शहरं
Join us  
Trending Stories
1
'टॅरिफ'नंतर ट्रम्प यांचा नवा फतवा! भारतीयांसाठी 'अमेरिकन ड्रीम' महागणार! Visa साठी भरावे लागणार ₹८८ लाख
2
IND-Pak हँडशेकवरून लढत राहिले; तिकडे या संघाचा कप्तान भारतीय वंशाचा, अर्धे खेळाडू पाकिस्तानी वंशाचे निघाले
3
मारुतीनंतर महिंद्राचे GST रेट आले...! स्कॉर्पिओ एनपेक्षा XUV 700 स्वस्त झाली, बोलेरो निओ तर...
4
हृदयद्रावक! जुळ्या मुलांनी आईला मारलेली मिठी; ढिगाऱ्याखालील मृतदेह पाहून अख्खं गाव रडलं
5
VIRAL : सलाम तिच्या हिमतीला! 'मौत का कुआं'मध्ये बाईक चालवणाऱ्या तरुणीचा व्हिडीओ पाहून अंगावर काटा येईल
6
VIDEO: हार्दिक पांड्याने सीमारेषेवर धावत-पळत, कसरत करत घेतला भन्नाट झेल, पाहणारेही थक्क
7
भारत टेन्शन फ्री... ४ वर्षात जे झालं नव्हतं ते आता झालं, 'हा' कोणता साठा आता जमा झाला?
8
"त्या २४८ शेतकऱ्यांना तीन महिन्यांत कर्जमाफी द्या", उच्च न्यायालयाने राज्य सरकारला झापले, आदेश काय?
9
घरची गरिबी, टोमणे सहन केले, पण मानली नाही हार, बनली बॉक्सिंगमध्ये वर्ल्ड चॅम्पियन, कोण आहे मीनाक्षी हुड्डा
10
हसत हसतच पाण्याच उतरलेला, क्षणात होत्याचं नव्हतं झालं; जुबीन गर्गचा शेवटचा Video व्हायरल
11
Zero GST Product List: सोमवारपासून या वस्तू '0' जीएसटीत येणार, तुम्ही पाहिल्यात का? 
12
Akshay Kumar : सातवीत नापास झाला होता अभिनेता अक्षय कुमार; लहानपणी पाहिलेलं 'हे' स्वप्न
13
Road Rage Case: ट्रक चालकाचे अपहरण; पूजा खेडकरच्या वडिलांच्या ड्रायव्हरला अटक, आई- वडील फरार
14
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शाह यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
15
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
16
सूर्य ग्रहण २०२५: चंद्रग्रहणात केला तोच उपाय सूर्यग्रहणातही, साठवणीच्या अन्न-पाण्यावर ठेवा तुळशीचे पान 
17
२२ दिवसांपासून बेपत्ता, शोधूनही सापडेना! नेमकी कुठे गेली साक्षी? आईने केले गंभीर आरोप
18
असा पैसा काय कामाचा? "मी कामावर जाण्यापूर्वी रोज रडते"; ४० लाख पगार, पण समाधान नाही
19
भारताविरुद्ध युद्ध झाल्यास 'हा' देश देणार पाकिस्तानला साथ? संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ म्हणाले...
20
प्रिया मराठेच्या निधनानंतर पती शंतनू मोघेची पहिली प्रतिक्रिया; म्हणाला, "मधल्या काळात..."

विशेष लेख: अकरावी प्रवेशात शिक्षण विभाग नापास!

By सीमा महांगडे | Updated: June 16, 2025 07:59 IST

दहावीचा टप्पा पार करून करिअरच्या स्वप्नांकडे झेप घेण्याचा मार्ग म्हणजेच अकरावी प्रवेश.

सीमा महांगडे,प्रतिनिधी: दहावीचा टप्पा पार करून करिअरच्या स्वप्नांकडे झेप घेण्याचा मार्ग म्हणजेच अकरावी प्रवेश. मात्र, प्रवेश प्रक्रिया राबवणारी शिक्षण विभागाची सुस्त आणि नादुरुस्त यंत्रणा पालक-विद्यार्थ्यांच्या डोक्याला ताप देत आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेत तांत्रिक अडचणी आहेतच. शिवाय अल्पसंख्याक कोटा आणि अंतर्गत कोट्याबाबत शिक्षण संचालनालयाने आयत्यावेळी घेतलेल्या निर्णयांनी विद्यार्थ्यांना वेठीस धरले आहे. अल्पसंख्याक संस्थांमध्ये सामाजिक आरक्षण लागू करण्याचा निर्णय यापूर्वीही मागे घ्यावा लागल्याचा अनुभव असताना पुन्हा प्रवेश प्रक्रिया न्यायालयीन प्रकरणात अडकली आहे. त्यामुळे दहावीचा निकाल लवकर लागला असला तरी अकरावी प्रवेश सुकर होतील, अशी परिस्थिती नाही.  

 राज्याचा शिक्षण विभाग दरवर्षी आपल्या नियोजन शून्यतेची प्रचिती देतो. नियोजनात हा विभाग दरवर्षी नापास का होतो, अपयशी का ठरतो, असा प्रश्न आहे. मुळातच यंदा अकरावी प्रवेश प्रक्रिया राज्यभरात ऑनलाईन राबविण्याचा निर्णय आयत्यावेळी घेण्यात आला. मात्र, त्यातील तांत्रिक अडचणींची शिक्षण उपसंचालक कार्यालयातील अधिकाऱ्यांनाच माहिती नसल्याने विद्यार्थ्यांसह पालकांना मानसिक त्रासाला सामोरे जावे लागले.   

वेबसाइट बंद पडणे, प्रवेशाच्या वेळापत्रकात पुन्हा पुन्हा बदल करणे आदी अडचणींचे विद्यार्थ्यांमागील शुक्लकाष्ट कायम आहे. त्यामुळे याही वर्षी अकरावीचे वर्ग उशिरा सुरू होण्याची लक्षणे आहेत. या उशिरामुळे होणारे शैक्षणिक नुकसान कोण भरून काढणार?  प्रवेशात सध्या फक्त तारीख पे तारीख प्रकार सुरू आहे. अर्ज भरण्यापासून ते यादी जाहीर होईपर्यंत फक्त नवीन तारखांचे वेळापत्रक दिले जात आहे. मग राज्यभक एकाच वेळी  ऑनलाइन प्रवेश हा निर्णय घेताना सेवा देणाऱ्या कंपन्यांना तांत्रिक अडचणी किंवा येणाऱ्या भाराची कल्पना नव्हती का?, किंबहुना शिक्षण विभागाने याची चाचपणी आधीच का केली नाही?, जर नियोजन नसताना प्रवेश प्रक्रियेला सुरुवात केली असेल, तर शिक्षण विभागाच्या ‘शिक्षणा’वरच प्रश्नचिन्ह उपस्थित होते.   प्रवेशाच्या अनेक फेऱ्या होऊनही महाविद्यालयांमध्ये हजारोंच्या संख्येने जागा रिक्त राहणे आणि दुसरीकडे विद्यार्थी महाविद्यालयीन प्रवेशापासून वंचित राहणे, हा विरोधाभास अनाकलनीय आहे. विशेष म्हणजे असा विरोधाभास का निर्माण होतो ते शोधण्याची तसदीही शिक्षण प्रशासनातला कुणी तज्ज्ञ घेताना दिसत नाही.  

शेवटी काय, दरवर्षी प्रवेश प्रक्रिया राबवूनही येरे माझ्या मागल्या घडत असेल आणि अकरावी प्रवेशासाठी एक फूलप्रूफ, अचूक व्यवस्था शिक्षण विभाग निर्माण करू शकत नसेल तर याबाबत आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. नाहीतर सब चलता हैं च्या नावाखाली सुरू झालेली अकरावी प्रवेशाची ही ढकलगाडी पुढे जाऊन वर्षभर चालली आणि विद्यार्थ्यांनी अकरावी ऐवजी इतर वाटा निवडल्या तर नवल वाटायला नको!

टॅग्स :Educationशिक्षणMaharashtraमहाराष्ट्र