शहरं
Join us  
Trending Stories
1
"चीनने भारताची जमीन बळकावली हे तुम्हाला कसं कळलं? तुम्ही खरे भारतीय असता तर…’’, सुप्रीम कोर्टाचे राहुल गांधींना खडे बोल  
2
बीएसएनएलने आणला १ रुपयांत फ्रिडम प्लॅन! ३० दिवस डेटा, कॉलिंग अन्... मोफत...
3
“सप्टेंबरमध्ये देशात मोठ्या राजकीय घडामोडी”; संजय राऊतांचे भाकित, म्हणाले, “RSS बैठकीत...”
4
'तो' खेळणार नाही असं इंग्लंडनेच सांगितलं होतं, पण आता बॅटिंग करणार; असं कसं? ICC नियमांत बसतं?
5
पाणी पाकिस्तानची पाठ सोडेना! उन्हाळ्यात पाणी प्यायला मिळेना, पावसाळ्यात महापूर
6
"मी स्किन व्हाइटनिंग सर्जरी केलेली नाही तर...", काजोलने सांगितलेलं तिच्या फेअरनेसचं रहस्य
7
"२० वर्षांनी आम्ही भाऊ एकत्र येऊ शकतो, मग..."; मनसे मेळाव्यात राज ठाकरेंचा कार्यकर्त्यांना कानमंत्र
8
Video - बँड-बाजा अन् शेवटचा निरोप! गाव रडलं पण 'तो' मित्राच्या अंत्ययात्रेत आनंदाने नाचला, कारण...
9
Lunchbox Recipe: परवलाचं चमचमीत भरीतही होऊ शकतं, कधी ट्राय केलंय का? पहा सोप्पी रेसिपी
10
रेपो दराच्या बैठकीपूर्वी सोन्या-चांदीच्या दरात वाढ, तुमच्या शहरात २४ कॅरेट सोन्याचा भाव काय?
11
१० हजारांत भारतीय थायलंडमध्ये काय काय करू शकतात? भारताच्या रुपयाची 'बाथ'मध्ये किती किंमत?
12
"माझ्या नादी लागू नका, पुराव्यासह फाईल्स उघडू..."; भाजपात प्रवेश करताच शिंदेसेनेच्या नेत्याला इशारा
13
"मुंबईत जो येईल त्याचं स्वागत करू..."; निशिकांत दुबेंबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
14
रॉयल एनफिल्डने चीनचे रेअर अर्थ मटेरिअल टाळले! नवीन धातू वापरला, ऑटो कंपन्या चकीत झाल्या...
15
काहीही करा, ‘हम नही सुधरेंगे’; CM देवेंद्र फडणवीसांचा क्लास वाया, वादग्रस्त विधाने सुरूच!
16
AI घेणार तुमच्या नोकरीची जागा? गुंतवणूकदार विनोद खोसला यांचा इशारा, म्हणाले यातून वाचायचं असेल तर..
17
‘झुकेगा नही’! ट्रम्प यांची धमकी, पण सरकार ठाम; अमेरिकेला भारताचं स्वतंत्र धोरण का खुपतंय?
18
मराठी अभिनेत्याचं साउथ इंडस्ट्रीत काम करण्याचं होतं स्वप्न, लॉकडाऊननंतर हैदराबाद गाठलं अन्...
19
चहा करताना 'ही' छोटीशी चूक कराल तर आयुष्याला मुकाल, योग्य पद्धत कोणती एकदा बघाच
20
ऑपरेशन महादेवमध्ये मारले गेलेले सगळे दहशतवादी पाकिस्तानीच! 'त्या' एका पुराव्याने समोर आली कुंडली

अखेर का झाली काँग्रेसची अशी दुर्दशा?

By विजय दर्डा | Updated: June 3, 2019 04:06 IST

यूपीएच्या दहा वर्षांच्या कार्यकाळातील पहिली पाच वर्षे सुरळीत पार पडली. नंतरचा पाच वर्षांचा काळ हातून गेला. राहुल गांधी पंतप्रधान बनण्यास तयार नव्हते

विजय दर्डाकाँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत कठोर परिश्रम घेतले यात शंका नाही. मात्र, निकाल काय लागला? काँग्रेस अतिशय वाईट पद्धतीने का पराभूत झाली? राहुल गांधी यांनी अमेठीत पराभूत होणे ही काय एखादी लहान घटना आहे? या निवडणुकीत मोदींची लहर नव्हे त्सुनामी होती. या त्सुनामीचाही अखेरपर्यंत पत्ता लागला नाही, हे सांगत हात झटकता येणार नाहीत. पराभवाचे एक कारण मोदींची त्सुनामी हे असू शकते. मात्र, असा दारुण पराभव ही संघटनात्मक विफलता नाही काय?मला जेव्हापासून समजू लागले, तेव्हापासून मी काँग्रेसला अगदी जवळून बघत आलो आहे. त्यानंतर, संसदीय राजकारणात १८ वर्षे राहण्याची संधीही मिळाली. काँग्रेसची मुळे गावागावात असतानाचा काळ मी चांगल्या रीतीने जाणून आहे. जिल्ह्याचा काँग्रेस अध्यक्ष काही सांगत असेल, तर त्यांचे म्हणणे ऐकून घेतले जात होते. त्यांनी कुणाला तिकीट देऊ नये असे सुचविले, तर ते मान्य केले जात होते. त्यावेळी काँग्रेसमध्ये सेवादल, महिला काँग्रेस, युवक काँग्रेस, एनएसयूआय यासारखे महत्त्वपूर्ण अंग होते. संघटनेत जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल, सुभाषचंद्र बोस, मौलाना अबुल कलाम आझाद, बी. पी. सीतारमैया, वीर वामनदादा जोशी, तुकडोजी महाराज, मोरारजी देसाई यांच्यासारखे लोक होते.

जे वेळप्रसंगी सतरंजीही अंथरत होते. सरोजिनी नायडू, कमला नेहरू, अरुणा असफअली आणि इंदिरा गांधी महिला काँग्रेसमध्ये अत्यंत सक्रिय होत्या. निवडणूक काळात लोक स्वत:च्या गाड्या घेऊन, स्वत:चे पेट्रोल खर्चून प्रचार करत. समर्पित कार्यकर्ते असत. १९६६ पर्यंत संघटनेत कार्यकर्त्याला महत्त्व होते. नंतर त्यांची जागा कॉन्ट्रॅक्टरनी घेतली. सभेच्या गर्दीचे काम कॉन्ट्रॅक्टरकडे दिले गेले. १९८५ ते १९९० या काळात बॅग संस्कृतीने जन्म घेतला. काँग्रेस बदलू लागली. आधी कोणताही नेता कुठेही गेला की, तेथील काँग्रेसच्या कार्यालयात जायचा. कारण त्यावेळी नेते कार्यालयाला मंदिर मानत होते. हळूहळू सर्व संपत गेले. इंदिराजी, राजीवजी, सोनियाजी आणि राहुलजी यांनी परिस्थिती सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र, नेत्यांची अशी फौज जमा झाली, ज्यांची प्राथमिकता पक्ष नव्हता, तर त्यांना स्वत:चे लाभ महत्त्वपूर्ण वाटत होते.

यूपीएच्या दहा वर्षांच्या कार्यकाळातील पहिली पाच वर्षे सुरळीत पार पडली. नंतरचा पाच वर्षांचा काळ हातून गेला. राहुल गांधी पंतप्रधान बनण्यास तयार नव्हते. पक्षातील काही लोकांनी त्यांच्या नावाला विरोध केला. एक दुसऱ्याला खाली खेचण्याचे असे काही डावपेच आखले गेले की पक्ष दुबळा होत गेला. केवळ पक्षाच्याच भल्यासाठी झटणारे अहमद पटेल, गुलाम नबी आझाद यांच्यासारख्यांना वर्तुळाबाहेर ढकलले. संघटनेऐवजी संगीतात तल्लीन असणाऱ्यांचा बोलबाला झाला. त्यात डॉ. मनमोहन सिंग भरडले जाऊ लागले. त्यांचे कार्यालय ठप्प पडले. एकापाठोपाठ एक घोटाळ्यांचे आरोप होऊ लागले. काँग्रेसने अनेक मंत्री आणि मुख्यमंत्र्यांचे राजीनामे घेतले, पण प्रतिमा डागाळली. सरकार निकामी आणि भ्रष्ट आहे, असे वातावरण तयार करण्यात आले. बेरोजगार त्रस्त होते. शेतकरी नैराश्यात बुडाला होता. अशा वेळी नरेंद्र मोदींचा उदय झाला. त्यांनी सुशासनाची ग्वाही दिली. मग लोकांनी त्यांना संधी दिली. मात्र, गेल्या पाच वर्षांत काँग्रेससह विरोधी पक्ष सार्थ भूमिका बजावू शकला नाही. सत्तारूढ पक्षाचे चरित्र आणि चेहरा या दोहोंचा पर्दाफाश केला जाऊ शकला असता, हे मी स्वत: संसदेत अनुभवले, परंतु विरोधकांनी आपल्याच लोकांची वाट लावली.

आता २०१९ वर दृष्टिक्षेप टाकू या! मोदींच्या २०१४ ते २०१९ या कारकिर्दीत सर्वकाही आलबेल नव्हतेच! आश्वासने पाळली गेली नाहीत. काँग्रेस आणि यूपीएमध्ये सामील असलेल्या पक्षांसाठी ही सुवर्णसंधी होती, परंतु ती त्यांनी गमावली. राहुल गांधी यांनी प्रचंड श्रम घेतले, परंतु संघटनेतील दिग्गज हातात हात घालून चालत होते का? तिकीट वाटपात ‘आपला आणि परका’ असा खेळही रंगला. अशा स्थितीत नरेंद्र मोदी हे देशभक्तीचा ‘हुकमी एक्का’ घेऊन आले आहेत, हे काँग्रेसला कळलेच नाही. पश्चिम बंगालपासून तर उत्तर प्रदेश, बिहार, राजस्थान आणि महाराष्ट्रापर्यंत काँग्रेस विस्कळीत झाली. असे असले, तरी काँग्रेस संपणार नाही, असे माझे ठाम मत आहे. काँग्रेस एक विचार आहे, आत्मा आहे. आत्मा आणि विचार कधी मरत नसतात. मात्र, वाईट दिवस येऊ शकतात.

या काळात संघटनस्तरावर भाजपा स्वत:ला बळकट बनवत गेली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या भाजपाच्या मातृ संघटनेने शेतकºयांपासून युवक आणि बुद्धिवाद्यांना जोडून देश-विदेशात संघटना उभारल्या. जनाधार मजबूत केला. ‘आम्ही दोनाचे तीनशे होऊ’ असे कधी काळी अटलजींनी म्हटले होते. ते नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या जोडीने खरे करून दाखविले. मोदी जगभर ओळखले जाणारे नेते आहेत. ज्यांची संघटनक्षमता अद्वितीय आहे, असे अमित शहांसारखे रणनीतीकार त्यांच्यासोबत आहेत. अशा वेळी मुकाबला कसा करायचा, गमावलेला जनाधार परत कसा मिळवायचा, याचा विचार काँग्रेसला करावा लागेल. आणि हो, आपल्या पहिल्या कार्यकाळात संरक्षण, परराष्ट्र यासारखे विभाग महिलांच्या हाती दिल्याबद्दल आणि आता वित्त मंत्रालयासारखे महत्त्वाचे खातेही एका महिलेकडे सोपविल्याबद्दल मी मोदीजींचे अभिनंदन करू इच्छितो.

(लेखक लोकमत समूहाचे चेअरमन, एडिटोरिअल बोर्ड आहेत)

टॅग्स :congressकाँग्रेसSonia Gandhiसोनिया गांधीRahul Gandhiराहुल गांधी