शहरं
Join us  
Trending Stories
1
जून ते सप्टेंबर ९९टक्के पाऊस; कोकण, नाशिक, पूर्व विदर्भात उत्तम पाऊस होण्याचा अंदाज
2
'या' चार राज्यांमध्ये मोठा उलटफेर होणार; भाजप जोरदार मुसंडी मारण्याची शक्यता
3
शिक्षक मतदारसंघासाठी भाजपची उमेदवारी नक्की कोणाला?
4
"मला T20 World Cup बघायचाही नाही, जेव्हा मी...", रियान परागचं अनोखं विधान
5
आजचे राशीभविष्य: सरकारी लाभ, यश-कीर्ती वृद्धी; पद-प्रतिष्ठा वाढ, सुखकारक दिवस
6
मे महिन्यात देशभरात उष्माघाताचे ४६ बळी; तीन महिन्यांत ५६ मृत्यू, महाराष्ट्रात ११ जण मृत्युमुखी
7
अरुणाचलमध्ये भाजपच; सिक्कीम ‘एसकेएम’चेच; दोन राज्यांमधील विधानसभा निवडणूक
8
प्रदोष शिवरात्रीचा शुभ संयोग: ‘असे’ करा व्रताचरण; पाहा, शुभ मुहूर्त, महत्त्व अन् मान्यता
9
पंचग्रही अद्भूत शुभ योग: ७ राशींना लाभ, लॉटरीची संधी; राजकारण्यांना यश, इच्छापूर्तीचा काळ!
10
WI vs PNG : हलक्यात घेऊन चालणार नाही! नवख्या संघानं वेस्ट इंडिजला घाम फोडला, कसाबसा सामना जिंकला
11
पंचग्रही योग: ‘या’ ५ मूलांकांना सुख-समृद्धी काळ, धनलाभाची संधी; पद-पैसा वृद्धी, शुभ होईल!
12
बॉम्बच्या धमकीमुळे विमानाचे इमर्जन्सी लँडिंग, पॅरिसहून येणाऱ्या विमानात मिळाली चिठ्ठी
13
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे तिहार तुरुंगात आत्मसमर्पण
14
जोकोविचला पाच सेटपर्यंत करावा लागला संघर्ष, रॉजर फेडररच्या विक्रमाशी केली बरोबरी
15
अभिनेत्री रवीना टंडनसह ड्रायव्हरला संतप्त जमावाची मारहाण
16
उद्योगपती गौतम अदानी भारतात सर्वात श्रीमंत, जगात सर्वाधिक श्रीमंतांकडे किती संपत्ती? 
17
नव्या उच्चांकासाठी बाजार सज्ज, एक्झिट पोलमधून देशात स्थिर सरकारचे येण्याचे संकेत
18
अनिल परब आज उमेदवारी अर्ज दाखल करणार
19
प्रवासकोंडीचे ग्रहण सुटले, मध्य रेल्वेवर जम्बो ब्लॉकला पूर्णविराम
20
एआय एक्झिट पोलमध्येही 'कमळ'; पण इंडियाच्याही जागा वाढणार

उद्दाम आणि मुद्दाम! चीन अंतर्गत असंतोषाने अस्वस्थ, म्हणून...

By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2022 10:08 AM

पुतीन आणि जिनपिंग यांच्या विस्तारवादाचे भय अवघ्या जगापुढे आहे. कोणाचाही विरोध न जुमानता जिनपिंग यांनी आपला राज्याभिषेक करवून घेतला. ‘एकात्म चीन’ ही त्यांची आवडती घोषणा. त्यात तैवान येतो; तसा चीनचा दावा असणारा भारतीय भूभागही येतो.

चीनवर विश्वास ठेवणे कठीण आहे’ अशा आशयाचे विधान परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी नुकतेच केले होते. त्याचा पुरावा पुन्हा मिळाला आहे. सीमेवर जोवर शांतता नाही, तोवर उभय देशांमध्ये कोणतेही संबंध विकसित होऊ शकत नाहीत, असेही जयशंकर म्हणाले होते. भारत आणि चीन हे परस्परांचे शेजारी. लडाख, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, सिक्कीम आणि अरुणाचल प्रदेश हे भारत-चीन सीमेवरचे भारतीय प्रदेश. १९६२च्या युद्धानंतर या दोन देशांमधील प्रत्यक्ष ताबारेषा या क्षेत्रांमध्ये विभागली गेली. भारताचे भूराजकीय स्थान, लोकसंख्या, आंतरराष्ट्रीय पटलावरील महत्त्व आणि सर्वंकष क्षमता यामुळे भारताच्या विरोधात पाकिस्तानला बळ देण्याचा प्रयत्न चीनने सातत्याने सुरू ठेवला आहे. याचा अर्थ चीनचे सारे आलबेल सुरू आहे, असे नाही. सध्या तर चीन अंतर्गत असंतोषाने अस्वस्थ आहे. अशाच कालखंडात बाह्य आक्रमण करून स्थानिक मुद्यांवरून लक्ष विचलित करणे ही जिनपिंग यांची व्यूहरचना असू शकते.

पुतीन आणि जिनपिंग यांच्या विस्तारवादाचे भय अवघ्या जगापुढे आहे. कोणाचाही विरोध न जुमानता जिनपिंग यांनी आपला राज्याभिषेक करवून घेतला. ‘एकात्म चीन’ ही त्यांची आवडती घोषणा. त्यात तैवान येतो; तसा चीनचा दावा असणारा भारतीय भूभागही येतो. चीनमध्ये नुकतेच कम्युनिस्ट पक्षाचे  जे अधिवेशन झाले, त्या अधिवेशनात गलवान खोऱ्यामध्ये उडालेल्या चकमकीची फिल्म दाखवण्यात आली. जिनपिंग यांच्यासाठी भारत किती ‘महत्त्वाचा’ आहे, हे तेव्हाच सिद्ध झाले. दक्षिण आशियात भारत हा बलशाली देश आहे. मात्र, भारताच्या सोबत कोणताही देश असू नये, हा चीनचा प्रयत्न जुना आहे. भूतान हा भारताचा खात्रीचा मित्र. त्यामुळे चीनने भूतानलाही धमकावले. गेल्या आठवड्यातच ही माहिती उजेडात आली. काही दिवसांपूर्वी भारत आणि अमेरिकेच्या सैन्याने उत्तराखंडमधील औली येथे संयुक्त सराव केला. त्यावर चीनचा तीव्र आक्षेप होता. भारताकडे चीनचे बारकाईने लक्ष आहे. या पार्श्वभूमीवर तवांगमध्ये भारत आणि चीनमध्ये झालेला सैन्यसंघर्ष नवा पेच निर्माण करणार आहे. लडाखमधील तणाव कायम असताना या संघर्षाने भारताची चिंता वाढली आहे. तवांगची प्रत्यक्ष ताबारेषा ओलांडण्याचा प्रयत्न चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीने केला. त्याला भारतीय सैनिकांनी प्रत्युत्तरही दिले. अरुणाचलच्या तवांग क्षेत्रात प्रत्यक्ष ताबारेषेवरून काही ठिकाणी वाद आहेत. दोन्ही देशांचे सैनिक तिथे गस्त घालत आहेत. गेली दीड दशके हेच चित्र आहे.

भारत-चीनमध्ये असणारा ताण नवा नाही. मात्र, लडाखमधील गलवान खोऱ्यात अडीच वर्षांपूर्वीच्या संघर्षानंतरची ही अशी पहिलीच चकमक आहे. गेल्या काही वर्षांत भारतीय लष्कराने तवांग परिसरात प्रत्यक्ष ताबारेषेजवळ बरीच जमवाजमव केली आहे. चीनही शांत बसलेला नाही. प्रत्यक्ष ताबारेषेच्या जवळ सरकण्याचा चीनचा प्रयत्न  सुरू आहेच. पश्चिम क्षेत्रामध्ये ताबारेषेचा भंग करण्याचा प्रयत्न चीनने अनेक वेळा केला आहे. आताचा हल्ला आकस्मिक नाही. तो पूर्वनियोजित असावा, असे दिसते. चीन योग्य वेळेची  वाट पाहत होता. ढगाळ वातावरण आणि बर्फवृष्टी यामुळे चीनला हा संघर्ष सोपा जाईल, असा आडाखा असणार. भारतीय सैनिकांनी हा हल्ला परतवून लावला. त्यामुळे मूळ चिंता मात्र संपलेली नाही. संसदेत या मुद्यावर मंगळवारी जी चर्चा झाली, ती पक्षीय स्वरूपाची आणि उथळ होती. राजकीय आरोप-प्रत्यारोप करून या प्रश्नाकडे पाहता येणार नाही. पंतप्रधान नेहरू असोत अथवा मोदी, चीन तेवढाच धोकादायक आहे. तरीही चीनशी संबंध, संवाद कायम ठेवण्याचे आव्हान आहे.

चीन हा सामरिक-राजकीय क्षेत्रांप्रमाणेच आर्थिक क्षेत्रातही आक्रमक धोरण राबवणारा देश आहे. चीनच्या विस्तारवादाचा भारत विरोधक आहे; पण दुसऱ्या बाजूला चीनवरचे आपले जे आर्थिक अवलंबित्व आहे, ते आपण पूर्णपणे झुगारून देऊ शकलेलो नाही. साठच्या दशकातील ‘हिंदी-चिनी भाई भाई’ हे खरे नाही, तसेच एकविसाव्या शतकाच्या पहिल्या दशकातले ‘चिंडिया’चे स्वप्नही खरे नाही. तरीही दोन्ही देश एकमेकांचे शत्रू होणे दोघांच्याही हिताचे नाही. अशावेळीच  राजकीय शहाणपणाची खरी परीक्षा असते. ‘जी-२०’ शिखर परिषदेचे अध्यक्षपद भारताकडे आले आहे. या कार्यगटांच्या बैठका देशभर सुरू आहेत. अशावेळी उद्दाम चीन मुद्दाम या चकमकी घडवत असताना तर ही परीक्षा आणखी तातडीची झाली आहे.

टॅग्स :india china faceoffभारत-चीन तणावchinaचीन