शहरं
Join us  
Trending Stories
1
होय, मी २००४ सालापासून भाजपशी युती व्हावी असा आग्रह पवारांकडे धरला होता, पण...; पटेलांचा मोठा खुलासा
2
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
3
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
4
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
5
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
6
'आरक्षणाची मर्यादा वाढवणार की नाही?', काँग्रेसचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना थेट सवाल
7
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
8
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
9
"प्रभू श्रीराम हृदयात आहेत, पण राम मंदिर..."; मेनका गांधी यांचे निवडणूक प्रचारादरम्यान विधान
10
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
11
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
12
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
13
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
14
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
15
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
16
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
17
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
18
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
19
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
20
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल

अपेक्षित निवाडा

By admin | Published: June 14, 2016 4:14 AM

‘तुमचं काम चित्रपटांना प्रमाणित करण्याचं आहे, सेन्सॉर करण्याचं नाही’, अशा अत्यंत नि:संदिग्ध शब्दात मुंबई उच्च न्यायालयाने गेल्या सप्ताहात केन्द्रीय चित्रपट प्रमाण मंडळाला

‘तुमचं काम चित्रपटांना प्रमाणित करण्याचं आहे, सेन्सॉर करण्याचं नाही’, अशा अत्यंत नि:संदिग्ध शब्दात मुंबई उच्च न्यायालयाने गेल्या सप्ताहात केन्द्रीय चित्रपट प्रमाण मंडळाला खडसावले तेव्हांच ‘उडता पंजाब’ या सिनेमाच्या प्रदर्शनाचा मार्ग मोकळा होणार हे दिसून आले होेते. तसा तो आता झाला आहे. न्यायालयाने चित्रपटातील केवळ एका प्रसंगाला कातरी लावली असून दोन दिवसात हा चित्रपट प्रदर्शनासाठी प्रमाणित करा असा आदेशही मंडळाला दिला आहे. संपूर्ण पंजाब राज्य आज अंमली पदार्थाच्या घातक विळख्यात अडकले असून या भयाण वास्तवाचेच यथार्थ चित्रण या चित्रपटात करण्यात आल्याचे सांगितले जाते. तथापि अनुराग कश्यप या संवेदनशील निर्माता-दिग्दर्शकाचा हा चित्रपट पहलाज निहलानी यांच्या अध्यक्षतेखालील मंडळाच्या कचाट्यात सापडला आणि प्रदर्शनापूर्वीच ‘उडता पंजाब’ला मन:पूत प्रसिद्धी मिळून गेली. निहलानी यांनी चित्रपटाच्या शीर्षकापासून आक्षेप घेतले व चित्रपटातील असंख्य दृष्यांना कातरी लावण्याचे तर काही शब्दप्रयोग गाळून टाकण्याचे फर्मान काढले. ते इतके अतार्किक होते की निर्मात्यानी निहलानी यांच्या आज्ञेचे पालन केले असते तर प्रेक्षकांना दाखवायला हाती काहीच शिल्लक राहिले नसते. परिणामी निर्मात्याला न्यायालयाचा दरवाजा खटखटविण्याशिवाय दुसरा मार्गच नव्हता. सोमवारी आपला निवाडा जाहीक करताना न्यायालयाने हे स्पष्ट केले की त्याने चित्रपटाच्या पटकथेचा संपूर्ण अभ्यास केला आणि त्यानंतरच या चित्रपटामुळे देशाच्या सार्वभौमत्वाला बाधा पोहोचते हा निहलानी आणि त्यांच्या गणगोताचा आक्षेप धुडकावून लावणारा निवाडा जाहीर केला. चित्रपटांच्या निर्मितीसंबंधीच्या सिनेमाटोग्राफ अ‍ॅक्टमध्ये ‘सेन्सॉर’ असा शब्दच आलेला नाही असे सांगून न्यायालयाने पुढे म्हटले की, तरीही कायद्याने दिलेल्या अधिकाराचा वापर करुन मंडळाला एखाद्या चित्रपटातील त्यांच्या मते आक्षेपार्ह भाग काढावासा वाटला तर तसा निर्णय राज्यघटनेतील मूलभूत हक्कांच्या आधीन राहूनच घेतला पाहिजे. हे अत्यंत महत्वाचे आणि एकप्रकारे मंडळाच्या दृष्टीने दिशादर्शक आहे. न्यायालयाच्या सदर निवाड्यामुळे व्यक्तिश: निहलानी यांचा मुखभंग झाला असला तरी न्यायालयाने ओढलेल्या कोरड्याचे वळ निहलानी यांची निवड करणाऱ्यांच्या व पाठराखण करणाऱ्यांच्याही अंगावर उठणारे आहेत. केवळ ‘आपला माणूस’ या एकाच निकषावर भलत्या जागी भलत्या लोकांची योजना केली की सरकारलाही कसे खाली पाहावे लागते हेही यातून दिसून आले. मात्र त्याचा परिणाम दिसेलच याची खात्री देता येत नाही.