शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू-काश्मीर पोलिसांची मोठी कारवाई, मुफ्ती इरफानला शोपियानमधून अटक; मोठे टेरर नेटवर्क उद्ध्वस्त
2
"ही पाकची जुनी खोड..."; इस्लामाबादच्या स्फोटाचं खापर भारतावर फोडणाऱ्या पाकिस्तानला मिळालं चोख उत्तर! 
3
न्यायालयाचा दणका! महिलांना मारहाण व शिवीगाळ केल्याप्रकरणी पुणे पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश
4
लाल किल्ला स्फोटात मोठा खुलासा! सुरक्षा यंत्रणांच्या जोरदार कारवाईमुळे मोठा धोका टळला
5
शेख हसीनानंतर आता युनूस सरकारविरोधात विद्यार्थी रस्त्यावर; बांगलादेशात पुन्हा चळवळ सक्रिय
6
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडले
7
लग्नाला नऊ वर्षे पूर्ण झाली, पतीने आपल्याच मित्रासोबत पत्नीचे लग्न लावून दिले; धक्कादायक कारण आले समोर
8
बिहारमध्ये काँग्रेसला मोठा धक्का! दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक संपताच मोठ्या नेत्याने दिला राजीनामा
9
Bihar Exit Poll : बिहारमध्ये उत्सुकता शिगेला! पहिला एक्झिट पोल आला, नितीश की तेजस्वी?
10
'तो शांत होता, त्याचे जास्त मित्र नव्हते'; दिल्ली बॉम्बस्फोटातील संशयित डॉक्टरच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया
11
राहुल द्रविडच्या लेकाची भारतीय U19 संघात वर्णी ; वैभव सूर्यवंशीचं नाव 'गायब' कारण...
12
छत्तीसगडच्या बीजापूरमध्ये मोठी चकमक, 6 नक्षलवादी ठार; मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त...
13
बॉसनं नोकरीवरून काढलं, पठ्ठ्यानं असं काही केलं की आता कंपनीला बसणार मोठा दंड!
14
फरीदाबाद मॉड्यूलचा खरा मास्टरमाईंड आला समोर; डॉक्टरांना कट्टरपंथी बनवणारा मौलवी इरफान अहमद कोण?
15
Travel : भारताशी कनेक्शन, 'या' देशात जाताच करोडपती व्हाल! परदेशवारीचा प्लॅन करताय तर नक्की विचार करा
16
ती चूक यामाहा नाही करणार...! पहिली वहिली इलेक्ट्रीक स्कूटर आली!  Aerox लूक; इतकी रेंज देणार की...
17
Delhi Red Fort Blast : जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्याचे कॉल डिटेल्स उघड; दिल्ली स्फोटाचं रहस्य उलगडलं, उमरने ‘तारिक’ नावाने घेतलं सिम कार्ड
18
Yamaha ची नव्या जमान्याची RX100...! स्टायलिश बाईक लाँच; किंमत फक्त ₹ १.** लाख!
19
IND vs SA : ईडन गार्डन्सच्या खेळपट्टीवर गंभीर नाराज; गांगुलीनं असं दिलं उत्तर
20
संत्र्याच्या साली कचरा समजून फेकून देता, थोडं थांबा... त्वचेसह घरालाही होईल मोठा फायदा

विशेष मुलाखत : बिहारमधले कुसळ दिसते, गुजरातेतले मुसळ नाही!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2022 09:34 IST

राज्यसभेतील प्रभावी भाषणांनी प्रकाशझोतात असणारे प्रा. मनोज कुमार झा यांच्याशी ‘लोकमत’चे वरिष्ठ संपादक शरद गुप्ता यांनी केलेला संवाद! 

गेल्या दोन महिन्यांत झालेल्या तीन विधानसभा पोटनिवडणुकीत सत्तारूढ संयुक्त जनता दल व राष्ट्रीय जनता दलाच्या आघाडीने दोन जागा गमावल्या. बिहार सरकारचे दारूबंदी धोरण पोलिसी दंडुके वापरून लागू करण्याविरुद्ध लोकांनी मतपेटीतून आपला राग व्यक्त केला का ?दारूबंदी धोरणात आमचे सरकार सतत बदल करत असून आवश्यकतेनुसार लवचिक धोरण स्वीकारले जाते आहे. आमचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हटवादी नाहीत. गुजरातमध्ये दारूबंदी खूप वर्षापासून लागू आहे. तेथेही विषारी दारूमुळे मृत्यू होतात; परंतु माध्यमे बिहारमधल्या घटना ठळकपणे सांगतात, गुजरातमधल्या नाही. त्यांना बिहारमधले कुसळ दिसते, पण गुजरातेतले मुसळ ते पाहात नाहीत!

परंतु आता तुमच्याच पक्षातले लोक दारूबंदी धोरणाला विरोध करत आहेत. आपली आघाडी स्थिर राहील का?आमचे सरकार पूर्णपणे स्थिर आहे. ऑगस्टमध्ये राजदबरोबर सरकार स्थापना करण्यापूर्वी नितीशजींनी सर्व विषयांवर सखोल चर्चा विनिमय केला होता. भाजप कशा प्रकारे लोकशाहीचा गळा दाबत आहे हे त्यांनी पाहिले होते. २०१७ मध्ये आपण राष्ट्रीय जनता दलाशी युती का तोडली, हे त्यांनी लोकांना सांगितले. आपली दिशाभूल केली गेली असे त्यांचे सांगणे आहे. २०२४ च्या निवडणुकीपूर्वी आम्ही लोकांसमोर एक प्रगतिशील लोकाभिमुख धोरण ठेवू इच्छितो.

पण जिथे भाजपला बहुमत नाही अशा राज्यसभेतदेखील विरोधी पक्षांच्या ऐक्याची गाडी पुढे सरकत नाही, त्याचे काय?राज्यसभेत त्यांच्याजवळ संख्याबळ नसेल; पण त्याची व्यवस्था करण्यात ते तरबेज आहेत. अनेक पक्ष आपल्या राज्यात भाजपला विरोध करतात; पण लोकसभा आणि राज्यसभेत त्यांचे सूर बदलतात. परंतु हळूहळू दक्षिण आणि पूर्व भारतातील पक्षांचा भाजप मोह संपत चालला आहे. काहींचा तर संपला आहे. कारण लोकशाही संपवण्याचे प्रयत्न आपल्याही गळ्याशी येतील, हे सर्वांना कळते.

पण विरोधकांच्या ऐक्यात अडचण कसली आहे? आमचा विरोध आत्मकेंद्रित आणि आत्ममुग्ध राजकारणाला आहे. यापासून लोकशाहीला धोका संभवतो. देशासमोरचे महत्त्वाचे मुद्देच गायब होत आहेत. ४५ वर्षांतला सर्वाधिक बेरोजगारी दर आज दिसतो आहे. महागाई गगनाला भिडली आहे. सार्वजनिक क्षेत्रातील संपत्ती कवडीमोलाने लिलावात विकली जात आहे.  निवडणुका याच मुद्द्यावर झाल्या पाहिजेत. मंदिर-मशीद आणि पाकिस्तान हे मुद्देच नाहीत. पाकिस्तानचे विधिलिखित ४७ सालीच पक्के झाले. आपण कशाला त्याच्या मागे लागावे? आपण त्यांच्यासारखे होऊ पाहतो आहोत का? पण भाजपसाठी हेच मुद्दे महत्त्वाचे आहेत आणि माध्यम व्यवस्थापनही. विरोधी पक्षांनी एकमेकांच्या जवळ येण्यापेक्षा मुद्द्यांच्या जवळ आले पाहिजे!

देश बहुसंख्याकवादाकडे चालला आहे काय? लोकशाहीत सरकार स्थापन करण्यासाठी बहुमत गरजेचे आहे; परंतु ते बहुसंख्याकवादात परिवर्तित होता कामा नये. कोणत्याही सरकारचे मूल्यमापन त्याने किती बहुमत मिळवले यावर न करता अल्पसंख्याकांशी त्याचा व्यवहार कसा आहे, यावर केले पाहिजे; पण हल्ली अल्पसंख्याकांच्या बाजूने एखादा शब्द बोलणेसुद्धा तुष्टीकरण मानले जाते. खरेतर दक्षिण आशियातील सर्वांत मोठा देश म्हणून याबाबतीत इतरांनी अनुकरण करावे, असे उदाहरण आपण समोर ठेवले पाहिजे.

काही पक्षांनी आताच स्वतःला बाजूला काढण्याची घोषणा केल्यामुळे आता विरोधी पक्षांचे ऐक्य कसे होणार?काही पक्षांनी नव्हे तर फक्त आम आदमी पक्षाने. भाजपचा पर्याय होण्यासाठी त्याची फोटोकॉपी होणे गरजेचे नाही. जर मूळ प्रत उपलब्ध असेल तर फोटो कॉपी कोण घेईल? भाजपला पर्याय म्हणजे भाजपच्या धोरणांचा, त्या प्रतिगामी विचारांना पर्याय होय. नोटांवर लक्ष्मी किंवा गणपतीची मुद्रा छापणे नव्हे. भाजपला पर्याय उभा करण्याऐवजी ते भाजपच्या म्हणण्याची पुष्टी करत आहेत; पण त्यांच्या पक्षातही प्रगतिशील विचारांचे पुष्कळ लोक आहेत. समान विचार करणारे सर्व जण एकत्र येतील, हे आपण पाहालच.

टॅग्स :Rajya Sabhaराज्यसभाBiharबिहारGujaratगुजरात