शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
2
'डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी नाहीच; पाकिस्तानच्या विनंतीवरुन युद्धविराम,' जयशंकर यांची स्पष्टोक्ती
3
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
4
"मी जे काही केलं ते इतिहास जमा झालं,..." गंभीर असं का म्हणाला? जाणून घ्या त्यामागची गोष्ट
5
Operation Sindoor: पाकिस्तानच्या हल्ल्यात आईवडील गमावले! राहुल गांधींनी २२ मुलांना घेतलं दत्तक
6
Eknath Khadse : 'पोलिस आधीपासूनच प्रांजल खेवलकर यांच्यावर पाळत ठेवत होते'; एकनाथ खडसेंनी पुरावेच दिले
7
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
8
खांदा फ्रॅक्चर झाला तरी आजोबांची 'ती' इच्छा केली पूर्ण; ५१ लीटर गंगाजल आणणाऱ्या नातवाचा मृत्यू
9
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
10
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
11
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
12
उद्धव ठाकरेंची मातोश्रीवर भेट, राज ठाकरेंचे ट्वीट; महायुतीला इशारा की समीकरणाचे सूचक संकेत?
13
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त
14
Mahadevi Elephant: अखेर 'महादेवी' हत्तीणीला निरोप देताना गावकऱ्यांना अश्रू अनावर; नांदणीत लोटला जनसागर
15
आणखी स्वस्त होणार कर्ज; ऑगस्टमध्ये पुन्हा एकदा रेपो दरात RBI कपात करण्याची शक्यता
16
माती खाऊन २४ कॅरेट सोने बाहेर टाकणारा बॅक्टेरिया सापडला; वैज्ञानिकांची तर लॉटरीच लागली...
17
Nag Panchami 2025: नागपंचमी का साजरी केली जाते, यामागील पौराणिक कथा वाचलीत का?
18
"पहलगाम दहशतवाद्यांचा खात्मा करणाऱ्या सैन्याला सॅल्यूट, हल्ला करणारे १०० वेळा विचार करतील"
19
चीनचा भारताला मोठा 'धक्का'! 'रेअर अर्थ' बंदीमुळे 'या' ५ क्षेत्रांवर थेट परिणाम, SBI चा गंभीर इशारा!
20
"TCS मधील कपात तर सुरुवात आहे, अजून अनेक कंपन्यांमध्ये AI चा फटका बसणारे"

पक्ष गेला, जिद्द कायम!! जाणाऱ्या मुख्य पात्रांनाच पवारांनी तुतारी फुंकायला लावली 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2024 09:57 IST

वयाच्या ३८व्या वर्षी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झालेले शरद पवार ८४व्या वर्षी रायगडावर पोहोचले, तेव्हा गेल्या साडेचार दशकांत सगळेच संदर्भ आमूलाग्र बदलून गेलेले होते.

'एक तुतारी द्या मन आणुनी', असे खरे म्हणजे शरद पवार म्हणालेले नव्हते. पण, निवडणूक आयोगाने त्यांच्या हातात ही तुतारी आणून दिली आहे. आता ती स्वप्राणाने फुंकण्याचे आव्हान शरद पवारांसमोर आहे. स्वतःच स्थापन केलेला पक्ष हातातून गेला आहे. चिन्ह गेले आहे. डझनभर आमदार वगळता सगळे आमदार गेले आहेत. 'आणखी काही जाणार आहेत', अशा बातम्या येत आहेत, अशा बातम्यांतील मुख्य पात्रांनाच पवारांनी तुतारी फुंकायला लावली हा मुद्दा वेगळा, पण चित्र एकूण सोपे नाही. 

वयाच्या ३८व्या वर्षी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झालेले शरद पवार ८४व्या वर्षी रायगडावर पोहोचले, तेव्हा गेल्या साडेचार दशकांत सगळेच संदर्भ आमूलाग्र बदलून गेलेले होते. छत्रपती शिवरायांच्या रायगडाचे रूप बदलले आणि शिवरायांच्या इतिहासाची मांडणीही बदलत गेली. रायगडाला जाग असतेच, पण त्याची 'याद' कोणाला आणि कधी येईल, याचे आडाखे मात्र बदलत असतात. इंदिरा गांधी ते नरेंद्र मोदी आणि यशवंतराव चव्हाण ते एकनाथ शिंदे असे अनेक बदल या काळात रायगडाने पाहिले. सगळे बदलले. एक मात्र कायम आहे. शरद पवार तेव्हाही झुंजत होते. आजही झुंज देत आहेत. 

१९७८मध्ये मुख्यमंत्री झालेल्या पवारांचे पुलोद सरकार इंदिरा गांधींनी १९८० मध्ये बरखास्त केल्यानंतरही शरद पवार दिल्लीला थेट आव्हान देत राहिले. पराभूत झाले. सोबतचे बहुतेक सगळे शिलेदार सोडून गेले, तरीही पवार लढत राहिले. आजही पवार लढताहेत. या लढाईचा निकाल काय लागेल, हे पवारांच्या हातात नाही. बैलजोडी, गायवासरू, चरखा, हाताचा पंजा, घड्याळ अशा चिन्हांनंतर वयाच्या ८४व्या वर्षी शरद पवार तुतारी फुंकत आहेत, ही घटना लक्षणीय अशीच. शरद पवारांचा राजकीय प्रवास एकरेषीय नाही. ते फार लवकर मुख्यमंत्री झाले खरे, मात्र दिल्लीला आव्हान देण्याच्या त्यांच्या सततच्या पवित्र्यामुळे ते अनेकदा सत्तेपासून दूर फेकले गेले. आधी इंदिरा गांधींना त्यांनी आव्हान दिले. इंदिरा गांधींच्या हत्येनंतर झालेल्या निवडणुकीत राजीव गांधी विक्रमी जागा जिंकत पंतप्रधान झाले. राजीव गांधींच्या उपस्थितीत शरद पवारांनी कॉग्रेसमध्ये प्रवेश केला आणि ते पुन्हा मुख्यमंत्रीही झाले. नंतर सोनिया गांधींना थेट आव्हान दिल्यामुळे त्यांना पंतप्रधानपदाच्या शर्यतीतून आणि पक्षातूनही बाहेर पडावे लागले. 

स्वतःचा राष्ट्रवादी कॉग्रेस पक्ष शरद पवारांनी स्थापन केला तो १९९९मध्ये, जन्मल्यापासून सत्तेचा चमचा तोंडात असण्याची सवय असल्याने २०१४ मध्ये पवारांच्या पक्षाला धक्का बसला, एकेक 'सरदार' त्यांना सोडून गेले. २०१९च्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर तर या 'आउटगोइंग ने कळस गाठला. मात्र, इडीला आव्हान देत शरद पवार उभे राहिले. त्यानंतर ते पावसात असे भिजले की त्यांच्या राजकीय आयुष्यातील अनेक डागही त्यामुळे धुऊन निघाले. महाविकास आघाडीचे सरकार राज्यात स्थापन होणे हा पुलोदपेक्षाही अतिशय वेगळा प्रयोग होता. दिल्लीला पुन्हा आव्हान देत पवारांनी महाराष्ट्रात सरकार स्थापन केले आणि ते पुन्हा एकदा पाडले गेले! त्यानंतर जसे सगळे शिलेदार त्यांना सोडून गेले, तसेच पुन्हा घडले, आणि, आहे त्यांना सोबत घेऊन पवार आता पुन्हा उभे राहिले आहेत. 'हे बळ येते कुठून?', असे विचारल्यावर पवार म्हणाले होते, "साहित्य, संगीत, कला आणि खेळ या माझ्या आंतरिक प्रेरणा आहेत !" हे त्यांचे वेगळेपण खरे, पण आज त्यांच्या हातात वय नाही. शिवाय, विरोधकांकडे सत्ता, यंत्रणा, मनुष्यबळही आहे.

 पवारांसोबत सहानुभूती असेलही, तिचे रूपांतर मतांमध्ये करण्याचे आव्हान त्यांच्यासमोर आहे. पवारांचे राजकारण नेहमीच अनपेक्षित असते म्हणूनही असेल कदाचित, पण सुरुवातीला शरद पवार विरुद्ध अजित पवार यांच्या संघर्षाकडेही अनेकजण संशयाने पाहत होते. मात्र, आता हे प्रकरण पुढच्या टप्यावर गेले आहे. अजित पवारांची प्रतिमा धडाकेबाज राजकारण्याची आहे. त्यांच्याकडे नेते आहेत. सत्ता आहे. शरद पवारांकडे उद्धव ठाकरे यांच्याप्रमाणेच सहानुभूती आहे. शिवाय, आमदार कुठे गेले, ते समजते. मतदार मात्र आमदारांसोबत जातातच, असे नाही. या मतदारांवर शरद पवारांची भिस्त आहे. शरद पवारांची 'सेकंड इनिंग' कशी असेल, हे यथावकाश समजेलही, पण 'मी अजून जहाज सोडलेले नाही', असे सांगत पवारांनी या वयात तुतारी मात्र फुंकली आहे!

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेस