शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
8
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
9
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
10
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
11
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
12
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
13
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
14
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
15
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
16
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
17
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
18
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
19
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
20
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

ठाकरे ब्रँड खरेच संपला का? भाजप-शिंदे सेनेसमोर आगामी काळात तगडे आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2026 06:34 IST

महापालिका स्तरावरील नेते गेले तरी जिवाला जीव देणारा निष्ठावंत सामान्य शिवसैनिक अजून सोबत आहे. 

मुंबई महापालिका निवडणुकीतील भारतीय जनता पक्ष व एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेचा विजय आणि मराठीच्या मुद्द्यावर एकत्र आलेल्या ठाकरे बंधूंची पीछेहाट निर्विवादपणे ऐतिहासिक आहे. तथापि, एवढ्याने ठाकरे ब्रँड संपला, उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील शिवसेना व राज ठाकरे यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेना संपली, असे म्हणणे घाईचे राजकारण आहे. एका निवडणुकीने कोणाचेही राजकारण संपत नाही, ना ते तेवढ्याने उभे राहते. तेव्हा, या निवडणुकीच्या निमित्ताने असा अंतिम निष्कर्ष काढायला नको. उलट, या निकालाने एका नव्या राजकीय लढाईची, त्याभोवती फिरणाऱ्या राजकारणाची सुरुवात मुंबई महानगर परिसरात झाली असे म्हटले तरी चालेल. मुळात उद्धव व राज यांचा पराभव दारूण, नामुष्कीजनक नाही. ही पीछेहाट सन्मानजनक आहे. निकालावरील पहिल्या प्रतिक्रियांमध्ये दोघांनीही म्हटल्याप्रमाणे मुंबई, तसेच या महानगरात राहणाऱ्या मराठी माणसांच्या हक्कांसाठी लढण्यापुरती ताकद दोघांनाही मतदारांनी दिली आहे. विशेषत: प्रतिकूल परिस्थितीत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने मिळविलेले यश अधिक लक्षणीय आहे.

मनसेचे अपयश थोडे अधिक वाटत असले तरी त्याचे कारण, गेल्या बारा वर्षांमध्ये म्हणजे २०१४ च्या लोकसभा निवडणुकीपासून दरवेळी मतदारांपुढे जाताना राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व भारतीय जनता पक्षासंबंधी बदललेल्या भूमिकांमध्ये आहे. आधी गुजरात माॅडेलचे जाहीर काैतुक, नंतर ‘लाव रे तो व्हिडीओ’ म्हणत टीका, नंतर पुन्हा साथ आणि शेवटी काडीमोड अशा भूमिका ते बदलत गेले. मराठी भाषेच्या मुद्द्यावर अखेर त्यांना सूर गवसला आणि ठाकरे बंधूंच्या एकीचा क्षण अवतरला. मतदारांवर या कोलांटउड्यांचा नक्कीच उलटा परिणाम झाला असणार. म्हणूनच त्यांना पुन्हा पुन्हा ‘आम्ही कायम एकत्र राहण्यासाठीच एकत्र आलो आहोत’ हे सांगावे लागत आहे. असो. अर्थात, दीर्घकालीन राजकारणाचा विचार करता एक मुद्दा यापेक्षा वेगळा आहे. 

शक्तिशाली विरोधकाला कमकुवत प्रतिस्पर्ध्याने ललकारणे, त्याच्याविरुद्ध ठामपणे उभे राहणे नेहमीच सामान्यांना आवडते. सामान्य माणूस अशा आव्हानवीराच्या पाठीशी उभा राहतो. महाराष्ट्राच्या राजकारणाचा विचार करता २०१४ च्या विधानसभा निवडणुकीचे उदाहरण ताजे आहे. भगवी युती म्हणून लोकसभा निवडणुकीत तब्बल ४१ जागांवर यश मिळविणारे भाजप व शिवसेना विधानसभा निवडणूक स्वतंत्रपणे लढले. भाजपच्या महाकाय आव्हानापुढे उद्धव ठाकरे उभे राहिले आणि मतदारांनी त्यांचे ६३ आमदार निवडून आणले. तितके यश शिवसेनेला त्यानंतर युती करूनदेखील मिळाले नाही. आता महापालिका निवडणुकीत तर जवळपास दोन दशकांचा दुरावा मागे टाकून उद्धव व राज हे बंधू एकत्र आले होते. मराठी भाषा, मराठी बाणा, मराठी माणूस हा भाऊबंधनाचा धागा होता. याच मुद्द्यावर त्यांनी मतदारांना साद घातली आणि मुंबईतील मराठीबहुल भागातील निकालाचे तपशील बारकाईने तपासले तर म्हणता येईल की, मतदारांनीही त्यांना भरभरून प्रतिसाद दिला. दादर, वरळी, लालबाग, शिवडी अशा जुन्या गिरणगावांतील मराठी मतदार ठाकरे बंधूंच्या पाठीशी उभे राहिले. त्यामुळेच मूळ पक्ष गेला, जनमानसात रूजलेले निवडणूक चिन्ह गेले, बहुतांश माजी नगरसेवक सोडून गेले, साधनांची वानवा, प्रतिस्पर्धी तगडा व संसाधनांनी सुसज्ज अशी सगळी प्रतिकूल परिस्थिती असतानाही उबाठा शिवसेना व मनसे या दोन्ही भावांच्या पक्षांनी लक्षणीय यश मिळविले. अर्थातच, हे यश बृहन्मुंबई महापालिकेची सत्ता कायम ठेवण्यासाठी पुरेसे नाही. जवळपास तीस वर्षांची सत्ता हातातून जाण्याची स्थिती उद्भवली आहे. तरीदेखील ठाकरे बंधूंना समाधान हेच असेल की, अगदी महापालिका स्तरावरील नेते गेले तरी जिवाला जीव देणारा निष्ठावंत सामान्य शिवसैनिक अजून सोबत आहे. 

कोणत्याही राजकीय पक्षाची खरी ताकद कार्यकर्ता हीच असते. उद्धव यांचे शिवसैनिक व राज यांचे मनसैनिक यांच्या रूपातील ही ताकद दोन्ही पक्षांना पुढची लढाई लढण्यासाठी उमेद देत राहतील. मुंबईकरांनी ज्यांच्या हाती सत्ता दिली आहे त्या भाजप व शिंदेंच्या सेनेपुढे या उमेदीचा दबाव आणि आव्हानदेखील मोठे असेल. हिंदुत्व आणि मराठी अस्मिता यात समन्वयाची कसरत त्यांना सतत करावी लागेल. धार्मिक व भाषिक ध्रुवीकरणाने इतके टोक गाठले आहे की, उद्धव व राज यांच्या नगरसेवकांना, सैनिकांना रोज नवे मुद्दे मिळत राहतील. एकंदरीत लढाई आता कुठे सुरू झाली आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : Thackeray Brand Over? BJP-Shinde Sena Face Tough Challenge Ahead.

Web Summary : Despite setbacks, the Thackeray brand isn't finished. United on Marathi identity, they retain voter support, posing a challenge to BJP-Shinde's Sena. The fight has just begun.
टॅग्स :Municipal Electionमहाराष्ट्र महानगरपालिका निवडणूक २०२६BMC Electionsमुंबई महापालिका निवडणूक निकाल २०२६Uddhav Thackerayउद्धव ठाकरेRaj Thackerayराज ठाकरे