शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
2
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
3
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
4
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
5
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
6
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
7
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
8
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
9
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
10
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?
11
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
12
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
13
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
14
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
15
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
16
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
17
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
18
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
19
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
20
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला

महाराष्ट्रातील शिक्षणाचा आधारवड

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2018 06:39 IST

दहा वर्षांच्या काळात त्यांनी घेतलेले निर्णय दूरगामी परिणाम करणारे ठरले.

- हेरंब कुलकर्णीमाजी पंतप्रधान नरसिंहराव आणि राज्यातील अनेक माजी मुख्यमंत्री ज्यांना आदर देत होते, असा एक शिक्षक या महाराष्ट्रात होता. शिक्षक हृदयाचा अधिकारी. महाराष्ट्रातील आज गती घेतलेल्या शिक्षणाला ज्यांनी वळण दिले, त्यातील प्रमुख नाव सरांचे आहे. अनेकांना संचालक म्हणजे वि. वि. चिपळूणकर असेच आजही वाटते. त्या काळात आजच्यासारखे प्रत्येक विभागाला संचालक नव्हते, सचिवमहात्म्य इतके वाढले नव्हते. त्यामुळे शिक्षणमंत्र्यांखालोखाल शिक्षण संचालकच सर्व निर्णय घेत. आज अधिकारी सामान्य शिक्षक विद्यार्थ्यांना माहीत नाहीत, कारण भेटी खूप कमी होतात. सर त्या काळात दुर्गम असलेल्या महाराष्ट्रात गावोगाव फिरले. अनेक खेड्यांत रात्री मुक्काम केला. रात्री पारावर पालकसभा घेऊन शिक्षणाचे महत्त्व निरक्षर पालकांना समजावून सांगितले. ही तळमळ होती. डहाणू तालुक्यातील ग्राममंगल संस्थेने काढलेल्या बालवाड्या बघायला डोक्यावर टॉवेल गुंडाळून ते पानसे सरांसोबत पायी डोंगरात फिरले. हा माणूस अधिकारी होता की, समाजसेवक असा प्रश्न पडतो.दहा वर्षांच्या काळात त्यांनी घेतलेले निर्णय दूरगामी परिणाम करणारे ठरले. ग्रामीण भागातील गुणवत्ता शोधणारी विद्यानिकेतन त्यांनी मधुकरराव चौधरीसोबत स्थापन केली. त्यातील बुद्धिमान मुले ही त्या घरातली शिकणारी पहिली पिढी होती. त्यातून शिकलेली मुले पुढे जीवनाच्या किती क्षेत्रात पुढे आली, हा खरेच सर्वेक्षण करण्याचा कौतुकाचा विषय आहे. विद्यानिकेतनच्या धर्तीवर जवाहर नवोदय योजना ही नंतर खूप वर्षांनी आली हे या योजनेचे द्रष्टेपण होते.‘वंचितांचे शिक्षण’ हा त्यांच्या आस्थेचा विषय होता. जे. पी. नाईक यांनी शाळाबाह्य मुलांसाठी अनौपचारिक शिक्षणाची कल्पना मांडली. त्या कल्पनेची प्रभावी अंमलबजावणी सरांनी महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्यात प्रभावीपणे केली. त्यातून हजारो मुले मुख्य प्रवाहात आली. मुलींच्या शिक्षणाला गती देण्यासाठी सावित्रीबाई फुले याच प्रेरणादायी असू शकतात हे ओळखून, त्यांनी नायगावला सावित्रीबाई जन्मदिन कार्यक्रम तर सुरू केलाच, पण गरीब कुटुंबातील मुलींना आर्थिक मदत देणारी सावित्रीबाई फुले दत्तक योजना सुरू केली. त्यातून हजारो मुली शिकल्या. रात्रशाळा बंद करण्याचा प्रयत्न होताच ते आक्रमक झाले, यात बालकामगारांची काळजी होती. पहिली, दुसरीला नापास करू नका, या आदेशामागे डोळ्यासमोर खेड्यात शिकणारी बहुजनाची पहिली पिढी होती. वंचितांच्या शिक्षणाबाबत ही त्यांची कणव होती. कागदी कामात अधिकारी म्हणून हरवून न जाता, हा माणूस महाराष्ट्राच्या खेड्यापाड्यांत फिरून अधिकारी, शिक्षक आणि गावकरी या जिवंत माणसांशी बोलत फिरला. फोन किंवा वीज चांगले रस्ते नसताना बहुजनांना शिक्षण मिळावे, यासाठी तळतळ करणाऱ्या महात्मा फुले, कर्मवीर भाऊराव पाटील, जे. पी. नाईक यांचे स्वप्न तो साकार करीत होता आणि अंत:करणात साने गुरुजींची प्रेमाची भाषा होती.आज स्पर्धा परीक्षेतून आलेले तरुण अधिकारी झाले आहेत, त्यांना तंत्रज्ञान समजते. अतिशय वेगाने ते माहितीची जुळवाजुळव करतात, पण चिपळूणकर सरांची तळमळ आणि कणव कोणत्या वेबसाइटवरून डाउनलोड करायची, हा प्रश्न आहे. सरांची तळमळ अधिकारी आणि शिक्षकांत संक्रमित करणे हेच आजच्या शैक्षणिक प्रश्नाला उत्तर आहे.(लेखक शिक्षण चळवळीतील कार्यकर्ते आहेत)

टॅग्स :Educationशिक्षणEducation Sectorशिक्षण क्षेत्र