शहरं
Join us  
Trending Stories
1
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
2
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
3
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
4
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले
5
Crime: विधवा भावजयीच्या प्रेमात पडला जेठ, लग्नासाठी सतत दबाव; नकार देताच अ‍ॅसिड फेकलं!
6
IND vs SA : सलग दोन सेंच्युरीसह 'या' पठ्ठ्यानं वाढवलं गिल-गंभीर जोडीचं टेन्शन; कारण...
7
आधार कार्ड काढायला घराबाहेर पडले ते परतलेच नाहीत; पेट्रोल पंप मालकाचा २ मुलींसह संशयास्पद मृत्यू
8
Hero: ड्युअल डिस्क ब्रेक्स, मल्टीपल राइडिंग मोड्स आणि बरेच काही; हिरो एक्सट्रीम १२५ आर लॉन्च!
9
Dance Bar Raid: उल्हासनगरातील चांदणी लेडीज सर्व्हिस बारवर पोलिसांची धाड, ९ महिलांसह १५ जणांना अटक
10
अरे देवा! मेट्रो स्टेशन तयार झालं पण नंतर कळालं उंचीच कमी, पुढं जे केलं ते पाहून थक्क व्हाल
11
स्टाँग रूमचे CCTV बंद, मध्यरात्री एका पिकअप व्हॅनची एन्ट्री; RJD च्या आरोपानंतर तपासाचे आदेश
12
चीनने वाढवली लष्करी ताकद! तिसरी विमानवाहू युद्धनौका 'फुजियान' तयार, अमेरिकेची चिंता वाढली
13
कोण आहेत गजाला हाशमी? ज्यांनी अमेरिकेत रचला नवा इतिहास; भारताशी थेट कनेक्शन, जाणून घ्या
14
वीज चमकली की सुरू होतं काउंटडाउन!… काय आहे क्रिकेटच्या मैदानात क्वचित लागू होणारा '30:30 नियम'?
15
चॉकलेट की बिस्किट... आरोग्यासाठी जास्त धोकादायक काय? खाण्याआधी एकदा विचार कराच
16
बिहारमध्ये वाढलेल्या मतदानाचा अर्थ काय, कोणता फॅक्टरमुळे वाढलं मतदान? प्रशांत किशोरांनी मांडलं गणित
17
ब्रिस्बेनच्या मैदानात पावसाची बॅटिंग! टीम इंडियानं ऑस्ट्रेलियाविरुद्धची टी-२० मालिका २-१ अशी जिंकली
18
डॉक्टरच्या लॉकरमध्ये मिळाली AK-47 रायफल, जम्मू-काश्मीर पोलीसही चकित; नेमकं प्रकरण काय?
19
"भैया मत करो...", बाईकवर मागे बसलेल्या तरुणीसोबत रॅपिडो चालकाचं धक्कादायक कृत्य
20
आधी ४५ कोटींचे मेट्रो स्टेशन बनवले, नंतर लक्षात आलं की उंची कमी झाली; मग...; हा जुगाड जाणून डोक्यावर हात माराल

'त्या' नेत्यांच्या विखारी प्रचारास निवडणूक आयोगानं घातला लगाम

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2019 05:30 IST

ज्या धोरणांचा स्वीकार राज्यघटनेने तत्त्वज्ञान म्हणून केला आहे, त्याला मानणाऱ्या मायावती आणि न मानणारे योगी आदित्यनाथ यांना जातीय विखारी प्रचार करण्यापासून रोखण्यासाठी संपूर्ण निवडणुकीसाठीच प्रचारबंदी करायला हवी.

ज्या धोरणांचा स्वीकार राज्यघटनेने तत्त्वज्ञान म्हणून केला आहे, त्याला मानणाऱ्या मायावती आणि न मानणारे योगी आदित्यनाथ यांना जातीय विखारी प्रचार करण्यापासून रोखण्यासाठी संपूर्ण निवडणुकीसाठीच प्रचारबंदी करायला हवी.सतराव्या लोकसभेची निवडणूक अटीतटीची होणार आहे. त्यासाठी प्रचाराची जोरदार मोहीम चालू असताना, काही नेते प्रचाराची पातळी सोडून भारतीय राज्यघटनेला अपेक्षित समाजवास्तवाला तडा जाईल, अशी वक्तव्ये करीत आहेत. त्यांना निवडणूक आयोगाने प्रचारास बंदी घालून लगाम लावला आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि बहुजन समाज पक्षाच्या प्रमुख मायावती यांना अनुक्रमे तीन आणि दोन दिवस प्रचारास बंदी घातली आहे. निवडणुकीची आचारसंहिता पाळण्याची सक्ती असताना, तिला पायदळी तुडविण्याच्या घटना अनेक वेळा घडत होत्या. त्यावर निवडणूक आयोग कारवाईची प्रक्रिया करीत होते. मात्र एखाद्या स्टार प्रचारकास प्रचारासच बंदी घालण्याचे पाऊल कधी उचलले नव्हते. उत्तर प्रदेशसारख्या सर्वात मोठ्या राज्याचे मुख्यमंत्रीपद सांभाळणाºया व्यक्तीच्या तोंडची भाषा ही समाजद्रोहाचीच आहे. मेरठमध्ये एका सभेत बोलताना त्यांनी मुस्लीम समाजाचा उल्लेख ‘हिरवा विषाणू’ असा केला होता. अलीला नव्हे, तर बजरंग बलीला मतदान करण्याचेही आवाहन केले होते.

भारतीय राज्यघटनेनुसार निवडणूक आचारसंहितेच्या विरोधात ही वक्तव्ये आहेत. समाजाची एकात्मता राहावी, ती राखण्याची जबाबदारी ज्यांच्यावर आहे, अशा वरिष्ठ पदावर बसलेल्या व्यक्तीने अशी भूमिका मांडावी, हा समाजद्रोह आहे. ते केवळ आपल्या धर्माचे बांधव नाहीत, म्हणून त्यांना विषाणू म्हणणे हा किती विखारी प्रचार आहे! वास्तविक अशा व्यक्तीला मुख्यमंत्रीपदावर राहण्याचाही अधिकार नाही. मायावती यांनी सहारनपूरमध्ये बोलताना, मुस्लीम समाजाच्या मतदारांनी मुस्लीम उमेदवारासच मतदान करण्याचे आवाहन केले होते. त्यांचे हे आवाहन भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे अनुयायी म्हणवून घेणाºयासही शोभत नाही. वंचित, उपेक्षित, दलित-पददलितांच्या उन्नतीचे राजकारण करणे आणि केवळ सत्तेवर येण्यासाठी ठरावीक धर्माच्या मतदारांनी एका ठरावीक धर्माच्या उमेदवारासच मतदान करा, असे आवाहन करणे, हे समाजद्रोहाचे आहे. खरे तर या दोघांनाही निवडणूक आयोगाने केवळ दोन-तीन दिवसांसाठी प्रचारावर बंदी न घालता, या संपूर्ण निवडणूक प्रक्रियेपासूनच बाहेर काढायला हवे होते. ही बंदी काही दिवसांसाठी असली तरी, तिचे स्वागत करायला हवे.

जाती-धर्माच्या आधारे मते मागण्याचे, सांस्कृतिक राष्ट्रवादाच्या आडून हिंदुत्वाच्या किंवा धर्मनिरपेक्षतेच्या नावावर मते मागण्याचे राजकारण हे घातक आहे. प्रत्येक भारतीय नागरिकाच्या विकासाचे मॉडेल काय असू शकेल, याची चर्चा करणे आवश्यक आहे. ज्या धोरणांचा स्वीकार भारतीय राज्यघटनेने एक तत्त्वज्ञान म्हणून केला आहे, त्याला मानणाºया बहुजनवादी मायावती आणि न मानणारे योगी आदित्यनाथ यांची भाषा एकसुरीच आहे. जातीय विखारी प्रचार करण्यापासून रोखण्यासाठी, या दोघांना संपूर्ण निवडणुकीसाठीच बंदी करायला हवी. समाजवादी पक्षाचे नेते आझम खान यांनी अभिनेत्री जयाप्रदा यांच्यावर टीका करताना असभ्य भाषेचा वापर केला होता. ही विरोधी पक्षांच्या उमेदवारावरील टीका नव्हती, तर लिंगभेदावर आधारित स्त्रीत्वाचा अपमानही करणारी होती. समाजवादी जनआंदोलनाचे जनक डॉ. राम मनोहर लोहिया यांच्या विचाराचे पाईक म्हणून मिरविणाºया समाजवादी पक्षाने अशा वाचाळवीराला घरी बसविले पाहिजे. आझम खान यांनी घमेंडखोरीची भाषा पहिल्यांदाच केलेली नाही. त्यांनी अनेक वेळा समाजशांततेला तडा जाईल, अशी वक्तव्ये केली आहेत. त्यांच्यावरही बंदी घालणे आवश्यक आहे. देशाचे प्रमुख नरेंद्र मोदी यांची भाषा विद्वेषाची आहे. काश्मीर किंवा राष्ट्रवादाच्या आडून त्यांनीही समाजाच्या धार्मिक ध्रुवीकरणाची भूमिकाच घेतली आहे. ज्यांच्यावर देश चालविण्याची जबाबदारी मतदारांनी टाकली होती, त्यांची ही भाषा असेल तर भारतीय लोकशाहीचे संरक्षण कोण करणार? यासाठी निवडणूक आयोगाच्या आदेशाचे स्वागत करून समाजहितासाठी बळ दिले पाहिजे. या बंदीला आव्हान देणारी मायावती यांची याचिका फेटाळताना सर्वोच्च न्यायालयानेही निवडणूक आयोगाच्या या कारवाईची प्रशंसा केली आहे. विखारी प्रचार करणाऱ्यांना हा आणखी एक ‘सर्वोच्च’ दणका आहे.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकUttar Pradesh Lok Sabha Election 2019उत्तरा प्रदेश लोकसभा निवडणूक 2019mayawatiमायावतीyogi adityanathयोगी आदित्यनाथ