्रहामार्गे चंद्रावर परावर्तित होऊन पृथ्वीतलावर आणलेले, हेही त्यांना आठवत नव्हतं. मात्र, अंटार्क्टिकेचा बर्फ आटपाडीच्या माळरानावर टाकून त्यांनी माणदेशाला थेट अटलांटिका खंडावर वसविलेलं, एवढंच आठवत होतं.काल ‘फेक न्यूज कारवाई’चा इराणी आदेश निघताच या चौकडीची थोडीशी तंतरलेली. ‘मात्र, मुळात आपण अधिस्वीकृत नाही. पत्रकार म्हणून तर समाजाकडूनही स्वीकृत नाही,’ असं स्वत:च्या मनाला समजावत त्यांनी या घोषणेकडं दुर्लक्ष केलेलं.असो. सकाळी-सकाळी माहिती अन् प्रसारण खात्याकडनं त्यांना एक धक्कादायक मेसेज येताच चौघेही ताडकन् उडाले. ‘आजपर्यंत आपण सोशल मीडियावर केलेली सत्य पत्रकारिता पाहता आपल्याला ‘सच न्यूज’ पुरस्कार देण्यात येतोय,’ अशा आशयाचा मजकूर वाचताच चौघेही गोंधळले. आपण खऱ्या बातम्या कधी दिल्या, या विचारात त्यांनी ‘स्मृती’लाही ताण दिला. मात्र, काहीच आठवत नव्हतं.तेव्हा चौघेही तत्काळ नेहमीच्या कॉर्नरवरील कॅन्टीनच्या अड्ड्यावर जमले. आजपावेतो आपण कोणती खरीखुरी बातमी दिली, याची चर्चा करू लागले. सर्वप्रथम पिंट्या म्हणाला, ‘मी तर गेल्या आठवड्यात एकच न्यूज अपलोड केलेली यारऽऽ.. केवळ व्यंगचित्रातून अन् सभेतूनच आग ओकणारे ‘राज’ आता प्रत्यक्षात कामाला लागणार. महाराष्ट्राची जुनीपुराणी ब्ल्यू प्रिंट ‘अपडेट’ करून फेसबुकवर ‘अपलोड’ करणार, या माझ्या पोस्टला बाराशे लाईक अन् अडीचशे कमेंटस् पडल्या रेऽऽ.’गण्याही बोलू लागला, ‘थोरले काका बारामतीकर म्हणं यापुढं भावकी-भावकीत भांडणं न लावता एकीचं राजकारण करणार.. ही माझी पोस्ट सातारा, माण अन् अकलूजमंदी तर लई गर ऽऽ गर फिरली बग लगाऽऽ’बंड्या आपला किस्सा सांगू लागला, ‘आगामी अधिवेशनाची तारीख उद्धो फॉरेनहून आल्यानंतरच ठरणार. त्यामुळं सरकार मजबूत होणार. वैयक्तिक कामासाठीच्या भेटीनंतर मातोश्रीवरची भूमिका बदलली, अशी न्यूज मी फिरविताच घाटकोपरपेक्षा दादरमध्ये जास्त आनंद झाला.’चिंट्यानं मात्र शेवटचा बॉम्ब टाकला, ‘मी मात्र ‘नमो’ची पोस्ट टाकली होती बुवाऽऽ. त्यांचे सर्व सहकारी पुढील वर्षभर मौनव्रत धारण करणार असून, एकहीजण आपली भलती-सलती भूमिका जाहीर करणार नाही. सोशल मीडियावरील माझ्या या विरोधी पोस्टला त्यांच्या भक्तांनीही टार्गेट न करता उलट लोकशाहीतील मतांचा आदर केला,’हे सारं ऐकताच चौघांचंही एकमत झालं की आपण सोडलेलं पिल्लू कदाचित खरं वाटलं म्हणून की काय हा पुरस्कार दिला जातोय; पण हाय.. चौघांच्याही मोबाईलवर अकस्मातपणे ‘नमो’ आॅफिसमधून नवा मेसेज धडकला, ‘स्मृतीबार्इंकडून आलेला संदेश म्हणजे ‘फेक न्यूज’ होती बरं काऽऽ.’ 

टॅग्स :Fake Newsफेक न्यूजnewsबातम्याMediaमाध्यमेSocial Mediaसोशल मीडियाGovernmentसरकार