शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
4
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
5
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
6
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
7
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
8
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
9
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
10
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
11
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
12
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
13
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
14
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
15
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
16
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
17
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
18
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
19
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
20
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 

निवडणुकीच्या स्पर्धेत भाजप आघाडीवर तर शिवसेना अद्याप हवेतच

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2019 04:11 IST

विधानसभेच्या निवडणुकांना अजून वेळ आहे. तोपर्यंत या कल्पनेचे पंख लावून राज्यभर उडण्यात गैर काही नाही. त्यामुळे शिवसेनेला राज्यातील तिचे बळ समजेल आणि राज्याच्या उपेक्षित क्षेत्रातील जनतेच्या मागण्याही जवळून समजतील.

महाराष्ट्रात भाजप-शिवसेनेचे युती सरकार सत्तेवर असले तरी त्यावर भाजपचा वरचश्मा आहे. सगळी महत्त्वाची खाती, मंत्रिपदे आणि मुख्यमंत्रीपद भाजपकडे आहे. हे सरकार स्थापन झाले तेव्हा त्यात सेनेचा समावेश नव्हता. बरेच दिवस विनवण्या व मनधरणी केल्यानंतर सेनेचे चार मंत्री त्या सरकारात घेतले गेले व त्यांना अत्यंत कमी महत्त्वाची पदे मिळतील याची काळजी घेतली गेली. लोकसभेच्या परवाच्या निवडणुकीत सेनेने भाजपला अडवून जास्तीच्या जागा मागून घेतल्या. परिणामी तिचे १८ खासदार लोकसभेत निवडून गेले. तरीही मोदींनी आपल्या सरकारात त्या पक्षाला एकच मंत्रीपद दिले व तेही (बाळासाहेबांच्या भाषेत) रिकाम्या बॅगा घेऊन फिरण्याचे. या साऱ्या पार्श्वभूमीवर शिवसेना विधानसभेच्या येत्या निवडणुकीनंतर मुख्यमंत्रीपदाची स्वप्ने पाहत असेल तर आपण तिची कीवच केलेली बरी.

सेनेला विधानसभेच्या जास्तीच्या जागा एखादवेळी मिळतील (तशीही त्या साऱ्या जागा लढविण्याची तयारी भाजपने केली आहे. त्या पक्षाचे कार्याध्यक्ष जे.पी. नड्डा त्यांच्या परवाच्या मुंबई भेटीत तसे म्हणालेही आहेत.) त्यामुळे सेनेने मुख्यमंत्रीपदाचे स्वप्न पाहणे आणि आदित्य ठाकरे यांनी आतापासूनच गुडघ्याला बाशिंग बांधून महाराष्ट्रभर त्याची जाहिरात करीत फिरणे हे सगळेच कमालीचे हास्यास्पद झाले आहे. सेना हा प्रादेशिक पक्ष आहे. त्याला भौगोलिक मर्यादा आहे. भाजपला तिच्या सामर्थ्याची व ते आपल्या मदतीवाचून निवडून येत नाही याची चांगली खात्री आहे. एका प्रादेशिक पक्षाने राष्ट्रीय पक्षाला गृहीत धरून त्याला आपल्या अटी सांगणे हा प्रकारच विनोदी व गमतीचा आहे. तरीही त्याची कुणी थट्टा केली नाही व करणार नाही. लहान मुलांच्या प्रत्येकच कृतीचे जसे कौतुक होते तसे कौतुक सेनेच्या वाट्याला आले. त्यातून कुणी कोणती स्वप्ने पाहावी यावर कुणाचे बंधन नाही. तरीही या बालिश प्रकाराला आळा घालण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘मीच उद्याचा मुख्यमंत्री असेन, मी भाजपचाही असेन आणि सेनेचाही असेन’ असे साऱ्यांना स्पष्टपणे सांगून टाकले आहे. त्यावर सेनेची प्रतिक्रिया आली नाही, ती येणारही नाही.

युती वा आघाडीतील दुय्यम दर्जाच्या पक्षाने तसेच वागायचे असते. मोदी व शहा हे सत्ताकांक्षेने केवढे पछाडले आहेत हे देश जाणतो. हातून गेलेली राज्ये जमेल त्या प्रकाराने ताब्यात आणण्यासाठी सारे बरेवाईट करणारी ही माणसे महाराष्ट्रासारखे महत्त्वाचे राज्य हातून जाऊ देईल असे ज्यांना वाटते त्यांच्या कल्पनाशक्तीचे आपण कौतुकच केले पाहिजे. मात्र काही का असेना स्वप्ने आणि कल्पनारंजन अनेकांना थोडेसे बळ देत असते. विदर्भातील शेतकरी आत्महत्या का करतात, कुपोषणाने होणारे बालमृत्यू विदर्भातच का होतात, सारा मराठवाडा भरपावसाळ्यातही तहानलेला का राहतो, तेथील धरणे सारीच्या सारी कशी आटतात आणि एवढे सारे होऊनही या प्रदेशातील माणसे शांत व स्थिर का असतात याची जरी ओळख सेनेला यामुळे पटली तर ते या दौऱ्याचे फार मोठे फलित ठरेल. अडचण एवढीच की हा दौरा पंख लावून व आकाशात उडत राहून होऊ नये. तो जमिनीवरचे वास्तव पाहत व्हावा. सेनेच्या या उड्डाणाची माहिती मिळाल्यानेच कदाचित भाजपनेही आपली राज्यभराची यात्रा परवा घोषित केली.

राहता राहिले काँग्रेस व राष्ट्रवादी पक्ष. त्या बिचाऱ्यांना त्यांचे घर अजून सावरता आले नाही. त्यातले नेते कोण, अनुयायी कोण आणि त्यात अखेरचा शब्द कुणाचा हेही जनतेला अद्याप समजले नाही. असो. निवडणुकीपर्यंत त्यांनाही या विषयाचे भान येईल अशी आशा बाळगून आपण येणाऱ्या लढतीकडे पाहू या. या साऱ्या स्पर्धेत भाजप आघाडीवर, काँग्रेस व राष्ट्रवादी अजून रेषेवर तर शिवसेना अद्याप हवेत आहे. येत्या काळात यातील कोणता पक्ष पुढे जातो व कोणते मागे राहतात हे दिसेल. तथापि, सेनेने केलेली यात्रेची तयारी साऱ्यांचे कुतूहल जागविणारी व करमणूक करणारी आहे.

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाBJPभाजपाMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019