शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

विशेष मुलाखत : मी राजकारण बदलायला आलो आहे, प्रत्येक राज्यात जाईन ! - अरविंद केजरीवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2022 06:47 IST

राजकारण आणि प्रशासनाचे नवीन प्रतिमान घडवणारे अरविंद केजरीवाल यांच्याशी लोकमत समूहाचे वरिष्ठ संपादक शरद गुप्ता यांनी केलेल्या संवादाचा संपादित अंश.

मुख्यमंत्री म्हणून आपली तिसरी टर्म कशी चालली आहे? आम्ही  उत्तम काम करून दाखवल्याने दिल्लीच्या जनतेने आम्हाला लागोपाठ संधी दिली. सात - आठ तास वीज पुरवठा खंडित व्हायचा, तिथे २४ तास वीज असते, तीही मोफत. सरकारी  इस्पितळांमध्ये उत्तम दर्जाचे उपचार, तपासण्या, औषधे सारे मोफत मिळते. चाळीस, पन्नास लाख रुपये खर्च येणारी शस्त्रक्रियाही मोफत केली जाते. दिल्लीतल्या सरकारी शाळा दिमाखदार झाल्या आहेत. आम्ही अर्थसंकल्पातला २५ टक्के खर्च शिक्षणावर करतो. सरकारी शाळांचे १२वीचे निकाल ९९.७ टक्के लागले आहेत. यावर्षी सुमारे ४ लाख मुले खासगी शाळांतून नावे काढून सरकारी शाळेत दाखल झाली आहेत. आम्ही नागरिकांना मोफत पाणी पुरवठाही करतो आहोत.

इतके सगळे मोफत दिल्यानंतरही आपला अर्थसंकल्प नफ्यातला कसा काय? इथे आधी खूप भ्रष्टाचार होता. प्रकल्प वेळेवर पूर्ण होत नसत आणि अर्थसंकल्प सदैव तोट्याचा असे. आम्ही सर्वप्रथम भ्रष्टाचार  संपवला आणि प्रकल्प वेळेवर पूर्ण करुन बरेच पैसे वाचवू लागलो. उदा. मुकरबा चौक उड्डाणपूल ४२२ कोटी रुपयात होणार होता, आम्ही तो वेळेआधी पूर्ण करून १२५ कोटी रुपये वाचवले.

नागरिकांना फुकटात सेवा घेण्याची सवय लावणे कितपत उचित आहे? या देशात मुख्यमंत्री, पंतप्रधान अशा सगळ्यांवर मोफत उपचार होतात, नागरिकांवर मोफत इलाज केला तर ती फुकटेगिरी कशी? या देशात ज्या सुविधा मंत्र्यांना मिळतात, त्या सगळ्या सर्वसामान्य लोकांना मिळवून दिल्याशिवाय स्वस्थ बसायचे नाही, असे मी ठरवलेच आहे.

यासाठी पैसे कुठून येणार? या देशात एकदा कोणी आमदार झाला की, त्याची बँकेतील शिल्लक १० - १५ कोटीच्या घरात जाते, याचा हिशेब कधी लावलात का तुम्ही? हे चोरीला जाणारे पैसेच आम्ही लोकांमध्ये वाटतो आहोत.  मी स्वतःसाठी विमान खरेदी केले नाही. पण, स्त्रियांना  बस प्रवास मोफत करुन दिला. सरकारकडे पैसा असतोच. रित्या खजिन्याची कारणे सांगणारे लोकांना मूर्ख ठरवतात. नियत साफ असेल तर सर्व काही शक्य होऊ शकते.

पंजाबमध्ये निवडणूक जिंकणे किती कठीण होते ?पंजाबमध्ये काँग्रेसने २५ वर्षे आणि अकाली दलाने १९ वर्षे राज्य केले. या दोघांनी पंजाबला फक्त लुटले. यांच्या सरकारने शाळा, इस्पितळे, वीज, पाण्याकडे कधीही लक्ष दिले नाही. पंजाबच्या लोकांचा आमच्यावर विश्वास होता, की हे अत्यंत प्रामाणिक लोक आहेत.

पण, मग इतक्या महाग निवडणुका आपण कशा लढता? आम आदमी पक्ष गरीब आहे. निवडणुकीत आम्ही लोकांना सांगतो की, आम्हाला एक संधी द्या, मंत्र्यांना मिळतात त्या सुविधा आम्ही तुम्हाला मोफत देऊ. भ्रष्टाचार संपवू. करातून आलेला प्रत्येक रुपया लोकांवरच खर्च करु. यामुळे लोकच आमची निवडणूक लढवतात. 

व्यवस्था बदलण्याऐवजी सरकार बदलणे हे तर आपले लक्ष्य झालेले नाही? आजवर ७५ वर्षांच्या राजकारणात जितकी आश्वासने दिली गेली त्यापैकी कोणतीच कुठल्याही राजकीय पक्षांनी पूर्ण केली नाहीत. आम्ही आमची सगळी आश्वासने पूर्ण केली आहेत. ही भ्रष्ट व्यवस्था बदलावी, असे विरोधी पक्षांना कधीच वाटत नाही. परंतु आम आदमी  पक्ष ती पूर्णपणे बदलत आहे.

“आप”ला कोणत्या राज्यात विजय मिळवणे सोपे आहे? का? आम्ही आंदोलनातून पुढे आलेले लोक आहोत. राजकारण बदलायला आलो आहोत. आम्ही प्रत्येक राज्यात जाऊ, जनता संधी देईल तिथे जाऊ. देशातला सामान्य माणूस आता उभा राहिला आहे. आता इमानदारी आणि देशभक्तीची लाट संपूर्ण देशात येईल.

आप”कडे भाजपऐवजी काँग्रेसचा पर्याय म्हणून का पाहिले जात आहे? आमचे उद्दिष्ट काँग्रेस किंवा भाजपला हरवणे नाही, तर देश जिंकला पाहिजे हे आहे. लोकांना आता बदल हवा आहे. काँग्रेसला मत देण्याचा अर्थ भाजपला मत देणे असा असतो. गोव्यासह अनेक राज्यांत काँग्रेसचे आमदार भाजपत गेले आणि भाजपने सरकार केले म्हणून काँग्रेसला मत देण्याचा काही फायदा नाही.  भाजपला हरवायचे असेल तर आम्हाला मत द्या, असे आवाहन आम्ही लोकांना करतो.

टॅग्स :Arvind Kejriwalअरविंद केजरीवालdelhiदिल्ली