शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

Editorial: ‘भाजप’ची लाट, ‘आप’ला वाट!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2022 08:02 IST

धार्मिक ध्रुवीकरण, जाती-पातींचे राजकारण, शेतकरी आंदोलनाचा परिणाम, कोरोना संसर्ग काळातील गैरव्यवस्थापन, दलित आणि स्त्रियांवरील अत्याचाराच्या भयंकर घटना, आदी विरोधाभासाने भरलेल्या वातावरणात देखील भाजपने स्पष्ट बहुमताचा आकडा पार करून राष्ट्रीय राजकारणात भाजपला सध्या तरी पर्याय नाही, याची नोंद केली आहे.

उत्तर प्रदेशासह पाच राज्य विधानसभांच्या निवडणुका विविध वैशिष्ट्याने भरलेल्या आणि अनेक विरोधाभासांनी गर्दी केलेल्या वातावरणात पार पडल्या. या देशातील पाचपैकी उत्तर प्रदेश सर्वांत मोठ्या राज्यासह भाजपने पुन्हा चार राज्यांत सत्ता मिळवून भाजपची लाट कायम असल्याचे दाखवून दिले आहे. पंजाब या एकमेव राज्यात सत्ताधारी असलेल्या काँग्रेस आणि पारंपरिक विरोधक अकाली दलाचा दारुण पराभव होऊन या राज्याच्या क्षितिजावर आम आदमी पक्षाचा उदय झाला आहे. राष्ट्रीय राजकारणाचा महामार्ग उत्तर प्रदेशातून जातो, असे मानले जाते. सलग चार निवडणुकीत सत्तांतर होत असताना मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखालील भाजपने पुन्हा सत्तेवर येण्याचा विक्रम केला आहे !

धार्मिक ध्रुवीकरण, जाती-पातींचे राजकारण, शेतकरी आंदोलनाचा परिणाम, कोरोना संसर्ग काळातील गैरव्यवस्थापन, दलित आणि स्त्रियांवरील अत्याचाराच्या भयंकर घटना, आदी विरोधाभासाने भरलेल्या वातावरणात देखील भाजपने स्पष्ट बहुमताचा आकडा पार करून राष्ट्रीय राजकारणात भाजपला सध्या तरी पर्याय नाही, याची नोंद केली आहे. समाजवादी पक्ष वगळता बहुजन समाज पक्ष आणि काँग्रेस या पूर्वाश्रमीच्या सत्ताधारी पक्षांचा दारुण पराभव झाला. या राज्यात काँग्रेसचा १९८९ पासून सलग पराभव होत आहे. प्रियांका गांधी यांच्या नेतृत्वाखाली निवडणुका लढवूनही काँग्रेसचा दारुण पराभव झाला. त्या तुलनेत भाजपच्या प्रचंड ताकदीच्या विरोधात समाजवादी पक्षाने माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्या नेतृत्वाखाली चांगली लढत दिली. भाजपने काशीचा विकास आणि अयोध्येतील राम मंदिराची पायाभरणी करून हिंदुत्वाचे मोठे पाऊल टाकले होतेच. त्याला आव्हान देणे समाजवादी पक्षाशिवाय कोणत्याही राजकीय पक्षांना जमले नाही. शेतकरी आंदोलनामुळे पश्चिम उत्तर प्रदेशात भाजपला फटका बसेल शिवाय राष्ट्रीय लोकदलाची समाजवादी पक्षाबरोबरची युती आव्हान उभे करेल, असे वाटले होते. त्याचा कोणताही परिणाम जाणवलाच नाही. लखीमपूर खेत्रीमध्ये शेतकऱ्यांवर झालेला हल्लाही मतदारांनी विसरून भाजपला जवळ केले. केंद्रातील सत्ता, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाचा प्रभाव या भाजपच्या जमेच्या बाजू होत्या. सर्व प्रकारच्या विरोधाभासांच्या चर्चेला पूर्णविराम देत योगी आदित्यनाथ यांचे नेतृत्वच मतदारांच्या पसंतीस पडलेले दिसते. उत्तर प्रदेशपेक्षा अधिक चकित करणारा निकाल पंजाब विधानसभेचा लागला आहे. पंजाब हा धगधगता आणि प्रगत प्रांत आहे. दिल्लीच्या राजकारणाचा प्रभाव असला तरी देशातील सर्वात जुना आणि ज्याची स्थापना स्वातंत्र्यपूर्व काळात झालेली आहे त्या अकाली दलाचा काँग्रेसला पर्याय म्हणून निवडण्यास मतदारांनी नकार दिला. अ

काली दलास एकदाच पुन्हा सत्ता मिळाली होती, अन्यथा पंजाबमध्ये काँग्रेस आणि अकाली दलाचे आलटून पालटून सरकार सत्तेवर येते. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कॅ. अमरिंदर सिंग यांना मुख्यमंत्रिपदावरून हटवून जो घोळ घालण्यात आला, त्यातून काँग्रेस पक्ष सावरलाच नाही. अकाली दलाने पाच वर्षांपूर्वी सत्तेवर असताना केलेल्या भ्रष्ट कारभारामुळे पंजाबी जनता खूप नाराज होती. या पक्षाचे ज्येष्ठ नेते प्रकाशसिंग बादल यांचाही पराभव मतदारांनी केला. ते पाचवेळा मुख्यमंत्री होते. अमरिंदर सिंग यांचाही पराभव झालाच, शिवाय विद्यमान मुख्यमंत्री चरणजितसिंग चन्नी यांचा दोन मतदारसंघांत पराभव झाला. आम आदमी पक्षाने काँग्रेस आणि अकाली दलास सक्षम पर्याय दिला. भ्रष्टाचारमुक्त सरकारच्या आश्वासनाची मतदारांना भुरळ पडली. २०१२ मध्ये स्थापन झालेल्या आपने दिल्ली विधानसभेत सलग दोनवेळा विजय मिळवून अनेक चांगले उपक्रम राबविले. सार्वजनिक वाहतूक, पाणीपुरवठा, शिक्षण, स्वच्छता, वीज वितरण आदी सुविधा उत्तम आणि स्वस्त दिल्या आहेत. मात्र, दिल्लीत या सरकारकडे गृहखाते नाही. पंजाब हे परिपूर्ण राज्य प्रथमच ‘आप’ला मिळाले आहे. गोवा, गुजरात, कर्नाटक आदी राज्यांत ‘आप’ने प्रयत्न केला; पण अपेक्षित यश मिळाले नव्हते. गोव्यामध्ये भाजप विरुद्ध काँग्रेस यांच्यातच मुख्य लढत होती. उत्तराखंड येथे भाजप सत्तेवर असला तरी अंतर्गत राजकारणाने तीन मुख्यमंत्री या राज्याने पाहिले. गटबाजी वाढली होती. तरीदेखील काँग्रेसला लढत देता आली नाही. हीच अवस्था मणिपूरमधील आहे. भाजपची लाट कायम असल्याचा या निकालाचा अर्थ आहे. ‘आप’च्या रुपाने राष्ट्रीय राजकारणात नवी वाट निर्माण झाली आहे आणि सर्वाधिक वर्षे सत्ताधारी काँग्रेसचे कमबॅक काही होत नाही.

टॅग्स :BJPभाजपाAAPआप