शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
2
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
3
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
4
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
5
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
6
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
7
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
8
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
9
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
10
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
11
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
12
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
13
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
14
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
15
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
16
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
17
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
18
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
19
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
20
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!

महामारीला निमंत्रण

By admin | Updated: December 9, 2015 23:53 IST

जागतिक एड्स निर्मूलन दिन नुकताच साजरा झाला. काही वर्षांपूर्वी एड्स या आजाराने प्रचंड दहशत निर्माण केली होती. कालौघात ती दहशत बरीच ओसरली असली तरी

जागतिक एड्स निर्मूलन दिन नुकताच साजरा झाला. काही वर्षांपूर्वी एड्स या आजाराने प्रचंड दहशत निर्माण केली होती. कालौघात ती दहशत बरीच ओसरली असली तरी, हा रोग हद्दपार करण्यासाठी अजून बरीच मोठी मजल मारायची आहे. जागतिक आरोग्य संघटना (हू) त्यासंदर्भात अत्यंत गंभीर आहे. भारतात राष्ट्रीय एड्स नियंत्रण संघटना (नॅको) मात्र ‘हू’ची री ओढण्यास तयार नाही. प्रत्येक ‘एचआयव्ही पॉझिटिव्ह’ रुग्णाला, मग तो आजाराच्या कोणत्याही टप्प्यावर असो, ‘अ‍ॅन्टिरिट्रोव्हायरल थेरपी’ (एआरटी) पुरविलीच गेली पाहिजे, अशी शिफारस ‘हूू’ने जागतिक एड्स निर्मूलन दिनाच्या पूर्वसंध्येला केली. बहुतांश देशांनी त्या शिफारसीचे पालन करण्यास होकार दिला असताना, ‘नॅको’ने मात्र यासंदर्भात वेगळी भूमिका घेऊन भारत त्यासाठी तयार नसल्याचे स्पष्टपणे सांगून टाकले आहे. भारताने गेल्या दीड दशकात एड्सच्या संकटाचा खूप चांगल्या रितीने मुकाबला केला. या आजाराविषयी जनजागृती करण्यासाठी व उपचारांसाठी बराच पैसाही ओतला. त्याचे चांगले परिणाम समोर आले असून, एड्सने होणाऱ्या मृत्यूच्या प्रमाणात निश्चितपणे घट झाली आहे. या पार्श्वभूमीवर ‘नॅको’ने घेतलेल्या ताज्या भूमिकेमुळे एवढ्या वर्षांत केलेल्या चांगल्या कामावर पाणी फिरले जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे. ‘एचआयव्ही पॉझिटिव्ह’ रुग्णांसाठी ‘एआरटी’ ही जीवरक्षक उपचार प्रणाली आहे. भारतात आजवर ‘सीडीफोर काऊंट’ ३५० असलेल्या रुग्णांना ‘एआरटी’ औषधे मोफत दिली जात असत. ‘सीडीफोर’ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या पेशी मानवी शरीरातील रोग प्रतिबंधक प्रणालीसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण असतात. या पेशींची संख्या जेवढी कमी तेवढी त्या रुग्णाची रोग प्रतिबंधक शक्ती कमी असते. यापुढे ‘सीडीफोर काऊंट’ ५०० असलेल्या रुग्णांनाही ‘एआरटी’ औषधे मोफत देण्याचे भारताने मान्य केले आहे; मात्र ती प्रत्येक ‘एचआयव्ही पॉझिटिव्ह’ रुग्णाला मोफत पुरविली पाहिजे, ही ‘हू’ची भूमिका आहे. जर एवढी वर्षे ‘सीडीफोर काऊंट’ ३५० असलेल्या रुग्णांना मोफत ‘एआरटी’ औषधे देऊनही परिस्थिती नियंत्रणात आहे, तर यापुढे ‘सीडीफोर काऊंट’ ५०० असलेल्या रुग्णांनाही मोफत औषध दिल्याने परिस्थितीत सकारात्मकच बदल होईल, अशी ‘नॅको’ची भूमिका दिसते. भारतातील अनेक तज्ज्ञ डॉक्टरांना मात्र ही भूमिका मान्य नाही. प्रत्येक ‘एचआयव्ही पॉझिटिव्ह’ रुग्णाला मोफत ‘एआरटी’ औषधे पुरविणे, हाच एड्सशी लढा देण्याचा योग्य मार्ग आहे, अवघ्या जगाने तो स्वीकारला आहे आणि आपणही जगाच्या पावलावर पाऊल ठेवून चालायला हवे, अशी त्यांची भूमिका आहे. या मतभेदांच्या परिणामी एड्स रुग्णांचे बळी गेले नाहीत आणि या महाभयंकर आजाराने महामारीचे रुप धारण केले नाही, म्हणजे मिळवली!