शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

अस्वस्थ, परिवर्तनशील दशकाची सांगता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2020 14:26 IST

मिलिंद कुलकर्णी अविनाश धर्माधिकारी यांचे ‘अस्वस्थ दशकाची डायरी’ हे ईशान्य राज्यांमधील विद्यार्थी आंदोलन, त्याचा सामाजिक व राजकीय परिणाम याविषयी ...

मिलिंद कुलकर्णी

अविनाश धर्माधिकारी यांचे ‘अस्वस्थ दशकाची डायरी’ हे ईशान्य राज्यांमधील विद्यार्थी आंदोलन, त्याचा सामाजिक व राजकीय परिणाम याविषयी स्वानुभव मांडणारे अप्रतिम पुस्तक आहे. ऐतिहासिक दस्तऐवज असे त्याचे वर्णन करता येईल. त्याच दशकासारखे २०१० ते २०२० हे दशक अस्वस्थतेचे निदर्शक होते. या दशकाची सुरुवात आणि शेवट यात काही साम्यस्थळे आहेत. भारतीय राजकारण व अर्थकारणात खाजगीकरण, उदारीकरण व जागतिकीकरण हे धोरण प्रस्थापित करण्यात महत्त्वपूर्ण सहभाग असलेल्या डॉ.मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखालील संयुक्त पुरोगामी आघाडीच्या दुसऱ्या कार्यकाळात भ्रष्टाचाराविरुध्द मोठे आंदोलन याच काळात झाले. अण्णा हजारे व अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनाने संपूर्ण देशभरात भ्रष्टाचाराविरुध्द जनभावना तयार झाली. हे आंदोलन हाताळण्यात डॉ.सिंग यांच्या सरकारला अपयश आले. आणि त्याची परिणती २०१४ च्या निवडणुकीत आघाडीच्या पराभवात झाली. डॉ.सिंग यांच्या प्रमाणे नरेंद्र मोदी हे २०१९ मध्ये दुसऱ्यांदा बहुमत मिळवून सत्तेत आले. पण सीएए, एनआरसी पाठोपाठ शेतकरी आंदोलनाने व्यापक स्वरुप धारण करीत सरकारविषयी जनभावना तयार करण्याचा प्रयत्न चालवला आहे. भ्रष्टाचारविरोधातील आंदोलन निर्णायक शेवटापर्यंत गेले, तसे शेतकºयांच्या आंदोलनाचे होते काय, हे नव्या वर्षांत कळेल. पण मुलभूत फरक दिसतो, तो म्हणजे तत्कालीन पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंग यांनी भ्रष्टाचारविरोधी आंदोलनासंबंधी ठोस भूमिका घेतली नव्हती, मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ती घेतलेली आहे. भाजपचे सर्व मंत्री, खासदार, मुख्यमंत्री, तसेच शासकीय प्रचार माध्यमे, समाज माध्यमे यांच्या माध्यमातून पंतप्रधान मोदी हे कृषी कायद्यांच्या फायद्यांविषयी, आंदोलकांच्या भूमिकेविषयी अथकपणे बोलताना दिसून येत आहे. त्याचा काही परिणाम होतो काय, हे सुध्दा नव्या वर्षात कळेल.अल्पसंख्य व बहुसंख्यवाद हा मुद्दा जागतिक राजकारणाच्या केंद्रस्थानी असतो. तसा तो भारतातही या दशकात प्रखरतेने दिसला. अल्पसंख्यकांना झुकते माप देण्याचा काँग्रेसवर आरोप करीत भाजपने बहुसंख्यक वादाचा उघडपणे पुरस्कार केला. त्याचा परिणाम २५ वर्षांत प्रथमच एका पक्षाचे बहुमताचे सरकार दिल्लीत येण्यात झाले. त्यापाठोपाठ अनेक राज्ये भाजपने मिळवली. जागतिक पातळीवर बहुसंख्यकवाद, राष्टÑवाद अशा नावाने राजकारण झाले. अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प यांनी ते आक्रमकपणे केले. त्याच ट्रम्पना अमेरिकन जनतेने नाकारल्याचे याच दशकात दिसून आले. सर्वसमावेशकतेचा हा सूर आता अन्य देशात आळवला जातो काय, हे नव्या दशकात कळेल.माहिती व तंत्रज्ञानात झालेला बदल हा मानवजातीवर परिणाम करणारा ठरला. भारताच्यादृष्टीने तर हा बदल मोठे परिवर्तन घडविणारा ठरला. विकसित देशांच्या बरोबरीने या क्षेत्रात भारतीयांनी या नव्या व्यासपीठाचा वापर केला. नवा बदल स्विकारला. कोरोना या जागतिक महासाथीच्या काळात याच माहिती व तंत्रज्ञानाचा खूप मोठा उपयोग झाल्याचे दिसून आले. अभिव्यक्त होण्याचे स्वातंत्र्य या व्यासपीठाने उपभोगायची संधी दिली. त्यामुळे सरकार, समाज व त्यातील घटकांमधील विसंगतीवर सामान्यांपासून तर असामान्य व्यक्तींपर्यंत कोणीही बोट ठेवू लागले. प्रश्न विचारु लागले. हा स्वागतार्ह बदल या दशकात दिसून आला.स्पॅनिश फ्लूनंतर १०० वर्षांनी कोरोनासारखी जागतिक महासाथ याच दशकात आली. आरोग्य पातळीवर विकसित असलेल्या देशांच्यातुलनेत भारताने या महासाथीचा सक्षमपणे मुकाबला केल्याचे दिसून आले. मजुरांचे स्थलांतर, सार्वजनिक आरोग्य सेवेतील प्रचंड त्रूटी असे काही अपवाद वगळता कोरोनाशी लढण्यासाठी सरकार आणि समाज हातात हात घेऊन काम करताना दिसून आल्या.९ महिन्यांच्या लॉकडाऊनच्या काळात भौतिक सुख म्हणजे सर्व काही अशा धारणेला मोठा धक्का बसला. वैयक्तिक आरोग्य, कौटुंबिक नाती आणि समाजाशी जुळवून घेण्याची वृत्ती यांचे माणसाच्या जीवनातील असलेले अविभाज्य स्थान याचे महत्त्व पटले. खूप काही शिकविणारे असे हे दशक होते, असे त्याचे एका ओळीत वर्णन करता येईल.

टॅग्स :Jalgaonजळगाव