शहरं
Join us  
Trending Stories
1
विधानसभेत भाजपा किती जागा लढवणार, मित्रपक्षांना काय देणार? भुजबळांच्या दाव्यानंतर फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
2
फोन जप्त करून राजीनामा घ्या; दमानियांचा हल्लाबोल: खुलासा करत अजित पवार म्हणाले...
3
कर्नाटक सेक्स स्कँडलमधील मुख्य आरोपी भारतात येणार; ३१ मे रोजी SIT ला सामोरं जाणार
4
तुम्ही आंधळे आहात का? तुमच्यावर विश्वास नाही म्हणत कोर्टानं गुजरात सरकारला फटकारलं
5
"अडवाणी पाकिस्तानी आहेत, भारतात येऊन स्थायिक झाले", राबडी देवींचा भाजपावर निशाणा
6
योगेंद्र यादवांचा पुन्हा दावा; भाजपाचं टेन्शन वाढणार, कुठल्या राज्यात किती जागांचा फटका?
7
प्रेम, शारीरिक शोषण, लग्न अन् तरूणाने काढला पळ; प्रेयसीने भररस्त्यात पकडून दिला चोप
8
Manoj Jarange Patil ...तर आपल्याला सत्तेत जावं लागेल; जातीवादावरून मनोज जरांगे पाटलांचं मोठं विधान
9
शेअर बाजारात मोठी अस्थिरता, ४ जूनला भाजप सरकार आलं नाही तर काय असेल स्थिती?
10
राहुल गांधींच्या सभेमध्ये मंच कोसळला, नेतेमंडळींचा एकच गोंधळ उडाला
11
KKR चे विजेतेपद ठरणार गौतम गंभीरच्या टीम इंडियाचा प्रशिक्षक बनण्याचा मार्गातील अडथळा!
12
हिरव्या रंगाची पैठणी अन् हाय हिल्स! कान्समधील अभिनेत्रीच्या लूकची चर्चा, सोशल मीडियावर होतंय कौतुक
13
"सोनिया गांधींना तुरुंगात टाकण्याची भाषा करणारे आता...", PM मोदींचा केजरीवालांवर निशाणा
14
कान्समध्ये पुरस्कार पटकावणाऱ्या पायल कपाडिया आहेत आरोपी नंबर 25? पुढील महिन्यात कोर्टात...
15
अरे देवा! पतीने आणल्या 60 प्रकारच्या नेलपॉलिश; सासूने लावताच सून नाराज, ठेवली 'ही' अट
16
"४ जूननंतर ईडीपासून वाचण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ..."; राहुल गांधींचा हल्लाबोल
17
"ससून रुग्णालय आहे की गुन्हेगारांना वाचवणारा अड्डा?"; ललित पाटीलचा उल्लेख करत काँग्रेसचा सवाल
18
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टी उच्चांकी स्तरावरून घसरला; Adani Ent आपटला, डिव्हिस लॅबमध्ये तेजी
19
पापुआ न्यू गिनीत भूस्खलनाने हाहाकार; 2000 लोक जिवंत जमिनीखाली गाडले गेले...
20
"विभव कुमार यांना जामीन मिळाला तर मला आणि माझ्या...", स्वाती मालीवाल यांचा कोर्टात मोठा दावा

आश्वासनांची खैरात

By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2018 7:55 AM

काम न झाल्याचे दु:ख असले तरी या व्यक्तीने आपल्यासाठी प्रयत्न केले, याचे समाधान असते. हे झाले वैयक्तिक पातळीवर..पण सार्वजनिक जीवनात तसे बऱ्याचदा होत नाही, हा आपला सार्वत्रिक अनुभव असतो. आश्वासन हा शब्द म्हणूनच बदनाम झाला आहे.

-मिलिंद कुलकर्णीएखाद्या गोष्टीची अपेक्षा, किंवा मागणी असेल तर ती पूर्ण होईल, त्यासाठी प्रयत्न करु असे आपण आश्वस्त करीत असतो. त्यासाठी मनापासून प्रयत्न करीत असतो. पण ते होत नसेल किंवा झाले नाही, तर संबंधिताला आपण कळवितोदेखील. बाबा रे, मी खूप प्रयत्न केला, पण जमले नाही. हा प्रामाणिकपणा समोरच्या व्यक्तीला भावतो. काम न झाल्याचे दु:ख असले तरी या व्यक्तीने आपल्यासाठी प्रयत्न केले, याचे समाधान असते. हे झाले वैयक्तिक पातळीवर..पण सार्वजनिक जीवनात तसे बऱ्याचदा होत नाही, हा आपला सार्वत्रिक अनुभव असतो. आश्वासन हा शब्द म्हणूनच बदनाम झाला आहे. पूर्ण न करण्यासाठी दिलेले ते आश्वासन, अशी त्याची नवी व्याख्या झालेली आहे. राजकीय पक्ष निवडणुकीच्या काळात जाहीरनामा, वचननामा अशा नावांनी पक्षीय भूमिका, संकल्प मांडतात. त्यात दुसरे असते तरी काय, तर केवळ आश्वासने. आमची सत्ता आली तर अमूक करु, तमूक करु, असे सांगितले जाते. लोकसभा, विधानसभा, जिल्हा परिषद, पालिका या निवडणुकांच्या काळात राजकीय पक्षांचे जाहीरनामे काढले तर त्यात त्याच त्या गोष्टी आपल्याला दिसून येतील. कारण आश्वासने पूर्ण करायची नसतात, म्हणून तर त्याची परत परत उजळणी केली जाते. मतदारांची स्मरणशक्ती क्षीण असल्याचा शोध राजकीय पंडितांनी यापूर्वीच लावल्याने जाहीरनाम्यांचा रतीब दरवेळी घातला जातो.

गेल्या लोकसभा निवडणुकीतील भाजपाच्या आश्वासनांची उजळणी आता विरोधी पक्ष करु लागले आहेत, कारण पुढील वर्षी निवडणुका आल्या आहेत म्हणून...परदेशातील काळा पैसा भारतात आणू आणि प्रत्येक नागरिकाच्या खात्यात १५ लाख रुपये जमा करु, असे आश्वासन देण्यात आले होते. १५ लाख सोडा, १५ रुपये काही जमा झालेले नाही. याउलट देशभक्ती जागृत करीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बहुसंख्य भारतीयांना श्रीमंत ठरवून गॅसची सबसिडी सोडायला आवाहन केले. त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद दिल्याने दोन-चार महिन्याने बँक खात्यात जमा होणारी २५-५० रुपयांची ही सबसिडीदेखील बंद झाली.अमूक कोटी तरुणांना नोक-या देऊ, हे आणखी एक आश्वासन होते. आता त्यावर मखलाशी अशी की, नोक-या नव्हे तर रोजगार दिले आहेत. कौशल्य विकास योजनेतून इतक्या तरुणांनी शिक्षण घेतले, बँकांनी एवढ्या कोटींचे कर्ज दिले, त्यांनी स्वयंरोजगार उभारला. शब्दच्छल किती छान केला जातो, नाही का?सध्या जळगाव महापालिकेची निवडणूक सुरु आहे. महापालिका कर्जबाजारी असल्याने पाच वर्षांपासून एकही विकासाचे काम झालेले नाही. मुख्यमंत्र्यांनी २५ कोटी रुपयांचा विशेष निधी तीन वर्षांपूर्वी मंजूर केला. हा मंजूर निधी मुंबईहून जळगावला यायला तब्बल दीड वर्षे लागली. जळगावी आल्यानंतर त्याचा विनियोग कसा करायचा, यावर दीड वर्षे खल झाला. त्याचे कारण असे की, महापालिकेत भाजपाची प्रतिस्पर्धी आघाडी म्हणजे खान्देश विकास आघाडी सत्तेत आहे. आमदार हे भाजपाचे आहेत. पालकमंत्र्यांनी आमदार, महापौर, आयुक्त यांची समिती नेमून निधी खर्चाचे अधिकार दिले. निधी आम्ही दिला आणि निधी आम्हाला मिळाला या वादात तो खर्च झालेला नाही. आता भाजपा नवीन आश्वासन देतेय की, राज्य सरकारकडून २०० कोटी रुपयांचा निधी आणू. २५ कोटी खर्च कसे खर्च करायचे हे ठरवायला दीड वर्षे लागली, तर २०० कोटी खर्चायला किती लागतील, हे गणित मोठे अवघड आहे. यातील मेख लक्षात घ्या, म्हणजे २०० कोटी रुपये खर्च होईपर्यंत महापालिका आमच्याच ताब्यात राहू द्या, आहे की, नाही गंमत.

जळगाव शहरात सध्या अमृत पाणी योजनेचे काम सुरु आहे. नवीन जलवाहिनी टाकण्यासाठी रस्ते खोदले जात आहे. हे काम सुमारे दोन वर्षे चालेल. तोपर्यंत रस्त्याची कामे करु नये, असे आदेश राज्य शासनाने दिलेले आहेत. तरीही भाजपाने या निवडणुकीत आश्वासन दिले आहे की, जळगाव शहरातील प्रत्येक रस्त्याचे काँक्रीटीकरण व डांबरीकरण करण्यात येईल. दोन वर्षे रस्त्याची कामे होणार नसताना दिले की, नाही आश्वासन? नोकरी आणि रोजगार असा शब्दच्छल आहे ना, तसेच हे...जाऊ द्या, अखेर आश्वासनच ते...

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षाPoliticsराजकारणMaharashtraमहाराष्ट्र