शहरं
Join us  
Trending Stories
1
सौदी अरेबियात भीषण अपघात, ४२ भारतीयांचा मृत्यू; प्रवासी बस डिझेल टँकरला धडकली, आगीचा उडाला भडका
2
काँगोमधील तांब्याच्या खाणीत मोठी दुर्घटना; पूल कोसळून ३२ जणांचा मृत्यू, अनेक जण अजूनही बेपत्ता
3
भारताचा अमेरिकेसोबत ऐतिहासिक LPG करार; घरगुती गॅस सिलिंदरची किंमत कमी होणार?
4
Delhi Blast : दिल्ली स्फोटातील डॉ. शाहीनच्या कोट्यवधींच्या फंडिंगबाबत धक्कादायक खुलासा, ATS-NIA चे छापे
5
टॅक्स भरणे झाले सोपे! बँक, नेट बँकिंगचा झंझट नाही; आता UPI ॲपद्वारे मिनिटांत भरा प्राप्तीकर
6
पालघर साधू हत्याकांडात आरोप केले, त्यालाच पक्षात घेतले? चौफेर टीका होताच भाजपानं दिलं असं स्पष्टीकरण
7
देवेंद्र फडणवीसांना भेटला, सत्कार करून घेतला; पंतप्रधान कार्यालयात सचिव म्हणणारा निघाला...
8
नोकरीच्या शोधात असलेल्यांसाठी सुवर्णसंधी! ९०% कंपन्या 'या' पदावर प्रोफेशनल्सची करणार भरती
9
देवेंद्र फडणवीसांचं 'धक्कातंत्र'! उद्धव ठाकरेंसह आदित्य ठाकरेंवर पुन्हा सोपवली जबाबदारी
10
टीम इंडिया ९३ धावांवर 'ऑलआउट', दुसरीकडे करुण नायरने एकट्याने केल्या त्यापेक्षा जास्त धावा
11
अजय देवगणपेक्षाही खतरनाक! विकी कौशलच्या 'तौबा तौबा' गाण्यावर काजोलने केला डान्स, सर्वांची हसून पुरेवाट
12
पुण्यातील या नगर परिषदेत ठाकरे आणि शिंदे गट एकत्र, नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराला पाठिंबा
13
"इंडस्ट्रीत पदार्पण मिळू शकते, पण...", करीना कपूर बॉलिवूडमधील नेपोटिझ्मबद्दल स्पष्टच बोलली
14
पाक विरुद्धच्या पराभवानंतर भारतीय संघासाठी कसे असेल Asia Cup स्पर्धेतील सेमीच समीकरण?
15
जे शिंदेंना मिळालं नाही ते नितीश कुमारांना मिळणार; बिहारमध्ये पुन्हा CM पद, फॉर्म्युला ठरला
16
भ्रष्टाचाराचं Live प्रेझेंटेशन... तरुणाचा महापौरांसमोरच कॉल, अधिकाऱ्यांच्या 'रेट लिस्ट'चा पर्दाफाश
17
ट्रम्प यांचा यु-टर्न! अमेरिकेच्या 'या' निर्णयानं भारताला होणार २६ हजार कोटींचा फायदा, 'यांना' मिळणार मोठा लाभ
18
सौदीचे प्रिन्स ७ वर्षानंतर अमेरिका दौऱ्यावर, ट्रम्प यांचा आनंद गगनात मावेना, कारणही आहे खास
19
Stock Market: किरकोळ तेजीसह शेअर बाजाराच्या कामकाजाला सुरुवात; सेन्सेक्समध्ये १०० अंकांची तेजी, निफ्टी २५,९०० च्या वर
20
Chandrayaan 4: भारत चंद्रावर जाणार; तेथील नमुने पृथ्वीवर आणणार, चांद्रयान-४ मोहिमेला सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्रातील शिक्षणाचा आधारवड

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2018 06:39 IST

दहा वर्षांच्या काळात त्यांनी घेतलेले निर्णय दूरगामी परिणाम करणारे ठरले.

- हेरंब कुलकर्णीमाजी पंतप्रधान नरसिंहराव आणि राज्यातील अनेक माजी मुख्यमंत्री ज्यांना आदर देत होते, असा एक शिक्षक या महाराष्ट्रात होता. शिक्षक हृदयाचा अधिकारी. महाराष्ट्रातील आज गती घेतलेल्या शिक्षणाला ज्यांनी वळण दिले, त्यातील प्रमुख नाव सरांचे आहे. अनेकांना संचालक म्हणजे वि. वि. चिपळूणकर असेच आजही वाटते. त्या काळात आजच्यासारखे प्रत्येक विभागाला संचालक नव्हते, सचिवमहात्म्य इतके वाढले नव्हते. त्यामुळे शिक्षणमंत्र्यांखालोखाल शिक्षण संचालकच सर्व निर्णय घेत. आज अधिकारी सामान्य शिक्षक विद्यार्थ्यांना माहीत नाहीत, कारण भेटी खूप कमी होतात. सर त्या काळात दुर्गम असलेल्या महाराष्ट्रात गावोगाव फिरले. अनेक खेड्यांत रात्री मुक्काम केला. रात्री पारावर पालकसभा घेऊन शिक्षणाचे महत्त्व निरक्षर पालकांना समजावून सांगितले. ही तळमळ होती. डहाणू तालुक्यातील ग्राममंगल संस्थेने काढलेल्या बालवाड्या बघायला डोक्यावर टॉवेल गुंडाळून ते पानसे सरांसोबत पायी डोंगरात फिरले. हा माणूस अधिकारी होता की, समाजसेवक असा प्रश्न पडतो.दहा वर्षांच्या काळात त्यांनी घेतलेले निर्णय दूरगामी परिणाम करणारे ठरले. ग्रामीण भागातील गुणवत्ता शोधणारी विद्यानिकेतन त्यांनी मधुकरराव चौधरीसोबत स्थापन केली. त्यातील बुद्धिमान मुले ही त्या घरातली शिकणारी पहिली पिढी होती. त्यातून शिकलेली मुले पुढे जीवनाच्या किती क्षेत्रात पुढे आली, हा खरेच सर्वेक्षण करण्याचा कौतुकाचा विषय आहे. विद्यानिकेतनच्या धर्तीवर जवाहर नवोदय योजना ही नंतर खूप वर्षांनी आली हे या योजनेचे द्रष्टेपण होते.‘वंचितांचे शिक्षण’ हा त्यांच्या आस्थेचा विषय होता. जे. पी. नाईक यांनी शाळाबाह्य मुलांसाठी अनौपचारिक शिक्षणाची कल्पना मांडली. त्या कल्पनेची प्रभावी अंमलबजावणी सरांनी महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्यात प्रभावीपणे केली. त्यातून हजारो मुले मुख्य प्रवाहात आली. मुलींच्या शिक्षणाला गती देण्यासाठी सावित्रीबाई फुले याच प्रेरणादायी असू शकतात हे ओळखून, त्यांनी नायगावला सावित्रीबाई जन्मदिन कार्यक्रम तर सुरू केलाच, पण गरीब कुटुंबातील मुलींना आर्थिक मदत देणारी सावित्रीबाई फुले दत्तक योजना सुरू केली. त्यातून हजारो मुली शिकल्या. रात्रशाळा बंद करण्याचा प्रयत्न होताच ते आक्रमक झाले, यात बालकामगारांची काळजी होती. पहिली, दुसरीला नापास करू नका, या आदेशामागे डोळ्यासमोर खेड्यात शिकणारी बहुजनाची पहिली पिढी होती. वंचितांच्या शिक्षणाबाबत ही त्यांची कणव होती. कागदी कामात अधिकारी म्हणून हरवून न जाता, हा माणूस महाराष्ट्राच्या खेड्यापाड्यांत फिरून अधिकारी, शिक्षक आणि गावकरी या जिवंत माणसांशी बोलत फिरला. फोन किंवा वीज चांगले रस्ते नसताना बहुजनांना शिक्षण मिळावे, यासाठी तळतळ करणाऱ्या महात्मा फुले, कर्मवीर भाऊराव पाटील, जे. पी. नाईक यांचे स्वप्न तो साकार करीत होता आणि अंत:करणात साने गुरुजींची प्रेमाची भाषा होती.आज स्पर्धा परीक्षेतून आलेले तरुण अधिकारी झाले आहेत, त्यांना तंत्रज्ञान समजते. अतिशय वेगाने ते माहितीची जुळवाजुळव करतात, पण चिपळूणकर सरांची तळमळ आणि कणव कोणत्या वेबसाइटवरून डाउनलोड करायची, हा प्रश्न आहे. सरांची तळमळ अधिकारी आणि शिक्षकांत संक्रमित करणे हेच आजच्या शैक्षणिक प्रश्नाला उत्तर आहे.(लेखक शिक्षण चळवळीतील कार्यकर्ते आहेत)

टॅग्स :Educationशिक्षणEducation Sectorशिक्षण क्षेत्र