शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

फुफाट्यातला पाक! पाकिस्तानी व्यवस्थेला संदेश देण्यासाठी हा हल्ला पुरेसा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2020 07:05 IST

लोकशाहीचे वावडे असलेला पाकिस्तान केवळ सैन्याच्या टाचेखालीच नसतो, तर दहशतवादाचाही प्रचंड पगडा तिथल्या व्यवस्थेवर आहे. हा पगडा झुगारून द्यायचा तर कराचीसारखे हल्ले होत राहतील...

पाकिस्तानातील कराची स्टॉक एक्स्चेंजवर सोमवारी दहशतवादी हल्ला झाला. अतिरेक्यांनी केलेल्या बेछूट गोळीबारात सुरक्षाकर्मींसह नऊजण बळी पडले. दहशतवादाला नाती ठाऊक नसतात. प्रसंगी तो आपल्याच पिलांना खाऊन टाकतो; पण ते पाकिस्तानी राज्यकर्त्यांच्या बथ्थड डोक्यात शिरणार नाही. जोपर्यंत सैन्याची आणि पर्यायाने आयएसआय या हिंसेचा विधिनिषेध नसलेल्या गुप्तहेर संघटनेची राजकीय आसमंताभोवती असलेली मगरमिठी सुटत नाही, तोपर्यंत त्या देशात विवेकाला स्थान मिळण्याची शक्यता नाही. दहशतवादाशी तिथल्या राज्यकर्त्यांची असलेली सलगी जगजाहीर आहे. विद्यमान पंतप्रधान इम्रान खान तर हे अतूट नाते अधूनमधून बिनदिक्कत प्रदर्शित करत असतात. हल्लीच एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी ओसामा बिन लादेनला चक्क हुतात्म्याच्या पंगतीत नेऊन बसविले. ते अनवधानाने तसे बोलले असतील असे म्हणत कुणी त्यांना संशयाचा फायदा देऊ नये यासाठी सांगावे लागेल की त्यांनी आधी बोलण्याच्या ओघात लादेन ‘मारला गेला’ असा शब्दप्रयोग केला व मग आपला शब्द मागे घेत तो ‘शहीद’ झाल्याचे विधान केले.

पाकिस्तानची मिलिटरी अकादमी असलेल्या आणि अनेक निवृत्त सेनाधिकाऱ्यांचे वास्तव्य असलेल्या अबोटाबाद येथे ओसामा राहत होता व तेथेच रात्रीच्या अंधारात हल्ला करून अमेरिकेच्या नेव्ही सिल्सनी त्याचा खात्मा केला होता. पाकिस्तानचे दहशतवादाशी असलेले स्नेहबंध दर्शविण्यास एरवी हा पुरावा पुरेसा असला तरी चीनसारख्या त्या देशाची पाठराखण करणाºया देशांना तसे वाटत नाही. परिणामी, संदिग्धतेच्या तारेवर कसरत करत इस्लामाबाद दहशतवादाला पोसत आला आहे. अमेरिका आणि युरोपच्या दटावणीमुळे इसिस किंवा तत्सम संघटनांना खुलेआम आसरा देण्याचे पाकिस्तानने टाळलेले असले, तरी मसूद अझहर आणि त्याच्या पिलावळीचा भारतद्वेष नृशंस हिंसेच्या पातळीवर नेण्यासाठी नेहमीच उत्तेजन दिले आहे. आपणही दहशतवादाची शिकार ठरलो आहोत, हा त्या देशाचा दावा वरकरणी खरा वाटेलही; कराचीत घडलेली ताजी घटना नि:संशय दहशतवाद्यांचेच कृत्य आहे; पण हे दहशतवादी काल-परवापर्यंत तिथल्या व्यवस्थेनेच पोसलेले होते. आज युरोप-अमेरिकेसह मध्यपूर्वेच्या दबावामुळे पाकिस्तान त्यांच्यावरली छत्रछाया दूर करू पाहतो आहे.

यामुळेच बिथरून जात त्यांनी कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ ठरू शकतो, याची दाहक जाणीव तिथल्या सत्ताधीशांना आणि सैन्यालाही करून दिलेली आहे. कराची हल्ल्याची जबाबदारी अद्याप कोणत्याही संघटनेने स्वीकारलेली नसली तरी त्यावरील दहशतवादी मोहर आयएसआयला सहजपणे हल्ल्याच्या उगमस्रोताकडे नेईल, याविषयी शंका नको. पाकिस्तान सध्या आर्थिक अस्थैर्याच्या लाटेत हेलकावे खात आहे. कोविड-१९मुळे उद्भवलेली परिस्थिती नवख्या इम्रान खानना व्यवस्थित हाताळता आलेली नाही. परिणामी जनतेत तीव्र क्षोभ आहे. भारतद्वेषाचा वन्ही चेतवत कळीचे अन्य मुद्दे लपविण्याची हुकमी क्लृप्तीही सध्या साथ देत नाही. काश्मीरचा पत्ता त्या देशाच्या हातून निसटण्याची शक्यता दिसू लागली आहे. एक चीन वगळता अन्य कोणताच देश मदत करण्याच्या मन:स्थितीत नाही. अफगाणिस्तानमधली सद्य:स्थितीही पाकिस्तानला प्रतिकूल बनण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. अशावेळी पाश्चिमात्य जगाकडे याचक म्हणून जायचे तर किमान अटी आणि नियमांसमोर दंडवत घालणे आले.

अटींच्या यादीत दहशतवादाच्या निर्मूलनाला अग्रस्थान असेल हे वेगळे सांगायची गरज नाही; पण इतके दिवस ज्यांना अभय दिले, त्यांना वाºयावर सोडायचे तर त्याचे परिणामही भोगावे लागतील. कराची हल्ल्याने हेच तर सूचित केले आहे. कराची स्टॉक एक्स्चेंज हे त्यामानाने बरेच सौम्य लक्ष्य होते. तेथे दहशतवादी हल्ला करण्यात मोठ्या मर्दुमकीची गरजही नव्हती; पण पाकिस्तानी व्यवस्थेला संदेश देण्यासाठी हा हल्ला पुरेसा आहे. किंबहुना हा संदेश इस्लामाबादपर्यंत प्रत्यक्ष हल्ला होण्याआधीच गेलेला असावा, अन्यथा सुसंस्कृत राजकारणी अशी आपली प्रतिमा जगापुढे जावी म्हणून आटोकाट प्रयत्न करणाऱ्या इम्रान खाननी लादेनला ‘हुतात्मा’ संबोधत दहशतवादी शक्तींसमोर पांढरे निशाण फडकवले नसते. अख्ख्या जगाचा रोष आपल्या वाट्याला येईल याचे भान असतानाही इम्रान या थरापर्यंत का गेले, याची उकल नजीकच्या भविष्यात होईलच.

 

टॅग्स :Pakistanपाकिस्तानTerror Attackदहशतवादी हल्लाBombsस्फोटके