शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

फुफाट्यातला पाक! पाकिस्तानी व्यवस्थेला संदेश देण्यासाठी हा हल्ला पुरेसा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2020 07:05 IST

लोकशाहीचे वावडे असलेला पाकिस्तान केवळ सैन्याच्या टाचेखालीच नसतो, तर दहशतवादाचाही प्रचंड पगडा तिथल्या व्यवस्थेवर आहे. हा पगडा झुगारून द्यायचा तर कराचीसारखे हल्ले होत राहतील...

पाकिस्तानातील कराची स्टॉक एक्स्चेंजवर सोमवारी दहशतवादी हल्ला झाला. अतिरेक्यांनी केलेल्या बेछूट गोळीबारात सुरक्षाकर्मींसह नऊजण बळी पडले. दहशतवादाला नाती ठाऊक नसतात. प्रसंगी तो आपल्याच पिलांना खाऊन टाकतो; पण ते पाकिस्तानी राज्यकर्त्यांच्या बथ्थड डोक्यात शिरणार नाही. जोपर्यंत सैन्याची आणि पर्यायाने आयएसआय या हिंसेचा विधिनिषेध नसलेल्या गुप्तहेर संघटनेची राजकीय आसमंताभोवती असलेली मगरमिठी सुटत नाही, तोपर्यंत त्या देशात विवेकाला स्थान मिळण्याची शक्यता नाही. दहशतवादाशी तिथल्या राज्यकर्त्यांची असलेली सलगी जगजाहीर आहे. विद्यमान पंतप्रधान इम्रान खान तर हे अतूट नाते अधूनमधून बिनदिक्कत प्रदर्शित करत असतात. हल्लीच एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी ओसामा बिन लादेनला चक्क हुतात्म्याच्या पंगतीत नेऊन बसविले. ते अनवधानाने तसे बोलले असतील असे म्हणत कुणी त्यांना संशयाचा फायदा देऊ नये यासाठी सांगावे लागेल की त्यांनी आधी बोलण्याच्या ओघात लादेन ‘मारला गेला’ असा शब्दप्रयोग केला व मग आपला शब्द मागे घेत तो ‘शहीद’ झाल्याचे विधान केले.

पाकिस्तानची मिलिटरी अकादमी असलेल्या आणि अनेक निवृत्त सेनाधिकाऱ्यांचे वास्तव्य असलेल्या अबोटाबाद येथे ओसामा राहत होता व तेथेच रात्रीच्या अंधारात हल्ला करून अमेरिकेच्या नेव्ही सिल्सनी त्याचा खात्मा केला होता. पाकिस्तानचे दहशतवादाशी असलेले स्नेहबंध दर्शविण्यास एरवी हा पुरावा पुरेसा असला तरी चीनसारख्या त्या देशाची पाठराखण करणाºया देशांना तसे वाटत नाही. परिणामी, संदिग्धतेच्या तारेवर कसरत करत इस्लामाबाद दहशतवादाला पोसत आला आहे. अमेरिका आणि युरोपच्या दटावणीमुळे इसिस किंवा तत्सम संघटनांना खुलेआम आसरा देण्याचे पाकिस्तानने टाळलेले असले, तरी मसूद अझहर आणि त्याच्या पिलावळीचा भारतद्वेष नृशंस हिंसेच्या पातळीवर नेण्यासाठी नेहमीच उत्तेजन दिले आहे. आपणही दहशतवादाची शिकार ठरलो आहोत, हा त्या देशाचा दावा वरकरणी खरा वाटेलही; कराचीत घडलेली ताजी घटना नि:संशय दहशतवाद्यांचेच कृत्य आहे; पण हे दहशतवादी काल-परवापर्यंत तिथल्या व्यवस्थेनेच पोसलेले होते. आज युरोप-अमेरिकेसह मध्यपूर्वेच्या दबावामुळे पाकिस्तान त्यांच्यावरली छत्रछाया दूर करू पाहतो आहे.

यामुळेच बिथरून जात त्यांनी कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ ठरू शकतो, याची दाहक जाणीव तिथल्या सत्ताधीशांना आणि सैन्यालाही करून दिलेली आहे. कराची हल्ल्याची जबाबदारी अद्याप कोणत्याही संघटनेने स्वीकारलेली नसली तरी त्यावरील दहशतवादी मोहर आयएसआयला सहजपणे हल्ल्याच्या उगमस्रोताकडे नेईल, याविषयी शंका नको. पाकिस्तान सध्या आर्थिक अस्थैर्याच्या लाटेत हेलकावे खात आहे. कोविड-१९मुळे उद्भवलेली परिस्थिती नवख्या इम्रान खानना व्यवस्थित हाताळता आलेली नाही. परिणामी जनतेत तीव्र क्षोभ आहे. भारतद्वेषाचा वन्ही चेतवत कळीचे अन्य मुद्दे लपविण्याची हुकमी क्लृप्तीही सध्या साथ देत नाही. काश्मीरचा पत्ता त्या देशाच्या हातून निसटण्याची शक्यता दिसू लागली आहे. एक चीन वगळता अन्य कोणताच देश मदत करण्याच्या मन:स्थितीत नाही. अफगाणिस्तानमधली सद्य:स्थितीही पाकिस्तानला प्रतिकूल बनण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. अशावेळी पाश्चिमात्य जगाकडे याचक म्हणून जायचे तर किमान अटी आणि नियमांसमोर दंडवत घालणे आले.

अटींच्या यादीत दहशतवादाच्या निर्मूलनाला अग्रस्थान असेल हे वेगळे सांगायची गरज नाही; पण इतके दिवस ज्यांना अभय दिले, त्यांना वाºयावर सोडायचे तर त्याचे परिणामही भोगावे लागतील. कराची हल्ल्याने हेच तर सूचित केले आहे. कराची स्टॉक एक्स्चेंज हे त्यामानाने बरेच सौम्य लक्ष्य होते. तेथे दहशतवादी हल्ला करण्यात मोठ्या मर्दुमकीची गरजही नव्हती; पण पाकिस्तानी व्यवस्थेला संदेश देण्यासाठी हा हल्ला पुरेसा आहे. किंबहुना हा संदेश इस्लामाबादपर्यंत प्रत्यक्ष हल्ला होण्याआधीच गेलेला असावा, अन्यथा सुसंस्कृत राजकारणी अशी आपली प्रतिमा जगापुढे जावी म्हणून आटोकाट प्रयत्न करणाऱ्या इम्रान खाननी लादेनला ‘हुतात्मा’ संबोधत दहशतवादी शक्तींसमोर पांढरे निशाण फडकवले नसते. अख्ख्या जगाचा रोष आपल्या वाट्याला येईल याचे भान असतानाही इम्रान या थरापर्यंत का गेले, याची उकल नजीकच्या भविष्यात होईलच.

 

टॅग्स :Pakistanपाकिस्तानTerror Attackदहशतवादी हल्लाBombsस्फोटके