शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
3
SL vs BAN : 'काठावर पास' झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
4
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
5
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
6
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
7
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
8
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
9
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
10
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
11
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
12
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
13
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
14
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
15
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
16
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
17
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
18
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
19
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
20
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...

संपादकीय: विधानसभेचा निकाल देशाच्या राजकारणाची दिशा बदलेल, त्यांच्या बोलण्याचा अर्थ...

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2024 07:33 IST

२०१९ पेक्षाही ते यावेळी महाराष्ट्रात अधिक लक्ष घालत असल्याचे दिसत आहे. इथला विधानसभेचा निकाल देशाच्या राजकारणाची दिशा बदलेल असे शाह बोलले आहेत.

केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते अमित शाह हे महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर खूपच सक्रिय झाल्याचे दिसत आहे. गेल्या आठवड्यात विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र व उत्तर महाराष्ट्रात भाजपचे नेते, पदाधिकाऱ्यांना त्यांनी मार्गदर्शन केले होते. त्यानंतर मंगळवारी मुंबई, कोकण असे करत त्यांनी महाराष्ट्राची परिक्रमा पूर्ण केली. २०१९ पेक्षाही ते यावेळी महाराष्ट्रात अधिक लक्ष घालत असल्याचे दिसत आहे. इथला विधानसभेचा निकाल देशाच्या राजकारणाची दिशा बदलेल असे शाह बोलले आहेत. लोकसभा निवडणुकीत गेल्यावेळच्या तुलनेत भाजपला मोठा फटका बसला होता. अशावेळी महाराष्ट्रातील विजय किती मोलाचा आहे हे शाह यांच्यासारख्या मुरब्बी राजकारण्याला निश्चितच चांगले कळते.  भाजपच्या आजच्या एकूणच स्थितीचा विचार केला तर महाराष्ट्र हातून गेल्यास त्याचा वेगवेगळ्या पद्धतीने फटका बसेल. हे हेरूनच शाह यांनी भाजप व महायुतीच्या विजयासाठीची सूत्रे हाती घेतली आहेत.

आता महायुतीचे सरकार येणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेष असल्याचे म्हणतानाच त्यांनी २०२९ मध्ये भाजपचे स्वबळावर सरकार येईल, असे भाकीत वर्तविले आहे. एकीकडे युतीचे राजकारण पुढे रेटताना भाजपने पहिला मित्र (एकनाथ शिंदे) आणि वर्षभरानंतर दुसरा मित्र (अजित पवार) जोडला. शिवसेनेच्या साथीने स्वीकारलेला युतीधर्म कायम ठेवताना नवा मित्रही जोडला. युती किंवा आघाडीच्या आधारानेच गेली २९ वर्षे महाराष्ट्राचे राजकारण सुरू आहे. मात्र, आता शाह यांनी पाच वर्षांनंतर स्वबळाचे सरकार आणण्याचा मानस व्यक्त केला आहे. स्वत:च्या भरवशावर सरकार आणण्याइतपत राज्यातील प्रमुख सहा पक्षांपैकी कोणाची ताकद आजतरी दिसत नाही आणि पुढच्या दोन-चार वर्षांतही अशी ताकद कोणाकडे असेल हेही वाटत नाही; पण  आताच्या परिस्थितीत भाजपजनांचे नीतिधैर्य वाढविण्यासाठी असा आशावाद त्यांनी व्यक्त केला एवढाच सध्यातरी त्याचा मर्यादित अर्थ घ्यायला हवा. मात्र, २०१९ पासूनच्या पाच वर्षांत महाराष्ट्राच्या राजकारणाने काय काय धक्कादायक वळणे घेतली हे तुम्ही आम्ही पाहिले आहेच. दोन मोठ्या पक्षांमध्ये उभी फूट पडली. चाराचे सहा प्रमुख पक्ष झाले. महायुतीच्या बाबतीत हा प्रवाह पुढील काळात उलट्या दिशेने वाहिला तर त्यांच्या तिनाचे दोन किंवा एकच पक्ष होईल, असे काहीसे संकेत तर शाह देत नाहीत ना याचे उत्तर अर्थातच काळाच्या उदरात दडलेले आहे. अशक्यतांना शक्यतांमध्ये बदलण्याचा खेळ आपण पाच वर्षांपासून अनुभवत आहोतच, तो पुढे सुरू राहणारच नाही याची शाश्वती देता येत नाही. होऊ शकते की जे तुम्हाआम्हाला दिसते त्यापेक्षा पुढचे राजकारण शाह यांच्यासारख्या नेत्याला दिसत असावे.

शाह यांनी एका महत्त्वाच्या विषयाला हात घातला आहे. राज्यात महायुतीची सत्ता आल्यास समान नागरी कायदा लागू करण्यापासून आम्हाला कोणी रोखू शकणार नाही, असे त्यांनी म्हटले आहे. केंद्रात मोदी सरकार पुन्हा आले तर हा कायदा लागू केला जाईल, असे भाजपचे नेते लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात सांगत होते. त्यातून धार्मिक ध्रुवीकरण होऊन भाजपला फायदा होईल, असे साधेसोपे गणित मांडले गेले होते; पण झाले उलटेच. हा कायदा आणल्याने आदिवासींच्या विशेषाधिकारांवर गदा येईल, असा नरेटिव्ह तयार केला गेला आणि आदिवासी पट्ट्यात भाजपला मोठा फटका बसला. महाराष्ट्रात चारपैकी एकच आदिवासी राखीव जागा भाजपला मिळाली आणि आदिवासींची लक्षणीय मते असलेल्या अन्य मतदारसंघांमध्येही महायुतीला धक्के बसले. तरीही महाराष्ट्रात समान नागरी कायदा आणण्याचे सूतोवाच शाह यांनी केले आहे.  

मुस्लिम मतदारांनी उद्धव सेनेसह महाविकास आघाडीला लोकसभेत मोठी साथ दिलेली होती. त्या मानाने भाजपला मानणारा हिंदुत्ववादी मतदार फारशा उत्साहाने मतदानासाठी उतरलाच नव्हता. विधानसभा निवडणुकीत त्याला मतदान केंद्रापर्यंत त्वेषाने आणण्यासाठी समान नागरी कायद्याची पेरणी केलेली दिसते. गेल्या काही महिन्यात राज्यात गणेशोत्सव व इतर निमित्ताने धार्मिक ताणतणाव बघायला मिळत आहेत, त्यातून पुन्हा एकदा धार्मिक ध्रुवीकरणाचे जे प्रयत्न सुरू झाले आहेत त्या प्रयत्नांना पूरक अशी भूमिका शाह घेताना दिसत आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी व्होट जिहाद हा नवा शब्द आणला आहे. हा शब्द धार्मिकतेकडे अंगुलीनिर्देश करणारा आहे हे स्पष्टच आहे. समान नागरी कायद्याबाबतचे सूतोवाच हे निमित्त आहे, त्या निमित्ताने भाजप आपला अजेंडा पुढे रेटत आहे. त्या अजेंड्याला विधानसभेत यशाची फळे लागतील की नाही हे निकालच सांगेल.

टॅग्स :Amit Shahअमित शाहBJPभाजपा