शहरं
Join us  
Trending Stories
1
दसरा मेळाव्यामधून लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिला असा शब्द 
2
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
3
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
4
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा
5
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दसरा मेळाव्यात मिळाले उत्तर! म्हणाले, “त्याच दिवशी...”
6
Uddhav Thackeray: "नशीब..., नाही तर फडणवीस म्हणून 20वे आले असते...!"; मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधत उद्धव ठाकरेंनी भरसभेत नेमकं काय वाचलं?
7
Uddhav Thackeray Speech: "भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका
8
Dasara Melava: “नेपाळप्रमाणे GenZ लडाखमध्ये रस्त्यावर, सोनम वांगचूक देशभक्त”: उद्धव ठाकरे, भाजपावर टीका
9
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
10
पाकिस्तानसाठी PoK ठरतंय 'अवघड जागीचं दुखणं'! शाहबाज शरीफने लष्कराला दिले महत्त्वाचे आदेश
11
'परदेशात जाऊन भारताचा अपमान केला तर...', राहुल गांधीवर भाजपचा थेट पलटवार
12
 तामिळनाडूत संघाच्या शाखेवर मोठी कारवाई, ३९ स्वयंसेवक ताब्यात, समोर आलं असं कारण  
13
“लोकशाहीवर चौफेर हल्ले, चीनला शक्य ते भारत करू शकत नाही”; कोलंबियातून राहुल गांधींची टीका
14
याला म्हणतात ढासू परतावा...! ₹1 च्या शेअरमध्ये तुफान तेजी, ₹184 वर पोहोचला भाव; आता कंपनीनं केली मोठी डील
15
...अन्यथा महाराष्ट्रात निवडणुका होऊ देणार नाही; मनोज जरांगेंनी सरकारविरोधात पुन्हा थोपटले दंड, कोणत्या मागण्या केल्या?
16
IAS Srishti Dabas : शाब्बास पोरी! दिवसा काम अन् रात्री अभ्यास; सुंदर IAS चा नेत्रदीपक प्रवास, अडचणींवर केली मात
17
  ब्रिटनमध्ये ज्यूंच्या प्रार्थनास्थळावर भीषण हल्ला, २ जणांचा मृत्यू, तिघे गंभीर जखमी, संशयित ठार   
18
IND vs WI, 1st Test Day 1 Stumps : KL राहुल लंगडताना दिसला; कुलदीप पॅड बांधून बॅटिंगसाठी नटला,पण...
19
Manoj Jarange Patil : "मी थोड्या दिवसांचा पाहुणा..."; मनोज जरांगे पाटील यांना अश्रू अनावर, मराठ्यांना भावनिक साद
20
उल्हासनगरात गरब्याच्या ठिकाणी शिवसेना शाखाप्रमुखावर पिस्तूल रोखून गोळीबार करणारा गजाआड 

अस्वस्थ, परिवर्तनशील दशकाची सांगता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2020 14:26 IST

मिलिंद कुलकर्णी अविनाश धर्माधिकारी यांचे ‘अस्वस्थ दशकाची डायरी’ हे ईशान्य राज्यांमधील विद्यार्थी आंदोलन, त्याचा सामाजिक व राजकीय परिणाम याविषयी ...

मिलिंद कुलकर्णी

अविनाश धर्माधिकारी यांचे ‘अस्वस्थ दशकाची डायरी’ हे ईशान्य राज्यांमधील विद्यार्थी आंदोलन, त्याचा सामाजिक व राजकीय परिणाम याविषयी स्वानुभव मांडणारे अप्रतिम पुस्तक आहे. ऐतिहासिक दस्तऐवज असे त्याचे वर्णन करता येईल. त्याच दशकासारखे २०१० ते २०२० हे दशक अस्वस्थतेचे निदर्शक होते. या दशकाची सुरुवात आणि शेवट यात काही साम्यस्थळे आहेत. भारतीय राजकारण व अर्थकारणात खाजगीकरण, उदारीकरण व जागतिकीकरण हे धोरण प्रस्थापित करण्यात महत्त्वपूर्ण सहभाग असलेल्या डॉ.मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखालील संयुक्त पुरोगामी आघाडीच्या दुसऱ्या कार्यकाळात भ्रष्टाचाराविरुध्द मोठे आंदोलन याच काळात झाले. अण्णा हजारे व अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनाने संपूर्ण देशभरात भ्रष्टाचाराविरुध्द जनभावना तयार झाली. हे आंदोलन हाताळण्यात डॉ.सिंग यांच्या सरकारला अपयश आले. आणि त्याची परिणती २०१४ च्या निवडणुकीत आघाडीच्या पराभवात झाली. डॉ.सिंग यांच्या प्रमाणे नरेंद्र मोदी हे २०१९ मध्ये दुसऱ्यांदा बहुमत मिळवून सत्तेत आले. पण सीएए, एनआरसी पाठोपाठ शेतकरी आंदोलनाने व्यापक स्वरुप धारण करीत सरकारविषयी जनभावना तयार करण्याचा प्रयत्न चालवला आहे. भ्रष्टाचारविरोधातील आंदोलन निर्णायक शेवटापर्यंत गेले, तसे शेतकºयांच्या आंदोलनाचे होते काय, हे नव्या वर्षांत कळेल. पण मुलभूत फरक दिसतो, तो म्हणजे तत्कालीन पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंग यांनी भ्रष्टाचारविरोधी आंदोलनासंबंधी ठोस भूमिका घेतली नव्हती, मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ती घेतलेली आहे. भाजपचे सर्व मंत्री, खासदार, मुख्यमंत्री, तसेच शासकीय प्रचार माध्यमे, समाज माध्यमे यांच्या माध्यमातून पंतप्रधान मोदी हे कृषी कायद्यांच्या फायद्यांविषयी, आंदोलकांच्या भूमिकेविषयी अथकपणे बोलताना दिसून येत आहे. त्याचा काही परिणाम होतो काय, हे सुध्दा नव्या वर्षात कळेल.अल्पसंख्य व बहुसंख्यवाद हा मुद्दा जागतिक राजकारणाच्या केंद्रस्थानी असतो. तसा तो भारतातही या दशकात प्रखरतेने दिसला. अल्पसंख्यकांना झुकते माप देण्याचा काँग्रेसवर आरोप करीत भाजपने बहुसंख्यक वादाचा उघडपणे पुरस्कार केला. त्याचा परिणाम २५ वर्षांत प्रथमच एका पक्षाचे बहुमताचे सरकार दिल्लीत येण्यात झाले. त्यापाठोपाठ अनेक राज्ये भाजपने मिळवली. जागतिक पातळीवर बहुसंख्यकवाद, राष्टÑवाद अशा नावाने राजकारण झाले. अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प यांनी ते आक्रमकपणे केले. त्याच ट्रम्पना अमेरिकन जनतेने नाकारल्याचे याच दशकात दिसून आले. सर्वसमावेशकतेचा हा सूर आता अन्य देशात आळवला जातो काय, हे नव्या दशकात कळेल.माहिती व तंत्रज्ञानात झालेला बदल हा मानवजातीवर परिणाम करणारा ठरला. भारताच्यादृष्टीने तर हा बदल मोठे परिवर्तन घडविणारा ठरला. विकसित देशांच्या बरोबरीने या क्षेत्रात भारतीयांनी या नव्या व्यासपीठाचा वापर केला. नवा बदल स्विकारला. कोरोना या जागतिक महासाथीच्या काळात याच माहिती व तंत्रज्ञानाचा खूप मोठा उपयोग झाल्याचे दिसून आले. अभिव्यक्त होण्याचे स्वातंत्र्य या व्यासपीठाने उपभोगायची संधी दिली. त्यामुळे सरकार, समाज व त्यातील घटकांमधील विसंगतीवर सामान्यांपासून तर असामान्य व्यक्तींपर्यंत कोणीही बोट ठेवू लागले. प्रश्न विचारु लागले. हा स्वागतार्ह बदल या दशकात दिसून आला.स्पॅनिश फ्लूनंतर १०० वर्षांनी कोरोनासारखी जागतिक महासाथ याच दशकात आली. आरोग्य पातळीवर विकसित असलेल्या देशांच्यातुलनेत भारताने या महासाथीचा सक्षमपणे मुकाबला केल्याचे दिसून आले. मजुरांचे स्थलांतर, सार्वजनिक आरोग्य सेवेतील प्रचंड त्रूटी असे काही अपवाद वगळता कोरोनाशी लढण्यासाठी सरकार आणि समाज हातात हात घेऊन काम करताना दिसून आल्या.९ महिन्यांच्या लॉकडाऊनच्या काळात भौतिक सुख म्हणजे सर्व काही अशा धारणेला मोठा धक्का बसला. वैयक्तिक आरोग्य, कौटुंबिक नाती आणि समाजाशी जुळवून घेण्याची वृत्ती यांचे माणसाच्या जीवनातील असलेले अविभाज्य स्थान याचे महत्त्व पटले. खूप काही शिकविणारे असे हे दशक होते, असे त्याचे एका ओळीत वर्णन करता येईल.

टॅग्स :Jalgaonजळगाव