शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India Plane Crash: विमानाच्या अपघाताचा लाईव्ह व्हिडिओ कसा बनला?; व्हिडिओ रेकॉर्ड करणारा समोर आला
2
नशिबाचा क्रूर खेळ! विजय रुपाणी यांच्या मृत्यूमागचे हैराण करणारे हे ३ दुर्दैवी योग
3
Sonam Raghuwanshi: राजाची हत्या केली अन् सोनम इंंदूरमध्ये आली, नंतर बुरखा घालून पळाली; जिथे लपली होती तो फ्लॅट सापडला!
4
SBI नं ग्राहकांना दिला झटका, 'या' स्कीमचे व्याजादर केले कमी; ग्राहकांचं होणार नुकसान
5
'इस्रायल-अमेरिका मानवतेचे शत्रू...', इराणवरील हल्ल्यावरून शिया धर्मगुरू मौलाना यासूब अब्बास भडकले
6
लटकलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला अन्...; कसा झालेला सुशांत सिंह राजपूतचा मृत्यू? ५ वर्षांनीही मृत्यूचं गूढ कायम
7
₹३१,००० कोटींच्या कंपनीचे मालक संजय कपूर यांचं 'हे' स्वप्न राहिलं अपूर्ण, कोणता होता त्यांचा व्यवसाय?
8
Air India Plane Crash: 'नो थ्रस्ट', अपघातापूर्वी पायलट सुमित सभरवालांचा ATC ला मेसेज; विमान का कोसळले?
9
Sanjay Raut : "अपघात झाला कसा, एकाच वेळेला २ इंजिन कशी बंद पडली, सायबरच्या माध्यमातून हायजॅक केली का?"
10
Ahmedabad Plane Crash : "तू हो पुढे, मी हात धुवून येतो"; मित्र मेसमधून बाहेर पडला, पण आर्यन आतच राहिला, गमावला जीव
11
"विमान पाहून महिला बेशुद्ध पडल्या, पायलटचे आभार मानते"; प्रत्यक्षदर्शींनी सांगितला भयानक अनुभव
12
७८ हजार कोटींची नेटवर्थ, कोणालाही नाव माहीत नाही.., कोण आहेत २,५०,००० कोटींची कंपनी शीनचे मालक 
13
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "MY LOVE...", विमान अपघातात गर्लफ्रेंडचा मृत्यू, डोळे पाणावणारा Video
14
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
15
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
16
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
17
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
18
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
19
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
20
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?

सरकारचाही खजिना रिकामा असा हा खासगीकरणाचा आतबट्ट्याचा व्यवहार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2019 06:22 IST

सेल्युलर आणि टेडा सेवा परवडणाऱ्या दरात मिळू लागल्याने जगाशी संपर्क ठेवण्यासाठी तळव्याएवढा मोबाइल हे जीवनाचे अविभाज्य अंग बनला, पण मोबाइल उद्योगाच्या या न भूतो विस्ताराचा केंद्र सरकारला सुमारे दोन लाख कोटी रुपयांचा फटका बसला आहे.

आर्थिक उदारीकरण आणि खासगीकरणाची कास धरल्यापासून भारतीय अर्थव्यवस्था अडीच पटीने वाढली, हे खरे, पण सरकारला मात्र याची फार मोठी झळ सोसावी लागली आहे. या धोरणामुळे एरवी सरकारची मक्तेदारी असलेल्या ज्या उद्योगांची दारे खासगी क्षेत्रासाठी खुली केली गेली, त्यापैकी दूरसंचार हे एक प्रमुख क्षेत्र. गेल्या दोन दशकांत अनेक कंपन्या या उद्योगात उतरल्या. त्यांनी जीवघेण्या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी अब्जावधी रुपयांची कर्जे घेऊन नवनवीन तंत्रज्ञान आणले. याचा ग्राहकांना मोठा फायदा झाला, पण मोबाइल उद्योगाच्या या न भूतो विस्ताराचा सुमारे दोन लाख कोटी रुपयांचा अप्रत्यक्ष बोजा ग्राहकांना सोसावा लागला आहे. खासगी दूरसंचार कंपन्यांना सुरुवातीस धंदा कितीही झाला, तरी सर्वांना एकसमान ठरावीक रक्कम परवाना शुल्क म्हणून आकारली जायची. मग कंपन्यांच्या मागणीवरून वार्षिक ढोबळ महसुलाच्या (ग्रॉस अ‍ॅडजस्टेट रेव्हेन्यू-जीएएस) ठरावीक टक्के रक्कम परवाना शुल्क म्हणून घेण्याची नवी पद्धत आली. सुरुवातीस सरकारचा वाटा १३ टक्के ठरला होता. नंतर तो कमी करून ७-८ टक्क्यांवर आणला गेला.

यासाठी कंपनीशी केलेल्या करारात ‘जीएएस’ची व्याख्या करणारे कलम घातले गेले. ते मान्य करून कंपन्यांनी धंदा सुरू केला. मग या कंपन्यांनी संघटना स्थापन करून या व्याख्येवरून वाद घालणे सुरू केले. आम्हाला ज्या उद्योगासाठी परवाना दिला आहे, फक्त त्यातूनच मिळालेल्या उत्पन्नात सरकार वाटा मागू शकते, असे त्यांचे म्हणणे होते. यासाठी त्यांनी ‘अकाउंटिंग स्टँडर्ड’चाही दाखला दिला. यावरून कोर्टकज्जे सुरू राहिल्याने सरकारला परवाना शुल्काची वार्षिक रक्कम मिळणे बंद झाले. गेल्याच आठवड्यात सर्वोच्च न्यायालयाने, सरकारची ‘जीएआर’ची व्याख्या बरोबर आहे व कंपन्यांना त्यानुसार सर्व रक्कम दंड व व्याजासह चुकती करावीच लागेल, असा निर्वाळा दिला. सरकारला परवाना शुल्क, दंड व व्याजाची एक लाख कोटी रुपयांहून अधिक थकबाकी वसूल करण्याची मुभा मिळाली. स्पेक्ट्रम खरेदीसाठी घेतलेल्या कर्जांचे मोठे डोंगर या कंपन्यांच्या डोक्यावर आहेत. एवढी थकबाकी एकदम वसूल केली, तर या कंपन्या दिवाळखोरीत जातील व सर्वच पैशावर पाणी सोडावे लागेल, अशी नवी चिंता सरकारपुढे उभी ठाकली आहे. त्यामुळे आता थकबाकीचे हप्ते बांधून देणे, व्याज व दंड कमी किंवा माफ करणे, यावरून वादावादीचा नवा अध्याय सुरू होईल.

दूरसंचार उद्योगाच्या खासगीकरणाचा हा फटका एवढ्यापुरता मर्यादित नाही. सरकारी बँकांच्या बुडीत कर्जांमध्येही या खासगी दूरसंचार कंपन्यांचा मोठा वाटा आहे. त्या बँकांना तारण्यासाठी सरकारने भांडवल पर्याप्ततेसाठी आत्तापर्यंत ७० हजार कोटी रुपयांहून अधिक रक्कम दिली आहे. दुसरीकडे या खासगी कंपन्यांना धंद्यात टिकविण्याच्या नादात सरकारने भारत संचार निगम व महानगर टेलिफोन निगम या आपल्या दूरसंचार कंपन्यांना हेतुपुरस्सर आजारी पाडले. कर्मचाऱ्यांचे पगारही न देण्याएवढी त्यांची दुरवस्था झाली. मग या दोन सरकारी कंपन्या बंद पडणे देशहिताचे नाही, याचा सरकारला साक्षात्कार झाला. यातूनच या दोन सरकारी कंपन्यांसाठी ४० हजार कोेटी रुपयांच्या ‘पुनरुज्जीवन पॅकेज’ची घोषणा झाली आहे.

या सगळ्याचा हिशेब केला, तर एकट्या दूरसंचार क्षेत्राच्या खासगीकरणाचा सरकारला बसलेला फटका दोन लाख कोटी रुपयांच्या घरात जातो. याचप्रमाणे, खासगीकरण केलेल्या वीजनिर्मिती, महामार्ग बांधणी, पायाभूत सुविधा उभारणी, तेल, कोळसा व अन्य खनिजांचे उत्पादन यासारख्या अन्य उद्योगक्षेत्रांचे रडगाणेही याहून वेगळे नाही. म्हणजे खासगीकरणातून जे उद्योग उभे राहिले, ते आजारी, त्यांना कर्जे देणाºया बँका आजारी, ज्या सेवांसाठी हे केले, त्या सेवाही अपुºया आणि सरकारचाही खजिना रिकामा असा हा खासगीकरणाचा आतबट्ट्याचा व्यवहार. यात सरस कोण, याचे केले जाणारे कुरघोडीचे राजकारण याहूनही घृणास्पद आहे.