शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

शेषन यांनी संपूर्ण निवडणूक प्रणालीच बदलली

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2019 05:03 IST

शेषन यांनी निवडणूक प्रणालीची जी आमूलाग्र स्वच्छता केली, त्यामुळे त्यांचे नाव देशात तर प्रत्येकाच्या तोंडी झालेच, पण सातासमुद्रापारही पोहोचले! ...

शेषन यांनी निवडणूक प्रणालीची जी आमूलाग्र स्वच्छता केली, त्यामुळे त्यांचे नाव देशात तर प्रत्येकाच्या तोंडी झालेच, पण सातासमुद्रापारही पोहोचले! तोपर्यंत त्या पदावरील व्यक्तीचे नावही सर्वसामान्यांना ठाऊक नसायचे! शेषन यांनी संपूर्ण निवडणूक प्रणालीच बदलली.देशातील निवडणूक प्रणालीचे चित्र आमूलाग्र बदलून टाकलेले माजी निवडणूक आयुक्त टी.एन. शेषन यांचे रविवारी रात्री निधन झाले आणि स्वतंत्र भारताच्या इतिहासास वळण देणारे आणखी एक व्यक्तिमत्त्व काळाच्या पडद्याआड गेले. केरळमधील पलक्कड जिल्ह्यातील थिरुनेल्लई या लहानशा गावात जन्मलेल्या शेषन यांनी देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून जबाबदारी सांभाळण्यापूर्वी, भारतीय प्रशासन सेवेतील सर्वोच्च असलेले ‘कॅबिनेट सेक्रेटरी’ हे पददेखील सांभाळले होते. शेषन हे किती कार्यक्षम अधिकारी होते हे त्यावरून स्पष्ट होतेच; मात्र दहावे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून जबाबदारी सांभाळताना त्यांनी निवडणूक प्रणालीची जी आमूलाग्र स्वच्छता केली, त्यामुळे त्यांचे नाव देशात तर प्रत्येकाच्या तोंडी झालेच, पण सातासमुद्रापारही पोहोचले! शेषन मुख्य निवडणूक आयुक्त होईपर्यंत त्या पदावरील व्यक्तीचे नावही सर्वसामान्य नागरिकांना ठाऊक नसायचे. शेषन यांनी १९९० ते १९९६ अशी सहा वर्षे मुख्य निवडणूक आयुक्त हे पद सांभाळले. त्या अवघ्या सहा वर्षांच्या कालखंडात त्यांनी संपूर्ण निवडणूक प्रणालीच अशी काही बदलून टाकली, की शेषन या नावाने सर्वसामान्य माणसाच्या हृदयातही घर केले. विशेष म्हणजे निवडणूक प्रणाली आमूलाग्रपणे बदलून टाकण्यासाठी शेषन यांनी सरकारकडे ना नव्या कायद्यांचा आग्रह धरला, ना नवे नियम केले! केवळ पूर्वीपासून अस्तित्वात असलेले कायदे आणि नियमांची काटेकोर अंमलबजावणी करूनच त्यांनी एक नवा अध्याय घडवला. आज तमाम राजकीय पक्षांना आणि राजकारण्यांना जिची सतत धास्ती वाटते ती आदर्श निवडणूक आचारसंहिता तर शेषन पदारूढ होईपर्यंत कुणाच्या गावीही नव्हती. देशातील अनेक भागांमध्ये, विशेषत: उत्तर भारतात, मतदान केंद्रांवर कब्जा करून हव्या त्या उमेदवाराच्या निवडणूक चिन्हावर शिक्के मारून मतपेट्या भरून टाकणे हा प्रकार राजरोसपणे होत असे.

गुन्हेगारांच्या अनेक टोळ्या राजकीय पक्षांसाठी हे काम करीत असत. शेषन पदारूढ झाल्यानंतर हे सगळे चित्र बदलले. आज निवडणूक प्रणालीचा अविभाज्य भाग असलेल्या आदर्श आचारसंहिता, छायाचित्रयुक्त मतदार ओळखपत्र, निवडणूक खर्चावरील बंधनाची काटेकोर अंमलबजावणी इत्यादी बाबी ही शेषन यांचीच देणगी आहे. त्याशिवाय निवडणुकांदरम्यान दिसणारा मदिरेचा महापूर, मतांची खरेदी, प्रचारासाठी भिंती बरबटणे, कर्णकर्कश भोंग्यांचा वाट्टेल तसा वापर, प्रचारासाठी जाती-धर्मांचा आधार अशा अनेक गोष्टी बव्हंशी इतिहासजमा करून टाकण्याचे श्रेयही नि:संशयपणे शेषन यांचेच आहे. निवडणुका सर्वथा नि:पक्षपातीपणाने पार पाडण्यावर शेषन यांचा एवढा भर होता, की निवडणूक सुरू असताना सरकारी खर्चाने वर्तमानपत्रांना जाहिराती देणाऱ्या उत्तर प्रदेशच्या तत्कालीन मुख्य सचिवांचे त्यांनी जाहीररीत्या वाभाडे काढले होते. एवढेच नव्हे तर पदासीन असताना मुलासाठी निवडणूक प्रचार केलेल्या एका राज्यपालास त्यांनी चक्क राजीनामा देण्यास भाग पाडले होते.
माजी मुख्य निवडणूक आयुक्त टी.एस. कृष्णमूर्ती यांनी ‘मिरॅकल आॅफ डेमॉक्रसी : इंडियाज अमेझिंग जर्नी’ हे पुस्तक लिहिले आहे. त्यामध्ये ते म्हणतात, भारताच्या निवडणूक आयोगाचा इतिहास लिहायचा झाल्यास, त्याचे दोन भाग करावे लागतील - शेषनपूर्व युग, जेव्हा निवडणूक आयोग एक सरकारी विभाग म्हणून काम करीत असे आणि शेषन यांच्यानंतरचे युग, जेव्हा निवडणूक आयोग खºया अर्थाने स्वतंत्र झाला! शेषन यांच्या कामगिरीचा यापेक्षा अधिक चांगल्या शब्दांत गौरव होऊच शकत नाही. या देशात लोकशाही प्रणाली रुजविण्यात आणि वाढविण्यात अनेक थोर नेत्यांचा सहभाग लाभला; मात्र लोकशाही प्रणालीचा आत्मा असलेल्या निवडणुका खºया अर्थाने नि:पक्ष करण्यात आणि सर्वसामान्य नागरिकाचा लोकशाही प्रणालीतील विश्वास दृढ करण्याचे श्रेय नि:संशयपणे शेषन यांचेच आहे. या देशातील सर्वसामान्य माणूस त्यासाठी सदैव त्यांचा ॠणी असेल. भारतमातेच्या या थोर सुपुत्रास विनम्र श्रद्धांजली!