शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

संपादकीय - बदल्यांचे राजकारण होते, पण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2020 06:13 IST

नवे सरकार आले की, आधीचे अधिकारी मोठ्या प्रमाणात बदलले जातात. उद्धव ठाकरे सरकारही तेच करीत आहे.फक्त कार्यक्षम अधिकाऱ्यांचा बळी जाऊ नये आणि सुमार अधिकाऱ्यांना बक्षिसी मिळू नये एवढीच अपेक्षा आहे.

महाविकास आघाडी सरकार मोठ्या प्रमाणात सनदी अधिका-यांच्या बदल्या करणार हे अपेक्षितच होते आणि त्यानुसार खांदेपालट सुरू झाला आहे. हे करताना कार्यक्षम अधिका-यांचा बळी जाऊ नये आणि मर्जीतील अधिकारी सुमार असताना त्यांना चांगल्या पदावर नियुक्ती मिळू नये. कारण, अशाने चांगले अधिकारी नाऊमेद होतात. अत्यंत कार्यक्षम अधिकाºयाला अगदीच कमी महत्त्वाच्या पदावर बदलून पाठविले तर ते अधिकारी त्यांच्यातील गुणवत्तेचा प्रशासनाला व्यापक फायदा करवून देऊ शकत नाहीत. मंगळवारी करण्यात आलेल्या बदल्यांमध्ये याबाबत एक उदाहरण प्राजक्ता लवंगारे यांचे देता येईल. मागासवर्गीय समाजातून आलेल्या लवंगारे या अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत आयएएस झाल्या. माहिती-जनसंपर्क, विक्रीकर, उत्पादन शुल्क, सिडको अशा महत्त्वाच्या ठिकाणी जबाबदा-या सांभाळणा-या लवंगारे यांची कर्तबगार अधिकारी म्हणून ओळख आहे. त्यांना मराठी भाषा विभागात पाठविण्यात आले.प्रशासनातील उच्चपदस्थांच्या अंतर्गत राजकारणाचा फटका त्यांना बसला असेही म्हटले जात आहे. कारण काहीही असो, पण बदल्यांमागे आकस दिसू नये आणि उत्कृष्ट अधिका-यांना डावलण्याचे राजकारण होता कामा नये. आधीच्या सरकारमध्ये विशेषत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी जवळीक होती या एका कारणावरून अधिका-यांना बदलले जात असेल तर तेही योग्य ठरणार नाही. फडणवीस यांनी दूरदृष्टी बाळगून पायाभूत सुविधा प्रकल्पांचे जाळे उभारण्यासाठी अथक प्रयत्न केले. काळाबरोबर आणि स्वत:च्या वेगाबरोबर चालू शकतील, तसेच इतर लोकाभिमुख योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी उपयुक्त ठरतील अशा अधिका-यांची टीम त्यांनी बांधली. ते एका चांगल्या राज्यकर्त्याचेच लक्षण होते. अशा टीममध्ये होते म्हणून अधिकाºयांना वेचून बाजूला करणे योग्य नाही. काही प्रमाणात तसे दिसत असले तरी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फडणवीस यांच्या मुख्यमंत्री कार्यालयात प्रधान सचिव असलेले भूषण गगराणी यांच्यासारख्या अतिशय कार्यकुशल अधिकाºयास त्याच पदावर ठेवत आपल्या कार्यालयाची प्रशासकीय धुरा सोपविली आणि केवळ ‘टीम फडणवीस’मध्ये होते म्हणून आकस बाळगला जाणार नाही, असे संकेत दिले. त्याच वेळी लोकप्रतिनिधींशी पंगा घेण्याचा स्वभाव असलेले तुकाराम मुंढे यांना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा प्रभाव असलेल्या आणि भाजपची सत्ता असलेल्या नागपुरात महापालिका आयुक्त म्हणून पाठविणे यात मात्र भाजपची पंचाईत करण्याचा हेतू नक्कीच डोकावतो. फडणवीस यांनी त्यांच्या कार्यकाळात सातत्याने आयएएस अधिकाºयांच्या बदल्या केल्या. एकेका वर्षात अधिकारी बदलले गेले. हा प्रयोग चांगला होता का? यावर वेगवेगळे तर्क दिले गेले.

वारंवार अशा बदल्या केल्याने प्रशासनात स्थैर्य राहत नाही, असे बोलले गेले. त्याच वेळी बदल्यांची टांगती तलवार अधिका-यांच्या मानेवर असली तर ते धाकाने चांगले काम करतात असे समर्थनदेखील दिले गेले. फडणवीस यांनी एक निर्णय मात्र अत्यंत चांगला घेतला. मुख्यमंत्री आणि मंत्र्यांकडे वर्षानुवर्षे एकवटलेल्या गैरसनदी अधिकाºयांच्या बदल्यांच्या अधिकारांचे त्यांनी विकेंद्रीकरण केले. खात्याचे जिल्ह्याचे प्रमुख, विभागीय प्रमुख वा सचिव यांना बदल्यांचे अधिकार देण्यात आले. त्यामुळे मंत्रालयातील ‘अर्थपूर्ण’ व्यवहारांना बºयापैकी चाप बसला. मात्र, हे व्यवहार मग खालच्या पातळीवर सुरू झाले ही दुसरी बाजू होतीच. ‘आमच्याकडे बदल्यांचे अधिकार नसल्याने अधिकारी आम्हाला जुमानत नाहीत’, असा तेव्हाच्या काही मंत्र्यांचा तक्रारीचा सूर असायचा. आताच्या मंत्रिमंडळातही बदल्यांचे अधिकार मिळावेत, अशी इच्छा बाळगणाºया मंत्र्यांची संख्या कमी नाही. ती इच्छा डावलून बदली अधिकारांचे विकेंद्रीकरण मुख्यमंत्री ठाकरे यांनी कायम ठेवावे. त्यात विविध टप्प्यांवर होत असलेल्या खाबुगिरीलाही त्यांनी आळा बसवावा. मुख्यमंत्री तसे करतील काय?

टॅग्स :Maharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारUddhav Thackerayउद्धव ठाकरेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसTransferबदली