शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये सर्वाधिक जागा जिंकूनही भाजपाची वाढली डोकेदुखी; मंत्रिपदाचा फॉर्म्युला बदलावा लागणार?
2
“तुम्ही चांगल्या योजना आणल्या नाहीत, जो जीता वहीं सिकंदर”; CM फडणवीसांचे शरद पवारांना उत्तर
3
अमेरिकेत महागाईनं हाहाकार! ट्रम्प यांनी अनेक वस्तूंवरील टॅरिफ केलं कमी, स्वस्त होणार 'या' गोष्टी
4
Shubman Gill Injury Update : शुभमन गिलनं मैदान सोडलं! पंत झाला कॅप्टन, नेमकं काय घडलं?
5
बिहार निवडणुकीत विरोधात काम, माजी केंद्रीय मंत्री पक्षातून निलंबित; भाजपाची मोठी कारवाई
6
लाल किल्ल्याजवळील स्फोटाने जमीन हादरली; मेट्रो स्टेशनवरील सीसीटीव्ही फुटेज आले समोर
7
बिहारमध्ये सर्वाधिक १ कोटी १५ लाख मते मिळवणारा RJD ठरला नंबर वन पक्ष; भाजपा-जेडीयूला किती मते?
8
कुणी २७, कुणी ९५ मतांनी, तर..., बिहारमधील या मतदारसंघांत माफक फरकाने झाला जय-पराजयाचा फैसला
9
'मारुती सुझुकी'च्या या कारमध्ये मोठा बिघाड, ३९ हजारांहून अधिक गाड्या परत मागवल्या
10
धक्कादायक...! मध्यरात्रीचा थरार...! पूर्वजांना मोक्ष मिळावा म्हणून आईनं पोटच्या २ चिमुकल्यांची केली हत्या, सासरे थोडक्यात बचावले
11
मुदतीपूर्वीच Gen Z कर्मचाऱ्यांना कंपनीतून का काढलं जातंय?; स्टडी रिपोर्टमधून समोर आलं कारण
12
धर्मेंद्र यांच्या ९० व्या वाढदिवसाचं जोरदार सेलिब्रेशन होणार! हेमा मालिनी म्हणाल्या- "आता प्रत्येक दिवस..."
13
New Fastag Rule: आजपासून फास्टॅगच्या नियमांत झाला मोठा बदल; याकडे लक्ष दिलं नाही तर भरावा लागेल दुप्पट टोल
14
"पैसे वाटून निवडणुका होत असतील आयोगाने विचार करावा"; बिहार निकालावर शरद पवारांचे गंभीर भाष्य
15
बिहार निकालानंतर काँग्रेसचा 'एकला चलो रे'चा नारा; मुंबई महापालिका स्वबळावर लढवण्याचे संकेत
16
Astro Tips: मनासारखा जोडीदार नशिबात आहे की नाही हे कसे ओळखावे? ज्योतिष शास्त्रानुसार... 
17
“भाजपाने आता अमेरिकेत राष्ट्रपतीपदाची निवडणूक लढवावी अन् टॅरिफचा घोळ संपवावा”: आदित्य ठाकरे
18
SBI चा ग्राहकांना झटका! १ डिसेंबरपासून बंद होणार 'ही' लोकप्रिय सेवा; बँकेच्या कामांवर होणार परिणाम
19
"विवाहित मुलांना वडिलांच्या मालमत्तेत राहण्याचा कोणताही अधिकार नाही"; उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
20
Rishabh Pant Record : टेस्टमध्ये टी-२० चा तडका! सेहवागचा १२ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडत पंतनं रचला इतिहास
Daily Top 2Weekly Top 5

विशेष मुलाखत : मी राजकारण बदलायला आलो आहे, प्रत्येक राज्यात जाईन ! - अरविंद केजरीवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2022 06:47 IST

राजकारण आणि प्रशासनाचे नवीन प्रतिमान घडवणारे अरविंद केजरीवाल यांच्याशी लोकमत समूहाचे वरिष्ठ संपादक शरद गुप्ता यांनी केलेल्या संवादाचा संपादित अंश.

मुख्यमंत्री म्हणून आपली तिसरी टर्म कशी चालली आहे? आम्ही  उत्तम काम करून दाखवल्याने दिल्लीच्या जनतेने आम्हाला लागोपाठ संधी दिली. सात - आठ तास वीज पुरवठा खंडित व्हायचा, तिथे २४ तास वीज असते, तीही मोफत. सरकारी  इस्पितळांमध्ये उत्तम दर्जाचे उपचार, तपासण्या, औषधे सारे मोफत मिळते. चाळीस, पन्नास लाख रुपये खर्च येणारी शस्त्रक्रियाही मोफत केली जाते. दिल्लीतल्या सरकारी शाळा दिमाखदार झाल्या आहेत. आम्ही अर्थसंकल्पातला २५ टक्के खर्च शिक्षणावर करतो. सरकारी शाळांचे १२वीचे निकाल ९९.७ टक्के लागले आहेत. यावर्षी सुमारे ४ लाख मुले खासगी शाळांतून नावे काढून सरकारी शाळेत दाखल झाली आहेत. आम्ही नागरिकांना मोफत पाणी पुरवठाही करतो आहोत.

इतके सगळे मोफत दिल्यानंतरही आपला अर्थसंकल्प नफ्यातला कसा काय? इथे आधी खूप भ्रष्टाचार होता. प्रकल्प वेळेवर पूर्ण होत नसत आणि अर्थसंकल्प सदैव तोट्याचा असे. आम्ही सर्वप्रथम भ्रष्टाचार  संपवला आणि प्रकल्प वेळेवर पूर्ण करुन बरेच पैसे वाचवू लागलो. उदा. मुकरबा चौक उड्डाणपूल ४२२ कोटी रुपयात होणार होता, आम्ही तो वेळेआधी पूर्ण करून १२५ कोटी रुपये वाचवले.

नागरिकांना फुकटात सेवा घेण्याची सवय लावणे कितपत उचित आहे? या देशात मुख्यमंत्री, पंतप्रधान अशा सगळ्यांवर मोफत उपचार होतात, नागरिकांवर मोफत इलाज केला तर ती फुकटेगिरी कशी? या देशात ज्या सुविधा मंत्र्यांना मिळतात, त्या सगळ्या सर्वसामान्य लोकांना मिळवून दिल्याशिवाय स्वस्थ बसायचे नाही, असे मी ठरवलेच आहे.

यासाठी पैसे कुठून येणार? या देशात एकदा कोणी आमदार झाला की, त्याची बँकेतील शिल्लक १० - १५ कोटीच्या घरात जाते, याचा हिशेब कधी लावलात का तुम्ही? हे चोरीला जाणारे पैसेच आम्ही लोकांमध्ये वाटतो आहोत.  मी स्वतःसाठी विमान खरेदी केले नाही. पण, स्त्रियांना  बस प्रवास मोफत करुन दिला. सरकारकडे पैसा असतोच. रित्या खजिन्याची कारणे सांगणारे लोकांना मूर्ख ठरवतात. नियत साफ असेल तर सर्व काही शक्य होऊ शकते.

पंजाबमध्ये निवडणूक जिंकणे किती कठीण होते ?पंजाबमध्ये काँग्रेसने २५ वर्षे आणि अकाली दलाने १९ वर्षे राज्य केले. या दोघांनी पंजाबला फक्त लुटले. यांच्या सरकारने शाळा, इस्पितळे, वीज, पाण्याकडे कधीही लक्ष दिले नाही. पंजाबच्या लोकांचा आमच्यावर विश्वास होता, की हे अत्यंत प्रामाणिक लोक आहेत.

पण, मग इतक्या महाग निवडणुका आपण कशा लढता? आम आदमी पक्ष गरीब आहे. निवडणुकीत आम्ही लोकांना सांगतो की, आम्हाला एक संधी द्या, मंत्र्यांना मिळतात त्या सुविधा आम्ही तुम्हाला मोफत देऊ. भ्रष्टाचार संपवू. करातून आलेला प्रत्येक रुपया लोकांवरच खर्च करु. यामुळे लोकच आमची निवडणूक लढवतात. 

व्यवस्था बदलण्याऐवजी सरकार बदलणे हे तर आपले लक्ष्य झालेले नाही? आजवर ७५ वर्षांच्या राजकारणात जितकी आश्वासने दिली गेली त्यापैकी कोणतीच कुठल्याही राजकीय पक्षांनी पूर्ण केली नाहीत. आम्ही आमची सगळी आश्वासने पूर्ण केली आहेत. ही भ्रष्ट व्यवस्था बदलावी, असे विरोधी पक्षांना कधीच वाटत नाही. परंतु आम आदमी  पक्ष ती पूर्णपणे बदलत आहे.

“आप”ला कोणत्या राज्यात विजय मिळवणे सोपे आहे? का? आम्ही आंदोलनातून पुढे आलेले लोक आहोत. राजकारण बदलायला आलो आहोत. आम्ही प्रत्येक राज्यात जाऊ, जनता संधी देईल तिथे जाऊ. देशातला सामान्य माणूस आता उभा राहिला आहे. आता इमानदारी आणि देशभक्तीची लाट संपूर्ण देशात येईल.

आप”कडे भाजपऐवजी काँग्रेसचा पर्याय म्हणून का पाहिले जात आहे? आमचे उद्दिष्ट काँग्रेस किंवा भाजपला हरवणे नाही, तर देश जिंकला पाहिजे हे आहे. लोकांना आता बदल हवा आहे. काँग्रेसला मत देण्याचा अर्थ भाजपला मत देणे असा असतो. गोव्यासह अनेक राज्यांत काँग्रेसचे आमदार भाजपत गेले आणि भाजपने सरकार केले म्हणून काँग्रेसला मत देण्याचा काही फायदा नाही.  भाजपला हरवायचे असेल तर आम्हाला मत द्या, असे आवाहन आम्ही लोकांना करतो.

टॅग्स :Arvind Kejriwalअरविंद केजरीवालdelhiदिल्ली