शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
3
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
4
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
5
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
6
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
7
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
8
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
9
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
10
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
11
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
12
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
13
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
14
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
15
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
16
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
17
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
18
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
19
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
20
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...

अत्यावश्यक आणि स्वागतार्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2021 00:24 IST

देशात रोज जितके रुग्ण आढळत आहेत, त्यापैकी ६० टक्के एकट्या महाराष्ट्रात असून, त्यामुळे तणाव वाढत चालला आहे.

वयाची साठी पूर्ण केलेल्या तसेच ४५ वर्षांवरील; पण व्याधीग्रस्त सर्वांना १ मार्चपासून देशभर कोरोनावरील लस दिली जाणार आहे. एकीकडे कोरोनाचे रुग्ण नव्याने वाढू लागले असून, त्यामुळे पुन्हा सर्वत्र अनिश्चिततेचे वातावरण निर्माण झाले आहे. नव्याने लॉकडाऊन लावला जाईल का, पुन्हा रोजगारांवर गदा येईल का, अर्थचक्र पुन्हा खाली जाईल का, अशी भीती लोकांना वाटू लागली आहे. त्यात महाराष्ट्रामध्ये रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे.

देशात रोज जितके रुग्ण आढळत आहेत, त्यापैकी ६० टक्के एकट्या महाराष्ट्रात असून, त्यामुळे तणाव वाढत चालला आहे. महाराष्ट्रातून अन्य राज्यांमध्ये जाण्यावर निर्बंध येऊ लागले आहेत. कोरोना झाला नसल्याचे तपासणी अहवाल असेल तरच आमच्याकडे प्रवेश मिळेल, अशी अट अनेक राज्यांनी महाराष्ट्रावर घातली आहे. मृत्यूचे प्रमाण कमी होत असले तरी मुंबई आणि विदर्भ या भागांत रुग्णवाढीचा वेग सर्वाधिक आहे. केंद्र व राज्य सरकारने निर्बंध कमी करण्यास वा उठविण्यास सुरुवात करताच, आता कोरोना संपला या समजुतीतून लोकांनी काळजी घेणे थांबविले, मास्कचा वापर बंद केला. संसर्ग वाढण्याचे हेच एकमेव कारण आहे. मात्र नेमक्या याच काळात केंद्र सरकारने लसीकरणाबाबत घेतलेल्या या निर्णयाचे सर्वत्र स्वागतच करायला हवे. तब्बल १३० कोटी लोकसंख्या असलेल्या देशात लसीकरण वेगाने करण्याची ही तयारी दिसत आहे.

सरकारच्या निर्णयामुळे अनेक गोष्टींबाबत स्पष्टताही आली. सर्वांना मोफत लस दिली जाणार का, की त्यासाठी पैसे मोजावे लागणार, याबाबत संदिग्धता होती. मात्र २० हजार खासगी केंद्रात जाऊन लस घेणाऱ्यांना ठरावीक रक्कम द्यावी लागेल, हे सरकारने स्पष्ट केले आहे. त्याबद्दल कोणाची तक्रार असता कामा नये. जसे खासगी दवाखाने व रुग्णालयांत उपचारांसाठी पैसे मोजावे लागतात, तसेच लसीबाबतही असेल. ज्यांना पैसे देणे परवडत नाही, त्यांच्यासाठी १० हजार सरकारी केंद्रांचा पर्याय आहेच. शिवाय लसीची किंमत सरकार ठरविणार आहे. त्यामुळे खासगी दवाखाने आणि रुग्णालयांत रुग्णांकडून बऱ्याचदा अव्वाच्या सव्वा रक्कम उकळली जाते, तसे होण्याची शक्यता नाही.

एकूण ३० हजार केंद्रांवर रोज लस दिली जाणार, याचाच अर्थ मुळी तितके लसीचे उत्पादन भारतात सहज शक्य आहे, असा होतो. त्याबद्दल लस बनवणाऱ्या भारतीय आणि जगभरातील कंपन्यांचे आपण ऋणी राहायला हवे. या संसर्गाच्या काळात संशोधकांनी केलेले प्रयत्न कधीच विसरून चालणार नाही. त्यांनी केलेल्या प्रयत्नांमुळेच लस लवकर निर्माण होऊ शकली. लसीकरणासाठी खासगी रुग्णालये, केंद्रे यांची मदत घेण्याचे ठरविले, याबद्दल सरकारचेही आभार मानायला हवेत. आता लसीकरणाला वेग येईल आणि कोरोनाच्या संसर्गाची शक्यता कमी होत जाईल. देशात अद्याप १ टक्का लोकांनाही लस मिळालेली नाही. त्यामुळे ६० वर्षांवरील व व्याधीग्रस्त असलेल्या ४५ वर्षांवरील अशा २७ कोटी लोकांना लस देण्यासाठी काही वर्षे गेली असती. पण खासगी क्षेत्राच्या सहभागामुळे हे कदाचित काही महिन्यांत शक्य होईल.

परिणामी अनेकांचे जीव वाचतील आणि औषधोपचारांवरील खर्चही कमी होईल. याच काही मोठ्या उद्योगपतींनी आम्ही लसीकरणासाठी सरकारला मदत करायला तयार आहोत, असे म्हटले होते. लोकमतनेही सातत्याने हीच भूमिका घेतली. त्यामुळे कदाचित अनेक कंपन्या, कारखाने, कार्यालये आपल्या कर्मचाऱ्यांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना लस देण्यासाठी पुढाकार घेतील. त्यात त्यांचे व समाजाचेही हित आहे. समाजातील एखादा घटक आजारी असेल वा त्याचे शारीरिक स्वास्थ्य चांगले नसेल, तर त्याचे केवळ घरातच नव्हे, बाहेरही आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक परिणाम होतात, हे आपण सर्वांनी गेले वर्षभर पाहिले आहे.

अर्थचक्र बिघडले, भेटीगाठी बंद झाल्या आणि गणेशोत्सव, दिवाळी वा कोणतेच सण, उत्सव आपण साजरे करू शकलो नाही. सर्वत्र निराशेचे सावट होते. त्यात हा कोरोनाचा विषाणू असा की, कोणी आजारी पडला तरी भेटायला वा मरण पावला तरी अंत्यसंस्काराला जाता आले नाही. आपल्यालाही संसर्ग होईल, ही भीती कायम मनात दाटून होती आणि आजही आहे. या सर्वांवर लस हाच एकमेव उपाय आहे. अर्थात लस बाजारात आली आणि ती केव्हाही घेता येईल, असा विचार करून वा गाफील राहून मास्क वापरणे बंद केले, शारीरिक अंतर पाळले नाही, तर आजही संसर्ग पुन्हा वाढेल. निराशेतून बाहेर पडण्यासाठी लसीबरोबरच कायमस्वरूपी काळजी घेण्याची सर्वांनी तयारी ठेवणे गरजेचे आहे.

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसIndiaभारतMaharashtraमहाराष्ट्र