शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले
2
राजाच्या हत्येनंतर आणखी एक टार्गेट, ज्याची हत्या करणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहचा नवा खुलासा
3
Air India Plane Crash: बोइंग विमानांचे ६ हजाराहून अधिक अपघात, तरीही १५० देश का खरेदी करतात?; इंजिनिअरचा खुलासा
4
बोइंगने घेतलेले शॉर्टकट पडले महागात, ड्रीमलाइनरवरील संशय वाढला; अमेरिकी माध्यमांत होतेय कंपनीच्या त्रुटींवर चर्चा; यापूर्वी देण्यात आले होते चौकशीचे आदेश
5
आमची मुलगी सोनमपेक्षा कमी नाही! जावयाच्या जीवाची भीती व्यक्त करत आईनेच गाठलं पोलीस स्टेशन! म्हणाली... 
6
Ahmedabad Plane Crash: त्यावेळी नेमकं काय घडलं असावं?
7
Gold Price 13 June: १ लाखांच्या पार पोहोचला सोन्याचा दर; Israel-Iran संघर्षामुळे वाढल्या किंमती, पाहा लेटेस्ट रेट्स
8
Viral Video: समुद्रकिनाऱ्यावर तरुणी काढत होती सेल्फी, तितक्यात मोठी लाट आली अन्...; व्हिडीओ व्हायरल
9
Accident: अग्निशामक दलाच्या गाडीने सहा जणांना चिरडले, बाप-लेकासह तिघे जागीच ठार, लेक वाचली
10
सांगलीतील लाच प्रकरणी आयएएस अधिकारी शुभम गुप्तांच्या अडचणी वाढल्या; आणखी कारनामे उघडकीस
11
एअर इंडियाच्या विमानाला अपघात का झाला? कारण ६ महिन्यांनी कळणार
12
WTC मध्ये राडा! हाताने चेंडूने जमिनीवर टाकला तरीही फलंदाज नाबाद; ऑस्ट्रेलिया टीम हैराण, नियम काय?
13
Air India Flight Emergency Landing : Air India च्या विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी; 156 प्रवाशांचा जीव टांगणीला
14
पुण्याला मुसळधार पावसाने झोडपले; सिंहगड रोडवरील नाल्यात ज्येष्ठ महिला वाहून गेली
15
Israel Attack Iran: इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे लष्करप्रमुख हुसैन सलामी ठार, दोन अणुशास्त्रज्ञांचाही मृत्यू 
16
तीन लग्न, ४ मुलं, करिश्मा कपूरच्या एक्स पती किती होता श्रीमंत?, मागे सोडली इतकी संपत्ती
17
विमान, वेग अन् विनाश : हे आहेत जगभरातील आतापर्यंतचे सर्वात मोठे विमान अपघात
18
"५ सेकंद सर्व थांबले, हिरवी लाईट सुरु झाली अन्..."; रमेश विश्वासकुमारने सांगितले टेकऑफ नंतर काय घडलं
19
Nandita Mahtani : रणबीर कपूरला केलं डेट, विराट कोहलीशीही कनेक्शन; संजय कपूरची पहिली पत्नी कोण?
20
अहमदाबाद प्लेन क्रॅशनंतर, व्हायरल होतेय या ज्योतिषाची भविष्यवाणी, मोठ्या नेत्याच्या मृत्यूचाही होता उल्लेख

शिक्षण आणि आरोग्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2018 00:08 IST

​​​​​​​शिक्षण आणि आरोग्य हे मानवाचा विकास तसेच समाजाची गुणवत्ता यांचे सर्वात मोठे बोधचिन्ह आहे. शिक्षण जितके प्रगत होईल आणि समाजातील प्रत्येक व्यक्तीपर्यंत जेवढ्या सहजपणे पोहोचेल, तो समाज तेवढाच प्रगत आणि विकसित बनेल. याचप्रकारे मानवाचे आरोग्य जेवढे चांगले राहिले, तेवढेच मानवाचे वैयिक्तक आणि सामाजिक जीवन सुखमय आणि दृढ होईल.

- डॉ.भूषण कुमार उपाध्याय शिक्षण आणि आरोग्य हे मानवाचा विकास तसेच समाजाची गुणवत्ता यांचे सर्वात मोठे बोधचिन्ह आहे. शिक्षण जितके प्रगत होईल आणि समाजातील प्रत्येक व्यक्तीपर्यंत जेवढ्या सहजपणे पोहोचेल, तो समाज तेवढाच प्रगत आणि विकसित बनेल. याचप्रकारे मानवाचे आरोग्य जेवढे चांगले राहिले, तेवढेच मानवाचे वैयिक्तक आणि सामाजिक जीवन सुखमय आणि दृढ होईल.शिक्षण आणि आरोग्याच्या या अनन्यसाधारण महत्त्वाला समजून भारतीय संस्कृतीमध्ये या दोन्ही बाबींवर फार खोलवर जाऊन विचार केलेला आहे. शिक्षण हे ज्ञानाचे माध्यम आहे. ज्ञान ही मानवाची वैचारिक आणि बौध्दिक क्षमता आहे ज्यामुळे मानव चांगल्या किंवा वाईट या बाबी ओळखू शकतो. श्रीमद्भगवद्गीतेमध्ये म्हटले आहे- ‘नहि ज्ञानेन सदृशं पवित्रमिह विद्यते’. याचाच अर्थ या सृष्टीमध्ये ज्ञानासारखे पवित्र काहीही नाही. या ज्ञानामुळेच मानव लौकिक किंवा पारलौकिक यश साध्य करू शकतो. शेवटी या ज्ञानप्राप्तीचे साधन जे शिक्षण आहे, ते सर्वांना सुलभ असणे आवश्यक आहे. ते सर्वांना सुलभ असण्याबरोबरच शिक्षण हे व्यवसायाचे रूप घेणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. शिक्षण देणारे पूर्णपणे त्यागाच्या भावनेने परिपूर्ण असावेत. शिक्षणाच्या ज्या संस्था आहेत, त्या सुध्दा व्यक्ती आणि समाज निर्माणाच्या भावनेने प्रेरित असाव्यात. समाजसेवेच्या भावनेने प्रेरित व्यक्तीच या क्षेत्रांमध्ये आली पाहिजे. पैशांच्या कमतरतेमुळे कोणताही विद्यार्थी त्याच्या इच्छेनुसारच्या शिक्षणापासून वंचित राहणार नाही. हेच कारण आहे की अनेक विकसित देशांमध्ये शिक्षण-संस्था पूर्णपणे सरकारच्या अमलाखाली आहेत. दुसरीकडे सरकारकडे जमा होणाऱ्या महसुलातील एक मोठा हिस्सा शिक्षणावर खर्च केला जातो. शिक्षण-प्रणाली अशी व्हावी की जिच्यामध्ये मानवाचे शरीर, मन आणि चेतनेचा संतुलित विकास व्हावा.याच प्रकारे आरोग्य हे मानवाच्या समाज आणि सुखी जीवनासाठी आवश्यक आहे. हेच कारण आहे की आयुर्वेदामध्ये असे म्हटले आहे की- ‘धर्मार्थकाम मोक्षाणाम् आरोग्यम् मूलमूत्तमम’. याचाच अर्थ चार पुरु षार्थ- धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष यासाठी आरोग्य हेच मूळ आहे. शेवटी इतक्या महत्त्वपूर्ण असलेल्या आरोग्याकरिता सर्वसुलभता आवश्यक आहे. आरोग्याच्या रक्षणासाठी आरोग्यकेंद्र सर्वांकरिता उपलब्ध असावेत. पैसे असले तरच चांगली आरोग्य सुविधा आणि पैसे नसतील तर कमी दर्जाची आरोग्य सुविधा देणे हा व्यावसायिक वृत्तीचाच परिणाम आहे. सरकारच्या महसुलाचा मोठा हिस्सा आरोग्यावर खर्च झाला पाहिजे आणि या क्षेत्रामध्ये काम करणारे लोक देखील त्यागवृत्तीच्या भावनेने प्रेरित असावेत.

टॅग्स :educationशैक्षणिकHealthआरोग्यnewsबातम्या