शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

अग्रलेख : पाकिस्तानातील भडका

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2020 07:32 IST

पाकिस्तानात सध्या असंतोषाचा खूप मोठा भडका उडाला आहे, त्याबद्दल आपण काहीच करू शकत नाही आणि करूही नये; पण सीमेवर अधिक दक्ष आणि सतर्र्क राहण्याची ही वेळ आहे, हे मात्र नक्की !

 भारताशी सतत कुरापती काढणाऱ्या पाकिस्तानमध्ये सध्या भडका उडाला आहे. पोलीस आणि लष्कर एकमेकांविरोधात उभे ठाकले असून, त्याचे यापुढील काळात भयंकर परिणाम होऊ शकतील. हे सध्या केवळ सिंध प्रांतात घडत असले तरी शेजारच्या पंजाब, पाकव्याप्त काश्मीर गिलगिट, बलुचिस्तान येथेही हा आगडोंब पसरू शकतो. तसे झाल्यास पंतप्रधान इम्रान खान यांच्या खुर्चीलाच सुरुंग लागेल. सिंध प्रांताची राजधानी असलेल्या कराचीमध्ये झालेले स्फोट हे तेथील वातावरणाचे निदर्शक असले तरी स्थिती त्याहून वाईट आहे. सिंधमध्ये भुट्टो यांच्या पाकिस्तान पीपल्स पार्टीची सत्ता आहे; पण पाक लष्कराने सरकार उलथून पाडल्यात जमा आहे आणि गव्हर्नरच्या बंगल्यापाशी शेकडो लष्करी जवान तैनात आहेत. लष्कराने पोलीस ठाण्यांचाही ताबा घेतला आहे आणि लष्कराच्या या कृतीच्या विरोधात पोलीस आक्रमक झाले आहेत. 

दोन दिवसांपूर्वी कराचीच्या पोलीसप्रमुखांचेच लष्कराने पहाटे चार वाजता त्यांच्या घरात घुसून अपहरण केले आणि त्यांच्याकडून माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांच्या जावयाच्या अटकेच्या आदेशावर बळजबरीने सही घेतली. त्याआधी आणि नंतर पोलीस आणि लष्कर आमने-सामने आले, त्यांच्यात गोळीबार झाला, त्यात किमान १० जण मरण पावले. पोलीसप्रमुखांच्या अपहरणामुळे संतप्त झालेल्या तब्बल ७० पोलिसांनी सामूहिक रजेवर जाण्याची घोषणा केली, तर काहींनी राजीनामे देऊ केले. परिस्थिती फारच चिघळत चालल्याचे पाहून लष्करप्रमुख बाजवा यांनी अपहरण प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. त्यामुळे पोलिसांनीही सामूहिक रजेचा निर्णय पुढे ढकलला आहे; पण सध्या तेथील रस्त्यांवर पोलीस नव्हे, तर लष्कराचेच साम्राज्य आहे. याचे कारण इम्रान खान सरकारविरोधात लोक हजारो आणि लाखोंच्या संख्येने रस्त्यावर उतरत आहेत आणि त्यांना पोलिसांची सहानुभूती आहे, असे इम्रान खान आणि लष्कराला वाटते. पण वाढती महागाई, अन्नधान्याची टंचाई, बेकारी आणि कोरोनामुळे निर्माण झालेली नवनवी संकटे यामुळे केवळ सिंध नव्हे, तर पाकिस्तानच्या सर्व प्रांतात संताप आहे. नवाझ शरीफ, बिलावल भुट्टो यांच्यासह १४ पक्षांनी एकत्र येऊन इम्रान सरकारला आव्हानच दिले आहे. त्यामुळेच हे आव्हान मोडून काढण्यासाठी इम्रान खान यांनी लष्कराचा आसरा घेतला आहे. अर्थात, इम्रान खान पंतप्रधान असले तरी देशाची सारी सूत्रे आजही लष्कराच्या हातातच आहेत. 

इम्रान खान यांना विजयी करण्यासाठी आपण प्रयत्न केले होते, असे विधान मध्यंतरी लष्करप्रमुखांनी केले होते. आता तर इम्रान खान पाकिस्तानी लष्कर आणि चीन यांच्या हातातील बाहुलेच बनले आहेत. त्यांना सत्ता हातात ठेवण्यासाठी लष्कराची आणि आर्थिक मदतीसाठी चीनची गरज आहे. चीन वगळता कोणत्याही देशाचा पाकिस्तानवर विश्वास नाही आणि दहशतवादी कारवाया तेथूनच चालतात, यावर सर्व देशांचे एकमत आहे. पंजाब, बलुचिस्तान, गिलगिट आणि एकूणच पाकव्याप्त काश्मीरमध्ये इम्रान सरकारविरोधात कमालीचा असंतोष आहे. आता तर लष्कराचा सिंध प्रांतातील जवानांवरही विश्वास राहिल्याचे दिसत नाही. सीमेवरून सिंधमधील जवानांना हलवून तिथे अन्य प्रांतातील जवान तैनात करण्याची तयारी सुरू झाली आहे. कराचीमध्ये इतका असंतोष आहे की लोक सरकारी वाहने, कार्यालये यांची नासधूस करीत आहेत, मॉल लुटत आहेत आणि परिस्थिती हाताबाहेर चालली आहे. अशावेळी नेहमीप्रमाणे ‘या घटनांत भारताचा हात आहे’ अशी ओरड इम्रान आणि त्यांचे सहकारी सुरू करतील, लोकांचे लक्ष विचलित करण्यासाठी सीमेवर गडबड करू शकतील, अशी शक्यता भारतातील माजी लष्करी अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे आणि त्यात तथ्यही आहे. त्यामुळे पाकिस्तानातील विस्फोटक स्थितीबद्दल आपण आनंद व्यक्त करण्याचे कारण नाही, किंबहुना अधिक सावध राहण्याची ही वेळ आहे. शिवाय इम्रान खान यांना हटवून लष्कराने पाकिस्तानची सत्ता ताब्यात घेतली, तर शेजारी राष्ट्र म्हणून आपल्या अडचणीत भरच पडेल. त्या तुलनेत इम्रान खान, नवाझ शरीफ वा भुट्टो यांचा पक्ष आपल्यासाठी दगडापेक्षा वीट मऊ ठरू शकतात. 

टॅग्स :Pakistanपाकिस्तानImran Khanइम्रान खानPoliceपोलिस