शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
7
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
8
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
9
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
10
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
11
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
12
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
13
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
14
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
15
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
16
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
17
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
18
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
19
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
20
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

पक्ष गेला, जिद्द कायम!! जाणाऱ्या मुख्य पात्रांनाच पवारांनी तुतारी फुंकायला लावली 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2024 09:57 IST

वयाच्या ३८व्या वर्षी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झालेले शरद पवार ८४व्या वर्षी रायगडावर पोहोचले, तेव्हा गेल्या साडेचार दशकांत सगळेच संदर्भ आमूलाग्र बदलून गेलेले होते.

'एक तुतारी द्या मन आणुनी', असे खरे म्हणजे शरद पवार म्हणालेले नव्हते. पण, निवडणूक आयोगाने त्यांच्या हातात ही तुतारी आणून दिली आहे. आता ती स्वप्राणाने फुंकण्याचे आव्हान शरद पवारांसमोर आहे. स्वतःच स्थापन केलेला पक्ष हातातून गेला आहे. चिन्ह गेले आहे. डझनभर आमदार वगळता सगळे आमदार गेले आहेत. 'आणखी काही जाणार आहेत', अशा बातम्या येत आहेत, अशा बातम्यांतील मुख्य पात्रांनाच पवारांनी तुतारी फुंकायला लावली हा मुद्दा वेगळा, पण चित्र एकूण सोपे नाही. 

वयाच्या ३८व्या वर्षी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झालेले शरद पवार ८४व्या वर्षी रायगडावर पोहोचले, तेव्हा गेल्या साडेचार दशकांत सगळेच संदर्भ आमूलाग्र बदलून गेलेले होते. छत्रपती शिवरायांच्या रायगडाचे रूप बदलले आणि शिवरायांच्या इतिहासाची मांडणीही बदलत गेली. रायगडाला जाग असतेच, पण त्याची 'याद' कोणाला आणि कधी येईल, याचे आडाखे मात्र बदलत असतात. इंदिरा गांधी ते नरेंद्र मोदी आणि यशवंतराव चव्हाण ते एकनाथ शिंदे असे अनेक बदल या काळात रायगडाने पाहिले. सगळे बदलले. एक मात्र कायम आहे. शरद पवार तेव्हाही झुंजत होते. आजही झुंज देत आहेत. 

१९७८मध्ये मुख्यमंत्री झालेल्या पवारांचे पुलोद सरकार इंदिरा गांधींनी १९८० मध्ये बरखास्त केल्यानंतरही शरद पवार दिल्लीला थेट आव्हान देत राहिले. पराभूत झाले. सोबतचे बहुतेक सगळे शिलेदार सोडून गेले, तरीही पवार लढत राहिले. आजही पवार लढताहेत. या लढाईचा निकाल काय लागेल, हे पवारांच्या हातात नाही. बैलजोडी, गायवासरू, चरखा, हाताचा पंजा, घड्याळ अशा चिन्हांनंतर वयाच्या ८४व्या वर्षी शरद पवार तुतारी फुंकत आहेत, ही घटना लक्षणीय अशीच. शरद पवारांचा राजकीय प्रवास एकरेषीय नाही. ते फार लवकर मुख्यमंत्री झाले खरे, मात्र दिल्लीला आव्हान देण्याच्या त्यांच्या सततच्या पवित्र्यामुळे ते अनेकदा सत्तेपासून दूर फेकले गेले. आधी इंदिरा गांधींना त्यांनी आव्हान दिले. इंदिरा गांधींच्या हत्येनंतर झालेल्या निवडणुकीत राजीव गांधी विक्रमी जागा जिंकत पंतप्रधान झाले. राजीव गांधींच्या उपस्थितीत शरद पवारांनी कॉग्रेसमध्ये प्रवेश केला आणि ते पुन्हा मुख्यमंत्रीही झाले. नंतर सोनिया गांधींना थेट आव्हान दिल्यामुळे त्यांना पंतप्रधानपदाच्या शर्यतीतून आणि पक्षातूनही बाहेर पडावे लागले. 

स्वतःचा राष्ट्रवादी कॉग्रेस पक्ष शरद पवारांनी स्थापन केला तो १९९९मध्ये, जन्मल्यापासून सत्तेचा चमचा तोंडात असण्याची सवय असल्याने २०१४ मध्ये पवारांच्या पक्षाला धक्का बसला, एकेक 'सरदार' त्यांना सोडून गेले. २०१९च्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर तर या 'आउटगोइंग ने कळस गाठला. मात्र, इडीला आव्हान देत शरद पवार उभे राहिले. त्यानंतर ते पावसात असे भिजले की त्यांच्या राजकीय आयुष्यातील अनेक डागही त्यामुळे धुऊन निघाले. महाविकास आघाडीचे सरकार राज्यात स्थापन होणे हा पुलोदपेक्षाही अतिशय वेगळा प्रयोग होता. दिल्लीला पुन्हा आव्हान देत पवारांनी महाराष्ट्रात सरकार स्थापन केले आणि ते पुन्हा एकदा पाडले गेले! त्यानंतर जसे सगळे शिलेदार त्यांना सोडून गेले, तसेच पुन्हा घडले, आणि, आहे त्यांना सोबत घेऊन पवार आता पुन्हा उभे राहिले आहेत. 'हे बळ येते कुठून?', असे विचारल्यावर पवार म्हणाले होते, "साहित्य, संगीत, कला आणि खेळ या माझ्या आंतरिक प्रेरणा आहेत !" हे त्यांचे वेगळेपण खरे, पण आज त्यांच्या हातात वय नाही. शिवाय, विरोधकांकडे सत्ता, यंत्रणा, मनुष्यबळही आहे.

 पवारांसोबत सहानुभूती असेलही, तिचे रूपांतर मतांमध्ये करण्याचे आव्हान त्यांच्यासमोर आहे. पवारांचे राजकारण नेहमीच अनपेक्षित असते म्हणूनही असेल कदाचित, पण सुरुवातीला शरद पवार विरुद्ध अजित पवार यांच्या संघर्षाकडेही अनेकजण संशयाने पाहत होते. मात्र, आता हे प्रकरण पुढच्या टप्यावर गेले आहे. अजित पवारांची प्रतिमा धडाकेबाज राजकारण्याची आहे. त्यांच्याकडे नेते आहेत. सत्ता आहे. शरद पवारांकडे उद्धव ठाकरे यांच्याप्रमाणेच सहानुभूती आहे. शिवाय, आमदार कुठे गेले, ते समजते. मतदार मात्र आमदारांसोबत जातातच, असे नाही. या मतदारांवर शरद पवारांची भिस्त आहे. शरद पवारांची 'सेकंड इनिंग' कशी असेल, हे यथावकाश समजेलही, पण 'मी अजून जहाज सोडलेले नाही', असे सांगत पवारांनी या वयात तुतारी मात्र फुंकली आहे!

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेस