शहरं
Join us  
Trending Stories
1
"शिवसेनाप्रमुखांचा ब्रँड पुसून टाकण्याचा प्रयत्न कराल तर नामोनिशान पुसून टाकू"
2
भाषेवरून राजकारण पेटले, उद्धव ठाकरेंची सडकून टीका, एकनाथ शिंदेंचा जोरदार पलटवार!
3
Mumbai Local: मुंबईकरांचा प्रवास आणखी सुखकर होणार, रेल्वेमंत्र्यांची लोकल ट्रेनबाबत मोठी घोषणा
4
आजचे राशीभविष्य : २० जून २०२५; विनाकारण खर्च वाढतील, प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
5
samruddhi mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर अपघातात दोघांचा मृत्यू, जीपचालकाला डुलकी लागल्याने दुर्घटना!
6
Bombay High Court: ‘त्या’ एसआरए योजनेत ३५ टक्के जागा खुल्या ठेवा
7
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
8
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
9
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
10
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
11
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
12
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
13
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
14
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
15
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
16
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
17
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
18
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
19
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
20
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार

अस्वस्थ, परिवर्तनशील दशकाची सांगता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2020 14:26 IST

मिलिंद कुलकर्णी अविनाश धर्माधिकारी यांचे ‘अस्वस्थ दशकाची डायरी’ हे ईशान्य राज्यांमधील विद्यार्थी आंदोलन, त्याचा सामाजिक व राजकीय परिणाम याविषयी ...

मिलिंद कुलकर्णी

अविनाश धर्माधिकारी यांचे ‘अस्वस्थ दशकाची डायरी’ हे ईशान्य राज्यांमधील विद्यार्थी आंदोलन, त्याचा सामाजिक व राजकीय परिणाम याविषयी स्वानुभव मांडणारे अप्रतिम पुस्तक आहे. ऐतिहासिक दस्तऐवज असे त्याचे वर्णन करता येईल. त्याच दशकासारखे २०१० ते २०२० हे दशक अस्वस्थतेचे निदर्शक होते. या दशकाची सुरुवात आणि शेवट यात काही साम्यस्थळे आहेत. भारतीय राजकारण व अर्थकारणात खाजगीकरण, उदारीकरण व जागतिकीकरण हे धोरण प्रस्थापित करण्यात महत्त्वपूर्ण सहभाग असलेल्या डॉ.मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखालील संयुक्त पुरोगामी आघाडीच्या दुसऱ्या कार्यकाळात भ्रष्टाचाराविरुध्द मोठे आंदोलन याच काळात झाले. अण्णा हजारे व अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनाने संपूर्ण देशभरात भ्रष्टाचाराविरुध्द जनभावना तयार झाली. हे आंदोलन हाताळण्यात डॉ.सिंग यांच्या सरकारला अपयश आले. आणि त्याची परिणती २०१४ च्या निवडणुकीत आघाडीच्या पराभवात झाली. डॉ.सिंग यांच्या प्रमाणे नरेंद्र मोदी हे २०१९ मध्ये दुसऱ्यांदा बहुमत मिळवून सत्तेत आले. पण सीएए, एनआरसी पाठोपाठ शेतकरी आंदोलनाने व्यापक स्वरुप धारण करीत सरकारविषयी जनभावना तयार करण्याचा प्रयत्न चालवला आहे. भ्रष्टाचारविरोधातील आंदोलन निर्णायक शेवटापर्यंत गेले, तसे शेतकºयांच्या आंदोलनाचे होते काय, हे नव्या वर्षांत कळेल. पण मुलभूत फरक दिसतो, तो म्हणजे तत्कालीन पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंग यांनी भ्रष्टाचारविरोधी आंदोलनासंबंधी ठोस भूमिका घेतली नव्हती, मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ती घेतलेली आहे. भाजपचे सर्व मंत्री, खासदार, मुख्यमंत्री, तसेच शासकीय प्रचार माध्यमे, समाज माध्यमे यांच्या माध्यमातून पंतप्रधान मोदी हे कृषी कायद्यांच्या फायद्यांविषयी, आंदोलकांच्या भूमिकेविषयी अथकपणे बोलताना दिसून येत आहे. त्याचा काही परिणाम होतो काय, हे सुध्दा नव्या वर्षात कळेल.अल्पसंख्य व बहुसंख्यवाद हा मुद्दा जागतिक राजकारणाच्या केंद्रस्थानी असतो. तसा तो भारतातही या दशकात प्रखरतेने दिसला. अल्पसंख्यकांना झुकते माप देण्याचा काँग्रेसवर आरोप करीत भाजपने बहुसंख्यक वादाचा उघडपणे पुरस्कार केला. त्याचा परिणाम २५ वर्षांत प्रथमच एका पक्षाचे बहुमताचे सरकार दिल्लीत येण्यात झाले. त्यापाठोपाठ अनेक राज्ये भाजपने मिळवली. जागतिक पातळीवर बहुसंख्यकवाद, राष्टÑवाद अशा नावाने राजकारण झाले. अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प यांनी ते आक्रमकपणे केले. त्याच ट्रम्पना अमेरिकन जनतेने नाकारल्याचे याच दशकात दिसून आले. सर्वसमावेशकतेचा हा सूर आता अन्य देशात आळवला जातो काय, हे नव्या दशकात कळेल.माहिती व तंत्रज्ञानात झालेला बदल हा मानवजातीवर परिणाम करणारा ठरला. भारताच्यादृष्टीने तर हा बदल मोठे परिवर्तन घडविणारा ठरला. विकसित देशांच्या बरोबरीने या क्षेत्रात भारतीयांनी या नव्या व्यासपीठाचा वापर केला. नवा बदल स्विकारला. कोरोना या जागतिक महासाथीच्या काळात याच माहिती व तंत्रज्ञानाचा खूप मोठा उपयोग झाल्याचे दिसून आले. अभिव्यक्त होण्याचे स्वातंत्र्य या व्यासपीठाने उपभोगायची संधी दिली. त्यामुळे सरकार, समाज व त्यातील घटकांमधील विसंगतीवर सामान्यांपासून तर असामान्य व्यक्तींपर्यंत कोणीही बोट ठेवू लागले. प्रश्न विचारु लागले. हा स्वागतार्ह बदल या दशकात दिसून आला.स्पॅनिश फ्लूनंतर १०० वर्षांनी कोरोनासारखी जागतिक महासाथ याच दशकात आली. आरोग्य पातळीवर विकसित असलेल्या देशांच्यातुलनेत भारताने या महासाथीचा सक्षमपणे मुकाबला केल्याचे दिसून आले. मजुरांचे स्थलांतर, सार्वजनिक आरोग्य सेवेतील प्रचंड त्रूटी असे काही अपवाद वगळता कोरोनाशी लढण्यासाठी सरकार आणि समाज हातात हात घेऊन काम करताना दिसून आल्या.९ महिन्यांच्या लॉकडाऊनच्या काळात भौतिक सुख म्हणजे सर्व काही अशा धारणेला मोठा धक्का बसला. वैयक्तिक आरोग्य, कौटुंबिक नाती आणि समाजाशी जुळवून घेण्याची वृत्ती यांचे माणसाच्या जीवनातील असलेले अविभाज्य स्थान याचे महत्त्व पटले. खूप काही शिकविणारे असे हे दशक होते, असे त्याचे एका ओळीत वर्णन करता येईल.

टॅग्स :Jalgaonजळगाव