शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

अन्वयार्थ : नक्षली उपद्रवाचा बिमोड : सर्व बाजूंनी प्रयत्न हवेत!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2024 07:37 IST

देशातील नक्षलग्रस्त जिल्ह्यांची संख्या ११० वरून ३४ इतकी खाली आली आहे. या आतंकाचा बीमोड करण्यासाठी सर्वस्तरीय प्रयत्नांची गती वाढवली पाहिजे.

प्रवीण दीक्षित  निवृत्त पोलिस महासंचालक

बेकायदा कारवाया प्रतिबंधात्मक कायद्याखाली २००९ पासून प्रतिबंध लावण्यात आलेल्या कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (माओवादी) या पक्षाने २१ सप्टेंबर ते २० ऑक्टोबर २०२४ या काळात पक्षाचा विसावा स्थापना दिवस देशभर पाळण्याचे आवाहन केले आहे. चारू मुजुमदार आणि कन्हाई चॅटर्जी यांनी १९६८ साली नक्षलवादी चळवळ सुरू केली. कालांतराने चळवळीत अनेक गट तयार झाले. २१ सप्टेंबर २००४ रोजी हे फुटलेले गट एकत्र येऊन भारतीय कम्युनिस्ट पक्ष माओवादी या पक्षाची स्थापना करण्यात आली. मार्क्स, लेनिन आणि माओ यांच्या विचारांनी हा पक्ष प्रेरित आहे. 

अमेरिका पुरस्कृत भांडवलशाही, सरंजामशाही आणि त्या स्वरूपाच्या उर्वरित व्यवस्थेला नेस्तनाबूत करण्यासाठी सशस्त्र क्रांतीद्वारे सत्ता हस्तगत करण्यावर या पक्षाचा ठाम विश्वास आहे. गेल्या वीस वर्षांत निमलष्करी तसेच पोलिस दलांवर अनेक यशस्वी हल्ले करण्यात आले. या काळात २३६६ अत्याधुनिक शस्त्रे हस्तगत केल्याचा दावा संघटना करते. किती निरपराध लोक मारले हे मात्र सांगत नाही. नैराश्यातून पोलिसांना शरण गेलेल्या अनेक सहकाऱ्यांना नक्षल्यांनी कंठस्नान घातले. सशस्त्र क्रांतिशिवाय सामाजिक न्याय, खरे स्वातंत्र्य, लोकराज्याची स्थापना, स्वयंनिर्णयाचे स्वातंत्र्य यातले काहीच मिळणार नाही, अशा मताच्या या पक्षाने भारतापासून फुटून निघण्याचा निश्चय केलेला आहे. हे उद्दिष्ट गाठण्यासाठी पक्ष, पीपल्स लिबरेशन आर्मी आणि अमेरिका पुरस्कृत भांडवलशाही, सरंजामशाही आणि त्या स्वरूपाच्या उर्वरित व्यवस्थेला नेस्तनाबूत करण्यासाठी सशस्त्र क्रांतीद्वारे सत्ता हस्तगत करण्यावर या पक्षाचा ठाम विश्वास आहे.

२००७ साली भारतीय क्रांतीविषयीचे धोरण आणि मार्गाची निश्चिती पक्षाने केली. त्यानुसार पोलिस दल तसेच भारतीय लष्करातील जास्तीत जास्त सैनिकांना आणि सरकारी अधिकाऱ्यांना मारणे हे प्राथमिक उद्दिष्ट आहे. औषधे, पैसा आणि नवीन तंत्रज्ञान मिळवण्यासाठी शहरी भागातून भरती करण्यात येते. कामगार, अर्धकुशल कामगार, विद्यार्थी आणि मध्यमवर्गीय बुद्धिमंतात ही चळवळ पसरविण्याचा प्रयत्न केला गेला. शहरी नक्षल्यांनी लष्कर, निमलष्करी दले, पोलिस आणि वरिष्ठ नोकरशहांच्या वर्तुळात शिरावे, गुप्त  माहिती मिळवून चळवळीला पुरवावी त्याचप्रमाणे आधुनिक शस्त्रे, दारुगोळा यांचा पुरवठा शक्य करुन द्यावा, माध्यमे सांभाळावीत, औषधांचा अव्याहत पुरवठा होईल हे पहावे, जखमींना मदत करावी, असे जाळे रचण्यात आले. आजच्या घडीला सभ्य वाटणारी नावे धारण करून अशा काही संघटना काम करत आहेत.

पश्चिम बंगालमधील सिलीगुडी जवळच्या नक्षल वारीतून सुरू झालेली ही चळवळ सर्वत्र पसरली. २०१३ पर्यंत ११० जिल्हे चळवळीने व्यापले. मात्र २०१४ साली भाजप केंद्रात सत्तेवर आल्यानंतर विकासकामांवर भर देण्यात येऊ लागला. शेवटच्या माणसापर्यंत योजना पोहोचावी यासाठी एक खिडकी योजना सुरू करण्यात आली. व्यवसाय कौशल्य आत्मसात करणे, महाराष्ट्र रोजगार मिळवून देणे, उद्योग सुरू करणे याला प्रोत्साहन देण्यात आले. गडचिरोलीतील १० हजारांहून अधिक तरुण- तरुणींनी या योजनेचा लाभ घेतला. अनेक राज्य सरकारांनी नक्षल्यांसाठी शरणागती योजना आणली. या उपायांचा नक्षल चळवळीला चांगलाच फटका बसला. याशिवाय स्थानिकांच्या सहकार्याने खाणकाम सुरू करण्यात आले. त्यातूनही रोजगार वाढला. केंद्राने अनेक नक्षलग्रस्त जिल्हे 'आकांक्षी जिल्हे' म्हणून जाहीर केले. तेथील लोकांना चांगले रस्ते, दूरसंचार यंत्रणा, शैक्षणिक तसेच वैद्यकीय सुविधा पुरवून मुख्य प्रवाहात आणले.

भारत सरकारने नक्षलवादग्रस्त राज्य पोलिसदलांना गुप्त माहिती पुरवणे, समन्वय आणि प्रशिक्षण अशी मदत केली. कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या यंत्रणांना पायाभूत सुविधा, वित्तपुरवठा आणि अतिरिक्त निमलष्करी दलाची मदतही देऊ केली. परिणामी नक्षलवादग्रस्त जिल्ह्यांची संख्या ११० वरून ३४ इतकी खाली आली. सध्या छत्तीसगडमधील अवुजमाल पहाडी भागात माओवादी कार्यरत आहेत. हा दुर्गम प्रदेश असल्याने तेथील स्थानिक नक्षल्यांच्या मुठीत असून त्यांनी हा प्रदेश 'मुक्त' जाहीर केला आहे. नक्षली उपद्रवाने होणारी हानी कमी करण्यासाठी प्रशासकीय उपायांव्यतिरिक्त सर्व लोकशाहीवादी आणि स्वातंत्र्याच्या कैवारी राजकीय पक्षांनी, तसेच माध्यमे, विद्वानांनी या विषयावर सजग राहणे गरजेचे आहे. 

टॅग्स :naxaliteनक्षलवादीPoliceपोलिसCentral Governmentकेंद्र सरकार