शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
2
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
3
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
4
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
5
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
6
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
7
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
8
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
9
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
10
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
11
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
12
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
13
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
14
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
15
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
16
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
17
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
18
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
19
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
20
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन

...तर खासदारकीचा राजीनामाही देईल - नाना पटोले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2017 01:05 IST

निवडून सर्वच येतात. मात्र, काहीजण लोकांचे प्रतिनिधी होतात तर काही ‘धनाचे’. जे धनाचे प्रतिनिधी आहेत, ते दबून राहतील. मी लोकांचा प्रतिनिधी आहे.

निवडून सर्वच येतात. मात्र, काहीजण लोकांचे प्रतिनिधी होतात तर काही ‘धनाचे’. जे धनाचे प्रतिनिधी आहेत, ते दबून राहतील. मी लोकांचा प्रतिनिधी आहे. त्यामुळे कुणाचीही भीती नाही. प्रसंगी खासदारकीचा राजीनामा देईल पण जनतेशी बेईमानी करणार नाही. खा. नाना पटोले यांची कमलेश वानखेडे यांनी घेतलेली मुलाखत.पंतप्रधान मोदींवर जाहीर टीका करण्याचे धाडस का व कुठून आले ?- पंतप्रधान मोदी यांनी बोलाविलेल्या खासदारांच्या बैठकीत आपण शेतकºयांचे प्रश्न मांडले. मात्र, पंतप्रधान मोदी त्यावर सहमत नव्हते. मी प्रखरतेने शेतक-यांची बाजू मांडली असता त्यांनी मला ‘आपको नही समजता’ असे म्हणत बोलू दिले नाही. खाली बसवले. गरीब, शेतकरी, शेतमजुरांचे प्रश्न मांडणे हे प्रत्येक खासदाराचे कर्तव्य आहे. मला माझ्या कर्तव्यापासून रोखले तर कसे सहन करणार ? मी जे काही बोललो ते उघड व खासदारांसमक्ष बोललो. माझा आवाज गरीब शेतक-यांसाठी उठतच राहील. मला परिणामांची पर्वा नाही.मोदी-शहा-पटेलांच्या जवळिकीमुळे तुम्ही नाराज आहात ?- पंतप्रधान मोदी, अमीत शहा व प्रफुल्ल पटेल हे’ ‘त्रिकूट’ मिळून काम करीत आहे, हे काही लपून राहिलेले नाही. पण कोण कुणाच्या जवळ आहे याने मला फरक पडत नाही. विधानसभेचे निकाल लागत असताना भाजपाला पाठिंबा देण्याची घोषणा करण्यासाठी प्रफुल्ल पटेलच पुढे आले होते. हीच खरी वास्तविकता आहे.भाजपा सोडण्याचा विचार आहे का ?- मी भाजपामध्येच आहे. कुठल्याही पक्षात जायचा विचार नाही. मी शेतकºयांसाठी बोललो ते चूक आहे, असे पक्षाचे म्हणणे असेल व पक्षश्रेष्ठींनी म्हटले तर खासदारकीचाही राजीनामा देऊन टाकील. पण जनतेशी बेईमानी करणार नाही.लोकसभेचे तिकीट कापल्या जाईल असे वाटते ?- मला तिकिटाचा मोह नाही. माझी राजकीय सुरुवात जिल्हा, विधानसभा व लोकसभा अपक्ष उमेदवार म्हणूनच झाली आहे. मी भाजपाकडे कधीही तिकीट मागायला गेलो नव्हतो. लोकसभेत मला अपक्ष म्हणून मिळालेली मते पाहून भाजपा नेत्यांनी बोलावून तिकीट दिले होते. ज्या भंडारा-गोंदियात झेंडा लावायला माणसं नव्हती तेथे मी भाजपा उभी केली. मी खुर्ची सोडणारा आहे. त्यामुळे मला तिकिटाची चिंताच नाही. मी फक्त जनतेची चिंता करतो.काँग्रेसमध्ये घरवापसीचा विचार आहे ?- मी रोखठोक भूमिका घेतल्यापासून अनेक पक्षांना मी आपलासा वाटू लागलो आहे. अनेक पक्षांकडून मला निमंत्रण मिळाले. मात्र, माझी लढाई राजकीय नाही. मी काँग्रेसचा आमदार असताना एक वर्ष शिल्लक असूनही शेतकºयांच्या कर्जमाफीसाठी राजीनामा दिला होता.सरकारकडून काय अपेक्षा आहे ?- मुख्यमंत्री फडणवीस यांनी जाहीर केलेल्या ऐतिहासिक कर्जमाफीकडे मी लक्ष ठेवून आहे. कर्जमाफीच्या आॅनलाईन अर्जात ६६ रकाने भरावे लागत आहे. त्याचे प्रिंट आऊट काढले तर साडेपाच फुटाची पट्टी होते. केंद्र व राज्य सरकारने शेतकºयांना न्याय देण्याची भूमिका घेतली नाही तर प्रसंगी टोकाची भूमिका घ्यायला मी मागे पाहणार नाही.

kamlesh.wankhede@lokmat.com

टॅग्स :BJPभाजपाNana Patoleनाना पटोले