शहरं
Join us  
Trending Stories
1
आता जर चुकाल तर संपाल, मराठी माणसांना आवाहन; उद्धवसेना-मनसे युतीची अधिकृत घोषणा
2
Shiv Sena MNS Alliance: 'शिवतीर्थ'वर राज-उद्धव! बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर संपूर्ण ठाकरे कुटुंबाचं अभिवादन
3
शिवसेनेनं 'करून दाखवलं', मनसेचं 'इंजिन' घसरलं! पाहा, मागील दोन निवडणुकांमध्ये नेमकं काय घडलं?
4
IND W vs SL W: भारताच्या 'लेडी सेहवाग'चा मोठा पराक्रम; स्मृती मानधना, दिप्ती शर्मा, जेमिमालाही टाकलं मागं!
5
'आम्ही भारतातील सर्वात मोठे फरार', ललित मोदी आणि विजय मल्ल्या यांचा सरकारवर हल्लाबोल; व्हिडीओ व्हायरल
6
सोने-चांदी-हिरे काही कमी नाही, राममूर्ती घडवायला दिले ३० कोटी; अयोध्येतील राम मंदिराला भेट दिली
7
Uddhav- Raj Thackeray PC: थोड्याच वेळात उद्धवसेना-मनसे युतीची अधिकृत घोषणा होणार; पत्रकार परिषदेकडे सगळ्यांचं लक्ष
8
कुणीही एकत्र आले तरी मुंबईत भाजपाचा महापौर बसेल; मंत्री बावनकुळेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा
9
फास्ट फूडमुळे खरंच झाला विद्यार्थिनीचा मृत्यू? डॉक्टर आणि कुटुंबीयांनी सांगितलं धक्कादायक 'सत्य'
10
DCM शिंदे पोहोचले बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर; ठाकरे बंधूंच्या यूतीपूर्वी घडामोडींना वेग
11
बांग्लादेशात हिंदूंवरील अत्याचार वाढले; चिटगावमध्ये कट्टरतावाद्यांनी हिंदूंची घरे जाळली
12
Vijay Hazare Trophy स्पर्धेतील पहिल्याच सामन्यात वैभव सूर्यवंशीचा धमाका! वादळी शतकासह रचला इतिहास
13
शेतकरी ते नोकरदार... बँकिंगपासून सोशल मीडियापर्यंत 'हे' ८ नियम १ जानेवारीपासून बदलणार
14
शरद पवारांची राष्ट्रवादी ठाकरे बंधूंच्या युतीत सहभागी होणार?; बैठकीतील इनसाइड स्टोरी समोर
15
नमो भारत ट्रेनमधील 'तो' अश्लील चाळा पडणार महागात! तरुण-तरुणीवर FIR; किती शिक्षा होणार?
16
अगदी बाबाची कॉपी! वडिलांसारखीच हँडसम आहेत हृतिकची मुलं, हृदान-हृहानचे डान्स मूव्ह्ज पाहून चाहते प्रेमात
17
सुधीर मुनंगटीवार यांनी घेतली CM देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले, नाराजी दूर होणार?
18
अमेरिकेत 'एपस्टीन फाइल्स'चा महास्फोट! डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर 'तसले' गंभीर आरोप; रिपोर्टने खळबळ
19
इंडिगोची 'दादागिरी' आता चालणार नाही; सरकारने दोन नवीन विमान कंपन्यांना दाखवला हिरवा कंदील
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत विक्रमी वाढ सुरुच, आज किती आहे १० ग्रॅम सोन्याचा लेटेस्ट रेट?
Daily Top 2Weekly Top 5

परि उमगले ना तंत्र जीवनाचे !

By किरण अग्रवाल | Updated: June 28, 2018 08:32 IST

शिक्षणाने जबाबदारीची जाणीव घडविली जातेय का किंवा कोणत्याही अडचणींना हिमतीने सामोरे जाण्याचे धाडस बिंबवले जातेय का, असा प्रश्न त्यामुळेच उपस्थित व्हावा.

शाळा, महाविद्यालयातील परीक्षेत उत्तीर्ण होणारे जीवनाच्या परीक्षेतही यशस्वी होतातच असे नाही, कारण शिक्षणातील मूल्याधिष्ठितपणा तर कमी होत चालला आहेच; शिवाय आयुष्यातील चढ-उताराला धैर्याने सामोरे जाण्याचे शिक्षण त्यात घडून येईनासे झाले आहे. नोकरीसाठीचे शिक्षण वाढले असून, जीवनासाठी झगडाव्या लागणाऱ्या कसरतीचे भान त्यातून जागवले जात नाही. त्यामुळे शिक्षित होऊनही असहायता अनुभवव करणारी तरुण मंडळी शुल्लक समस्यांमुळे मानसिकदृष्ट्या कोलमडून पडताना दिसते व त्यातूनच टोकाचे पाऊल उचलून आयुष्य संपवायलाही मागेपुढे पाहत नाही. शिक्षणाने जबाबदारीची जाणीव घडविली जातेय का किंवा कोणत्याही अडचणींना हिमतीने सामोरे जाण्याचे धाडस बिंबवले जातेय का, असा प्रश्न त्यामुळेच उपस्थित व्हावा.

शिक्षणामुळे विचाराच्या कक्षा रुंदावतात. विवेकाच्या ज्योती प्रज्वलित होतात व त्यामुळे भल्या-बुºयाची जाण होते, असे सर्वसाधारणपणे बोलले जाते. बव्हंशी ते खरेही आहे, तसा अनुभवही समाजात वावरताना येतो. परंतु त्याचबरोबर अडीअडचणीच्या अगर कसोटीच्या प्रसंगी भलेभले उच्चविद्याविभूषित गांगरून गेलेलेही दिसून येतात. अर्थात, इथवरही ठीक. कारण शिक्षणाने आलेले भान संबंधितांना अधिक चिकित्सक बनवत असेल, त्यामुळे ते निर्णयप्रक्रियेत गोंधळलेले दिसूनही येत असतील कदाचित; परंतु याची पुढची पायरी गाठत प्रश्न सोडविता येत नसेल किंवा तशी शक्यता दिसत नसेल तर चक्क आयुष्य संपवायला निघण्याच्या निर्णयाप्रत ते येत असतील तर मग शिक्षणाने त्यांना काय शिकवले, असा प्रश्न उपस्थित होणे स्वाभाविक ठरावे. अनेक ठिकाणच्या विविध प्रकरणांत शिक्षित तरुण हिंमत सोडून किंवा हतबलतेतून अप्रिय निर्णय घेताना दिसून येतात, तेव्हा आश्चर्य वाटून जाते ते त्यामुळेच.

लाथ मारीन तेथे पाणी काढेन, अशी दुर्दम्य इच्छाशक्ती ज्याच्या ठायी असते ती तरुण पिढी. पण या तरुणांतील शिकलेली मुलेही आत्महत्येचा मार्ग अनुसरतानाची अलीकडची दोन उदाहरणे या संदर्भातील गंभीरता लक्षात आणून देणारी आहे. यातील एक घटना आहे सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर तालुक्यातील. ईश्वर वठार येथील अनिशा लवटे या पॉलिटेक्निकला शिकणा-या तरुणीने पंख्याला गळफास घेत आत्महत्या केली. कारण काय तर, शिक्षणाचा वाढता खर्च भागवताना वडिलांची होणारी ओढाताण तिला बघवत नव्हती. तिची एक बहीण इंजिनिअरिंगचे शिक्षण घेत आहे, तर भाऊ वारणा येथे शिकतो आहे. एक एकर शेतीतून या तीनही मुलांचा शिक्षणाचा भार पेलवत नसल्याने वडिलांवरील कर्ज वाढत होते. त्यामुळे अनिशाने आयुष्य संपविले. असे करताना जे वडील कर्जबाजारी होऊन तिला शिकवण्यासाठी धडपडत होते, त्यांच्यावर किती दु:खाचा डोंगर कोसळेल याचा विचार केला गेला नाही. हतबलतेतून तिने हे पाऊल उचलले; पण तिचे शिक्षण तिला याबाबत मार्गदर्शक ठरूशकले नाही, असेच म्हणायला हवे. शिक्षणातून विचार करण्याची क्षमता लाभली असती तर कदाचित तिने असा टोकाचा निर्णय घेतला नसता. अडचणीतून मार्ग निघण्याची वाट बघत ती परिस्थितीला सामोरे गेली असती. पण तसे होऊ शकले नाही.

दुसरे उदाहरण असेच काहीसे आहे. गुजरातच्या बडोदा येथे इंजिनिअरिंगच्या दुस-या वर्षात शिकणा-या नैतिककुमार तांडेल या विद्यार्थ्याने आपल्या भावाला किडनी मिळावी म्हणून आत्महत्या केली. मुळात, भावाच्या जगण्यासाठी अशा पद्धतीने स्वत:चे आयुष्य संपविण्याचे कुणीही समर्थन करणार नाही. कारण गरजूला किडनी मिळण्याचे अनेक मार्ग उपलब्ध आहेत. दुसरे म्हणजे आत्महत्या करूनही वेळ दवडला गेल्याने त्याची किडनी उपयोगी पडू शकली नाही. त्यामुळे इंजिनिअरिंगचे शिक्षण घेणा-या नैतिकने उगाच स्वत:चा जीव गमावल्याचे स्पष्ट व्हावे. अवयव प्रत्यारोपणासाठीची पुरेशी वैज्ञानिक माहिती नसण्यातून हे घडून आलेले दिसते. म्हणूनच अभियांत्रिकीचे शिक्षण घेऊन किंवा घेताना नैतिकने काय शिकले, असा प्रश्न उपस्थित व्हावा. यातील भाव-भावनांचा उद्वेग, असहायतेतून आलेली अपरिहार्यता आदींचा विचार ठीक असला तरी आत्महत्येचा पर्याय कसा योग्य ठरावा? शिक्षणाने मुले शिक्षित होत आहेत; पण ते सुशिक्षित होत आहेत का, यासारखा प्रश्नही त्यामुळेच केला जातो. प्रस्तुतच्या घटना पाहता व विशेषत: तंत्रशिक्षणाच्या अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांनी उचलेले पाऊल बघता, ते शिक्षणातील तंत्र शिकू पाहत होते; पण जीवनाचे तंत्र त्यांना काही उमगले नसावे असेच खेदाने म्हणता यावे. समाजमन अस्वस्थ करणा-या या घटनांकडे गांभीर्याने बघून तरुणातील हतबलतेवर इलाज शोधण्याची वेळ आली आहे, ती त्यामुळेच.

टॅग्स :educationशैक्षणिक