शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
2
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
3
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
4
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
5
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
6
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
7
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
8
दहशतवादी हल्लानंतर मृत्यू पावलेल्या पर्यटकांसाठी श्रद्धांजली यात्रा, मकरंद देशपांडे म्हणाले...
9
"मी १५ दिवस स्वतःचीच लघवी प्यायलो, कारण...; परेश रावल यांचा खुलासा, अजय देवगणच्या वडिलांनी दिला होता सल्ला
10
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
11
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
12
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
13
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
14
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
15
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
16
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
17
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
18
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
19
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
20
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात

रिअल इस्टेटमधून अर्थव्यवस्थेला उभारी द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2019 06:18 IST

भारताच्या सरासरी वार्षिक सकल राष्ट्रीय उत्पन्नात (जीडीपी) त्याआधीच्या १० वर्षांत झाली तेवढ्याच दराने वाढ झाली आहे. तरीही वास्तवात देशात उत्साहाचे वातावरण दिसत नाही, असे का व्हावे?

मोदी सरकार सत्तेवर आल्यापासूनच्या गेल्या साडेचार वर्षांत भारताच्या सरासरी वार्षिक सकल राष्ट्रीय उत्पन्नात (जीडीपी) त्याआधीच्या १० वर्षांत झाली तेवढ्याच दराने वाढ झाली आहे. तरीही वास्तवात देशात उत्साहाचे वातावरण दिसत नाही, असे का व्हावे? व्यापारी किंवा उद्योगपतींशी बोलल्यास त्यांचा निरुत्साह स्पष्टपणे जाणवतो. माझ्या मते देशातील रिअल इस्टेट क्षेत्राची जी स्थिती आहे ते याचे प्रमुख कारण आहे.

अल्लाउद्दीनचा जादूचा दिवाही तोकडा वाटावा अशी आश्वासनांची खैरात करून भाजपाचे सरकार मोठा गाजावाजा करत सत्तेवर आले. सर्वांना परवडणारे घर, हे या सरकारने दिलेले असेच एक आश्वासन. याद्वारे एका दगडात दोन पक्षी मारण्याचा सरकारचा हेतू होता. सरकार अशा भ्रमात होते की, या देशातील सर्व रिअल इस्टेट फक्त भ्रष्ट राजकीय नेते व नोकरशहांच्या मालकीची आहे. त्यामुळे रिअल इस्टेट उद्योगावर दबाव आणून किंवा रिअल इस्टेटच्या किमती कमी करण्याची धोरणे राबवून एकीकडे अन्य राजकीय पक्षातील लोकांच्या धनशक्तीला कात्री लावता येईल व दुसरीकडे घरांच्या किमती मध्यमवर्गाच्या आवाक्यात आणता येतील, असा दुहेरी गैरसमज सरकारने करून घेतला होता.

पण सरकार हे विसरले की, देशातील बहुसंख्य लोकांकडे स्थावर मालमत्ता खरेदी करण्याएवढी क्रयशक्तीच नाही. ‘क्रेडिट स्युईस’ने त्यांच्या २०१८ च्या ‘ग्लोबल वेल्थ रिपोर्ट’मध्ये नमूद केल्याप्रमाणे देशाची ७७.४ टक्के मालमत्ता १० टक्के गर्भश्रीमंत भारतीयांच्या मालकीची आहे. बहुसंख्येने असलेल्या तळाच्या ६० टक्के लोकांच्या मालकीच्या फक्त ४.७ टक्के मालमत्ता आहेत. सर्वाधिक श्रीमंत एक टक्का लोकांकडे ५१.५ टक्के संपत्ती आहे. गेल्या चार वर्षांत सर्वसामान्य भारतीयांच्या क्रयशक्तीत फारशी वाढ झालेली नाही. त्यांचे वास्तव किमान उत्पन्न वाढलेले नाही किंवा रोजगारामध्येही नाट्यमय वाढ झालेली नाही. त्यामुळे गेल्या साडेचार वर्षांत भारतीय अर्थव्यवस्थेच्या विकासाच्या तुलनेत रिअल इस्टेट खरेदी करणारे नवे ग्राहक तितकेसे वाढलेले नाहीत.

अर्थव्यवस्थेतून काळा पैसा बाहेर काढणे व रिअल इस्टेटच्या किमती मध्यमवर्गाच्या आवाक्यात आणणे या उद्देशाने सरकारने नोटाबंदी केली. पण हा उद्देश सफल झाला नाही. उलट अर्थव्यवस्थेचे नुकसान झाले. सरकारने हेही लक्षात घेतले नाही की, या देशातील लोक कुटुंबातील सोनेनाणे आणि राहते घर याकडे केवळ गुंतवणूक म्हणून कधीच पाहत नाहीत. त्यांच्या भावना त्यात गुंतलेल्या असतात. त्यांच्यासाठी ती आयुष्यभराची पुंजी असते आणि अगदीच निकड येईल तेव्हा उपयोगी पडणारे साधन असते. नोटाबंदी करून किंवा ‘एफएसआय’मध्ये वाढ करून रिअल इस्टेटच्या किमती पाडण्याचे सरकारने खूप प्रयत्न केले. पण आपल्या मिळकतीची किंमत कमी होईल या भीतीने सामान्य लोक आपल्या मालमत्ता विकून टाकायला पुढे आले नाहीत. त्यांनी मालमत्ता विकल्या नाहीत. तसेच त्यांना शाश्वती वाटत नसल्याने त्यांनी नव्या मालमत्तांमध्ये पैसा घालणेही बंद केले.

दुर्दैवाने पूर्वी राजकारणी, नोकरशहा व व्यापार-उद्योगवाल्यांनी कमावलेला बहुतेक सर्व पैसा रिअल इस्टेटमध्ये गुंतविला जायचा. परिणामी रिअल इस्टेटच्या किमती अवास्तव पातळीवर पोहोचल्या. खरे तर किमती ग्राहकांची क्रयशक्ती, देशाचे ‘जीडीपी’ किंवा दरडोई उत्पन्न अशा गोष्टींवर ठरायला हव्यात. नोटाबंदीच्या आधी रिअल इस्टेटमध्ये गुंतविलेल्या पैशावर भरघोस परतावा मिळत होता, त्यामुळे अनेक प्रकारचा मोठा पैसा या क्षेत्रात ओतला गेला. केवळ व्यक्तीच नव्हे तर लघू व मध्यम उद्योगांनी व मोठ्या उद्योगांनीही त्यांच्याकडे असलेला अतिरिक्त पैसा गुंतविण्यासाठी रिअल इस्टेटचा मार्ग निवडला.परंतु सरकारने नोटाबंदी केल्यापासून आणि रिअल इस्टेटच्या किमती कमी करण्याचे सातत्याने प्रयत्न सुरू झाल्यापासून गुंतवणूकदारांनी आणि खरेदीदारांनी रिअल इस्टेटला रामराम ठोकून शेअर बाजारात, म्युच्युअल फंडांत किंवा अन्य वित्तीय साधनांमध्ये पैसे गुंतवायला सुरुवात केली. गुंतवणुकीचा एक मार्ग म्हणून स्थावर मालमत्तेकडे पाहण्यापासून लोकांना परावृत्त करण्याचे प्रयत्न मोदी सरकारने सातत्याने केल्याने प्रत्यक्ष ज्यांना वापर करायचा आहे अशांचा अपवाद वगळता इतरांनी या क्षेत्रात पैसे गुंतविणे जवळजवळ बंद केले. नोटाबंदीपर्यंत शेअर बाजारात जै पेसे गुंतवत नव्हते ते त्यानंतर या मार्गाकडे वळले.

यासाठी एक सूचना अशी करावीशी वाटते ती म्हणजे थेट परकीय गुंतवणुकीचे दरवाजे रिअल इस्टेट उद्योगासाठीही खुले करणे. यात विदेशी नागरिकांना निवासी घरे व जमिनी खरेदी करण्याची मर्यादित काळासाठी मुभा देता येईल. मात्र या काळात त्यांनी खरेदी केलेली रिअल इस्टेट विकण्यावर बंधने घालता येतील. उदा. पहिली सात वर्षे विक्रीवर पूर्ण बंदी व त्यानंतरच्या तीन वर्षांत टप्प्याने विक्रीला मुभा देणे. याने भारताच्या रिअल इस्टेट उद्योगात परकीय पैसा दीर्घ काळासाठी येईल. बांधकाम उद्योग अन्य ३०० लहान-मोठ्या उद्योग व्यवसायांशी निगडित असल्याने याने एकूणच अर्थव्यवस्थेस उभारी येण्यास मदत होईल.संसदेत सादर झालेल्या ताज्या आर्थिक पाहणी अहवालानुसार रिअल इस्टेट आणि बांधकाम व्यवसाय कृषीच्या खालोखाल सर्वाधिक रोजगार देणारे उद्योग आहेत. सन २०१३ मध्ये या उद्योगाने चार कोटीहून अधिक लोकांना रोजगार दिला होता. सन २०१७ मध्ये हा आकडा ५.२ कोटींवर गेला व सन २०२२ पर्यंत तो ६.७ कोटीपर्यंत जाण्याची अंदाज आहे. सन २०१५-१६ मध्ये भारतात झालेल्या एकूण मूल्यवर्धनामध्ये रिअल इस्टेटचा वाटा ७.७ टक्के होता.मागणीला बळकटी देण्यासाठी सुरु असलेल्या बांधकाम प्रकल्पांवरील जीएसटी १८ टक्क्यांवरून पाच ते सहा टक्के असा कमी करणे हाही एक उपाय आहे. हे करताना इन्पुट क्रेडिटची सवलत देऊ नये. याने सरकारचा महसूल फारसा कमी होणार नाही. कारम सध्याही इन्पुट क्रेडिटनंतर प्रत्यक्ष जीएसटीचा बोजा पाच ते सहा टक्के एवढाच होतो.- केतन गोरानीयागुंतवणूक सल्लागार

टॅग्स :Real Estateबांधकाम उद्योग