शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
2
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
3
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
4
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
5
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
6
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
7
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
8
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
9
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
10
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
11
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
12
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
13
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
14
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
15
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
16
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
17
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
18
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
19
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
20
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन

विशेष लेख: अकरावी प्रवेशात शिक्षण विभाग नापास!

By सीमा महांगडे | Updated: June 16, 2025 07:59 IST

दहावीचा टप्पा पार करून करिअरच्या स्वप्नांकडे झेप घेण्याचा मार्ग म्हणजेच अकरावी प्रवेश.

सीमा महांगडे,प्रतिनिधी: दहावीचा टप्पा पार करून करिअरच्या स्वप्नांकडे झेप घेण्याचा मार्ग म्हणजेच अकरावी प्रवेश. मात्र, प्रवेश प्रक्रिया राबवणारी शिक्षण विभागाची सुस्त आणि नादुरुस्त यंत्रणा पालक-विद्यार्थ्यांच्या डोक्याला ताप देत आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेत तांत्रिक अडचणी आहेतच. शिवाय अल्पसंख्याक कोटा आणि अंतर्गत कोट्याबाबत शिक्षण संचालनालयाने आयत्यावेळी घेतलेल्या निर्णयांनी विद्यार्थ्यांना वेठीस धरले आहे. अल्पसंख्याक संस्थांमध्ये सामाजिक आरक्षण लागू करण्याचा निर्णय यापूर्वीही मागे घ्यावा लागल्याचा अनुभव असताना पुन्हा प्रवेश प्रक्रिया न्यायालयीन प्रकरणात अडकली आहे. त्यामुळे दहावीचा निकाल लवकर लागला असला तरी अकरावी प्रवेश सुकर होतील, अशी परिस्थिती नाही.  

 राज्याचा शिक्षण विभाग दरवर्षी आपल्या नियोजन शून्यतेची प्रचिती देतो. नियोजनात हा विभाग दरवर्षी नापास का होतो, अपयशी का ठरतो, असा प्रश्न आहे. मुळातच यंदा अकरावी प्रवेश प्रक्रिया राज्यभरात ऑनलाईन राबविण्याचा निर्णय आयत्यावेळी घेण्यात आला. मात्र, त्यातील तांत्रिक अडचणींची शिक्षण उपसंचालक कार्यालयातील अधिकाऱ्यांनाच माहिती नसल्याने विद्यार्थ्यांसह पालकांना मानसिक त्रासाला सामोरे जावे लागले.   

वेबसाइट बंद पडणे, प्रवेशाच्या वेळापत्रकात पुन्हा पुन्हा बदल करणे आदी अडचणींचे विद्यार्थ्यांमागील शुक्लकाष्ट कायम आहे. त्यामुळे याही वर्षी अकरावीचे वर्ग उशिरा सुरू होण्याची लक्षणे आहेत. या उशिरामुळे होणारे शैक्षणिक नुकसान कोण भरून काढणार?  प्रवेशात सध्या फक्त तारीख पे तारीख प्रकार सुरू आहे. अर्ज भरण्यापासून ते यादी जाहीर होईपर्यंत फक्त नवीन तारखांचे वेळापत्रक दिले जात आहे. मग राज्यभक एकाच वेळी  ऑनलाइन प्रवेश हा निर्णय घेताना सेवा देणाऱ्या कंपन्यांना तांत्रिक अडचणी किंवा येणाऱ्या भाराची कल्पना नव्हती का?, किंबहुना शिक्षण विभागाने याची चाचपणी आधीच का केली नाही?, जर नियोजन नसताना प्रवेश प्रक्रियेला सुरुवात केली असेल, तर शिक्षण विभागाच्या ‘शिक्षणा’वरच प्रश्नचिन्ह उपस्थित होते.   प्रवेशाच्या अनेक फेऱ्या होऊनही महाविद्यालयांमध्ये हजारोंच्या संख्येने जागा रिक्त राहणे आणि दुसरीकडे विद्यार्थी महाविद्यालयीन प्रवेशापासून वंचित राहणे, हा विरोधाभास अनाकलनीय आहे. विशेष म्हणजे असा विरोधाभास का निर्माण होतो ते शोधण्याची तसदीही शिक्षण प्रशासनातला कुणी तज्ज्ञ घेताना दिसत नाही.  

शेवटी काय, दरवर्षी प्रवेश प्रक्रिया राबवूनही येरे माझ्या मागल्या घडत असेल आणि अकरावी प्रवेशासाठी एक फूलप्रूफ, अचूक व्यवस्था शिक्षण विभाग निर्माण करू शकत नसेल तर याबाबत आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. नाहीतर सब चलता हैं च्या नावाखाली सुरू झालेली अकरावी प्रवेशाची ही ढकलगाडी पुढे जाऊन वर्षभर चालली आणि विद्यार्थ्यांनी अकरावी ऐवजी इतर वाटा निवडल्या तर नवल वाटायला नको!

टॅग्स :Educationशिक्षणMaharashtraमहाराष्ट्र